शहरं
Join us  
Trending Stories
1
रोहित आर्याप्रकरणी अहवाल सादर करा! मानवाधिकार आयोगाकडून पोलिसांना ८ आठवड्यांची मुदत
2
आजचे राशीभविष्य,०४ नोव्हेंबर २०२५: वडीलधार्‍यांकडून लाभ, दुपार नंतर प्रतिकूलतेशी तोंड द्यावे लागेल
3
छगन भुजबळ यांच्यावर यशस्वी हृदय शस्त्रक्रिया; जाणून घ्या हेल्थ अपडेट
4
मतदारांची दुबार नावे शोधा, त्यांचे दुबार मतदान रोखा! निवडणूक आयोगाने दिले स्पष्ट आदेश
5
STचा पुढचा पल्ला वीजनिर्मितीचा; सौरऊर्जा प्रकल्पातून वर्षाला ३०० मेगावॅट निर्मितीचे लक्ष्य
6
मुंबई अपहरण प्रकरण: रोहित आर्याचे एन्काउंटर; माजी मंत्री केसरकर यांची हाेणार चौकशी
7
मुख्य अधिष्ठाता डॉ. बारोट यांची उचलबांगडी; हलगर्जी भोवली, वैद्यकीय अधिकाऱ्याला कारणे दाखवा
8
आवडत्या बांधकाम व्यावसायिकांसाठी ५ हजार कोटींचा पीएपी घोटाळा: वर्षा गायकवाड
9
डॉक्टर संपाचा रुग्णसेवेवर परिणाम नाही; राज्यभर ओपीडीत रुग्णांची नेहमीप्रमाणेच तपासणी
10
ऊस दरासाठी बोलावलेली पहिली बैठक निष्फळ; आम्ही कायदा हातात घेऊन कारखाने बंद पाडू; राजू शेट्टींचा इशारा
11
रशियाच्या मदतीने इराण ८ नवीन अणुऊर्जा प्रकल्प बांधणार, असा करार दोन्ही देशांमध्ये झाला
12
फक्त २००० रुपयांची SIP तुम्हाला बनवेल 'कोट्यधीश'; कंपाऊंडिंगचे गणित समजून घ्या
13
'घोळ कुणी घातला आणि फायदा कुणाला झाला, हे आता लपवणं शक्यच नाही'; राज ठाकरेंच्या आमदाराचं थेट मुद्द्यावर बोट
14
१ कोटींचा पगार, ६० सेकंदात व्हिसा रिजेक्ट; इंजिनिअरने धक्कादायक अनुभव सांगितला, ते तीन प्रश्नही केले शेअर
15
आजीला ‘हार्ट अटॅक’...घरच्यांनी लपवली गोष्ट; भारताच्या लेकीनं फिल्डिंगच्या जोरावर फिरवली मॅच!
16
Railway Accident: मुंब्रा रेल्वे अपघात प्रकरणी दोन इंजिनिअरवर गुन्हा दाखल, एफआरआयमध्ये काय?
17
चिनी एअरलाइन्समध्ये विवाहित एअर होस्टेस आता 'एअर आंटी' झाली, मोठा वाद सुरू झाला
18
Travel : भारतापासून अवघ्या ४ तासांवर आहे 'हा' देश; शिमला-मनालीच्या बजेटमध्ये करू शकता परदेशवारी!
19
Amol Majumdar : भारतीय महिला संघाच्या यशामागचा हिरो अन् त्याचं ‘सेम टू सेम’ हिटमॅन स्टाईल सेलिब्रेशन
20
"मी म्हणालो हॉटेलवरून उडी मारेन अन् स्वतःला संपवून टाकेन", बालाजी कल्याणकरांच्या डोक्यात काय सुरू होतं?

नांदेड जिल्ह्यातील ५३ गावांना फ्लोराईडचा धोका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 2, 2018 01:06 IST

दुसरीकडे उपलब्ध होणारे पाणीही किती शुद्ध आणि सुरक्षित आहे याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे़ भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेने केलेल्या अभ्यासात जिल्ह्यातील ५३ गावे फ्लोराईड बाधित असल्याचे पुढे आले असून, या विभागातर्फे घेण्यात आलेल्या नमुन्याच्या तपासणीत तब्बल ८७ नमुने बाधित आढळले आहेत़

