शहरं
Join us  
Trending Stories
1
पंजाब किंग्सच्या विजयाने वाढली चेन्नई सुपर किंग्सची डोकेदुखी; Play off साठी ठोकली दावेदारी
2
"हिम्मत असेल, तर घोषणा करा..."! पंतप्रधान मोदींनी राहुल गांधींना दिली 3 आव्हानं; बघा VIDEO
3
"पोलिसांनी त्याची हत्या केली..."! सलमान खान गोळीबार प्रकरणातील आरोपीच्या आत्महत्येला नवं वळण
4
MS Dhoni ने केला डॅरिल मिचेलचा अपमान? खवळला इरफान पठाण, Video Viral 
5
100 शाळा अन् 143 कॉल…; बॉम्बच्या धमकीनंतर दिल्ली सरकार अ‍ॅक्शन मोडवर, अ‍ॅडव्हायजरी जारी
6
जय श्रीराम! राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू अयोध्येत; रामलला चरणी नतमस्तक, शरयू नदीचे केले पूजन
7
“शरद पवारच माझे मुख्य प्रचारक, यशवंत चव्हाणांना भारतरत्न देण्याचे का सुचले नाही”: उदयनराजे
8
शरद पवारांनंतर उद्धव ठाकरेंनी भरसभेत मागितली माफी; PM मोदींवर केली टीका, म्हणाले...
9
"अडीच हजार फोन केले तेव्हा..., सगळे लफडे काढतो त्याचे"; चंद्रकांत खैरे संजय शिरसाटांवर एवढं का संतापले?
10
“नरेंद्र मोदींचा भटकत आहे आत्मा, कारण आम्हाला मविआचा करायचा आहे खात्मा”: रामदास आठवले
11
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाची पहिली बॅच ठरली; पाहा कोण कोण अमेरिकेला आधी जाणार
12
"ज्यांचे स्वतःचे मत या मतदारसंघात नाही, त्यांना लोकांच्या मताची किंमत काय कळणार?"
13
"तू माझ्या आयुष्यात नसतीस तर..."; विराट कोहलीची पत्नी अनुष्का शर्मासाठी खास रोमँटिक पोस्ट
14
"केंद्र सरकारच्या धोरणांमुळे शेतकरी संकटात, पण PM मोदी याकडे ढुंकूनही पाहायला तयार नाहीत"
15
ऋतुराज गायकवाडने इतिहास घडविला! MS Dhoni चा ११ वर्षांपूर्वीचा मोठा विक्रम मोडला 
16
T20 World Cup साठी टीम इंडियात निवड झाली अन् आयपीएलमध्ये घसरली कामगिरी
17
“लोकशाही, संविधान वाचवण्यासाठी केंद्रात इंडिया आघाडीची सत्ता आणा”; नाना पटोलेंचे आवाहन
18
महायुतीच्या जागावाटपाच्या तहात अजितदादा फसले; CM शिंदे मात्र वरचढ ठरले? चर्चांना उधाण
19
“माझा लोकांशी चांगला संपर्क, स्थानिक असल्याचा नक्कीच फायदा होईल”; भूषण पाटील स्पष्टच बोलले
20
सलमान गोळीबार प्रकरण: चौकशी अर्धवट असताना आरोपीची कोठडीत आत्महत्या; दुसऱ्या कैद्याने सांगितला घटनाक्रम

गटबाजी मोडीत काढण्याचे आघाडी, युतीसमोर आव्हान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 21, 2019 12:34 AM

विधानसभा, लोकसभेला युती, आघाडी होते. आणि स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीवेळी स्वबळाचा नारा घुमतो. याचा परिणाम कार्यकर्त्यांतील सलोख्यावर होतो.

