शहरं
Join us  
Trending Stories
1
आता मनसे काँग्रेसचे चिन्ह पंजा काढून घेणार? निवडणूक आयोगाकडे धाव, प्रकरण काय?
2
शांतीगिरी महाराजांनी शिवसेनेच्या नावाने उमेदवारी अर्ज भरला; भुजबळांची पहिली प्रतिक्रिया
3
निवडणूक आली की मोदींना महाराष्ट्र आठवला का, गुजरातला उद्योग नेताना...; काँग्रेसची टीका
4
"नरेंद्र मोदींच्या जागी राहुल गांधी पंतप्रधान असते तर..."; नेमकं काय म्हणाले आसामचे मुख्यमंत्री?
5
"माझं एक लग्न पंतप्रधान मोदींमुळे मोडलं..."! पाकिस्तानातील मुफ्तीचा दावा, व्हिडिओ व्हायरल
6
'त्यांना कशाला घेता, आम्हीच तुमच्यासोबत येतो; उद्धव ठाकरेंचा दिल्लीला फोन'; शिंदेंचा गौप्यस्फोट
7
तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंथ रेड्डींना पोलिसांनी थेट दिल्लीला बोलवले, सोबत फोनही घेऊन येण्याच्या सूचना
8
'निवडणूक आयोगाला आम्ही आदेश देऊ शकत नाही'; हायकोर्टाने फेटाळली मोंदींविरोधातील याचिका
9
Vastu Shastra: कणभर मोहरीचे मणभर फायदे; घराच्या प्रवेश द्वाराशी मोहरी ठेवा आणि वास्तु दोष घालवा!
10
तिहार जेलमधून अरविंद केजरीवाल यांची महिलांसाठी मोठी घोषणा; आतिशी यांनी दिला मेसेज
11
उदयनराजे म्हणाले, संकेत समजून घ्या! कॉलर उडवून शरद पवार सांगत आहेत की...
12
४ मे! राणेंसाठी राज ठाकरे कणकवलीत येणार; तिथेच काही वर्षांपूर्वी राज यांची कार माघारी फिरलेली
13
ठाकरेंचे 13 पैकी 5-6 आमदार शिंदेंच्या संपर्कात, खासदारही; फसलेल्या सभेवरून उदय सामंतांचा दावा
14
अमेठीमध्ये बसपाने उतरवला उमेदवार? भाजपा की काँग्रेस, कुणाचं गणित बिघडवणार?  
15
PHOTOS: IPS पदाचा राजीनामा देऊन लोकसभेच्या 'रिंगणात', सामाजिक कार्यासाठी मैदानात!
16
भाजपाकडून उज्ज्वल निकम उमेदवार; प्रकाश आंबेडकर म्हणाले, “व्यक्ती म्हणून आक्षेप...”
17
Akshaya Tritiya 2024: अक्षय्य तृतीयेच्या दिवशी लावा नवीन तुळस; होतील अगणित फायदे!
18
'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम शिवाली परबची गगनभरारी, अभिनेत्रीने खरेदी केलं हक्काचं घर
19
फडणवीसांच्या भेटीनंतर अभिजीत पाटलांचं ठरलं?; सूचक वक्तव्याने चर्चांना उधाण
20
“तुम्ही मतांचा पाऊस पाडा, मी विकासाचा पाऊस पाडल्याशिवाय राहणार नाही”: पंकजा मुंडे

सोडतीद्वारे करावे लागले बियाणे वाटप; बियाणांच्या तुटवड्याने शेतकरी संकटात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 16, 2019 7:40 PM

बियाणांसाठी शेतकऱ्यांची रीघ

ठळक मुद्देकृषी विभागाचा ढिसाळ कारभारबारूळ येथे सोडतीद्वारे बियाणे वाटप 

बारुळ (जि. नांदेड) : खरीप हातचा गेल्याने शेतकऱ्यांच्या नजरा आता रबी हंगामावर आहेत. मात्र शेतकऱ्यांमागच्या अडचणी संपायला तयार नाहीत. कृषी विभागाच्या वतीने रबी हंगामासाठी बियाणे वाटपाचे आयोजन करण्यात आले होते. यासाठी शेकडो शेतकरी बारुळच्या कृषी मंडळ कार्यालयात जमा झाले. मात्र अवघ्या ३५ हरभरा बियाणाच्या बॅगा आल्याने अनेक शेतकऱ्यांना रिकाम्या हाताने परतावे लागले.

