शहरं
Join us  
Trending Stories
1
कोणताही मूर्ख माणूस असा उघडपणे बॅगा घेऊन पैसे वाटप करू शकतो का? राऊतांच्या दाव्यांवर शिंदे गटाचे प्रत्युत्तर
2
बेपर्वाईचे १४ बळी,७८ जखमी; घाटकोपरला पेट्रोल पंपावर होर्डिंग कोसळले, अवकाळी पावसाचा तडाखा
3
आजचे राशीभविष्य १४ मे २०२४; सूर्य वृषभेत, दलाली, व्याज, कमिशनमधून मोठ्या धनलाभाची शक्यता
4
महामुंबईला अवकाळीचा तडाखा; मुंबई, ठाणे, कल्याण, नवी मुंबई, रायगड, पालघरला पावसाने झोडपले
5
राज्यभरातील होर्डिंगचे स्ट्रक्चरल ऑडिट करा: CM एकनाथ शिंदे, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल
6
“मुझे बचाव, मैं शेड के नीचे फस गया हूँ”; होर्डिंगखाली दबलेल्या जखमीची सुटका
7
...तर पाकला हातात बांगड्या घालायला लावू! अणुशक्तीवरुन इंडिया आघाडीवर PM मोदींचा घणाघात
8
महाराष्ट्रात टक्का वाढेना; देशातील ९६ मतदारसंघात सरासरी ६६ टक्के मतदान
9
खिचडी सरकारकडून १२ लाख कोटींचा घोटाळा; अमित शाह यांचा महाआघाडीवर आरोप
10
प्रश्न: विवाह कधी करणार? राहुल गांधी म्हणाले, आता लवकरच करावा लागेल...
11
चुका नेहरूंच्या, मोदींना दोष कशासाठी? परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर, काँग्रेसकडून जनतेची दिशाभूल
12
सकाळी लोकलने, संध्याकाळी पावसाने मुंबईकरांना झोडपले; मध्य रेल्वेवर लोकल गोंधळामुळे तारांबळ
13
वादळी पावसाने मुंबईची अवस्था वाईट; हवामान खाते म्हणते, “आम्ही अलर्ट दिला होता”
14
जैन समाजाच्या समस्या सोडवण्यास नेहमीच तत्पर राहू; देवेंद्र फडणवीस, प्रमोद सावंत यांची हमी
15
“पीयूष गोयल मुंबईसह राज्याच्या विकासासाठी प्रयत्न करतील”; CM एकनाथ शिंदे यांना विश्वास
16
नरेंद्र मोदींनाही ७५ वर्षांनंतर राजकारणातून निवृत्त करणार का?: रमेश चेन्नीथला यांचा सवाल
17
...तर राष्ट्रवादी आणि शिवसेना पक्ष फुटलेच नसते, अमित शाहांचा दावा 
18
"भाजपा 400 चा आकडा पार करू शकणार नाही...", निवडणूक निकालांबाबत ममता बॅनर्जीं केली मोठी भविष्यवाणी
19
"पंतप्रधान मोदी यांच्याशी चर्चा करण्यासाठी समोरची व्यक्ती त्या बरोबरीची असायला हवी"
20
Ghatkopar Hoarding Collapse Update: ८ जणांचा मृत्यू, ६६ जखमी; मृतांच्या नातेवाईकांना ५ लाखांची मदत जाहीर, मुख्यमंत्री Eknath Shinde यांची घोषणा

पहिली ते आठवीपर्यंतचे ५ लाख ३ हजार ८८० विद्यार्थी विनापरीक्षा उत्तीर्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 05, 2021 4:16 AM

नांदेड : कोरोनामुळे वर्षभर शाळा बंद राहिल्या. मात्र, शिक्षकांकडून ऑनलाईन वर्ग घेण्यात आले. दरम्यान, ऐन परीक्षेच्या काळात कोरोनाचा प्रादुर्भाव ...

