शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

तरुण फळविक्रेत्यांवर काळाचा घाला; तेलंगणातील अपघातात तिघांचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 13, 2019 16:17 IST

तेलंगणात झालेल्या या अपघातात तिघांचा मृत्यू झाला असून आॅटोचालक  गंभीर जखमी आहे.

ठळक मुद्देचौघेही तरुण भागीदारीत सफरचंद विक्रीचा व्यवसाय करीत होते.

देगलूर (जि. नांदेड) :  तेलंगणातील नारायणखेड येथील बाजारपेठेत सफरचंद विक्रीसाठी घेऊन जाणाऱ्या आॅटोला विरुद्ध दिशेने येणाऱ्या भरधाव  ट्रकने धडक दिली. या अपघातात देगलूर येथील शेख सद्दाम शेख मौलाना  (२८, लाईनगल्ली), शेख सैलानी बाबा शेख महेबूब (२५, भायेगाव रोड), शेख फिरदोस शेख वलीयोद्दीन (३०, जियाकॉलनी ) या तीन तरुणांचा मृत्यू झाला. तर एका जणाची प्रकृती गंभीर आहे. ही  घटना मंगळवारी कंदरपल्ली चौरस्त्यावर सकाळी नऊ वाजेच्या सुमारास घडली. 

मंगळवारी नारायणखेड येथे आठवडी बाजार असल्याने शेख सद्दाम शेख मौलाना, शेख सैलानी बाबा शेख महेबूब, शेख फिरदोस शेख वलीयोद्दीन व आॅटोचालक शेख हबीबवल्ली चाऊस (२८, तेलीगल्ली ) हे देगलूर येथील चारजण आॅटोने (टीएस १६-युसी ११३०) नारायणखेडकडे जात होते. कंदरपल्ली चौरस्त्यावर समोरुन येणाऱ्या ट्रकने (एमएच ३० एबी- ३५८९) दिलेल्या जोरदार धडकेत शेख सदाम शेख मौलाना हा तरुण जागेवरच ठार झाला. गंभीर दोन जखमींना बांसवाडा रुग्णालयात प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी निजामाबादला नेण्यात येत असताना रस्त्यातच सैलानी बाबा शेख महेबूब याचा मृत्यू झाला. तर  शेख फिरदोस शेख वलीयोद्दीन नांदेड येथे उपचारासाठी नेताना नरसीजवळ त्याची प्राणज्योत मालवली. 

आॅटोचालक शेख हबीब वली चाऊस याच्या डोक्याला जबर मार लागला असून त्याच्यावर निजामाबादच्या शासकीय रुग्णालयात  उपचार सुरू आहे. दरम्यान, अपघाताची घटना घडताच नगराध्यक्ष मोगलाजी शिरशेटवार यांनी अपघातग्रस्तांच्या नातेवाईकांसह घटनास्थळी धाव  घेऊन गंभीर जखमींना उपचारासाठी इतरत्र हलविण्यास मदत केली. याप्रकरणी बिचकुंदा पोलीस ठाण्यात ट्रकचालकावर गुुन्हा नोंद करण्यात आला आहे.

देगलूर शहरावर शोककळातेलंगणात झालेल्या या अपघातात तिघांचा मृत्यू झाला असून आॅटोचालक  गंभीर जखमी आहे. हे चौघेही देगलूर येथील तरुण भागीदारीत सफरचंद विक्रीचा व्यवसाय करीत होते. चारही तरुण अविवाहित असून दररोज कष्ट करून कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवीत होते. या अपघातात तिघांचा मृत्यू झाल्याने त्यांच्या कुटुंबियांसह देगलूर शहरावर शोककळा पसरली आहे. 

टॅग्स :Deathमृत्यूNandedनांदेडAccidentअपघातTelanganaतेलंगणा