शहरं
Join us  
Trending Stories
1
शुबमन गिल प्लेईंग ११ बाहेर बसणार, संजू सॅमसनला संधी? भारत-पाकिस्तान सामन्यापूर्वी मोठा बदल होण्याची शक्यता...
2
भारत-पाकिस्तान सामन्याच्या दिवशीच एकनाथ शिंदेंचे X अकाऊंट हॅक; राजकीय वर्तुळात खळबळ
3
Viral Video : चीनला पोहोचलेल्या भारतीय व्यक्तीने दाखवलं असं काही की पाहणारेही झाले थक्क! तुम्हीही कमाल बघाच
4
चिंता वाढली! एलियन्स, AI आणि तिसरे महायुद्ध; बाबा वेंगाची 2026 वर्षाबद्दल भविष्यवाणी काय?
5
मनोज जरांगेंच्या बैठकीत मधमाशांचा हल्ला, सहकाऱ्यांनी अंगावर उपरणी टाकून पाटलांना वाचवलं
6
"माझ्याशी लग्न कर, तुला सगळ्या सिनेमात घेईन...", प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीने अभिनेत्याला दिलेली ऑफर, नकार देताच करिअर संपवलं
7
हैदराबाद विद्यापीठाच्या निवडणुकीत ABVP चा मोठा विजय; NSUI ला नोटापेक्षा कमी मते...
8
VIRAL : फक्त तिकीटच नाही, तरुणीचे इन्स्टाग्राम अकाऊंटही तपासले! रेल्वेतील टीटीईचा धक्कादायक प्रताप
9
टॅरिफ, H1B व्हिसानंतर अमेरिकेचा आता भारतीय कोळंबीवर डोळा! मच्छीमारांवर संकट येणार?
10
पती, पत्नी आणि तो... वेगळचं प्रकरण! माहेर अन् सासरच्यांनी मिळून केलं विवाहितेचं अपहरण; पुढे जे झालं ते ऐकून व्हाल हैराण
11
लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या गर्लफ्रेंडची हत्या; सुटकेसमध्ये भरून मृतदेह १०० किमी दूर नदीत फेकला
12
५००० परदेशी लोकांना नोकरीवर बसवले, १६ हजार अमेरिकींना काढले...; ट्रम्प प्रशासनाने H-1B चा पाढाच वाचला...
13
'तुम्ही कुणाला त्रास दिला, तर अजिबात ऐकणार नाही'; अजित पवारांचा इशारा
14
निवडून आलेल्याला २ कोटी मात्र आमदार नसतानाही मला २० कोटी मिळतात; सदा सरवणकरांचं वादग्रस्त विधान
15
पंतप्रधान मोदी आज देशवासियांना संबोधित करणार; पाच वाजता कोणत्या विषयावर बोलणार?
16
शेअर बाजारातील जोखीम घटक काय असतो? तुमची गुंतवणूक वाचवून चांगला नफा कसा कमवायचा?
17
हुंड्यासाठी सुनेला मारहाण, खोलीत कोंडून विषारी साप सोडला; सासरच्यांनी गाठला क्रूरतेचा कळस
18
स्वप्नातील एसयूव्ही खरेदीची संधी! महिंद्रा स्कॉर्पिओ झाली ₹२.१५ लाखांनी स्वस्त; जाणून घ्या नवीन किंमत
19
Nagpur Crime: घरातून बाहेर पडला अन् कारमध्ये मिळाला व्यावसायिकाचा मृतदेह; मृत्यू की हत्या?
20
युद्ध युरोपच्या दाराशी! रशियन ड्रोनची नाटो देशांच्या हद्दीत घुसखोरी, तिसऱ्या महायुद्धाचा धोका वाढला?

देगलुरचे शेतकरी एक वर्षांपासून अनुदानाच्या प्रतीक्षेत; अतिवृष्टी व पुराचा बसला होता फटका   

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 6, 2018 16:56 IST

राज्यात २०१६ मध्ये अतिवृष्टी व पुरामुळे बाधित झालेल्या परंतु विमा न भरलेल्या शेतकर्‍यांना ५० टक्के अनुदान दोन हेक्टरपर्यंत देण्याचा निर्णय मुख्यमंत्र्यांनी जाहीर करून एक वर्षाचा कालावधी उलटला़ मात्र अद्यापपर्यंत नुकसानग्रस्त शेतकर्‍यांना अनुदान मिळाले नाही.

