शहरं
Join us  
Trending Stories
1
“लिहून घ्या, काही झाले तरी आता मुंबईत...”; CM फडणवीसांनी मुंबई मनपा निवडणुकीचे रणशिंग फुंकले
2
७ तास चालली चर्चा, भारतावर लादलेला ट्रम्प टॅरिफ अमेरिका कमी करणार? पाहा, बैठकीत काय झाले...
3
“सध्याचे वातावरण सरकारला पोषक नाही, पराजयाच्या भीतीने निवडणुका पुढे ढकलल्या”: विजय वडेट्टीवार
4
इस्रायलचा येमेनच्या बंदरावर मोठा हवाई हल्ला, हुथी बंडखोरांचा दावा!
5
IND vs PAK मॅचनंतर वातावरण तापलंय! बॉयकॉटची धमकी देणाऱ्या पाक संघानं घेतला हा निर्णय
6
‘भारताने अमेरिकेच्या मध्यस्थीचा प्रस्ताव नाकारला’, पाकिस्तानने केली ट्रम्प यांच्या दाव्याची पोलखोल
7
जीएसटीत कपात अन् बँकांत गर्दी...! लोक कार लोन रद्द करू लागले, काय आहे कारण...
8
'या' मुस्लीम देशावर मोठा हल्ला करण्याच्या तयारीत इस्रायल, दिला बंदरं रिकामी करण्याचा अल्टीमेटम!
9
कोराडी परिसरात पर्यावरण पर्यटन प्रकल्पाला प्रतिवर्ष १ रूपये भाडे तत्वावर जमीन मंजूर
10
“सत्तेत नसूनही काँग्रेसकडून तरुणांच्या हाताला काम, प्रत्येक जिल्ह्यात रोजगार मेळावा”: सपकाळ
11
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह ७ जणांच्या निर्दोष मुक्ततेविरोधात उच्च न्यायालयात सुनावणी, आली मोठी अपडेट
12
केवळ ₹11,000 मध्ये आपली बनवा 'ही' नवी ढासू SUV, 52 भाषांसह AI असिस्टंन्ट अन् बरंच काही;  कंपनीनं सुरू केली बुकिंग
13
Nagpur Rains : अंदाज खरा ठरला ! मुसळधार पावसाने नागपूरकरांना झाेडपले; अजून किती दिवस असाच बरसणार?
14
Shalarth ID Scam : 'ते' ६३२ शिक्षक, मुख्याध्यापक तुरुंगात जाणार? शिक्षण क्षेत्रातील सर्वात माेठा घोटाळ्याची झाडाझडती सुरु
15
Video - "तीळ कुठे आहे हे Gemini ला कसं कळलं?"; तरुणीने सांगितला धक्कादायक अनुभव
16
Video: मोहम्मद युसूफने खालची पातळी गाठली! लाईव्ह टीव्हीवर सूर्यकुमारच्या नावाचा अभद्र उच्चार...
17
“चुकीच्या गोष्टी सुरू, खाडाखोड करून कुणबी नोंदी; रिपोर्ट मुख्यमंत्र्यांना देणार”: छगन भुजबळ
18
पडळकरांवर गुन्हा दाखल करा, अन्यथा जीवाचे बरे-वाईट करू; कुणी दिला इशारा, नेमके प्रकरण काय?
19
IND vs PAK हस्तांदोलन वादावर ऑस्ट्रेलियाचा रिकी पॉन्टींग स्पष्ट बोलला, पाकिस्तानला झापलं...
20
मेघालयमध्ये मोठी राजकीय उलथापालथ, ८ मंत्र्यांनी दिला राजीनामा, नेमकं कारण काय?

