शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
2
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
3
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
4
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
5
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
6
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
7
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
8
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
9
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
10
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
11
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
12
व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये स्मृती मानधनाची ऐतिहासिक कामगिरी, मेग लॅनिंगचाही विक्रम मोडला!
13
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
14
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
15
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
16
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण
17
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
18
लंकेत टीम इंडियाचा डंका! आधी स्नेह राणाचा जलवा! मग सृती, हरलीनसह प्रतिकानं लुटली मैफिल
19
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...
20
राणा सांगा वाद! सपा खासदार रामजीलाल सुमन यांच्या ताफ्यावर हल्ला; अनेक वाहनांचे नुकसान...

Drought In Marathwada : दुष्काळाच्या छायेने चौकी-धर्मापुरीत घरे कुलुपबंद !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 23, 2018 20:21 IST

चौकी धर्मापुरी गावातील लोक पोट भरण्यासाठी स्थलांतरित होत आहेत.

ठळक मुद्देशेतकरी आणि भोई बांधवांनी सोडले गावकर्जाचे हप्ते फेडण्यासाठी कर्नाटक, तेलंगणात

- गोविंद शिंदे, बारुळ जि. नांदेड

‘मानार प्रकल्प’ हा  कंधारच नव्हे तर नायगाव, बिलोली, धर्माबाद या तालुक्यासाठी कामधेनू प्रकल्प म्हणून ओळखला जातो़ मात्र मागील तीन वर्षापासून हा प्रकल्प भरला नाही़ प्रकल्पाच्या भरवशावर असलेली २४ हजार हेक्टर बागायती जमीन  आता कोरडवाहू बनली आहे़ तर दुसरीकडे  मत्स्य व्यवसाय करणारे घेतलेले कर्ज फेडण्यासाठी कर्नाटक, तेलंणात  स्थलांतर करीत आहेत़  शेतकरी निसर्ग व शासनामुळे हतबल झाला आहे़बारुळ येथील मानार प्रकल्प गेले तीन वर्षांपासून भरला नसल्याने या भागात दुष्काळाची तीव्रता वाढली आहे़  प्रकल्पापासून एक कि़मी़ अंतरावरील चौकी धर्मापुरी गावातील लोक पोट भरण्यासाठी स्थलांतरित होत आहेत़   

२२० मजूर ऊसतोड, वीट्टभट्टी, मच्छीमारी, मत्स्य व्यवसाय व इतर कामासाठी कर्नाटक, हैद्राबादकडे कुटुंबासह गेल्याने गावातील गल्ली, गाव ओसाड पडल्यासारखे दिसत आहे़ धर्मापुरी या गावाची कुटुंबसंख्या १२० असून येथील गावातील नागरिकांना शेती कमी आहे़ प्रकल्पाच्या काठावर वसलेल्या या गावाचा रोजगाराचा  हा मच्छमारी आहे़  या प्रकल्पावर २४ हजार हेक्टर जमीन नेहमी बागायती असते़ पण  निसर्गाच्या अवकृपेमुळे ही शेती आता कोरडवाहू बनली आहे़ धर्मापुरीसह तेलर, वरवंट, बारुळ, चिंचोली, बाचोटी, मंगनाळी   आदी गावातील मच्छव्यवसाय करणारे व  शेतकरी कामाच्या शोधात गाव सोडून गेले आहेत़ 

बळीराजा काय म्हणतो?

२२० मजूर परप्रांतातमानार प्रकल्प तीन वर्षांपासून न भरल्याने रोजगारावर उपासमारीची वेळ आली आहे़ रोजगाराने बँकेचे, खाजगी कर्ज घेतल्याने हप्ते फेडण्यासाठी येथील २२० मजूर, शेतकरी कर्नाटक, हैद्राबाद कामाचा शोधसाठी गेले आहेत़    - बालाजी मेकलवाड (सरंपच)

गाव सोडण्याची पाळीहाताला काम नसल्याने माणसे पोटाची खळगी भरण्यासाठी उसतोड, विटभट्टीच्या कामावर गेले आहेत. शासनाकडून रोजगाराची कामे दिल्या जात नाहीत. त्यामुळे  गाव सोडण्याची वेळ आली आहे. -जमुनाबाई डुबूकवाड

हाताला काम द्यावे २० ते २५ गावातील भोई समाजासह इतर समाजही मच्छव्यवसाय करतो़ पण प्रकल्पातील अल्पसाठ्यामुळे आमच्या हाताला काम धंदा नाही़  शासनाने  हाताला काम देण्याची सोय करावी़- मुख्तार शेख (मच्छमारी व्यवसाय)

टॅग्स :droughtदुष्काळFarmerशेतकरीagricultureशेतीAgriculture Sectorशेती क्षेत्र