शहरं
Join us  
Trending Stories
1
अफगाणिस्तानचे परराष्ट्र मंत्री पहिल्यांदाच भारत दौऱ्यावर; भारतीय अधिकाऱ्यांसमोर मोठा पेच, कारण काय?
2
पुण्यात पुन्हा दहशतवादी?; ATS आणि पुणे पोलिसांकडून कोंढवा परिसरात रात्रभर सर्च ऑपरेशन
3
इस्रायल-हमास शांतता करार: डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा एकदा दोघांचीही सही मिळविली, युद्ध थांबणार?
4
आजचे राशीभविष्य-९ ऑक्टोबर २०२५: आनंदोत्सव साजरा करण्याचा दिवस; व्यवसाय-नोकरीत होईल लाभ!
5
दोन शिवसेनेतल्या सततच्या भांडणांचा फायदा कोणाला?
6
संपादकीय: दिलासा तूर्त, चिंता शाश्वत! कर्जमाफीचा उच्चार न करता दिलेले पॅकेज...
7
पाकवर हल्ला कोणाच्या सांगण्यामुळे राेखला? पंतप्रधान नरेंद्र माेदी यांचा काॅंग्रेसला सवाल
8
उद्योगांवर विजेचा ‘गुपचुप’ हल्ला, राज्यात स्थिती आणखी बिकट; प्रति युनिट दर ११.१५ रुपयांवर 
9
वाहनचालकांनो सावधान! विना हेल्मेट, राँग साइड, प्रखर दिव्यांविरुद्ध कठोर कारवाई करा : सुप्रीम कोर्ट
10
इलेक्ट्रिक कार विक्रीत दुप्पट वाढ; सप्टेंबरमध्ये नवा विक्रम; १५ हजार इव्हींची विक्री
11
‘६० कोटी जमा करा, मग याचिकेवर विचार’; शिल्पा शेट्टीवर न्यायालय संतापले...
12
शिवसेना पक्ष अन् धनुष्यबाण कुणाचा? १२ नोव्हेंबरला सुनावणी   
13
भाजपकडून लोकप्रिय चेहऱ्यांना संधी; गायिका मैथिलीस पक्षाची उमेदवारी? डॅमेज कंट्रोल मोड ऑन
14
एक जीबी डेटा आता चहाच्या एका कपापेक्षाही स्वस्त झाला आहे : मोदी
15
आता स्मार्ट चष्म्याने पाहा, बोला अन् पैसे द्या; फोनशिवाय अन् पिन न टाकता करता येणार व्यवहार 
16
प्रा. कितागावा, रॉबसन अन् याघी यांना नोबेल; मेटल-ऑर्गेनिक फ्रेमवर्कसाठी रसायनशास्त्रातील पुरस्कार 
17
भारताशी युद्ध झाल्यास आम्हीच बाजी मारणार; पाकचे संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची दर्पोक्ती
18
महिला विश्वचषक : ऑस्ट्रेलियाने पाकिस्तानला दिला धडा, मूनीचे निर्णायक शतक
19
जब गिल पर आया दिल, तो रोहित क्या चीज हैं !
20
महिला विश्वचषक : फलंदाजांना दाखवावा लागेल दम, आज दक्षिण आफ्रिकेच्या कडव्या आव्हानाचा करणार सामना

गोदावरी नदीवरील बाभळी बंधाराचे १४ दरवाजे उघडले; १०.०५ द.ल.घ.मी. पाणी गेले तेलंगणात

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 3, 2025 19:03 IST

बंधाऱ्यात उरला ०.७ दशलक्ष घनमीटर पाणीसाठा; २९ ऑक्टोबरपर्यंत दरवाजे राहणार उघडे

धर्माबाद (जि. नांदेड) : तालुक्यातील गोदावरी नदीवर बाभळी (ध) येथे २५० कोटी रुपये खर्च करून बांधलेल्या बाभळी बंधाऱ्याचे १४ दरवाजे सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानुसार त्रिसदस्यीय समितीच्या उपस्थितीत १ जुलै रोजी उघडण्यात आले. सकाळी ६ वाजून ३० मिनिटांनी पहिला दरवाजा उघडला. त्यानंतर दुपारी ३ वाजेपर्यंत सर्वच १४ ही दरवाजे उघडण्यात आले. बंधाऱ्यात जमा असलेले १०.०५ दशलक्ष घनमीटर पाणीसाठा तेलंगणात सोडण्यात आला. आता केवळ ०.७ दशलक्ष घनमीटर पाणीसाठा शिल्लक आहे. सर्व दरवाजे २९ ऑक्टोबरपर्यंत वर राहणार आहेत.

यावेळी केंद्रीय जलआयोगाचे कार्यकारी अभियंता एम.एल.फ्रँकलिन, तेलंगणा राज्यातील श्रीराम सागरचे कार्यकारी अभियंता एम.चक्रपाणी, सहायक कार्यकारी अभियंता के.रवि, महाराष्ट्र पाटबंधारे विभाग नांदेडचे कार्यकारी अभियंता सी.आर.बनसोड, बाभळी बंधाऱ्याचे उपविभागीय अभियंता सी.डी.पोतदार, कनिष्ठ अभियंता धनंजय गव्हाणे, एस.बी.देवकांबळे आदी उपस्थितीत होते. महाराष्ट्राने कोट्यवधी रुपये खर्च केला,पण त्याचा फायदा तेलंगणा राज्याला होत आहे. जमा झालेले पाणी मोफत तेलंगणात जात आहे. यासंदर्भात राज्य शासन लक्ष देण्यास तयार नाही.

सदर प्रकरण सर्वोच्च न्यायालयात गेले व यावर २८ फेब्रुवारी २०१३ रोजी सर्वोच्च न्यायालयाने तीन अटी टाकत पुढीलप्रमाणे निकाल दिला. १ जुलै रोजी बंधाऱ्याचे सर्व गेट वर उचलणार व २९ ऑक्टोबर रोजी बंधाऱ्याचे सर्व गेट खाली टाकण्यात येणार. १ मार्च रोजी बंधाऱ्यातील पाणीसाठा पैकी (०.६०) शून्य दशांश साठ टीएमसी पाणी श्रीराम सागरला ( पोचमपाड धरण) सोडावे.

या वादग्रस्त बंधाऱ्याचे उद्घाटन तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते २९ ऑक्टोबर २०१४ रोजी झाले. त्यावर्षी उशिरा पर्जन्यमान झाल्यामुळे जेमतेम पाणीसाठा बंधाऱ्यात शिल्लक राहिला. त्यानंतर मात्र गेली अकरा वर्षे झाले बंधाऱ्याचे गेट उघडण्याची तारीख ऐन पावसाळ्यात १ जुलै रोजी आहे. पावसाळ्यातच ही तारीख असल्याने पावसाळ्यातील पाणी तेलंगणात निघून जात आहे. बंधाऱ्यात आजपर्यंत २.७४ टीएमसी पाणीसाठा कधीच उपलब्ध झाला नाही. २५० करोडो रुपये खर्चून बांधलेला बाभळी बंधारा कोरडाच राहत असल्याने बंधाऱ्याचे गेट टाकून काय फायदा? असा प्रश्न संतप्त जनतेतून ऐकायला मिळत आहे.

टॅग्स :DamधरणWaterपाणीMarathwadaमराठवाडाNandedनांदेड