शहरं
Join us  
Trending Stories
1
एकहाती सत्तेपेक्षा 'मिलीजुली' सरकार देशहिताचं, जे सगळ्यांची 'मन की बात' ऐकेल; आदित्य ठाकरेंनी मांडला वेगळाच मुद्दा
2
"अरविंद केजरीवाल यांच्यासाठी माझ्याकडे एक वाईट बातमी आहे..."; काय म्हणाले अमित शाह?
3
स्लोव्हाकियाचे पंतप्रधान रॉबर्ट फिको यांच्यावर प्राणघातक हल्ला, रुग्णालयात दाखल 
4
Anil Desai, Congress: ठाकरे गटाच्या उमेदवाराशी आधी काँग्रेस कार्यकर्ते भिडले, मग खांद्यावरून घेऊन नाचले; गैरसमजातून वाद, नेमकं काय घडलं?
5
झारखंडचे मंत्री आलमगीर आलम यांना ईडीकडून अटक, सचिवाच्या नोकराच्या घरी सापडली होती कोट्यावधींची रोकड!
6
धक्कादायक! वाहन चालवत असतानाच फार्मासिस्टचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू
7
राहुल गांधींच्या पत्रिकेत पंतप्रधान बनण्याचा योग नाही; भाजप नेत्याचा खोचक टोला...
8
चार प्रमुख उमेदवार, चार फॅक्टर! कोण होणार औरंगाबादचा खासदार?; मतदानानंतर असं दिसतंय 'गणित'
9
Neeraj Chopra : नीरज चोप्राने आणखी एक सुवर्णपदक जिंकले, महाराष्ट्राच्या पाटीलची 'उत्तम' कामगिरी
10
दिव्या खोसलासोबतच्या घटस्फोटाच्या चर्चांवर भूषण कुमार यांनी सोडलं मौन; म्हणाले...
11
पती पत्नीचा असाही 'व्यवसाय'! ती ट्रक चालकांना जाळ्यात फसवायची अन् तो उकळायचा पैसे
12
CAA अंतर्गत भारताचे नागरिकत्व देण्यास सुरुवात, गृहमंत्रालयाने 14 जणांना दिली प्रमाणपत्रे...
13
"फिरायला गेले नव्हते..."! प्रियांका गांधी अमित शाह यांच्यावर भडकल्या; थायलंडला कशासाठी गेल्या होत्या? स्पष्टच सांगितलं
14
इस्रायलचं टेन्शन वाढणार! दक्षिण आफ्रिकेची आंतरराष्ट्रीय कोर्टात याचिका; उद्या होणार सुनावणी
15
ज्या सत्तेला सोनिया गांधींनी नाकारले, त्या सत्तेवर मोदींचा डोळा; मल्लिकार्जुन खरगेंचा हल्लाबोल...
16
एका लग्नाची दुसरी गोष्ट! 75 वर्षीय वडिलांसाठी लेकीने निवडली 60 वर्षांची नवरी
17
स्टार क्रिकेटपटूची बलात्काराच्या प्रकरणातून निर्दोष मुक्तता; ट्वेंटी-२० वर्ल्ड कप खेळण्यास सज्ज
18
धक्कादायक! तरुणी झोपली होती, प्रियकरानं घरात घुसून केली हत्या, घटनेनं शहर हादरलं
19
मुसलमान आणि आमचा DNA एकच; मुलाच्या प्रचारावेळी बोलताना ब्रिजभूषण भावूक  
20
गंभीर हसल्याशिवाय क्रशला प्रपोज करणार नाही; तरूणीच्या पोस्टरला भारतीय दिग्गजाचं उत्तर

नांदेड जिल्ह्यात खरीप हंगामाचे पेरणीक्षेत्र वाढण्याची अपेक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 01, 2018 12:28 AM

जिल्ह्यात २०१८ च्या खरीप हंगामात पेरणीक्षेत्र वाढण्याची अपेक्षा कृषी विभागाने व्यक्त केली आहे़ त्याच वेळी कपाशीच्या पे-यात मात्र अल्प प्रमाणात घट होईल, असा अंदाजही वर्तविण्यात आला आहे़ गतवर्षी बोंडअळीच्या हल्ल्याने कापूस उत्पादक शेतकरी आर्थिक संकटात सापडले होते़ त्यामुळे ही घट अपेक्षित आहे़

