शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्ली कॅपिटल्स जिंकले, राजस्थान रॉयल्सचे प्ले ऑफचे तिकीट पक्के झाले! गणित बिघडले
2
Rakhi Sawant : राखी सावंतची प्रकृती बिघडली, रुग्णालयातील फोटो व्हायरल, नेमकं काय झालंय?
3
जगातील कोणतीही शक्ती CAA ला रोखू शकत नाही; अमित शाहंचा TMC-काँग्रेसवर हल्लाबोल
4
छत्रपतींचा अपमान करणाऱ्या महाराष्ट्रद्रोह्यांना मराठी माणूस धडा शिकवेल; काँग्रेसची घणाघाती टीका
5
PM Modi Property in Affidavit, Lok Sabha Election 2024: वाराणसीतून पंतप्रधान मोदी यांनी भरला उमेदवारी अर्ज... पाहा त्यांची प्रॉपर्टी किती? शिक्षण किती?
6
इस्रायलच्या अडचणी वाढणार? आंतरराष्ट्रीय न्यायालयात होणार सुनावणी
7
पेटीएमवर UPI Lite Wallet कसे अ‍ॅक्टिव्हेट करायचे? जाणून घ्या प्रोसेस...
8
"गेल्या १० वर्षात देशाची प्रगती, आता भारताला कुणीच..."; रश्मिका मंदानानं केलं मुंबईच्या 'अटल सेतू'चं कौतुक!
9
KL Rahul चा अफलातून झेल पाहून संजीव गोएंका खूश झाले; टाळ्या वाजवताना दिसले, Video
10
Kangana Ranaut : 7 किलो सोनं, 60 किलो चांदी, 50 LIC पॉलिसी...; कोट्यवधींची मालकीण आहे कंगना राणौत
11
राहुल द्रविडनंतर BCCI मुख्य प्रशिक्षक म्हणून CSK च्या ताफ्यातील प्रमुख व्यक्तीचा करतेय विचार 
12
घाटकोपर होर्डिंगप्रकरणी दोषींवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा, अंबादास दानवेंची मागणी
13
34 हजार कोटींचा बँक घोटाळा; DHFL चा माजी संचालक धीरज वाधवानला CBI ने घेतले ताब्यात
14
अजितदादा आणखी ५-६ दिवस थांबले असते तर शरद पवार 'तो' निर्णय घेणार होते; पाटलांचा खुलासा
15
VIP चोराची अजब कहाणी! वर्षभरात 200वेळा विमानप्रवास; फ्लाईटमधून कोट्यवधींचे दागिने लंपास
16
'कल्याणमध्ये ठाकरेसेना-शिंदेंसेनेची नुरा कुस्ती, निवडणुकीनंतर मोदी आणि ठाकरे एकत्र येतील', प्रकाश आंबेडकर यांचा दावा
17
आधी झापलं, मग जेवायला घरी बोलावलं! Sanjiv Goenka यांची लोकेश राहुलला झप्पी
18
"अग्निवीर योजना फाडून कचऱ्यात फेकून देऊ", राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल 
19
'चंदा लो, धंदा दो' या महायुतीच्या धोरणामुळेच झाली होर्डिंग दुर्घटना; विजय वडेट्टीवारांचे टीकास्त्र
20
Arvind Kejriwal : "तुम्ही कमळाचं बटण दाबलंत तर मला पुन्हा जेलमध्ये जावं लागेल पण जर..."

नांदेड जिल्ह्यातील अतिवृष्टीचे २६१ कोटी दोन वर्षानंतरही थकीतच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 11, 2018 12:51 AM

दुष्काळाने होरपळून निघालेल्या शेतकऱ्यांना दोन वर्षांपूर्वी दुष्काळापाठोपाठ अतिवृष्टीचा फटका सहन करावा लागला होता़ या नैसर्गिक संकटानंतर प्रशासनाने नुकसानीची पाहणी करून पीक विमा योजनेत समाविष्ट नसलेल्या शेतक-यांना अनुदान देण्यासाठी शासनाकडे २६१ कोटी ९५ लाखांची मागणी केली होती़ मात्र दोन वर्षे उलटली तरी या शेतक-यांच्या हाती छदामही पडलेला नाही़

ठळक मुद्देनुकसानीची प्रतीक्षा : विमा योजनेत समाविष्ट नसलेल्यांना शासनाने दाखविला ठेंगा

