शहरं
Join us  
Trending Stories
1
“तुम्ही बोलत नाही, आम्ही ओबीसी आरक्षणासाठी लढायचे नाही का?”; छगन भुजबळांचा शरद पवारांना सवाल
2
भगवान विष्णू यांच्यावरील वक्तव्यासंदर्भात CJI बीआर गवई यांचं स्पष्टिकरण; 'संयम राखायला हवा...', विश्वहिंदू परिषदेचा सल्ला
3
'खोटारडं' पाकिस्तान पुन्हा उघडं पडलं... मॅच रेफरीच्या केबिनमध्ये काय घडलं? सत्य समोर आलं...
4
ठाकरे बंधू एकत्र आले तर मविआवर काय परिणाम होईल? शरद पवार थेट म्हणाले, “मग आता वेगळे...”
5
सात दिवस अविरत उपसले कष्ट, तेव्हा हाती लागली मौल्यवान रत्नं, मजूर महिलेचं नशीब उजळलं 
6
IND vs PAK हस्तांदोलन वादाचा खरा आरोपी सापडला... सामनाधिकारी पॉयक्रॉफ्टची चूकच नव्हती!
7
लग्न कधी करणार? श्रिया पिळगावकरला थेट प्रश्न; म्हणाली, "माझे आईबाबा सांगतात की..."
8
अंगणवाडी सेविकांना मिळणार स्मार्टफोन, वाढणार मानधन; योगी आदित्यनाथ यांची मोठी घोषणा
9
अभिनेता श्रेयस तळपदेवर गुन्हा दाखल; उत्तराखंडमधील घोटाळा प्रकरण, आलोक नाथ यांचेही नाव...
10
सुनेला वाचवण्यासाठी धावली सासू, पण तेवढ्यात धडाधड कोसळली भिंत, सून वाचली पण...  
11
राहुल गांधी निराश, त्यांच्या नेतृत्वात काँग्रेसने ९० निवडणुका हरल्या; अनुराग ठाकूरांचा हल्लाबोल
12
सावधान! आयफोन १७च्या नावाखाली फसवणूक, सायबर गुन्हेगार 'असे' करतात खाते रिकामी
13
Sarva Pitru Amavasya 2025: सर्वपित्री अमावस्येला आहे सूर्यग्रहण; काळजीपूर्वक टाळा 'या' चुका!
14
बंगळुरुतील योग गुरुचा 8 महिलांवर अत्याचार; अल्पवयीन पीडितेने दाखवले धाडस, पोलिसांनी आवळल्या मुसक्या
15
३० पैशांवरुन २४ रुपयांवर आला 'हा' शेअर; १ लाखाचे केले ८ कोटी, गुंतवणूकदार मालामाल
16
GST कपातीनंतर Maruti ची मोठी घोषणा! S-Presso ₹ 3.50 लाखात तर Wagon R फक्त...
17
Surya Grahan 2025: ग्रहण सूर्याला मात्र 'या' राशींचे भाग्य येईल फळाला; १०० वर्षांनी जुळून आलाय अपूर्व योग!
18
पेन्शनधारकांसाठी गुड न्यूज! १ ऑक्टोबरपासून NPS चे नियम बदलणार, तरुणांना सर्वाधिक फायदा
19
पोहे आणि उपमा नेहमीच खातो पण त्याचे फायदे माहितीहेत का, दोघांपैकी आरोग्यासाठी बेस्ट काय?
20
पितृपक्ष २०२५ शिवरात्री: व्रतात ‘हे’ मंत्र म्हणा, महादेव प्रसन्न होतील, पूर्वज वरदान देतील!

अजूनही आधार जोडलेच नाही; आता सोळावा हप्ता शेतकऱ्यांच्या हातचा जाणार!

By रामेश्वर बालाजीराव काकडे | Updated: February 6, 2024 19:08 IST

पीएम किसान, नमो पेन्शन योजना, आधार संलग्न केलेच नाही, १५,७९१ शेतकरी १६ व्या हप्त्याला मुकणार

नांदेड : किसान पेन्शन योजनेतील लाभार्थ्यांना ई-केवायसी, आधार प्रमाणीकरण, आधार लिंक या गोष्टींची पूर्तता करण्यासाठी शासनाने दीड वर्षाचा कालावधी दिला होता. आजपर्यंत जिल्ह्यातील १५ हजार ७९१ शेतकऱ्यांनी आधार संलग्न केले नसल्याने सदर शेतकरी केंद्र शासनाच्या पीएम किसानच्या १६ व्या हप्त्याला मुकावे लागणार आहे. शासनाकडून याबाबत वारंवार सूचना देऊनही दुर्लक्ष केल्याचा फटका शेतकऱ्यांना बसला.

