शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
2
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
3
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
4
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
5
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
6
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
7
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
8
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
9
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
10
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
11
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास
12
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता
13
'फॅमिली मॅन' फेम अभिनेत्याची हत्या? मित्रांसोबत गेला होता पिकनिकला, कुटुंबियांनी व्यक्त केला संशय
14
पाकिस्तानने भारतासाठी हवाई क्षेत्र बंद केले, परंतू भारताचे वापरतोय; ते ही बंद करण्याचा विचार...
15
आप पदाधिकाऱ्याच्या मुलीचा कॅनडामध्ये संशयास्पद मृत्यू; आठवडाभरापासून होती बेपत्ता
16
"गावातल्या मुलाला आपण स्वीकारणारच नाही का?"; 'झापुक झुपूक'च्या ट्रोलिंगबद्दल केदार शिंदे स्पष्टच बोलले
17
'भालू' फेम अभिनेते, निर्माते आणि दिग्दर्शक प्रकाश भेंडे यांचं निधन
18
कॅनडामध्ये ट्रम्प विरोधाने निवडणूक फिरली; ट्रुडोंच्या पक्षाचे मार्क कार्नी नवे पंतप्रधान होणार
19
Akshaya Tritiya 2025: सोने खरेदी शक्य नाही? मग अक्षय्य तृतीयेला घरी आणा कामधेनुची मूर्ती!
20
वैभव सूर्यवंशीच्या तुफान फटकेबाजीवर बॉलिवूडकरही फिदा! युवा क्रिकेटपटूवर केला कौतुकाचा वर्षाव

उर्ध्व पैनगंगेचे पाणी पळविण्याचा घाट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 3, 2019 00:24 IST

डॉ़ शंकरराव चव्हाण यांनी अर्धापूर तालुक्यातील शेतकऱ्यांच्या बांधावर पाणी यावे यासाठी अथक प्रयत्नांतून उर्ध्व पैनगंगा प्रकल्पाचे पाणी नांदेड जिल्ह्याकडे वळविले़ परंतु, सध्याच्या भाजप सरकारची या पाण्यावर वक्रदृष्टी पडली आहे़ हे पाणी अन्यत्र वळविण्याचा घाट घातला जात आहे़

ठळक मुद्देअशोकराव चव्हाण यांचा घणाघात दलबदलूंचे घाणेरडे राजकारण मतदानाद्वारे हाणून पाडा