ठळक मुद्देबोंडअळीचा हल्ला : कपाशीच्या पेऱ्यात यंदा घट होण्याचा कृषी विभागाचा अंदाज

लोकमत न्यूज नेटवर्कनांदेड : जिल्ह्यात २०१८ च्या खरीप हंगामात पेरणीक्षेत्र वाढण्याची अपेक्षा कृषी विभागाने व्यक्त केली आहे़ त्याच वेळी कपाशीच्या पे-यात मात्र अल्प प्रमाणात घट होईल, असा अंदाजही वर्तविण्यात आला आहे़ गतवर्षी बोंडअळीच्या हल्ल्याने कापूस उत्पादक शेतकरी आर्थिक संकटात सापडले होते़ त्यामुळे ही घट अपेक्षित आहे़जिल्ह्याचे भौगोलिक क्षेत्र हे १० लाख ३३ हजार १०० हेक्टर आहे़ त्यात गतवर्षी खरीप हंगामात ७ लाख ७६ हजार ६६४ हेक्टर क्षेत्रावर लागवड झाली होती़ तर रबी हंगामातही १ लाख ६८ हजार १२७ हेक्टर क्षेत्रात पिकांची लागवड झाली होती़ गतवर्षी झालेल्या खरीप हंगामाच्या लागवडीत सर्वाधिक लागवड नगदी पीक म्हणून ओळखल्या जाणाºया सोयाबीन पीकाची झाली होती़ जिल्हयात ३ लाख १७ हजार ९५७ हेक्टर क्षेत्रात सोयाबीनची लागवड झाली होती़ यंदाही सोयाबीनच्या पेºयाचे प्रमाण तितकेच राहील अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे़ खरीप ज्वारीच्या लागवडीतही यंदा मोठी वाढ अपेक्षित धरली आहे़ गतवर्षी ६१ हजार ४९८ क्षेत्रात ज्वारीची लागवड झाली होती़ यंदा ती १ लाखाहून अधिक हेक्टर क्षेत्रात ज्वारीची पेरणी होईल अशी अपेक्षा आहे़ तुरीच्या पेºयातही गतवर्षीच्या प्रमाणात थोडी घट अंदाजित धरली आहे़गतवर्षी जिल्ह्यात २ लाख ६९ हजार ७७९ हेक्टर क्षेत्रात कापूस पिकाची लागवड झाली होती़ यंदा त्यात घट होईल असा अंदाज कृषी विभागाने केला आहे़ २ लाख ५० हेक्टर क्षेत्रात कापूस लागवडीची तयारी होत असल्याचा अंदाज वर्तविला आहे़जिल्ह्यात कापूस पिकाचे सर्वसाधरण क्षेत्र ३ लाख २३ हजार ७५३ हेक्टर इतके आहे़ यंदा अडीच लाख हेक्टर क्षेत्र हे संभाव्य कापूस लागवडीसाठी वापरात येईल अशी अपेक्षा आहे़ या पेरणीसाठी आवश्यक बियाणांच्या पाकिटांची संख्या १२ लाख ५३ हजार इतकी आहे़ त्यामध्ये बीटी कापूस बियाणांच्या पाकिटांची संख्या १२ लाख २८ हजार इतकी आहे़ त्यामध्ये बीजी-२ बियाणे हे १२ लाख १८ हजार तर बीजी-१ बियाणे हे १० हजार अपेक्षित आहे़ नॉन बीटी बियाणांच्या पाकिटांची संख्या ही २५ हजार अपेक्षित आहे़२०१७-१८ मध्ये ७६ हजार ९९५ मे़टन खत शिल्लक आहे़ त्याच वेळी खरिपासाठी १३ हजार ५६० मे़टन उपलब्ध झाले आहे़ त्यातील ३ हजार ५७२ मे़टन खताची विक्री आतापर्यंत झाली असून ८६ हजार ९८३ मे़टन खत अद्यापही शिल्लक आहे़ यामध्ये युरीया, डी.ए़पी़, एम़ओ़पी़, एऩपीक़े़, एस़एस़पी़, ए़एस़, एस़ओ़पी़ खत प्रकारांचा सामवेश आहे़जिल्ह्यात अनुदानीत रासायनीक खतांची विक्रीही डी.