शहरं
Join us  
Trending Stories
1
लक्ष्मणरेषा ओलांडाल तर तुमचा विनाश अटळ, समूळ उच्चाटन करू; PM मोदींचा पुन्हा खणखणीत इशारा
2
आजचे राशीभविष्य १४ मे २०२५: आजचा दिवस आगळा - वेगळा अनुभव देणारा
3
काश्मीरचा बळकावलेला भूभाग पाकने परत करावा; भारताची आग्रही मागणी, कोणाची मध्यस्थी मान्य नाही
4
दहशतवादी मसूद अजहरच्या कुटुंबीयांना पाकिस्तान देणार १४ कोटी; विशेष 'शुहाद पॅकेज'ची घोषणा
5
डॉ. विजय दर्डा, आपला अमृतमहोत्सव शुभंकर असो...; PM नरेंद्र मोदी यांचा विशेष शुभेच्छा संदेश
6
राज ठाकरेंना उद्धव ठाकरेंपासून दूर ठेवण्याचे प्रयत्न? शिंदे गटाकडून हालचाली, चर्चांना उधाण
7
तयार होतेय 'शक्ती' चक्रीवादळ, देशभर तीन दिवस जोरदार पाऊस; पावसाची कधी आणि कुठे शक्यता?
8
लष्कराने दहशतवादी तळ नेमके शोधले तरी कसे? या शस्त्रांमुळे पाकला दयेची मागावी लागली भीक
9
ऑपरेशन सिंदूर: 'त्या' १२ दहशतवादी तळांवर कारवाईसाठी पाकवर दबाव; २१ तळांची होती भारताची यादी
10
काश्मिरात लष्कर-ए-तैयबाच्या म्होरक्यासह ३ दहशतवाद्यांचा खात्मा
11
निवृत्तीनंतर कोणतेही सरकारी पद घेणार नाहीत सरन्यायाधीश खन्ना; भूषण गवई आज पदभार स्वीकारणार
12
"कामगारच विकासाचे खरे शिल्पकार"; राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांचे प्रतिपादन
13
राज्याला रेल्वे फाटकमुक्त करणार: मुख्यमंत्री; नागपुरातील १० पुलांचेही लवकरच होणार उद्घाटन
14
उद्धवसेनेच्या माजी नगरसेविका तेजस्वी घोसाळकर भाजपच्या वाटेवर? ठाकरे गटाला जय महाराष्ट्र
15
दहावीतही मुलींचा 'स्ट्राइक रेट' जबरदस्त! सीबीएसईतही कन्या 'शक्ती'
16
साईभक्तांना देणगीनुसार विशेष प्राधान्य; श्री साईबाबा संस्थानचे सुधारित सुविधा धोरण
17
पश्चिम-मध्य रेल्वेच्या नव्या मार्गांच्या कामाला गती; २९.३२ हेक्टरवरची झाडे तोडण्यास परवानगी
18
“...तर लाखो लोक संघर्षाचे बळी ठरले असते”; डोनाल्ड ट्रम्प पुन्हा भारत-पाक युद्धविरामावर बोलले
19
“२४ तासांत देश सोडा”; भारताने केली पाकिस्तानी उच्चायुक्तालयातील अधिकाऱ्यावर कठोर कारवाई
20
शेख हसीना यांच्या पक्षावर बंदी; बांगलादेशच्या निर्णयावर भारताची नाराजी, स्पष्ट केली भूमिका

कंधार तालुक्यात अवकाळी भीज पावसाचा कोप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2021 04:50 IST

भुईमूग पिकाला पाने गुंडाळणाऱ्या अळीचा विळखा कंधार : तालुक्यात १७ हजार २२१ हेक्टरवर शेतकऱ्यांनी रब्बीची लागवड केली आहे. खरीप ...

भुईमूग पिकाला पाने गुंडाळणाऱ्या अळीचा विळखा

कंधार : तालुक्यात १७ हजार २२१ हेक्टरवर शेतकऱ्यांनी रब्बीची लागवड केली आहे. खरीप हंगामातील झालेल्या पीक नुकसानीची कसर भरून काढण्यासाठी रब्बी आणि उन्हाळी हंगामावर अनेक शेतकऱ्यांनी लक्ष केंद्रित केले. परंतु दि. १८ फेब्रुवारी रात्रीपासून भीज पाऊस सुरू आहे. त्यामुळे शिवारात कापणी करून आडवा केलेल्या गहू, हरभरा पिकावर पाऊस कोपला आहे. त्यामुळे पिकाची अवकळा झाल्याचे चित्र आहे तसेच ढगाळ वातावरणामुळे उन्हाळी भुईमुगाला पाने गुंडाळणाऱ्या अळीचा विळखा बसल्याने शेतकरी चिंतित झाला आहे.

यंदाचा खरीप हंगाम शेतकऱ्यांना आर्थिक फटका देणारा ठरला. अतिवृष्टी, सततच्या पावसामुळे पिकाची नासाडी केली. सलग दोन वर्ष आर्थिक हानी झाल्यामुळे शेतकऱ्यांनी रब्बी पिकातून आर्थिक आधारासाठी प्रयत्न केला. गहू आठ हजार ५०० हे., हरभरा सात हजार ९०० हे., ज्वारी ४३०, चारापीक २१०, करडई ४० हे. आदीची मोठ्या आशेने लागवड केली. उन्हाळी हंगामात भुईमूग चार हजार ८०० हेक्टर, ज्वारी ४५० हे., चारापिके २८० हे., सोयाबीन १५० हे. लागवड करण्यात आली.

गत काही दिवसापासून हरभरा काढणी केली जात आहे. अनेक शेतकऱ्यांना हरभरा पीक उताऱ्याने चांगला आधार मिळाल्याने शेतकरी आनंदित होते. परंतु अनेक शेतकऱ्यांनी रब्बी हंगामातील कापणी केलेल्या हरभरा व गव्हाची भीज पावसाने नासाडी केली. गव्हाचा रंग बदलून कमी भाव मिळण्याचा धोका आहे. त्यातच उन्हाळी भुईमूग पिकाला पाने गुंंडाळणाऱ्या अळीचा विळखा बसला आहे. गत काही दिवसापासून ढगाळ वातावरणाचा परिणाम झाला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना अळीचा अटकाव करण्यासाठी आर्थिक भुर्दंड बसणार आहे. त्यातच अशीच अवकाळी पाऊस व गारपीट झाली तर फळपीक, पालेभाज्या आदी पिकाला धोका निर्माण होण्याची चिंता शेतकऱ्यांना आहे.

चौकट

भुईमूग पिकाला पाने गुंडाळणाऱ्या अळीचे नियंत्रण करण्यासाठी अलिका १० मि.ली. अधिक बुरशीनाशक २५ ग्रॅम. प्रति १० लीटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. त्यामुळे अळीचे नियंत्रण करता येईल.

रमेश देशमुख (ता.कृषी अधिकारी, कंधार)

तालुक्यात कंधार पर्जन्यमापन यंत्रावर ४ मि.मी., कुरूळा ३, उस्माननगर ४, फुलवळ ५, बारूळ ४ व सर्वाधिक पेठवडज येथे १० मि.मी.ची नोंद झाली आहे.