नांदेड : डॉ़ शंकरराव चव्हाण यांनी अर्धापूर तालुक्यातील शेतकऱ्यांच्या बांधावर पाणी यावे यासाठी अथक प्रयत्नांतून उर्ध्व पैनगंगा प्रकल्पाचे पाणी नांदेड जिल्ह्याकडे वळविले़ परंतु, सध्याच्या भाजप सरकारची या पाण्यावर वक्रदृष्टी पडली आहे़ हे पाणी अन्यत्र वळविण्याचा घाट घातला जात आहे़ एवढेच नव्हे, तर ते शेतीसाठी न वापरता नांदेड शहरासाठी वापरावे असाही दलबदलूंकडून प्रयत्न केला जात आहे़ हा प्रयत्न हाणून पाडण्यासाठी येत्या १८ तारखेला मतदानाच्या माध्यमातून भाजपासह विरोधकांना धडा शिकवा असे आवाहन खा़अशोकराव चव्हाण यांनी केले़मालेगाव येथे मंगळवारी चव्हाण यांनी पदाधिकारी-कार्यकर्त्यांशी संवाद साधला़ यावेळी मंचावर माणिकराव पाटील इंगोले, भाऊराव चव्हाण कारखान्याचे गणपतराव तिडके, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रंगराव पाटील, शेतकरी संघटनेचे नेते माणिकराव राजेगोरे, पप्पू पाटील कोंडेकर, सुनील अटकोरे, सरपंच उज्ज्वला इंगोले, शेकापचे सरचिटणीस सुभाशिष कामेवार, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे एकनाथ पाटील, काँग्रेस तालुकाध्यक्ष बालाजी गव्हाणे, जि़प़सदस्या संगीता अटकोरे, सभापती मंगला स्वामी, लालजी कदम, बळवंत इंगोले यांच्यासह काँग्रेस-राष्ट्रवादी पदाधिकारी-कार्यकर्त्यांची उपस्थिती होती़ दाभडी नाल्याचे पाणी सोडण्यासाठी सरकारपर्यंत जावे लागू नये, यासाठी आमच्या मंत्रिमंडळाने निर्णय घेतला़ शासनाने यापूर्वी पाणी वाटपाचे धोरण ठरविले आहे़ त्यात बदल करु नये़ महत्त्वाचे म्हणजे पाण्याच्या प्रश्नात राजकारण व्हायला नको मात्र भाजपाकडून अशा पद्धतीचे घाणेरडे राजकारण खेळले जात आहे़ आणि त्याला आपल्याच जिल्ह्यातील काही दलबदलूंची साथ मिळत असल्याचा घणाघात करीत नेतृत्वाकडे विकासाची दृष्टी असावी लागते़ मागील पाच वर्षांत मी सत्तेत नव्हतो़ मात्र त्यानंतरही नांदेडच्या प्रश्नाबाबत जागरुकपणे लढा देत होतो़ तुम्ही सत्तेत होतात तुम्ही नांदेडसाठी काय दिलेत याचे उत्तर द्या असा खडा सवालही चव्हाण यांनी यावेळी केला़ काही जणांची सत्तेबरोबर निष्ठा बदलते़ माझ्या विरोधी उमेदवाराचा आता निवडणूक लढवित असलेला सहावा पक्ष आहे़ मुख्यमंत्री बदलला की त्याच्याबरोबर या उमेदवाराचाही पक्ष बदलतो़ बरे हे पक्षांतरही कुठल्या मुद्यासाठी नसते, तर मेहुण्याच्या सल्ल्यावरुन स्वत:च्या तुमड्या भरण्यासाठी असते़ आता नांदेडकरांनीही हे चांगले ओळखले आहे़ काँग्रेसकडेच विकासाची दृष्टी आहे़ त्यामुळे आम्ही बंद पडलेले कारखाने सुरु करुन शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहण्याचा प्रयत्न केला़ या माध्यमातून तरुणांना रोजगाराच्या संधी मिळाल्या़ दुसरीकडे विरोधक दारुची दुकाने सुरु करण्यात मग्न आहेत़ अशा स्थितीत कोणाच्या पाठीशी उभे राहायचे याचा निर्णय नांदेडकरांना या निवडणुकीत घ्यावयाचा असल्याचे सांगत नांदेडकर काँग्रेसच्या पाठीशी उभे राहतील, असा ठाम विश्वास असल्याचेही खा़ अशोकराव चव्हाण म्हणाले़मतविभाजन होणार नाहीआम्ही विचाराने बांधलेली माणसे आहोत़ त्यामुळेच शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी आग्रही असणा-या राजू शेट्टींना दोन महत्त्वाच्या जागा सोडल्या़ काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत या निवडणुकीत शेकाप, जनता दल, रिपाइं (कवाडे) आदी ५६ पक्ष संघटना एकत्रित आलो आहोत़ मागील वेळी ७० टक्के मतदान विरोधात असतानाही केवळ मतविभाजनामुळे भाजपाला सत्ता मिळाली होती़ यावेळी तसे होणार नाही़ याची दक्षता आम्ही घेतली आहे़ आता मतदारांनींही समविचारी पक्षांच्या मतांचे विभाजन होणार नाही, याची दक्षता घ्यायला हवी असे आवाहन चव्हाण यांनी केले.

टॅग्स :nanded-pcनांदेडLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकAshok Chavanअशोक चव्हाणBJPभाजपाcongressकाँग्रेस