शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

Drought In Marathwada : दुष्काळाच्या छायेने चौकी-धर्मापुरीत घरे कुलुपबंद !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 23, 2018 20:21 IST

चौकी धर्मापुरी गावातील लोक पोट भरण्यासाठी स्थलांतरित होत आहेत.

ठळक मुद्देशेतकरी आणि भोई बांधवांनी सोडले गावकर्जाचे हप्ते फेडण्यासाठी कर्नाटक, तेलंगणात

- गोविंद शिंदे, बारुळ जि. नांदेड

‘मानार प्रकल्प’ हा  कंधारच नव्हे तर नायगाव, बिलोली, धर्माबाद या तालुक्यासाठी कामधेनू प्रकल्प म्हणून ओळखला जातो़ मात्र मागील तीन वर्षापासून हा प्रकल्प भरला नाही़ प्रकल्पाच्या भरवशावर असलेली २४ हजार हेक्टर बागायती जमीन  आता कोरडवाहू बनली आहे़ तर दुसरीकडे  मत्स्य व्यवसाय करणारे घेतलेले कर्ज फेडण्यासाठी कर्नाटक, तेलंणात  स्थलांतर करीत आहेत़  शेतकरी निसर्ग व शासनामुळे हतबल झाला आहे़बारुळ येथील मानार प्रकल्प गेले तीन वर्षांपासून भरला नसल्याने या भागात दुष्काळाची तीव्रता वाढली आहे़  प्रकल्पापासून एक कि़मी़ अंतरावरील चौकी धर्मापुरी गावातील लोक पोट भरण्यासाठी स्थलांतरित होत आहेत़   

२२० मजूर ऊसतोड, वीट्टभट्टी, मच्छीमारी, मत्स्य व्यवसाय व इतर कामासाठी कर्नाटक, हैद्राबादकडे कुटुंबासह गेल्याने गावातील गल्ली, गाव ओसाड पडल्यासारखे दिसत आहे़ धर्मापुरी या गावाची कुटुंबसंख्या १२० असून येथील गावातील नागरिकांना शेती कमी आहे़ प्रकल्पाच्या काठावर वसलेल्या या गावाचा रोजगाराचा  हा मच्छमारी आहे़  या प्रकल्पावर २४ हजार हेक्टर जमीन नेहमी बागायती असते़ पण  निसर्गाच्या अवकृपेमुळे ही शेती आता कोरडवाहू बनली आहे़ धर्मापुरीसह तेलर, वरवंट, बारुळ, चिंचोली, बाचोटी, मंगनाळी   आदी गावातील मच्छव्यवसाय करणारे व  शेतकरी कामाच्या शोधात गाव सोडून गेले आहेत़ 

बळीराजा काय म्हणतो?

२२० मजूर परप्रांतातमानार प्रकल्प तीन वर्षांपासून न भरल्याने रोजगारावर उपासमारीची वेळ आली आहे़ रोजगाराने बँकेचे, खाजगी कर्ज घेतल्याने हप्ते फेडण्यासाठी येथील २२० मजूर, शेतकरी कर्नाटक, हैद्राबाद कामाचा शोधसाठी गेले आहेत़    - बालाजी मेकलवाड (सरंपच)

गाव सोडण्याची पाळीहाताला काम नसल्याने माणसे पोटाची खळगी भरण्यासाठी उसतोड, विटभट्टीच्या कामावर गेले आहेत. शासनाकडून रोजगाराची कामे दिल्या जात नाहीत. त्यामुळे  गाव सोडण्याची वेळ आली आहे. -जमुनाबाई डुबूकवाड

हाताला काम द्यावे २० ते २५ गावातील भोई समाजासह इतर समाजही मच्छव्यवसाय करतो़ पण प्रकल्पातील अल्पसाठ्यामुळे आमच्या हाताला काम धंदा नाही़  शासनाने  हाताला काम देण्याची सोय करावी़- मुख्तार शेख (मच्छमारी व्यवसाय)

टॅग्स :droughtदुष्काळFarmerशेतकरीagricultureशेतीAgriculture Sectorशेती क्षेत्र