शहरं
Join us  
Trending Stories
1
शुबमन गिलनं उद्ध्वस्त केला ४६ वर्षांपूर्वीचा 'महा रेकॉर्ड'; गावसकर, सचिन, द्रविड अन् शास्त्रींना मागे टाकत बनला 'NO.1'
2
मराठीवरून मविआत फूट? काँग्रेसला बोलावले नाही, आता ठाकरेंच्या मेळाव्याला शरद पवार जाणार नाहीत
3
ENG vs IND : बुमराहच्या अनुपस्थितीत आकाश दीपचा "मैं हूँ ना...शो"! दोन्ही शतकवीरांच्या पदरी भोपळा
4
ENG vs IND : कमबॅकसाठी टीम इंडियानं उभारला धावांचा डोंगर; पहिल्या डावात फक्त एकाच गोष्टीची खंत!
5
जे कधी नाही जमलं ते टीम इंडियानं करून दाखवलं; जड्डू अन् वॉशिंग्टनसह गिलनं उचलला सिंहाचा वाटा
6
शुबमन धमाका...; इंग्लंडमध्ये द्विशतक ठोकत केली विराटची बरोबरी; 'हे' मोठे विक्रम करत रचला इतिहास!
7
Shubman Gill Double Century : शुबमन गिलचं विक्रमी 'द्विशतक'; अशी कामगिरी करणारा पहिला भारतीय कॅप्टन
8
मोहम्मद शमी दरमहा देणार ४ लाखांची पोटगी; निर्णयावर Ex पत्नी हसीन जहाँ म्हणते- कायद्याचं राज्य आहे..!!
9
"हे दोघे एकत्र येणे म्हणजे, मराठी...; फक्त स्वार्थासाठी एकत्र येताहेत!" नारायण राणे यांचा एकाच वेळी दोन्ही ठाकरेंवर हल्लाबोल
10
Viral Video : पावसात पळत जाऊन दोरीवरचे कपडे काढण्याची गरजच नाही! 'हा' जुगाड सोशल मीडियावर व्हायरल
11
WTC मध्ये २००० धावांसह १०० पेक्षा अधिक विकेट्स! जडेजाच्या नावे झाला वर्ल्ड रेकॉर्ड
12
“शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी करावी, त्यासाठी समिती नको”; विजय वडेट्टीवारांची सरकारकडे मागणी
13
थायलंडच्या निलंबित पंतप्रधान शिनावात्रा यांनी सत्ता वाचवण्यासाठी खेळला नवा 'डाव', नेमकं काय केलं?
14
डोक्यावर पदर घेतला नाही म्हणून पती चिडला, पत्नीचा राग लेकराला आपटून काढला! चिमुकल्याचा मृत्यू
15
"तो वाद मराठी-अमराठी नव्हता"; ठाण्यात शिवसैनिकाला झालेल्या मारहाणीवर आदित्य ठाकरेंचे स्पष्टीकरण
16
Smriti Irani : "मुलगा झाला नाही म्हणून आईला सोडावं लागलं घर"; स्मृती इराणींनी सांगितला 'तो' वाईट प्रसंग
17
त्रिभाषा समितीचे अध्यक्ष नरेंद्र जाधव यांनी स्पष्ट केली भूमिका; राज ठाकरेंबद्दल म्हणाले...
18
जगातील या 5 देशांमध्ये राहतात सर्वाधिक हिंदू! टॉप टेनमध्ये 3 मुस्लीम देशांचाही समावेश, चकित करणारी आहे आकडेवारी
19
दिशा सालियान प्रकरणी आदित्य ठाकरे स्पष्टच बोलले; म्हणाले, “गेल्या ५ वर्षांत ठराविक लोक...”
20
“धारावी पुनर्विकास की देवनार डम्पिंग डील? २,३६८ कोटींचा ‘कचरा प्रकल्प’ कोणाच्या फायद्याचा?”

