शहरं
Join us  
Trending Stories
1
घाबरायची गरज नाही! ट्रम्प यांच्या H-1B व्हिसा बॉम्बनंतर उडालेल्या गोंधळात, अमेरिकन अधिकाऱ्यानंच दिली आनंदाची बातमी; म्हणाले, फक्त...
2
ट्रम्प यांचा H-1B व्हिसाबाबत निर्णय, नियम बदलावर भारताची पहिली प्रतिक्रिया; सरकार म्हणते...
3
SL vs BAN : 'काठावर पास' झालेल्या बांगलादेशचा टॉपर श्रीलंकेला दणका; पराभवाचा हिशोबही केला चुकता
4
“२३८ नवीन रेक, नववर्षांत स्वयंचलित दरवाजे असलेली लोकल, ६० टक्के प्रवासी वाढ”: अश्विनी वैष्णव 
5
GST कपातीनंतर Amul ची मोठी घोषणा! दूध, तूप, लोणी, आइसक्रीम स्वस्त; ग्राहकांना मोठा दिलासा, जाणून घ्या नवे दर
6
Asia Cup 2025 :मॅच संपल्यावर वडिलांच्या निधनाची बातमी! घरी जाऊन तो परत आला अन् देशासाठी मैदानात उतरला
7
२ लाख भारतीयांवर परिणाम, IT सेक्टर-नोकरीत फटका; ट्रम्प H-1B व्हिसा नियम बदलाने मोठे नुकसान!
8
स्मृतीनं केली विक्रमांची 'बरसात'! ४१२ धावा करून ऑस्ट्रेलियाला भरलेली धडकी; एक इंज्युरी ब्रेक अन्...
9
उद्योगांना दिलेली अवाजवी एमआरपी सवलत तात्काळ मागे घ्यावी, मुंबई ग्राहक पंचायतीची केंद्रीय मंत्र्यांकडे मागणी
10
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
11
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
12
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
13
Mohanlal: ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव, भारत सरकारची मोठी घोषणा
14
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
15
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
16
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ
17
उत्तराखंड : मुख्यमंत्री पुष्करसिंह धामींकडून चमोलीतील आपत्तीग्रस्त भागांची पाहणी, पीडितांना दिलं सर्वतोपरी मदतीचा विश्वास
18
आपटून, धोपटून...! नवरात्रीला आणायची होती ओलाची रोडस्टर; PDI तपासणीवेळी ग्राहक हादरला....
19
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
20
दिशा पटानीच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारावर CM योगी आदित्यानाथ यांचे रोखठोक मत, म्हणाले...

किनवट तालुक्यात चार वर्षांत १११ शेतकऱ्यांच्या आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 11, 2018 00:44 IST

सलग चार वर्षांपासून किनवट तालुक्यात दुष्काळी परिस्थिती असून निसर्गाच्या लहरीपणामुळे पिकाचा उतारा घटून शेतकरी कर्जाच्या खाईत ढकलला गेला आहे़ त्यामुळे गत चार वर्षांत १११ शेतकºयांनी कर्जबाजारीपणामुळे आत्महत्या केली आहे़