वहाबोद्दीन शेख।नायगाव बाजार : विधानसभा, लोकसभेला युती, आघाडी होते. आणि स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीवेळी स्वबळाचा नारा घुमतो. याचा परिणाम कार्यकर्त्यांतील सलोख्यावर होतो. त्यामुळेच युती असो वा आघाडी या दोघांनाही स्थानिक कार्यकर्त्यांत मनोमिलन घडविण्याचे आव्हान आहे. नेत्यांनी कार्यकर्त्यांची एकजूट ठेवण्यासाठी पुढाकार न घेतल्यास याचे परिणाम निवडणूक निकालावर दिसणार आहेत.नायगाव तालुका इतर तालुक्यांच्या तुलनेत नवीन आहे. पूर्वी तो बिलोली तालुक्यात व बिलोली विधानसभा मतदारसंघात होता़ १९९९ मध्ये नायगावला तालुक्याचा दर्जा मिळाला आणि नंतर विधानसभा मतदारसंघ म्हणून त्याला ओळख मिळाली़ काँग्रेसची जुनी मंडळी लोकांचे प्रश्न सोडविण्यासाठी दूरदृष्टीने मनातून झटत होती़ त्याचाच फायदा पुढच्या पिढीतील कार्यकर्त्यांनाही मिळत आहे़ बारूळचा मानार प्रकल्प माजी गृहमंत्री कै़शंकरराव चव्हाण यांनी उभारला़ त्यास कै़ बळवंतराव चव्हाण यांनी सहकार्य केले़ या प्रकल्पामुळे नायगाव तालुक्यातील बहुतांश शेती मानारच्या लाभक्षेत्राखाली आली़ त्यामुळे या भागातील मतदार नेहमीच काँग्रेसच्या बाजूने राहिला आहे. विद्यमान खा़ अशोकराव चव्हाण यांनीही गोदावरी नदीवर बळेगावला कोल्हापुरी बंधारा बांधला़ त्यामुळे बऱ्याच गावचा पिण्याच्या पाण्याचा व शेतीचा प्रश्न सुटला़ आ़ वसंतराव चव्हाण यांनीही पाणी, रस्त्यांसह सुगावच्या धरणाचा प्रश्न मार्गी लावला, ही काँग्रेससाठी जमेची बाजू आहे़नायगावची नगरपंचायत, पं़स़चे ३ गण, जि़प़चा एक गट व अनेक संस्था या काँग्रेसच्या ताब्यात आहेत़ विधानसभा निवडणुकीच्या वेळी मोदींची लाट असतानाही तालुक्यातून आ़ वसंतराव चव्हाण यांना दहा हजारांचे मताधिक्य मिळाले होते. आता काँग्रेस-राष्ट्रवादी लोकसभेसाठी एकत्र आले आहेत. त्याप्रमाणेच राष्ट्रवादीचे गंगाधरराव कुंटूरकर, भगवानराव भिलवंडे, राजेश कुंटूरकर, बाळासाहेब धर्माधिकारी, सूर्याजी चाडकर, वसंत सुगावे, परबता पाटील, पांडुरंग गायकवाड यांचेदेखील मनोमिलन होणे गरजेचे आहे़ तसे झाल्यास याचा फायदा निश्चितच काँग्रेसला होवू शकतो़नवमतदारांना आकर्षित करण्यासाठी कसरततालुक्यात भाजपादेखील कासव- गतीने पुढे सरकत आहे़ जि़प़चे दोन गट, पं़स़चे तीन गण आज भाजपाच्या ताब्यात आहेत़ नगरपंचायतमध्ये देखील भाजपाने एका सदस्याच्या माध्यमातून प्रवेश केला आहे. विधानसभा निवडणुकीवेळीही भाजपा उमेदवार राजेश पवार दुसऱ्या क्रमांकावर होते. आज पवार आणि माजी खा़ भास्करराव पा़ खतगावकर या दोन्ही गटांचे कार्यकर्ते मतदारांच्या गाठीभेटी घेताना दिसतात.राजेश पवार हे तालुक्यातील रहिवासी असले तरी भास्करराव पाटील खतगावकरांना मानणारा एक मोठा गटदेखील तालुक्यात आहे़ जिल्ह्याची धुरा सांभाळणारे आ़ राम पाटील रातोळीकरांना मात्र ‘कभी इधर तो कभी उधर’ करीत पक्षाचे काम करावे लागत आहे़ एकंदरीत पाहता तरूण मतदारांना आपल्याकडे ओढण्यासाठी पक्षांनी कंबर कसली असली तरी यावेळेस लोकसभेचे उमेदवार कोण? यावरच पुढील गणित ठरणार आहे़

टॅग्स :NandedनांदेडElectionनिवडणूकBJPभाजपाcongressकाँग्रेसShiv SenaशिवसेनाNCPराष्ट्रवादी काँग्रेस