जिल्ह्यात पीएम किसान योजनेसाठी ३ लाख ८७ हजार १५७ इतकी पात्र शेतकऱ्यांची संख्या आहे. त्यापैकी ५ फेब्रुवारीपर्यंत ३ लाख ८४ हजार ३१२ शेतकऱ्यांनी ई-केवायसी पूर्ण केली आहे. याचे प्रमाण ९९ टक्के इतके आहे; पण ई-केवायसी केल्यानंतर ३ लाख ७१ हजार ३६६ शेतकऱ्यांनीच आधार संलग्न केले आहे. त्यामुळे उर्वरित शेतकऱ्यांना केंद्र सरकारच्या पीएम किसानसह राज्य सरकारच्या नमो पेन्शन योजनेपासून वंचित राहावे लागणार आहे.

देशातील शेतकऱ्यांना आर्थिक आधार देण्यासाठी केंद्र सरकारने पाच वर्षांपूर्वी पी.एम. किसान सन्मान योजना सुरू केली आहे. यामध्ये प्रत्येक शेतकऱ्याला महिन्याला पाचशे रुपये असे चार महिन्यांचे दोन हजार रुपये वर्षाला तीन टप्प्यात दिले जातात, तर राज्य सरकारने नमो पेन्शन योजना सुरू केली आहे. या योजनेतही चार महिन्यांचे दोन हजार याप्रमाणे सहा हजार रुपये पेन्शन शेतकऱ्यांना दिली जात आहे; पण ई-केवायसी करूनही आधार संलग्नीकरण न केल्याने जिल्ह्यातील १५ हजारांपेक्षा अधिक शेतकरी या योजनांपासून वंचित राहणार आहेत.

ई-केवायसी प्रलंबित असलेले शेतकरीजिल्ह्यात ९९ टक्के ई-केवायसीचे काम पूर्ण झाले असून केवळ एक टक्के शेतकऱ्यांनी ई-केवायसी केलेली नाही. ई-केवायसी प्रलंबित असलेल्या शेतकऱ्यांची संख्या २८४५ इतकी आहे.

१६ व्या हप्त्यापासून वंचित राहणारे शेतकरीआधार संलग्नीकरण न केल्याने केंद्र शासनाच्या पीएम किसानच्या १६ व्या हप्त्यापासून, तसेच राज्य शासनाच्या नमो पेन्शन योजनेपासून १५ हजार ७९१ शेतकरी वंचित राहणार आहेत.

तालुकानिहाय शेतकरी संख्याई-केवायसी प्रलंबित असलेले तालुकानिहाय शेतकरी असे- अर्धापूर १२१, भोकर ११४, बिलोली १६२, देगलूर १७, धर्माबाद १३७, हदगाव ३७८, हिमायतनगर ९१०, कंधार ८७, किनवट १९१, लोहा २५४, माहूर ७२, मुखेड ७९, मुदखेड २१७, नायगाव २, नांदेड ४९, तर उमरी तालुक्यात ५५ शेतकऱ्यांची ई-केवायसी प्रलंबित आहे.

या महिन्यात मिळणार १६ वा हप्ताशेतकऱ्यांना पीएम किसान सन्मान योजनेचा १६ वा हप्ता फेब्रुवारी महिन्यात मिळणार आहे. याशिवाय जे शेतकरी पीएम किसानसाठी पात्र आहेत, अशा शेतकऱ्यांना राज्य सरकारच्या नमो पेन्शन योजनेचाही लाभ मिळेल. सदर योजनेसाठी महसूल विभागाकडून लँड फिडिंगचे काम केले जाते, तर ग्रामविकास विभागाकडून मयत लाभार्थ्यांची माहिती कृषी विभागाकडे दिली जाते, तर ही योजनेची कृषी विभागाकडून अंमलबजावणी केली जात आहे.

पोस्ट ऑफिसमध्ये खाते काढावेशेतकऱ्यांनी आधार फिडिंग केवायसी डीबीटी अकाउंट काढून घ्यावे, अन्यथा लाभापासून वंचित राहावे लागेल. शक्यतोवर पोस्ट ऑफिसमध्ये खाते काढावे.- भाऊसाहेब बरहाटे, जिल्हा कृषी अधीक्षक, नांदेड.

टॅग्स :NandedनांदेडFarmerशेतकरीAgriculture Sectorशेती क्षेत्र