गोदावरी जलशुद्धीकरणासाठी बायो एंजाइमचा प्रयोग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2021 04:30 IST

नांदेड : गोदावरी नदी संसद लोकचळवळमार्फत जल शुद्धीकरण कारसेवा राबविण्यात येत आहे. नदीतील पाणी स्वच्छ होण्यासाठी गोदावरी नदी संसदने ...

नांदेड : गोदावरी नदी संसद लोकचळवळमार्फत जल शुद्धीकरण कारसेवा राबविण्यात येत आहे. नदीतील पाणी स्वच्छ होण्यासाठी गोदावरी नदी संसदने पुढाकार घेत बायो एंजाइमचा प्रयोग राबविण्यास प्रारंभ केला आहे. या उपक्रमात नागरिकांनी दहा ते पंधरा मिनिटांचा वेळ देऊन सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात येत आहे.

शहराच्या वैभवात भर घालणारी गोदावरी नदी प्रदूषणाच्या विळख्यात सापडली असून, तिचे शुद्धीकरण करण्याची जबाबदारी प्रत्येक नांदेडकराची असून, त्यासाठी प्रत्येकाने खारीचा वाटा उचलून काही सामाजिक संघटनांच्या माध्यमातून यामध्ये सहभागी होणे गरजेचे आहे. गोदावरी नदीचे प्रदूषण समाज संघटित होऊनच रोखू शकतो. सध्या जगात जैविक जलशुद्धीकरण प्रकल्प मोठ्या प्रमाणात राबविण्यात येत आहेत. त्याचा परिणाम अत्यंत ठळक दिसून येत आहे. या सिद्ध प्रयोगाच्या आधारे गोदावरी नदी संसद "जैविक जलशुद्धीकरण कारसेवा" सुरू करत आहे. केवळ आपली १० ते १५ मिनिटे या उपक्रमासाठी द्यावी लागणार आहेत. त्यासाठी बाहेर जाण्याचीही गरज नसल्याचे आयोजकांनी सांगितले. संपूर्ण अभ्यासाअंती गोदावरी नदी संसद टीमने हे आवाहन केले आहे. त्यासाठी स्वतःच्या घरीच राहून, घरातीलच वस्तू वापरून करता येणारे जैविक जलशुद्धीकरण तंत्र म्हणजे "बायो एंजाइम". त्यासाठी गुळ, संत्रे / मोसंबीची साल किंवा वाहिलेली फुले, ताक किंवा इस्ट, पाणी, प्लास्टिकची बॉटल, असे साहित्य आवश्यक आहे. त्याचे प्रमाण १:३:१०, उदा. १०० ग्रॅम, गूळ : ३०० ग्रॅम संत्रे / मोसंबी साल, वाहिलेली फुले : १ लीटर पाणी, एका प्लास्टिक बॉटलमध्ये झाकण बंद करून ३० ते ४५ दिवस सावलीत ठेवावे लागेल. पाहिले १० दिवस रोज दिवसातून १ वेळेस झाकण उघडणे (गॅस निघून जाण्यासाठी). पुढील २० दिवस २ दिवसाकाठी एक वेळेस झाकण उघडणे आवश्यक आहे. ३० दिवसात "बायो एंजाइम" तयार होईल. सदर तयार मिश्रण कपड्याने गाळून घेणे.

एक लीटर बायो एंजाइम १० हजार लीटर पाण्याला स्वछ करते.

सहभागींना मिळणार प्रमाणपत्र

तयार करण्यात आलेले "बायो एंजाइम" आपण नदी पात्रात, प्रदूषित जलसाठ्यात सोडू शकतो. "बायो एंजाइम" जलचर, वनस्पती, पशु पक्ष्यांना बिलकुल हानिकारक नाही. प्रत्येकजण गोदावरी नदी जैविक जलशुद्धीकरण कारसेवा करू शकताे. कारसेवा पूर्ण करणाऱ्यांसाठी गोदावरी नदी संसदतर्फे प्रमाणपत्र देण्यात येणार असल्याचे आयोजकांकडून दीपक मोरताळे यांनी कळविले आहे.