ठळक मुद्देजळालेल्या डीपी सहा-सहा महिने दुरुस्त होईनात

किनवट : सलग चार वर्षांपासून किनवट तालुक्यात दुष्काळी परिस्थिती असून निसर्गाच्या लहरीपणामुळे पिकाचा उतारा घटून शेतकरी कर्जाच्या खाईत ढकलला गेला आहे़ त्यामुळे गत चार वर्षांत १११ शेतकºयांनी कर्जबाजारीपणामुळे आत्महत्या केली आहे़किनवट तालुक्यात सलग चार वर्षांपासून निसर्गाच्या लहरीपणामुळे महागामोलाचे बियाणे वाया जात आहे़ कर्जमाफीचेही तालुक्यात तीनतेरा वाजले आहेत. पेरणीसाठी मिळणारे पीककर्ज पेरणीनंतर मिळू लागले. खरीप हंगामाचे कसेबसे पीक घरात येत आहे़ मात्र पीककर्जासाठी शेतकरी आजही बँकेच्या रांगेत उभे आहेत़ ऐन पेरणीच्या काळात शेतकºयांना बी बियाणे खरेदीसाठी व्याज दिडीदुपटीने खाजगी कर्ज काढण्यात येत आहे़ दरवर्षी खरीप हंगामात पिकांवर रोगांचा प्रादुर्भाव होतो, त्यातच निसर्गाची अवकृपा ही किनवट तालुक्यातील शेतकºयांच्या पाचवीला पुंजली आहे़ म्हणूनच की काय, गेल्या चार वर्षांत १११ शेतकºयांनी कर्जबाजारीपणामुळे आत्महत्या केली आहे.आघाडी सरकारच्या काळात म्हणजे २००९ ते २०१३ या कालावधीत ६६ शेतकºयांनी आत्महत्या केल्याची नोंद आहे़ तर महायुतीच्या काळात या आकड्याने शंभरी पार केली आहे़

  • किनवटचे आ. प्रदीप नाईक म्हणाले, शासनाचे धोरण हे शेतकरीविरोधी आहे. कर्जमाफीची घोषणा फसवी आहे. या शासनाच्या काळात शेतकºयांच्या उत्पादित मालाला योग्य भाव मिळत नाही. पीकविम्यात दुजाभाव होत असून शेतकºयांचा उत्पादित माल वेळेवर खरेदी होत नाही. उल्लेखनीय म्हणजे, कधी नव्हे ते यावर्षी ऐन दिवाळीत भारनियमन लादल्या गेले हे शासनाचे मोठे अपयश आहे.
  • किनवट तालुक्यात २०१४ मध्ये २६, २०१५-३२, २०१६-२९, २०१७-१२ तर ३ नोव्हेंबर २०१८ पर्यंत एकूण १२ आत्महत्या झाल्या आहेत़ अशाप्रकारे चार वर्षांतच १११ शेतकºयांनी मृत्यूला कवटाळले़

यावर्षी खरीप हंगामात सुरुवातीला समाधानकारक पाऊस झाला. त्यानंतर पावसाचा खंड व नंतर अतिवृष्टी यामुळे उतारा घटून तालुक्यात दुष्काळसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे़ तर त्यात भर म्हणून आता रबी हंगाम घेऊ इच्छिणाºया व पाण्याची सोय उपलब्ध असलेल्या शेतकºयांच्या कृषिपंपाला वेळेवर वीजपुरवठा केला जात नाही़ तर रोहित्र जळाल्यानंतर वेळीच नवीन दिले जात नाही यामुळे पेरणी केलेले बियाणे जमिनीतच राहिले़ आजही विजेची समस्या कायम आहे. ट्रान्सफॉर्मर जळाले तर आॅईल नाही़ ही समस्या महावितरण शेतकºयांना सांगून अडवणूक करते, अशा परिस्थितीत चिंताक्रांत शेतकरी आत्महत्येला कवटाळून जीवन संपवतात. हे चित्र एका वर्षाचे नसून दरवर्षीचे आहे. विदर्भाच्या सीमेवर यवतमाळ जिल्ह्याला लागून असलेल्या किनवट तालुक्याला विदर्भ पॅकेजच्या धर्तीवर शासनाने पॅकेज जाहीर करून शेतकरी आत्महत्या थांबवाव्यात, अशी मागणी आहे. २००६ ते ३ नोव्हेंबर २०१८ या कालावधीत म्हणजे तेरा वर्षांत एकूण २१८ शेतकरी आत्महत्या झाल्या आहेत, असे शेतकरी आत्महत्या प्रकरणाचा गोषवारावरून स्पष्ट होत आहे.

    टॅग्स :NandedनांदेडFarmerशेतकरीfarmer suicideशेतकरी आत्महत्या