बी़टी़ अर्थात थेट लाभ हस्तांतरण प्रकल्पाअंतर्गत होत आहे़ शेतकºयांना एम़आऱपी़ दरानेच खताची विक्री करणे बंधनकारक आहे़ शेतकºयांना खत खरेदी करताना आधार कार्ड सोबत ठेवणे आवश्यक आहे़ रासायनिक खतांच्या विक्रीवरील अनुदान संबंधित उत्पादक आणि पुरवठाधारकांना अदा केले जात आहे़ नांदेड जिल्ह्यासाठी व्हिजन टेक या कंपनीकडून ८४५ आणि अ‍ॅनॉलॉजिक्स कंपनीकडून १५९ असे १००४ पीओएस मशीन उपलब्ध करुन दिल्या आहेत़जिल्ह्यात बोगस बियाणे, खते विक्रीचे प्रकार रोखण्यासाठी जिल्हास्तरावर १ आणि तालुकास्तरावर १६ भरारी पथकांची स्थापना करण्यात आली आहे़ बियाणांच्या निवडीसंदर्भात शेतकºयांनी खबरदारी घेण्याचे आवाहनही करण्यात आले आहे़ कृषी विभागाने ग्रामस्तरावर बैठका घेण्यात येणार आहे़ शेतकºयांनी सोयाबीन बियाणे घरचे वापरणे, बीज प्रक्रिया करणे, उगवण क्षमतेनुसार सोयाबीन बियाणांचा वापर करणे आवश्यक आहे़ बीटी कापूस बियाणा बाबत एकाच वाणाचा आग्रह न धरता इतर समतुल्य वाणाची निवड करावी अशी सूचना कृषी विभागाने केली आहे़जिल्ह्यात यंदा खरीप हंगामासाठी पुरेसे बियाणे उपलब्ध असल्याचा दावा कृषी विभागाने केला आहे़ ज्वारी, तूर, मुग, उडीद, सोयाबीन आदी पिकांसाठी महाबीजचे ५४ हजार क्विंटल बियाणांची मागणी करण्यात आली आहे़ खाजगी बियाणांचे प्रमाण २३ हजार ९१० क्विंटल इतके आहे़---कापसाचे क्षेत्र : ३ लाख २३ हजार ७५३ हेक्टरजिल्ह्यात कापूस पिकाचे सर्वसाधरण क्षेत्र ३ लाख २३ हजार ७५३ हेक्टर इतके आहे़ यंदा अडीच लाख हेक्टर क्षेत्र हे संभाव्य कापूस लागवडीसाठी वापरात येईल अशी अपेक्षा आहे़ या पेरणीसाठी आवश्यक बियाणांच्या पाकिटांची संख्या १२ लाख ५३ हजार इतकी आहे़गतवर्षी जिल्ह्यात २ लाख ६९ हजार ७७९ हेक्टर क्षेत्रात कापूस पिकाची लागवड झाली होती़ यंदा त्यात घट होईल असा अंदाज कृषी विभागाने केला.शेतकºयांना खत खरेदी करताना आधार कार्ड सोबत ठेवणे आवश्यक आहे़ रासायनिक खतांच्या विक्रीवरील अनुदान संबंधित उत्पादक आणि पुरवठाधारकांना अदा केले जात आहे़---भौगोलिक क्षेत्र १० लाख ३३ हजार १०० हेक्टरबीटी कापूस बियाणाबाबत एकाच वाणाचा आग्रह न धरता इतर समतुल्य वाणाची निवड करावी अशी सूचना कृषी विभागाने केली आहे़ शेतकºयांनी खते, बियाणे आदी बाबत अडचणी अथवा तक्रारी असल्यास किसान संचार टोल फ्री दूरध्वनी क्रमांक १८००२३३४००० तसेच जिल्हा नियंत्रण कक्ष दुरध्वनी क्रमांक ०२४६२-२३०१२३ या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधावा़जिल्ह्यात कापूस पिकाचे सर्वसाधारण क्षेत्र ३ लाख २३ हजार ७५३ हेक्टर इतके आहे़ यंदा अडीच लाख हेक्टर क्षेत्र हे संभाव्य कापूस लागवडीसाठी वापरात येईल अशी अपेक्षा आहे़ या पेरणीसाठी आवश्यक बियाणांच्या पाकिटांची संख्या १२ लाख ५३ हजार इतकी आहे़

टॅग्स :NandedनांदेडFarmerशेतकरी