शहरं
Join us  
Trending Stories
1
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
2
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
3
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
4
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
5
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
6
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
7
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
8
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
9
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
10
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
11
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
12
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
13
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
14
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
15
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
16
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
17
मामाची पोरगी पटवली! सूरज चव्हाण कधी करणार लग्न? तारीख आणि ठिकाण आलं समोर
18
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
19
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."
20
RSS मध्ये मुस्लीम सहभागी होऊ शकतात का? मोहन भागवतांनी दिलं असं उत्तर, सभागृहात टाळ्यांचा एकच कडकडाट झाला!

देगलुरचे शेतकरी एक वर्षांपासून अनुदानाच्या प्रतीक्षेत; अतिवृष्टी व पुराचा बसला होता फटका   

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 6, 2018 16:56 IST

राज्यात २०१६ मध्ये अतिवृष्टी व पुरामुळे बाधित झालेल्या परंतु विमा न भरलेल्या शेतकर्‍यांना ५० टक्के अनुदान दोन हेक्टरपर्यंत देण्याचा निर्णय मुख्यमंत्र्यांनी जाहीर करून एक वर्षाचा कालावधी उलटला़ मात्र अद्यापपर्यंत नुकसानग्रस्त शेतकर्‍यांना अनुदान मिळाले नाही.

ठळक मुद्देराज्यात जून ते आॅक्टोबर २०१६ या कालावधीत ज्या भागात अतिवृष्टी व पूरपरिस्थितीमुळे शेतीपिके व फळपिकांचे नुकसान झाले होते. ज्या शेतकर्‍यांनी आपल्या पिकाचा विमा उतरविला नव्हता अशा शेतकर्‍यांना मंडळनिहाय नुकसान झालेल्या खरीप पिकांना ५० टक्के अनुदान मिळणार होते

देगलूर (नांदेड ) : राज्यात २०१६ मध्ये अतिवृष्टी व पुरामुळे बाधित झालेल्या परंतु विमा न भरलेल्या शेतकर्‍यांना ५० टक्के अनुदान दोन हेक्टरपर्यंत देण्याचा निर्णय मुख्यमंत्र्यांनी जाहीर करून एक वर्षाचा कालावधी उलटला़ मात्र अद्यापपर्यंत नुकसानग्रस्त शेतकर्‍यांना अनुदान मिळाले नाही. येणार्‍या काळात अनुदान मिळते की कालोघात हे अनुदान देण्याकडे सोयीस्कररीत्या टाळल्या जाणार, हे कालांतराने स्पष्ट होणार आहे़                         

राज्यात जून ते आॅक्टोबर २०१६ या कालावधीत ज्या भागात अतिवृष्टी व पूरपरिस्थितीमुळे शेतीपिके व फळपिकांचे नुकसान झाले होते. त्या भागातील ज्या शेतकर्‍यांनी पीक विमा भरला होता, त्या शेतकर्‍यांना पीक विमा देण्याचा तसेच ज्या शेतकर्‍यांनी आपल्या पिकाचा विमा उतरविला नव्हता अशा शेतकर्‍यांना मंडळनिहाय नुकसान झालेल्या खरीप पिकांना ५० टक्के अनुदान दोन हेक्टरपर्यंत देण्याचा निर्णय २७ डिसेंबर २०१६ रोजी झालेल्या मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकीनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केला होता. 

शेतकर्‍यांच्या दृष्टीने हा अत्यंत महत्त्वाचा निर्णय होता़ त्यामुळे शेतकर्‍यांत समाधानाचे वातावरण होते. मात्र राज्यातल्या ज्या भागात अतिवृष्टी व पूरपरिस्थितीमुळे शेतीपिके व फळपिकांचे नुकसान झाले होते, त्या भागातील तहसील कार्यालयाने पीक विमा न भरलेल्या शेतकर्‍यांची यादी वेळेवर शासनाकडे पाठविली नव्हती. परिणामी ८ फेब्रुवारी २०१७ ते १३ आॅक्टोबर २०१७ या आठ महिन्यांत महसूल व वनविभागाच्या सचिवांनी सहा स्मरणपत्रे संबंधित अधिकार्‍यांना पाठवून याद्या तात्काळ पाठविण्याचे आदेश काढले होते. 

देगलूर तालुक्यातील शेतकर्‍यांच्या याद्यासुद्धा रखडल्या होत्या. याबाबत ‘लोकमत’मध्ये वृत्त प्रसिद्ध होताच तालुक्यातील पीक विमा न भरलेल्या शेतकर्‍यांच्या याद्या व नुकसानीपोटी १९ कोटी रुपयांचा प्रस्ताव शासनाला सादर करण्यात आला. यासंदर्भात  अधिकार्‍यांनी किमान कागदी घोडे तर नाचविले. ज्या भागात अतिवृष्टीने नुकसान झाले होते, त्या भागातील कोणत्याही पक्षाच्या एका ही आमदाराने शेतकर्‍यांना अनुदानाची रक्कम केव्हा मिळणार याबाबत आवाज उठविला नाही. तसेच विरोधी पक्षाच्या नेत्यांनीसुद्धा शेतकर्‍यांच्या या महत्त्वाच्या प्रश्नासाठी शासनाला जाब विचारला नाही. 

एकाही आमदाराने प्रश्न केला नाही उपस्थित मुख्यमंत्र्यांनी जाहीर करून अनुदान मिळण्यास का विलंब होत आहे, त्यामागची नेमकी कारणमीमांसा काय आहे हा प्रश्न एखाद्या आमदाराने विधानसभेत उपस्थित केला असता तर शेतकर्‍यांना आतापर्यंत अनुदानाची रक्कम मिळाली असती. मात्र तसे काहीच झाले नाही. त्यामुळे एक वर्षाचा कालावधी उलटून गेल्यानंतरही शेतकर्‍यांना अनुदान मिळू शकले नाही हे वास्तव आहे.

टॅग्स :FarmerशेतकरीMONEYपैसाNandedनांदेड