ठळक मुद्देभूजल सर्वेक्षण विभागाचा अहवाल १६ तालुक्यांतील ८७ नमुने फ्लोराईड बाधित

अनुराग पोवळे ।लोकमत न्यूज नेटवर्कनांदेड : जिल्ह्यातील १६ पाणलोट क्षेत्रातील भूजल पातळीत घट झाल्याने येणाऱ्या काळात जिल्ह्यातील तब्बल ४०१ गावांना पाणी टंचाईचा तडाखा सोसावा लागणार आहे़ दुसरीकडे उपलब्ध होणारे पाणीही किती शुद्ध आणि सुरक्षित आहे याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे़ भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेने केलेल्या अभ्यासात जिल्ह्यातील ५३ गावे फ्लोराईड बाधित असल्याचे पुढे आले असून, या विभागातर्फे घेण्यात आलेल्या नमुन्याच्या तपासणीत तब्बल ८७ नमुने बाधित आढळले आहेत़जिल्ह्यात मागील पावसाळ्यात सरासरी पेक्षा कमी म्हणजेच ८१ टक्के पाऊस झाल्याने तब्बल १६ पाणलोट क्षेत्रातील भूजल पातळीत चिंताजणक घट झाली आहे़ पर्यायाने येणा-या उन्हाळ्यात जिल्हावासीयांना तीव्र पाणीटंचाईचा सामना करावा लागणार आहे़ तब्बल ४०१ गावांना पाणी टंचाईचा तडाखा बसेल असा अंदाज यापूर्वीच भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेने जिल्हा प्रशासनाला सादर केला आहे़ विशेष म्हणजे आॅक्टोबर महिन्यापासूनच मुखेड, देगलूर आणि कंधार या दुष्काळग्रस्त तालुक्यातील तब्बल ११५ गावांना पाणी टंचाईची झळ सोसावी लागत आहे़पावसाने दगा दिल्याने पाणी टंचाईची तीव्रता भीषण होणार आहे़ विशेषत: कंधार, मुखेड, देगलूर पाठोपाठ दुसºया टप्प्यातील जिल्यातील बिलोली, नायगाव या तालुक्यातील गावानाही झळ सोसावी लागणार आहे़ एप्रिल २०१९ ते जून २०१९ पर्यंत मुदखेड, धर्माबाद, बिलोली, उमरी, नायगाव या पाच तालुक्यातील तब्बल १७६ गावाना पाण्यासाठी भटकंती करावी लागणार आहे़ पहिल्या टप्प्यात देगलूर तालुक्यातील ६० गावांना पाणी टंचाईची झळ बसण्याचा अंदाज आहे़ तर मुखेड तालुक्यातील ५३ आणि कंधार तालुक्यातील दोन गावे आॅक्टोबरपासूनच तहानलेली राहणार आहेत़ मुखेड तालुक्यातील ४० गावांसमोर पाणी टंचाईचा प्रश्न उभा आहे़ तर बिलोली तालुक्यातील ३२ आणि नायगाव तालुक्यातील ८ गावांना पाणी टंचाई जाणवणार आहे़ टंचाईची ही तीव्रता तिस-या टप्प्यातही उग्र होण्याची शक्यता आहे़ नायगाव तालुक्यातील ६१ गावे टँकरवर विसंबून राहतील़ तर उमरी तालुक्यातील ५८ गावांना पाणी टंचाईचा मुकाबला करावा लागेल़ संभाव्य पाणी टंचाई लक्षात घेवून प्रशासनाने उपाय योजनांचे नियोजन सुरु केले असतानाच आता फ्लोराईड बाधीत पाण्याचा अहवाल पुढे आला आहे़जिल्ह्यातील १६ तालुक्यात भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेने अभ्यास केला असता ८७ नमुने फ्लोराईड बाधीत आढळून आले आहेत़ यात सर्वाधिक फ्लोराईड बाधित नमुने नायगाव तालुक्यात आढळले असून तेथे तब्बल १८ नमुने बाधीत होते़ तर उमरी आणि कंधार तालुक्यात प्रत्येकी १७ आणि हदगाव आणि किनवट तालुक्यात प्रत्येकी १३ नमुने फ्लोराईड बाधीत असल्याचे दिसून आले आहे़अर्धापूर तालुक्यात ३, नांदेड २, मुखेड २ तर भोकर आणि देगलूर तालुक्यातील प्रत्येकी १ नमुनाही फ्लोराईडयुक्त पाण्याने बाधीत असल्याचा हा अहवाल सांगतो़ या बाधित नमुन्यावरुन तब्बल जिल्ह्यातील ५३ गावांसमोर फ्लोराईडचे संकट कायम असल्याचे दिसून येते़ यात कंधार तालुक्यातील १३ गावे, उमरी १२, नायगाव १०, किनवट ६, हदगाव ६, नांदेड २ तर देगलूर, भोकर, मुखेड आणि अर्धापूर तालुक्यातील प्रत्येकी १ गाव फ्लोराईडने बाधित असल्याचे दिसून येते़ विशेष म्हणजे फ्लोराईडवर सध्यातरी कुठलाही ईलाज नाही़ परंतू ग्रामस्थांमध्ये जागरुकता निर्माण करुन त्यांना फ्लोराईडयुक्त पाण्याचे धोके समजावुन सांगावे लागणार आहे़ पाणी नमुन्यात आढळलेल्या फ्लोराईडमुळे फ्लोरोसीस सारख्या घातक आजाराचा या गावातील ग्रामस्थांना सामना करावा लागणार आहे़जमिनीतील पाण्याची काळजी कोणाला ?पाण्याचा वारेमाप उपसा आणि दुसरीकडे दिवसेंदिवस पावसाचे कमी होत असलेल प्रमाण यामुळे भूजल पातळी खालावत आहे़ त्यातूनच फ्लोराईडयुक्त पाण्याचा धोका निर्माण झाला आहे़ ज्या पाण्यामध्ये फ्लोरीनचे प्राकृतिक तत्व आढळून येतात त्यालाच फ्लोराईड म्हटले जाते़ हे फ्लोराईड पाण्याबरोबरच मातीतील विविध स्तरात आढळून येतात़ फ्लोराईडयुक्त पाण्यामुळे विशेषत: दातांचे आरोग्य संकटात सापडते़ याबरोबरच पोटासंबंधीचे विविध आजार उद्भवतात़ या पाण्यामुळेच शरीरातील हाडे कमजोर होतात तसेच दातांना पिवळेपणा येतो़ त्यामुळे फ्लोराईडयुक्त पाण्याचा वापर आरोग्यासाठी धोकादायक आहे़ या पार्श्वभूमीवर फ्लोराईड बाधीत नमुने आढळलेल्या जिल्हयातील ५३ गावांनी पिण्याच्या पाण्यासंबंधी दक्षता बाळगण्याची आवश्यकता आहे़ प्रशासनही या दृष्टीने प्रयत्नशील आहे़

टॅग्स :Nandedनांदेडwater pollutionजल प्रदूषणwater scarcityपाणी टंचाईvishnupuri damविष्णुपुरी धरण