गोकुळ भवरे।लोकमत न्यूज नेटवर्ककिनवट : दुष्काळाने होरपळून निघालेल्या शेतकऱ्यांना दोन वर्षांपूर्वी दुष्काळापाठोपाठ अतिवृष्टीचा फटका सहन करावा लागला होता़ या नैसर्गिक संकटानंतर प्रशासनाने नुकसानीची पाहणी करून पीक विमा योजनेत समाविष्ट नसलेल्या शेतक-यांना अनुदान देण्यासाठी शासनाकडे २६१ कोटी ९५ लाखांची मागणी केली होती़ मात्र दोन वर्षे उलटली तरी या शेतक-यांच्या हाती छदामही पडलेला नाही़राज्य शासन शेतकरीविरोधी असल्याच्या तक्रारी वारंवार केल्या जातात़ शेतक-यांच्या या आरोपांना जणूकाही पुष्टी देणारीच ही बाब असल्याचे दिसून येते़ आॅक्टोबर २०१६ मध्ये किनवटसह जिल्ह्यातील सर्वच तालुक्यांना अतिवृष्टीचा तडाखा बसला़ अतिवृष्टीनंतर जिल्ह्यातील सर्व मंडळ अधिका-यांनी नुकसानीची पाहणी केली़ यावरून अतिवृष्टीमुळे फळबाग, फळपिकांचे नुकसान निरंक असल्याचे दिसून आले़ मात्र जिरायत पीक असलेल्या सोयाबीन, ज्वारी, उडीद याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते़ यावरून तसा अहवाल जिल्हा प्रशासनाकडे दिला़ यावर याद्या तयार करताना बाधित शेतक-यांना दोन हेक्टरपेक्षा जास्त अनुदान जाणार नाही, तसेच पीक कंपनीच्या मंजूर रकमेच्या ५० टक्के रक्कम या निकषावर अनुदान वाटपाच्या याद्या करण्यात आल्या़ या यादीनुसार जिल्ह्यातील १ हजार ५४७ गावे बाधित असल्याचे आणि या गावातील ४ लाख ९३ हजार ९३९ शेतक-यांचे नुकसान झाल्याचे पुढे आले होते़ या नुकसानीपोटी जिल्हा प्रशासनाने २६१ कोटी ९५ लाख ९८ हजार ६६८ रुपयांची मागणी शासनाकडे केली होती़ यात किनवट तालुक्यातील नुकसानीची रक्कम २० कोटी ८३ लाख १८ हजार ७८ रुपये एवढी होती़ मात्र सदर नुकसान भरपाई शासनाकडून अद्यापही मिळालेली नाही़दरम्यान, फेब्रुवारी २०१७ मध्येही किनवटसह जिल्ह्यातील ९ तालुक्यांचे गारपिटीमुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे़ याचे पंचनामेही करण्यात आले़ ९ तालुक्यातील तब्बल २९ हजार ६३५ हेक्टर क्षेत्राला या गारपिटीचा फटका बसला होता़ या नुकसानीपोटीही तातडीने मदत देण्याची आवश्यकता व्यक्त होत आहे़ संकटकाळी शेतकºयांना मदत न मिळाल्यास संकट वाढू शकते, अशा प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत़तालुकानिहाय अशी होती मागणीनांदेड -१३ कोटी ३४ लाख १३ हजार, मुदखेड- १९ कोटी ५३ लाख, अर्धापूर-११ कोटी ४५ लाख ३१ हजार, भोकर- ७ कोटी ४४ लाख २६ हजार, उमरी-११ कोटी ७६ लाख १ हजार, कंधार-१७ कोटी ६३ लाख ३५ हजार, लोहा-२९ कोटी ४२ लाख ४१ हजार, माहूर-१३ कोटी १ लाख ४९ हजार,किनवट-२० कोटी ८३ लाख १८ हजार, हदगाव-१५ कोटी १४ लाख १२ हजार, हिमायतनगर-८ कोटी ५७ लाख ९८ हजार, देगलूर-१९ कोटी ९६ लाख ९८ हजार, बिलोली-१८ कोटी ८ लाख ३५ हजार, धर्माबाद-११ कोटी ४२ लाख ७९ हजार, नायगाव-१३ कोटी २१ लाख १२ हजार, मुखेड-३१ कोटी ११ लाख ४३ हजार रुपये़

टॅग्स :droughtदुष्काळFarmerशेतकरी