नांदेड : कोरोनामुळे वर्षभर शाळा बंद राहिल्या. मात्र, शिक्षकांकडून ऑनलाईन वर्ग घेण्यात आले. दरम्यान, ऐन परीक्षेच्या काळात कोरोनाचा प्रादुर्भाव पुन्हा वाढल्याने पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना परीक्षा न घेताच पुढच्या वर्गात पाठविण्याचा निर्णय राज्य शासनाने जाहीर केला. या निर्णयामुळे जिल्ह्यातील ५ लाख ३ हजार ८८० विद्यार्थी विनापरीक्षा उत्तीर्ण झाले आहेत. या निर्णयामुळे जिल्ह्यातील सोळा तालुक्यांमधील पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना आता थेट पुढच्या वर्गात प्रवेश मिळेल. गतवर्षी मार्च महिन्यात कोरोनाचे संकट आल्यानंतर विद्यार्थ्यांच्या परीक्षा होऊ शकल्या नव्हत्या. त्यानंतर त्यांना पुढील वर्गात प्रवेश देण्यात आला. कोरोनाचे संकट वर्षभर कायम असल्याने शाळा उघडू शकल्या नाहीत. मात्र, शाळांनी ऑनलाईन वर्ग घेऊन विद्यार्थ्यांचे अभ्यासक्रम पूर्ण करून घेतले हाेते. याकाळात विद्यार्थ्यांना ऑनलाईन अभ्यास देण्यात आला. ग्रामीण भागातील अनेक विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षण मिळू शकले नाही. यंदा आकारिक व संकलित चाचण्या होऊ शकल्या नव्हत्या. त्यामुळे पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांचे मूल्यमापन कशाच्या आधारे करावे, हा देखील प्रश्न होता. मात्र, आता हा प्रश्न निकाली निघाला असून, पुढच्या वर्षी शिक्षकांना विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक विकासासाठी अधिक परिश्रम घ्यावे लागणार आहेत.

पालक म्हणतात...

१. आता हे वर्षसुद्धा विद्यार्थ्यांच्या भवितव्यासाठी कसे जाणार, याची चिंता आहे. गतवर्षीही परीक्षा झाल्या नव्हत्या. यावर्षीही परीक्षा होत नसल्याने मुले परीक्षेपासून दूर राहात आहेत. विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेचा प्रश्न यानिमित्ताने निर्माण झाला आहे.

- सुनील लोंढे, पालक

२. वर्षभर ऑनलाईन शिक्षण मिळाल्यानंतर परीक्षा घेणे आवश्यक होते. मात्र, कोरोनाचे संकट अधिकच वाढले आहे. त्यामुळे परीक्षा रद्द करून मुलांना उत्तीर्ण करण्याचा निर्णय योग्यच आहे. मुलांच्या परीक्षेपेक्षाही त्यांचा जीव अधिक महत्त्वाचा आहे.

- अशोक गालफाडे, पालक

शिक्षणतज्ज्ञ म्हणतात...

गतवर्षी सुरू झालेले कोरोनाचे संकट यावर्षीही कायम असल्याने परीक्षा रद्द होण्याचा निर्णय अपेक्षित होता. मात्र, पुढील वर्षी शैक्षणिक नुकसान भरून काढण्याचा प्रयत्न शासन स्तरावरुन होणे आवश्यक आहे. -

२. वर्षभर ऑनलाईन शिक्षण सुरू असले तरी काही घेण्यात आलेल्या उपक्रमात अनेक विद्यार्थी सहभागी हाेऊ शकले नव्हते. त्यामुळे पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी शासनाने घेतलेला निर्णय योग्यच आहे. पुढील वर्षी अधिक परिश्रम घेऊन गतवर्षीचा अभ्यासक्रम शिकवावा लागेल.

- व्यंकटेश चौधरी, शिक्षण विस्तार अधिकारी, नांदेड.

आरटीईनुसार हा निर्णय आवश्यक

मोफत व सक्तीच्या शिक्षण हक्क कायद्यानुसार पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना अनुत्तीर्ण करता येत नाही. तर दुसरीकडे वय वाढल्यानंतर संबंधित विद्यार्थ्याला खालच्या वर्गात प्रवेश देता येत नाही. वयोगटानुसार वर्गात प्रवेश द्यावा लागतो. त्यामुळे पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना परीक्षा न घेता, प्रमोट करण्याचा निर्णय घेणे शिक्षण विभागासाठी अपरिहार्य होते, असे शिक्षणतज्ज्ञांनी सांगितले.