शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईकरांनो काळजी घ्या! पुढील २४ तासांसाठी पावसाचा रेडअलर्ट, हवामान खात्याचा इशारा
2
आता खामेनेईचा खात्मा करणारच..: हॉस्पिटलवरील हल्ल्यानंतर इस्त्रायलचे खुले चॅलेंज
3
इराणच्या हल्ल्यात इस्त्रायली एअर डिफेन्स फेल; मित्राची झाली आठवण, भारताला आला कॉल, आता...
4
जगाला हादरवणारी बातमी! इराणने इस्रायलचा शेअर बाजार उडवला; तुमच्या गुंतवणुकीवर काय परिणाम होणार?
5
Rain Update: रायगडमधील तीन नद्यांनी ओलांडली धोक्याची पातळी, तीन पर्यटन ठिकाणी जाण्यास बंदी
6
...तर अमेरिका किम जोंग उन यांच्या देशावर अणुबॉम्ब टाकेल; यांनी केला मोठा दावा
7
₹८,००० कोटींची गुंतवणूक... अंबानींनी केली Coca-Cola आणि Pepsi ला टक्कर देण्याची तयारी; काय आहे प्लान?
8
मुंबई, रायगड, रत्नागिरी जिल्ह्यासह पुणे घाट, सातारा घाट परिसरात 24 तासांसाठी ऑरेंज अलर्ट
9
धक्कादायक! "लग्न ठरल्यानंतर सोनम दिवसातून फक्त..."; राजा रघुवंशीच्या मित्राचा मोठा खुलासा
10
बसच्या तिकिटामुळे हत्या उघडकीस आली! पाच वर्षाचे रिलेशन, लग्नाची इच्छा, घडलं वेगळंच
11
६ ग्रहांचे जुलैमध्ये गोचर: १० राशी मालामाल, इच्छापूर्ती काळ; अचानक पैसे मिळतील, चांगले घडेल!
12
Video: इलॉन मस्क यांना मोठा धक्का; प्रक्षेपणादरम्यान SpaceX च्या स्टारशिप रॉकेटमध्ये स्फोट
13
Air India Plane Crash: 'असं वाटलं पाकिस्ताननेच मिसाईल हल्ला केला, चार मित्र गमावले'; अपघातातून वाचलेल्या केशवने सांगितला थरार
14
ठाकरेंसोबत रात्रीतून खेळ झाला! काल मातोश्रीवर आलेले 'ते' दोन नेते आज शिंदेंच्या शिवसेनेत
15
लीड्स टेस्टपूर्वीच टीम इंडियाला मोठा झटका, 259 धावा करणाऱ्या 'या' क्रिकेटरला दुखापत! नेमकं काय घडलं? आता कशी असेल प्लेइंग 11?
16
Ashadhi Ekadashi 2025: संत नामदेवांनी पांडुरंगाच्या आरतीत उल्लेखलेली 'राही' नेमकी कोण?
17
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी राहुल गांधी यांना वाढदिवसानिमित्त दिल्या खास शुभेच्छा, म्हणाले...
18
Shree Swami Samarth: एक पैशाचा खर्च नाही, ‘हा’ उपाय एकदा करून पाहा; स्वामी कायम पाठीशी असतील, अशक्यही शक्य होईल!
19
चालत्या रिक्षात अचानक झाला स्फोट; आगीत महिला प्रवासी जिवंत जळाली, ५ जण जखमी
20
Air India Plane Crash Insurance Claim : अहमदाबाद विमान अपघात: Air India ४,०८० कोटी रुपयांचा 'इन्श्युरन्स क्लेम' करणार, इतिहासातील सर्वाधिक आकडा ठरणार?

