शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसांत दाेनदा प्रवासी लटकले; सीएसएमटी ते वडाळ्यापर्यंत वाहतूक कोलमडली
2
आजचे राशीभविष्य - २ मे २०२४; व्यापारासाठी दिवस उत्तम, आर्थिक बाबी मार्गी लागतील
3
२८-१५-५ महायुतीचा फॉर्म्युला; नाशिक, ठाणे शिंदेसेनेला, पालघर भाजपकडे
4
पहिल्या दोन टप्प्यांतील मतदानाची अंतिम टक्केवारी जाहीर; ३ टक्क्यांची वाढ
5
राज ठाकरे सभा घेऊन कोणाच्या वरातीत नाचणार? सभेसाठी मनसेच्या अर्जावर उद्धवसेनेची टीका
6
भाजप-उद्धवसेना फक्त एका ठिकाणी समोरासमोर; गळ्यात गळे घालून फिरणारे शिवसैनिक एकमेकांच्या विरोधात
7
मुंबईत षटकार मारणार, राज्यात १५ जागा जिंकणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विश्वास
8
लॉकअपमधल्या चादरीच्या पट्टीने गळफास घेत बिश्नोई गँगच्या आरोपीची आत्महत्या
9
देशाच्या विकासात काँग्रेस अडथळा; ‘फॅमिली फर्स्ट’मुळे भारताचे नुकसान, योगी आदित्यनाथ यांचे टीकास्त्र
10
ठाण्यात दोघा माजी महापौरांमध्ये पुन्हा लढत; २०१४ मध्ये राजन विचारे विरुद्ध संजीव नाईक झाली होती लढत
11
प्रज्वल रेवण्णा उद्या बंगळुरूत येणार; आरोप तथ्यहीन असल्याचा दावा
12
पंतप्रधानांच्या पत्रात दडला निवडणुकीचा अजेंडा; उमेदवारांच्या माध्यमातून मतदारांना संदेश
13
श्रीकांत यांच्या कल्याणसाठी म्हस्केंना उमेदवारी देऊन विचारेंना बाय ? राजन विचारे यांना निवडणूक सोपी जाणार अशी चर्चा सुरू
14
शिंदेंना चढावी लागणार ‘व्हाइट हाउस’ची पायरी; गणेश नाईक यांचा नवी मुंबईसह आगरी मतांवर प्रभाव
15
मराठी पाट्यांचे रडगाणे; ९८ टक्के आस्थापनांनी न्यायालयाच्या आदेशाचे पालन केले
16
दगडफेकीपर्यंतचा प्रचार कोणत्या दिशेने जाणार?
17
MS Dhoni ने केला डॅरिल मिचेलचा अपमान? खवळला इरफान पठाण, Video Viral 
18
100 शाळा अन् 143 कॉल…; बॉम्बच्या धमकीनंतर दिल्ली सरकार अ‍ॅक्शन मोडवर, अ‍ॅडव्हायजरी जारी
19
जय श्रीराम! राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू अयोध्येत; रामलला चरणी नतमस्तक, शरयू नदीचे केले पूजन
20
शरद पवारांनंतर उद्धव ठाकरेंनी भरसभेत मागितली माफी; PM मोदींवर केली टीका, म्हणाले...

गैर समजातून तुटणारा संसार जुळविण्यात बिलोली पोलिसांना यश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 30, 2020 7:17 PM

सासरच्या मंडळीने व माहेरच्या मंडळीने दोघांनाही समजण्याचा खूप प्रयत्न केला पण त्यांत त्याना अपयशच आले.

ठळक मुद्देगेल्या दोन वर्षापासून  विवाहिता आपल्या माहेरी होती.गैरसमजुतीमुळे वाद वाढत गेला

बिलोली :  किरकोळ वादाच्या गैरसमजुतीतून गेल्या दोन वर्षांपासून कौटुंबिक संसारातून एकमेकांपासून अलिप्त राहून घटस्फोटाच्या अंतिम टोकाला गेलेला वाद मिटवून त्या कुटुंबांचा विस्कटलेला संसार सामोपचाराने  जुळविण्याचा यशस्वी प्रयत्न  बिलोली पोलिसांच्या मदतीने  झाल्याने मौ.केसराळी व कासराळी येथील दोन्ही कुटुंबांत आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

हा वाद इतका विकोपाला गेला की, गेल्या दोन वर्षापासून  विवाहिता आपल्या माहेरी होती. सासरच्या मंडळीने व माहेरच्या मंडळीने दोघांनाही समजण्याचा खूप प्रयत्न केला पण त्यांत त्याना अपयशच आले. शेवटी  माजी खा. भास्करराव पाटील खतगावकर यांच्या  सूचनेप्रमाणे डॉ .के.बी.कासराळीकर व पोलीस निरीक्षक  डोईफोडे यांच्या पुढाकारातून   दोन्ही कुटुंबियांना २७ ऑक्टोबर रोजी पोलीस स्टेशन बिलोली या ठिकाणी एकत्र आणून दोघांची काय अडचण आहे. दोघांमध्ये वाद कशामुळे विकोपाला गेला या सर्व गोष्टीची  सखोल माहिती घेऊन दोन्ही कुटुंबाची मने जुळवण्याचा आटोकाट यशस्वी प्रयत्न करुन  एक-दोन दिवसांत घटस्फोट होणार, असे चित्र निर्माण झालेले सताना डॉ. के.बी कासराळीकर, आनंद पाटील बिराजदार, माजी तालुकाध्यक्ष भाजपा तसेच सामाजिक कार्यकर्ते राजू पाटील शिंपाळकर, पोलीस जमादार बोधने, केसराळीचे माजी सरपंच  इब्राहिम शेख, राम पाटील काळे, नागनाथ पाटील, माजी सरपंच सटवाजी सोनकांबळे, किशन मेहेत्रे, विठ्ठल शिरोळे आदींच्या उपस्थितीत तुटणारे संसार जुळवण्यात यश आले.

गैरसमजुतीमुळे वाद वाढत गेलाअसे म्हणतात ना, ज्या समाजात आपण जन्मलो त्या समाजासाठी काहीतरी केले पाहिजे, या उक्तीप्रमाणे  म.रा.रो.हमी योजनेचे माजी तालुकाध्यक्ष डॉ.के.बी.कासराळीकर  व पोलीस निरीक्षक शिवाजीराव  डोईफोडे हे   घटस्फोटाच्या टोकाला गेलेले कासराळी  येथील  एकाचा विवाह केसराळी येथील एका महिलेसोबत गेल्या नऊ ते दहा वर्षापूर्वी रीतीरिवाजाप्रमाणे झाला  होता. काही वर्षानंतर त्यांना एक मुलगा व एक मुलगी अशा दोन अपत्याना जन्म दिले. मध्यंतरीच्या काळात दोघा नवरा बायकोच्या गैरसमजुतीमुळे वाद होत गेला. 

टॅग्स :Divorceघटस्फोटNandedनांदेडPoliceपोलिस