शहरं
Join us  
Trending Stories
1
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
2
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
3
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
4
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
5
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
6
उद्धवसेना व मनसे नेत्यांच्या चर्चेत काही जागांवरून तिढा; आ. अनिल परब यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट 
7
चव्हाणांनी टाळला 'महायुती' शब्दप्रयोग; म्हणाले, फक्त कमळालाच करा मतदान..!
8
मुंबईत मात्र शरद पवार गटाची राज, उद्धवसोबत जाण्याला पहिली पसंती; मुंबईसाठी उद्धवसेनेला २२ ते ३० जागांचा प्रस्ताव? 
9
६ किलो सोने, ३१३ किलो चांदी अन् ४.६२ कोटी रोख; दिल्लीतील ट्रॅव्हल एजंटवर ईडीची कारवाई, १२ छापे
10
एकतर मैत्रिपूर्ण लढा किंवा समसमान जागावाटप करा; भाजपमधील युती नकोच म्हणणाऱ्यांची नवी भूमिका
11
'सर तन से जुदा' घोषणा देणे देशद्रोह : हायकोर्ट; प्रेषित मोहम्मदांच्या आदर्शाचा केलेला अवमान
12
ठाण्यातील १३१ पैकी १०० जागांवर उद्धवसेना; शरद पवार गटाचा दावा, पहिल्या बैठकीत चर्चा
13
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
14
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
15
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
16
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
17
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
18
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
19
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
20
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
Daily Top 2Weekly Top 5

नांदेड जिल्ह्यातील ५३ गावांना फ्लोराईडचा धोका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 2, 2018 01:06 IST

दुसरीकडे उपलब्ध होणारे पाणीही किती शुद्ध आणि सुरक्षित आहे याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे़ भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेने केलेल्या अभ्यासात जिल्ह्यातील ५३ गावे फ्लोराईड बाधित असल्याचे पुढे आले असून, या विभागातर्फे घेण्यात आलेल्या नमुन्याच्या तपासणीत तब्बल ८७ नमुने बाधित आढळले आहेत़