ठळक मुद्देराज्यात जून ते आॅक्टोबर २०१६ या कालावधीत ज्या भागात अतिवृष्टी व पूरपरिस्थितीमुळे शेतीपिके व फळपिकांचे नुकसान झाले होते. ज्या शेतकर्‍यांनी आपल्या पिकाचा विमा उतरविला नव्हता अशा शेतकर्‍यांना मंडळनिहाय नुकसान झालेल्या खरीप पिकांना ५० टक्के अनुदान मिळणार होते

देगलूर (नांदेड ) : राज्यात २०१६ मध्ये अतिवृष्टी व पुरामुळे बाधित झालेल्या परंतु विमा न भरलेल्या शेतकर्‍यांना ५० टक्के अनुदान दोन हेक्टरपर्यंत देण्याचा निर्णय मुख्यमंत्र्यांनी जाहीर करून एक वर्षाचा कालावधी उलटला़ मात्र अद्यापपर्यंत नुकसानग्रस्त शेतकर्‍यांना अनुदान मिळाले नाही. येणार्‍या काळात अनुदान मिळते की कालोघात हे अनुदान देण्याकडे सोयीस्कररीत्या टाळल्या जाणार, हे कालांतराने स्पष्ट होणार आहे़                         

राज्यात जून ते आॅक्टोबर २०१६ या कालावधीत ज्या भागात अतिवृष्टी व पूरपरिस्थितीमुळे शेतीपिके व फळपिकांचे नुकसान झाले होते. त्या भागातील ज्या शेतकर्‍यांनी पीक विमा भरला होता, त्या शेतकर्‍यांना पीक विमा देण्याचा तसेच ज्या शेतकर्‍यांनी आपल्या पिकाचा विमा उतरविला नव्हता अशा शेतकर्‍यांना मंडळनिहाय नुकसान झालेल्या खरीप पिकांना ५० टक्के अनुदान दोन हेक्टरपर्यंत देण्याचा निर्णय २७ डिसेंबर २०१६ रोजी झालेल्या मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकीनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केला होता. 

शेतकर्‍यांच्या दृष्टीने हा अत्यंत महत्त्वाचा निर्णय होता़ त्यामुळे शेतकर्‍यांत समाधानाचे वातावरण होते. मात्र राज्यातल्या ज्या भागात अतिवृष्टी व पूरपरिस्थितीमुळे शेतीपिके व फळपिकांचे नुकसान झाले होते, त्या भागातील तहसील कार्यालयाने पीक विमा न भरलेल्या शेतकर्‍यांची यादी वेळेवर शासनाकडे पाठविली नव्हती. परिणामी ८ फेब्रुवारी २०१७ ते १३ आॅक्टोबर २०१७ या आठ महिन्यांत महसूल व वनविभागाच्या सचिवांनी सहा स्मरणपत्रे संबंधित अधिकार्‍यांना पाठवून याद्या तात्काळ पाठविण्याचे आदेश काढले होते. 

देगलूर तालुक्यातील शेतकर्‍यांच्या याद्यासुद्धा रखडल्या होत्या. याबाबत ‘लोकमत’मध्ये वृत्त प्रसिद्ध होताच तालुक्यातील पीक विमा न भरलेल्या शेतकर्‍यांच्या याद्या व नुकसानीपोटी १९ कोटी रुपयांचा प्रस्ताव शासनाला सादर करण्यात आला. यासंदर्भात  अधिकार्‍यांनी किमान कागदी घोडे तर नाचविले. ज्या भागात अतिवृष्टीने नुकसान झाले होते, त्या भागातील कोणत्याही पक्षाच्या एका ही आमदाराने शेतकर्‍यांना अनुदानाची रक्कम केव्हा मिळणार याबाबत आवाज उठविला नाही. तसेच विरोधी पक्षाच्या नेत्यांनीसुद्धा शेतकर्‍यांच्या या महत्त्वाच्या प्रश्नासाठी शासनाला जाब विचारला नाही. 

एकाही आमदाराने प्रश्न केला नाही उपस्थित मुख्यमंत्र्यांनी जाहीर करून अनुदान मिळण्यास का विलंब होत आहे, त्यामागची नेमकी कारणमीमांसा काय आहे हा प्रश्न एखाद्या आमदाराने विधानसभेत उपस्थित केला असता तर शेतकर्‍यांना आतापर्यंत अनुदानाची रक्कम मिळाली असती. मात्र तसे काहीच झाले नाही. त्यामुळे एक वर्षाचा कालावधी उलटून गेल्यानंतरही शेतकर्‍यांना अनुदान मिळू शकले नाही हे वास्तव आहे.

टॅग्स :FarmerशेतकरीMONEYपैसाNandedनांदेड