किनवट तालुक्यातील आठ प्रकल्प जोत्याखाली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 3, 2019 00:30 IST

तालुक्यातील १९ पैकी ८ प्रकल्पांतील पाणीसाठा जोत्याखाली गेला आहे़ तर उर्वरीत प्रकल्पांत केवळ १० टक्के इतकाच जलसाठा आहे़ कोरड्या पडलेल्या प्रकल्पात गाळाचे प्रमाणही वाढल्याने व तलावातील गाळ काढण्यासाठी वाव असतानाही गाळ तलावाबाहेर पडला नाही़

ठळक मुद्दे११ प्रकल्पांत दहा टक्क्यांवरूनही कमी पाणीसाठा

किनवट : तालुक्यातील १९ पैकी ८ प्रकल्पांतील पाणीसाठा जोत्याखाली गेला आहे़ तर उर्वरीत प्रकल्पांत केवळ १० टक्के इतकाच जलसाठा आहे़ कोरड्या पडलेल्या प्रकल्पात गाळाचे प्रमाणही वाढल्याने व तलावातील गाळ काढण्यासाठी वाव असतानाही गाळ तलावाबाहेर पडला नाही़ त्यामुळे गाळमुक्त धरण गाळयुक्त शिवार हे अभियानही कागदोपत्रीच राबविल्याचे चित्र आहे़ परिणामी किनवट तालुक्यात पाणीटंचाईची भीषण समस्या निर्माण झाली आहे़सन २०१८ च्या पावसाळ्यात अनियिमित झालेल्या पावसाने ६६ टक्के एवढीच नोंद झाली़ त्यातही इस्लापूर, शिवणी व जलधारा मंडळात केवळ ५० टक्क्यांच्या आतच पावसाची नोंद झाली आहे़ कमी पाऊस झाला असला तरी गाळाने रुतलेले प्रकल्प भरल्याची नोंद झाली़ मात्र उन्हाळ्यात या प्रकल्पाची अवस्था पाहिल्यानंतर भयानक चित्र दिसत आहे़ म्हणजे, बहुतांश प्रकल्पांत गाळ मोठ्या प्रमाणात साचल्याचे स्पष्ट झाले आहे़१९ प्रकल्पांपैकी डोंगरगाव या मध्यम प्रकल्पात केवळ (३.८१) टक्के इतकाच जलसाठा आहे़ कुपटी, मुळझरा, थोरा, नांदगाव, अंबाडी, वरसांगवी, सावरगाव हे सात लघू व शिरपूर बृहत असे आठ प्रकल्प कोरड्या स्थितीत असल्याचे ३० मे च्या पाणीपातळी अहवालावरून दिसून येत आहे़ जलधारा व मांडवी प्रकल्पात एकअंकी म्हणजे (१.९६) व (१.०९) इतकाच जलसाठा आहे़सध्या प्रकल्पात असलेला जलसाठा पुढीलप्रमाणे- नागझरी (१९.७०), लोणी (३२.२८), निचपूर (२०.११), सिंदगी (२३.२५), हुडी (१९.१५), पिंपळगाव (कि) (१७.२१), पिंपळगाव (भि) (१४.७४) असा आहे़ तर निराळा, लाक्कडकोट व सिंदगी (बोधडी) या साठवण तलावातील पाणीपातळी कमी झाली आहे़ बहुतांश प्रकल्प गाळाने भरल्याने येत्या काळातही पडणाऱ्या पावसाचे पाणी गाळाअभावी वाहून जाणार असल्याने पुढच्या वर्षीही प्रकल्पातील पाणीसाठा लवकरच घटून प्रकल्प कोरडे पडणार आहेत. गाळमुक्त धरण गाळयुक्त शिवार हे अभियान राबविले असते तर तलावातील गाळ बाहेर पडला असता आणि वाहून जाणारे पाणी प्रकल्पातच राहिले असते.पाण्यासाठी वणवणकिनवट तालुक्यात दरवर्षी चांगला पाऊस होतो़ मात्र मागील वर्षी केवळ ६६ टक्के पाऊस झाला़ त्यात प्रकल्पात गाळच अधिक असल्याने प्रत्यक्ष धरणे भरली असली तरी, पाणीसाठा मात्र कमी होता़ शासनाने राबविलेल्या गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार अभियानाचाही किनवटमध्ये फज्जा उडाला़ त्यामुळे पाणीटंचाई तीव्र झाली़

टॅग्स :NandedनांदेडDamधरणWaterपाणीwater scarcityपाणी टंचाई