किनवट तालुक्यातील आठ प्रकल्प जोत्याखाली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 3, 2019 00:30 IST

तालुक्यातील १९ पैकी ८ प्रकल्पांतील पाणीसाठा जोत्याखाली गेला आहे़ तर उर्वरीत प्रकल्पांत केवळ १० टक्के इतकाच जलसाठा आहे़ कोरड्या पडलेल्या प्रकल्पात गाळाचे प्रमाणही वाढल्याने व तलावातील गाळ काढण्यासाठी वाव असतानाही गाळ तलावाबाहेर पडला नाही़

ठळक मुद्दे११ प्रकल्पांत दहा टक्क्यांवरूनही कमी पाणीसाठा

किनवट : तालुक्यातील १९ पैकी ८ प्रकल्पांतील पाणीसाठा जोत्याखाली गेला आहे़ तर उर्वरीत प्रकल्पांत केवळ १० टक्के इतकाच जलसाठा आहे़ कोरड्या पडलेल्या प्रकल्पात गाळाचे प्रमाणही वाढल्याने व तलावातील गाळ काढण्यासाठी वाव असतानाही गाळ तलावाबाहेर पडला नाही़ त्यामुळे गाळमुक्त धरण गाळयुक्त शिवार हे अभियानही कागदोपत्रीच राबविल्याचे चित्र आहे़ परिणामी किनवट तालुक्यात पाणीटंचाईची भीषण समस्या निर्माण झाली आहे़सन २०१८ च्या पावसाळ्यात अनियिमित झालेल्या पावसाने ६६ टक्के एवढीच नोंद झाली़ त्यातही इस्लापूर, शिवणी व जलधारा मंडळात केवळ ५० टक्क्यांच्या आतच पावसाची नोंद झाली आहे़ कमी पाऊस झाला असला तरी गाळाने रुतलेले प्रकल्प भरल्याची नोंद झाली़ मात्र उन्हाळ्यात या प्रकल्पाची अवस्था पाहिल्यानंतर भयानक चित्र दिसत आहे़ म्हणजे, बहुतांश प्रकल्पांत गाळ मोठ्या प्रमाणात साचल्याचे स्पष्ट झाले आहे़१९ प्रकल्पांपैकी डोंगरगाव या मध्यम प्रकल्पात केवळ (३.८१) टक्के इतकाच जलसाठा आहे़ कुपटी, मुळझरा, थोरा, नांदगाव, अंबाडी, वरसांगवी, सावरगाव हे सात लघू व शिरपूर बृहत असे आठ प्रकल्प कोरड्या स्थितीत असल्याचे ३० मे च्या पाणीपातळी अहवालावरून दिसून येत आहे़ जलधारा व मांडवी प्रकल्पात एकअंकी म्हणजे (१.९६) व (१.०९) इतकाच जलसाठा आहे़सध्या प्रकल्पात असलेला जलसाठा पुढीलप्रमाणे- नागझरी (१९.७०), लोणी (३२.२८), निचपूर (२०.११), सिंदगी (२३.२५), हुडी (१९.१५), पिंपळगाव (कि) (१७.२१), पिंपळगाव (भि) (१४.७४) असा आहे़ तर निराळा, लाक्कडकोट व सिंदगी (बोधडी) या साठवण तलावातील पाणीपातळी कमी झाली आहे़ बहुतांश प्रकल्प गाळाने भरल्याने येत्या काळातही पडणाऱ्या पावसाचे पाणी गाळाअभावी वाहून जाणार असल्याने पुढच्या वर्षीही प्रकल्पातील पाणीसाठा लवकरच घटून प्रकल्प कोरडे पडणार आहेत. गाळमुक्त धरण गाळयुक्त शिवार हे अभियान राबविले असते तर तलावातील गाळ बाहेर पडला असता आणि वाहून जाणारे पाणी प्रकल्पातच राहिले असते.पाण्यासाठी वणवणकिनवट तालुक्यात दरवर्षी चांगला पाऊस होतो़ मात्र मागील वर्षी केवळ ६६ टक्के पाऊस झाला़ त्यात प्रकल्पात गाळच अधिक असल्याने प्रत्यक्ष धरणे भरली असली तरी, पाणीसाठा मात्र कमी होता़ शासनाने राबविलेल्या गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार अभियानाचाही किनवटमध्ये फज्जा उडाला़ त्यामुळे पाणीटंचाई तीव्र झाली़

टॅग्स :NandedनांदेडDamधरणWaterपाणीwater scarcityपाणी टंचाई