ठळक मुद्देभूजल सर्वेक्षण विभागाचा अहवाल १६ तालुक्यांतील ८७ नमुने फ्लोराईड बाधित

अनुराग पोवळे ।लोकमत न्यूज नेटवर्कनांदेड : जिल्ह्यातील १६ पाणलोट क्षेत्रातील भूजल पातळीत घट झाल्याने येणाऱ्या काळात जिल्ह्यातील तब्बल ४०१ गावांना पाणी टंचाईचा तडाखा सोसावा लागणार आहे़ दुसरीकडे उपलब्ध होणारे पाणीही किती शुद्ध आणि सुरक्षित आहे याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे़ भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेने केलेल्या अभ्यासात जिल्ह्यातील ५३ गावे फ्लोराईड बाधित असल्याचे पुढे आले असून, या विभागातर्फे घेण्यात आलेल्या नमुन्याच्या तपासणीत तब्बल ८७ नमुने बाधित आढळले आहेत़जिल्ह्यात मागील पावसाळ्यात सरासरी पेक्षा कमी म्हणजेच ८१ टक्के पाऊस झाल्याने तब्बल १६ पाणलोट क्षेत्रातील भूजल पातळीत चिंताजणक घट झाली आहे़ पर्यायाने येणा-या उन्हाळ्यात जिल्हावासीयांना तीव्र पाणीटंचाईचा सामना करावा लागणार आहे़ तब्बल ४०१ गावांना पाणी टंचाईचा तडाखा बसेल असा अंदाज यापूर्वीच भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेने जिल्हा प्रशासनाला सादर केला आहे़ विशेष म्हणजे आॅक्टोबर महिन्यापासूनच मुखेड, देगलूर आणि कंधार या दुष्काळग्रस्त तालुक्यातील तब्बल ११५ गावांना पाणी टंचाईची झळ सोसावी लागत आहे़पावसाने दगा दिल्याने पाणी टंचाईची तीव्रता भीषण होणार आहे़ विशेषत: कंधार, मुखेड, देगलूर पाठोपाठ दुसºया टप्प्यातील जिल्यातील बिलोली, नायगाव या तालुक्यातील गावानाही झळ सोसावी लागणार आहे़ एप्रिल २०१९ ते जून २०१९ पर्यंत मुदखेड, धर्माबाद, बिलोली, उमरी, नायगाव या पाच तालुक्यातील तब्बल १७६ गावाना पाण्यासाठी भटकंती करावी लागणार आहे़ पहिल्या टप्प्यात देगलूर तालुक्यातील ६० गावांना पाणी टंचाईची झळ बसण्याचा अंदाज आहे़ तर मुखेड तालुक्यातील ५३ आणि कंधार तालुक्यातील दोन गावे आॅक्टोबरपासूनच तहानलेली राहणार आहेत़ मुखेड तालुक्यातील ४० गावांसमोर पाणी टंचाईचा प्रश्न उभा आहे़ तर बिलोली तालुक्यातील ३२ आणि नायगाव तालुक्यातील ८ गावांना पाणी टंचाई जाणवणार आहे़ टंचाईची ही तीव्रता तिस-या टप्प्यातही उग्र होण्याची शक्यता आहे़ नायगाव तालुक्यातील ६१ गावे टँकरवर विसंबून राहतील़ तर उमरी तालुक्यातील ५८ गावांना पाणी टंचाईचा मुकाबला करावा लागेल़ संभाव्य पाणी टंचाई लक्षात घेवून प्रशासनाने उपाय योजनांचे नियोजन सुरु केले असतानाच आता फ्लोराईड बाधीत पाण्याचा अहवाल पुढे आला आहे़जिल्ह्यातील १६ तालुक्यात भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेने अभ्यास केला असता ८७ नमुने फ्लोराईड बाधीत आढळून आले आहेत़ यात सर्वाधिक फ्लोराईड बाधित नमुने नायगाव तालुक्यात आढळले असून तेथे तब्बल १८ नमुने बाधीत होते़ तर उमरी आणि कंधार तालुक्यात प्रत्येकी १७ आणि हदगाव आणि किनवट तालुक्यात प्रत्येकी १३ नमुने फ्लोराईड बाधीत असल्याचे दिसून आले आहे़अर्धापूर तालुक्यात ३, नांदेड २, मुखेड २ तर भोकर आणि देगलूर तालुक्यातील प्रत्येकी १ नमुनाही फ्लोराईडयुक्त पाण्याने बाधीत असल्याचा हा अहवाल सांगतो़ या बाधित नमुन्यावरुन तब्बल जिल्ह्यातील ५३ गावांसमोर फ्लोराईडचे संकट कायम असल्याचे दिसून येते़ यात कंधार तालुक्यातील १३ गावे, उमरी १२, नायगाव १०, किनवट ६, हदगाव ६, नांदेड २ तर देगलूर, भोकर, मुखेड आणि अर्धापूर तालुक्यातील प्रत्येकी १ गाव फ्लोराईडने बाधित असल्याचे दिसून येते़ विशेष म्हणजे फ्लोराईडवर सध्यातरी कुठलाही ईलाज नाही़ परंतू ग्रामस्थांमध्ये जागरुकता निर्माण करुन त्यांना फ्लोराईडयुक्त पाण्याचे धोके समजावुन सांगावे लागणार आहे़ पाणी नमुन्यात आढळलेल्या फ्लोराईडमुळे फ्लोरोसीस सारख्या घातक आजाराचा या गावातील ग्रामस्थांना सामना करावा लागणार आहे़जमिनीतील पाण्याची काळजी कोणाला ?पाण्याचा वारेमाप उपसा आणि दुसरीकडे दिवसेंदिवस पावसाचे कमी होत असलेल प्रमाण यामुळे भूजल पातळी खालावत आहे़ त्यातूनच फ्लोराईडयुक्त पाण्याचा धोका निर्माण झाला आहे़ ज्या पाण्यामध्ये फ्लोरीनचे प्राकृतिक तत्व आढळून येतात त्यालाच फ्लोराईड म्हटले जाते़ हे फ्लोराईड पाण्याबरोबरच मातीतील विविध स्तरात आढळून येतात़ फ्लोराईडयुक्त पाण्यामुळे विशेषत: दातांचे आरोग्य संकटात सापडते़ याबरोबरच पोटासंबंधीचे विविध आजार उद्भवतात़ या पाण्यामुळेच शरीरातील हाडे कमजोर होतात तसेच दातांना पिवळेपणा येतो़ त्यामुळे फ्लोराईडयुक्त पाण्याचा वापर आरोग्यासाठी धोकादायक आहे़ या पार्श्वभूमीवर फ्लोराईड बाधीत नमुने आढळलेल्या जिल्हयातील ५३ गावांनी पिण्याच्या पाण्यासंबंधी दक्षता बाळगण्याची आवश्यकता आहे़ प्रशासनही या दृष्टीने प्रयत्नशील आहे़

टॅग्स :Nandedनांदेडwater pollutionजल प्रदूषणwater scarcityपाणी टंचाईvishnupuri damविष्णुपुरी धरण