शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

Drought In Marathwada : खरीप पिके गेली, रबीची शाश्वती संपली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 11, 2018 18:00 IST

दुष्काळवाडा : यावर्षीच्या अत्यल्प पावसामुळे देगलूर तालुक्यात खरीप पिके अखेरपर्यंत सावरु शकली नाहीत.

- श्रीधर दिक्षीत बेम्बरा, ता. देगलूर, जि. नांदेड. 

यावर्षीच्या अत्यल्प पावसामुळे देगलूर तालुक्यात खरीप पिके अखेरपर्यंत सावरु शकली नाहीत. परिणामी मिळणारे उत्पन्न लागवडीला महाग ठरले. पंचमी, गणेशोत्सव आणि नवरात्र या काळात पाऊस पडेल अशी आशा होती. तीही फोल ठरली. जमिनीमध्ये आता थोडाही ओलावा नाही. अशा परिस्थितीत यावर्षी  रबीच्या पेरण्याची शक्यता नाही. 

अनेक वषार्नंतर पहिल्यांदाच शेतकऱ्यांना रबीच्या  पेरण्या करता येणार  नाहीत. पाण्याची पातळी खालावली असल्याने नोव्हेंबर महिण्यापासूनच ग्रामीण भागात  नागरिकांना पाणी टंचाईच्या झळा सोसाव्या लागणार आहेत. नगदी पिके असलेले मुग, उडीद, सोयाबीन या पिकांना जेवढी लागवड लागली तेवढेही उत्पन्न शेतकऱ्यांच्या हाती लागले नाही. बहुतांश शेतकऱ्यांची तूर अक्षरश: वाळून गेली आहे.  पांढरे सोने समजल्या जाणाऱ्या कापसाची तर अत्यंत वाईट अवस्था आहे. प्रारंभापासूनच कापसावर लाल्यासह विविध रोग पडल्याने कापसाची लागवड करुन शेतकऱ्यांच्या कर्जात वाढच झाली आहे. तालुक्यात सरासरीच्या तुलनेत केवळ ३९़५० टक्के पाऊस यावर्षी झाला. पावसाने सलग जवळपास दोन महिने पाठ फिरविल्याने रबीच्या पेरण्या शेतकरी करू शकले नाहीत. ज्या शेतकऱ्यांनी टाळकी ज्वारीचा पेरा केला, त्याचे मोड उगवले; मात्र  जमिनीत ओल नसल्याने दोन तीन दिवसातच ते जळून जात आहे. 

खरीप हंगामामध्ये  शेतकऱ्यांनी संकरित ज्वारीचा पेराच केला नाही. आता रबीच्या पेरण्या होणार नसल्याने जनावरांना चाराही मिळणार नाही. त्यामुळे कुटुंबाच्या उपजिविकेबरोबरच जनावरांसाठी चारा  कसा आणावा याची ही चिंता शेतकऱ्यांना भेडसावत आहे. शेतात पिकेच नाहीत मग शेतमजुरांच्या हाताला काम कसे मिळणार? उपासमार टाळण्यासाठी सीमावर्ती तेलंगणातील हैदराबाद येथे जाण्याची तयारी अनेकांनी सुरू केली आहे. पाणीसाठा गतवर्षीचाच

देगलूर शहरला पाणी पुरवठा करणाऱ्या करडखेड माध्यम प्रकल्पात व येडूर येथील साठवण तलावात गतवर्षीचाच पाणीसाठा आहे. तसेच तालुक्यातील लिंगनकेरूर, हणेगाव येथील दोन तलाव, भुतनहिप्परगा आणि अंबुलगा तलावात पाणीच नाही. पाणी पातळी दिवसागणिक खालावत असल्याने  विंधन विहिरी कोरड्या पडण्याच्या मार्गावर आहेत.  

रबी हंगामाला फटका बसेल खरीप हंगामात झालेल्या अपुऱ्या पावसाचा परिणाम रबी हंगामात निश्चित दिसणार आहे. जमिनीमध्ये ओलावा दिसत नाही. शासन निदेर्शानुसार विविध उपाययोजनांची कामे घेतली जातीलच. मागील वर्षभरात २४७ शेततळी पूर्ण झाली असून त्यामध्ये आजघडीला देखील पाणी उपलब्ध आहे. अशा शेतकऱ्यांनी हरभरा पेरणीसाठी तुषार किंवा ठिबकचा वापर केला तर कमी पाण्यावर जास्त क्षेत्र ओलिताखाली येऊ शकते. या दोन्ही योजनेचा लाभ घेण्यासाठी अल्पभूधारकांना ५५ टक्के, तर बाहुभूधारकांना ४५ टक्के अनुदान मिळणार आहे - शिवाजी शिंदे, तालुका कृषी अधिकारी, देगलूर. 

बळीराजा काय म्हणतो?

- १९७२ च्या दुष्काळासारखी परिस्थिती आहे. शेतकऱ्यांना जगवायचे असेल तर एकरी पंचवीस हजार रुपयांची मदत द्यावी. जनावरांसाठी चारा छावण्या तातडीने उभ्या कराव्यात. परिस्थिती हाताबाहेर जाण्यापूर्वीच उपाययोजना झाल्या पाहिजेत. - प्रकाश निवृत्तीराव पाटील, बेम्बरा 

- शेतकऱ्यांनी पदरमोड, उसनवारी करून खरिपाच्या पेरण्या केल्या आहेत. लागवडीवर जेवढा खर्च झाला तेवढेही पदरात पडले नाही. विम्याची रक्कम देऊनच भागणार नाही. अनुदान मिळाले पाहिजे आणि ते वेळेवर मिळाले पाहिजे. - बसलिंगप्पा सुलपुले, होट्टल 

- तीन वर्षांपासून दुष्काळसदृश्य परिस्थिती आहे. नजर आणेवारी झाली, प्रत्यक्ष पंचनामे किंवा सर्वेक्षण व्हावे. होणारा खर्च आणि मिळणारे उत्पन्न याचा ताळमेळ लागत नसल्याने अनुदानाचा आधार शेतकऱ्यांना तातडीने मिळावा. - कोंडीबा गव्हाणे, अल्लापूर 

- अनेक शेतकऱ्यांना नाफेडकडून तोलाई केलेल्या मालाचे पैसे मिळाले नाहीत. २०१६-१७ मधील पीक विम्याची रक्कम, कापूस अळीचे अनुदान, भावांतर योजनेतील एक हजार रुपये अनुदान अद्याप बऱ्याच शेतकऱ्यांचा हातात पडले नाहीत. - श्रीनिवास कुलकर्णी, तडखेल 

टॅग्स :droughtदुष्काळagricultureशेतीMarathwadaमराठवाडाriverनदीWaterपाणी