शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
3
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
4
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
5
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
6
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
7
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
8
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
9
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
10
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
11
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
12
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
13
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
14
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
15
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
16
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
17
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
18
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
19
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
20
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
Daily Top 2Weekly Top 5

जलपुनर्भरणाच्या कामाने राज्यात शेतकऱ्यांचे अकालमृत्यू थांबतील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 28, 2019 18:56 IST

कधीकाळी भारतात महाराष्ट्र हे विकासाबाबतीत नंबर एकचे राज्य होते. पण आज दुर्दैवाने शेतकरी आत्महत्येत आपण एक नंबरवर गेलो आहोत़

ठळक मुद्देपावसाच्या पाण्याची कमतरता नाही पण त्याचे नियोजन, पुनर्भरण, साक्षरता याची कमतरता आहे. जलसाक्षरतेमुळे मराठवाडा विभागाचा आर्थिक व सामाजिक कायापालट होईल

नांदेड : तिसरे महायुद्ध रोखावयाचे असेल तर जलसाक्षरता आवश्यक आहे. दिवसेंदिवस शिक्षण आणि ज्ञानामधील दरी वाढत आहे. पण, स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ हे शिक्षणाबरोबरच ज्ञानही देत आहे. विद्यापीठाने हाती घेतलेले जलपुनर्भरणाचे काम अकालमृत्यू रोखणारे आहे, असे प्रतिपादन जलपुरुष डॉ. राजेंद्रसिंह राणा यांनी केले़ 

स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने डॉ. शंकरराव चव्हाण यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त शुक्रवारी विद्यापीठाच्या अधिसभा सभागृहात ‘तिसऱ्या महायुद्धाचे समाधान: जलसाक्षरता’ या विषयावरील व्याख्यानात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. उद्धव भोसले तर यशदा पुणेचे कार्यकारी संचालक डॉ. सुमंत पांडे, कुलसचिव डॉ. सर्जेराव शिंदे, मानवविज्ञान विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ. भगवान जाधव, ऊर्ध्व पैनगंगेचे कार्यकारी अभियंता दत्तात्रय सावंत, जलनायक डॉ. प्रमोद देशमुख, राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे संचालक डॉ. शिवराज बोकडे, डॉ. अविनाश कदम यांची प्रमुख उपस्थिती होती.

डॉ़ राणा म्हणाले, कधीकाळी भारतात महाराष्ट्र हे विकासाबाबतीत नंबर एकचे राज्य होते. पण आज दुर्दैवाने शेतकरी आत्महत्येत आपण एक नंबरवर गेलो आहोत़ विद्यापीठ हे समाजासाठी एक आदर्श असते. विद्यापीठामधूनच समाजातील तळागाळापर्यंत विविध प्रोत्साहित बाबी पोहोचत असतात. कुलगुरू डॉ. उद्धव भोसले यांच्या पुढाकाराने जलसाक्षरतेद्वारे जलपुनर्भरणाचे जे कार्य झालेले आहे ते कौतुकास्पद आहे़  मराठवाडा हा विभाग बऱ्याच प्रमाणात दुष्काळप्रदेश म्हणून ओळखला जातो. येथे पावसाच्या पाण्याची कमतरता नाही पण त्याचे नियोजन, पुनर्भरण, साक्षरता याची कमतरता आहे. येथे पडलेल्या पावसाच्या सरासरी प्रमाणामध्ये आमच्या भागात २५ टक्केच पाऊस पडतो. पण आम्ही समाजाला जलसाक्षर करून दुष्काळावर मात केली आहे. आज विद्यापीठामध्ये जे काही जलसाक्षरतेवर कार्य होत आहे. ते येथे आलेल्या चारही जिल्ह्यांतील राष्ट्रीय सेवा योजनेच्या विद्यार्थ्यांनी आपआपल्या महाविद्यालयात, गावात, घरी याबद्दल माहिती द्यावी आणि जलसाक्षरतेचे काम हाती घ्यावे, असे आवाहन डॉ़ राणा यांनी केले़  दरम्यान, यशदा पुणेचे कार्यकारी संचालक डॉ.सुमंत पांडे, जलनायक डॉ. प्रमोद देशमुख यांनीही आपले विचार मांडले.

लवकरच जलसाक्षरतेवर अभ्यासक्रम - कुलगुरू जलसाक्षरतेवर लवकरच अभ्यासक्रम तयार करण्यात येईल आणि तो अभ्यासक्रम व्यवस्थापन विषयांमध्ये समावेश करण्यात येईल, असे मत कुलगुरू डॉ. उद्धव भोसले यांनी व्यक्त केले़ त्याशिवाय येणाऱ्या शैक्षणिक वर्षापासून विद्यापीठ परिसर, लातूर आणि परभणी उपकेंद्र आणि न्यू मॉडल डिग्री कॉलेज, हिंगोली येथे प्रमाणपत्र अभ्यासक्रम सुरू करण्यात येईल, असे जाहीर केले. या जलसाक्षरतेमुळे मराठवाडा विभागाचा आर्थिक व सामाजिक कायापालट होईल, असा विश्वास डॉ़ उद्धव भोसले यांनी व्यक्त केला़ 

टॅग्स :swami ramanand tirth marathawada univercity, nandedस्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेडWaterपाणीRainपाऊसEarthपृथ्वीMarathwadaमराठवाडा