शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
3
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
4
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
5
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
6
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
7
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
8
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले
9
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
10
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
11
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे
12
अमित शाहांची सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत बैठक, पाकिस्तानी नागरिकांबद्दल दिला महत्त्वाचा आदेश
13
"निर्लज्ज पाकिस्तान", दहशतवाद्यांना 'स्वातंत्र्य सैनिक' म्हटल्यावर पाक क्रिकेटर प्रचंड संतापला
14
गुंतवणुकीत 'ही' काळजी घेतली, तर होऊ शकता मालामाल! कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायच्या?
15
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
16
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
17
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
18
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
19
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
20
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून

अजूनही आधार जोडलेच नाही; आता सोळावा हप्ता शेतकऱ्यांच्या हातचा जाणार!

By रामेश्वर बालाजीराव काकडे | Updated: February 6, 2024 19:08 IST

पीएम किसान, नमो पेन्शन योजना, आधार संलग्न केलेच नाही, १५,७९१ शेतकरी १६ व्या हप्त्याला मुकणार

नांदेड : किसान पेन्शन योजनेतील लाभार्थ्यांना ई-केवायसी, आधार प्रमाणीकरण, आधार लिंक या गोष्टींची पूर्तता करण्यासाठी शासनाने दीड वर्षाचा कालावधी दिला होता. आजपर्यंत जिल्ह्यातील १५ हजार ७९१ शेतकऱ्यांनी आधार संलग्न केले नसल्याने सदर शेतकरी केंद्र शासनाच्या पीएम किसानच्या १६ व्या हप्त्याला मुकावे लागणार आहे. शासनाकडून याबाबत वारंवार सूचना देऊनही दुर्लक्ष केल्याचा फटका शेतकऱ्यांना बसला.

जिल्ह्यात पीएम किसान योजनेसाठी ३ लाख ८७ हजार १५७ इतकी पात्र शेतकऱ्यांची संख्या आहे. त्यापैकी ५ फेब्रुवारीपर्यंत ३ लाख ८४ हजार ३१२ शेतकऱ्यांनी ई-केवायसी पूर्ण केली आहे. याचे प्रमाण ९९ टक्के इतके आहे; पण ई-केवायसी केल्यानंतर ३ लाख ७१ हजार ३६६ शेतकऱ्यांनीच आधार संलग्न केले आहे. त्यामुळे उर्वरित शेतकऱ्यांना केंद्र सरकारच्या पीएम किसानसह राज्य सरकारच्या नमो पेन्शन योजनेपासून वंचित राहावे लागणार आहे.

देशातील शेतकऱ्यांना आर्थिक आधार देण्यासाठी केंद्र सरकारने पाच वर्षांपूर्वी पी.एम. किसान सन्मान योजना सुरू केली आहे. यामध्ये प्रत्येक शेतकऱ्याला महिन्याला पाचशे रुपये असे चार महिन्यांचे दोन हजार रुपये वर्षाला तीन टप्प्यात दिले जातात, तर राज्य सरकारने नमो पेन्शन योजना सुरू केली आहे. या योजनेतही चार महिन्यांचे दोन हजार याप्रमाणे सहा हजार रुपये पेन्शन शेतकऱ्यांना दिली जात आहे; पण ई-केवायसी करूनही आधार संलग्नीकरण न केल्याने जिल्ह्यातील १५ हजारांपेक्षा अधिक शेतकरी या योजनांपासून वंचित राहणार आहेत.

ई-केवायसी प्रलंबित असलेले शेतकरीजिल्ह्यात ९९ टक्के ई-केवायसीचे काम पूर्ण झाले असून केवळ एक टक्के शेतकऱ्यांनी ई-केवायसी केलेली नाही. ई-केवायसी प्रलंबित असलेल्या शेतकऱ्यांची संख्या २८४५ इतकी आहे.

१६ व्या हप्त्यापासून वंचित राहणारे शेतकरीआधार संलग्नीकरण न केल्याने केंद्र शासनाच्या पीएम किसानच्या १६ व्या हप्त्यापासून, तसेच राज्य शासनाच्या नमो पेन्शन योजनेपासून १५ हजार ७९१ शेतकरी वंचित राहणार आहेत.

तालुकानिहाय शेतकरी संख्याई-केवायसी प्रलंबित असलेले तालुकानिहाय शेतकरी असे- अर्धापूर १२१, भोकर ११४, बिलोली १६२, देगलूर १७, धर्माबाद १३७, हदगाव ३७८, हिमायतनगर ९१०, कंधार ८७, किनवट १९१, लोहा २५४, माहूर ७२, मुखेड ७९, मुदखेड २१७, नायगाव २, नांदेड ४९, तर उमरी तालुक्यात ५५ शेतकऱ्यांची ई-केवायसी प्रलंबित आहे.

या महिन्यात मिळणार १६ वा हप्ताशेतकऱ्यांना पीएम किसान सन्मान योजनेचा १६ वा हप्ता फेब्रुवारी महिन्यात मिळणार आहे. याशिवाय जे शेतकरी पीएम किसानसाठी पात्र आहेत, अशा शेतकऱ्यांना राज्य सरकारच्या नमो पेन्शन योजनेचाही लाभ मिळेल. सदर योजनेसाठी महसूल विभागाकडून लँड फिडिंगचे काम केले जाते, तर ग्रामविकास विभागाकडून मयत लाभार्थ्यांची माहिती कृषी विभागाकडे दिली जाते, तर ही योजनेची कृषी विभागाकडून अंमलबजावणी केली जात आहे.

पोस्ट ऑफिसमध्ये खाते काढावेशेतकऱ्यांनी आधार फिडिंग केवायसी डीबीटी अकाउंट काढून घ्यावे, अन्यथा लाभापासून वंचित राहावे लागेल. शक्यतोवर पोस्ट ऑफिसमध्ये खाते काढावे.- भाऊसाहेब बरहाटे, जिल्हा कृषी अधीक्षक, नांदेड.

टॅग्स :NandedनांदेडFarmerशेतकरीAgriculture Sectorशेती क्षेत्र