कृषी विभागाच्या वतीने कृषी उत्पादकता वाढविण्यासाठी विशेष कार्यक्रम राबविला जातो. याअंतर्गत राष्ट्रीय अन्नसुरक्षा अभियान राष्ट्रीय कृषी विकास योजनेतून दरवर्षी हंगामनिहाय विविध उपक्रम हाती घेतले जातात. यंदा या अभियानाअंतर्गत रब्बी हंगामात कडधान्य विकास कार्यक्रम राबविण्यात येत आहे. बारूळ कृषी मंडळ कार्यालयातंर्गत ३३ गावे येतात. त्यापैकी तीन गावासाठी ३० हेक्टरसाठी पुरेल इतके हरभऱ्याचे बियाणे प्राप्त झाले होते. यातील बारूळ, भूकमारी व गुंडा या गावासाठी कृषी सहायकांच्या उपस्थितीत  बियाणे वाटपाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

बारूळ शिवारातील ३२० शेतकऱ्यांनी हरभरा बियाणाचे मागणीसंदर्भात नावे नोंदवली होती. परंतु प्राप्त झालेल्या बॅगा अवघ्या ३५ असल्याने या बॅगा नेमक्या द्यायच्या कुणाला असा प्रश्न उपस्थित झाला. या विषयावरुन काहीकाळ कार्यालय परिसरात गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. अखेर लक्की ड्रॉ काढून या बॅगांचे वाटप करण्याचा निर्णय घेण्यात आला. परंतु बारूळ शिवारातील एका कुटुंबाच्या घरी एकच नाव नोंदणी करण्याची अट असल्याने अनेक शेतकऱ्यांना बियाणापासून वंचित रहावे लागले. यातून गदारोळ  वाढल्याने कृषी सहायक गोविंद तोटेवाड हे बियणांचे वाटप न करताच निघून गेले. 

नव्या नियमामुळे शेतकरी बियाणापासून वंचितकृषी विभागाकडून मागील काही वर्षे नियमानुसार १०० हेक्टर शेतीच्या बियाण्याचे वाटप केले जात होते. ते आता नव्या नियमानुसार १० हेक्टर शेतीसाठी वाटप करण्यात येत आहे. या प्रकारामुळे अनेक गरजू शेतकरी या योजनेपासून वंचित राहत आहेत. कृषी विभागाच्या कर्मचाऱ्यांनाही बियाणाचे वाटप करताना विविध अडचणींचा सामना करावा लागत असल्याने कृषी विभागाने बियाणे वाटपा संदर्भातील जाचक अटी रद्द करण्याची मागणी शेतकऱ्यांतून होत आहे.  

२०० हेक्टरवर लागवड; १० हेक्टरपुरते बियाणेबारूळ शिवारात रबी हंगामात साधारण २०० हेक्टर हरभऱ्याची लागवड होते. परंतु कृषी विभागाच्या नवीन नियमानुसार या शिवारातील केवळ दहा हेक्टर साठी बियाण्याचे वाटप करण्याचा निर्णय घेण्यात आला. या दहा हेक्टरसाठी बियाणाच्या अवघ्या ३५ बॅगा आल्याने बारूळ कृषी मंडळ कार्यालयातील ३३ गावातील शेकडो शेतकऱ्यांना याचे वाटप कसे करायचे? असा प्रश्न निर्माण झाला.  या प्रकाराबाबत शेतकऱ्यांतून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. 

टॅग्स :FarmerशेतकरीagricultureशेतीAgriculture Sectorशेती क्षेत्र