शहरं
Join us  
Trending Stories
1
'इंग्रजांची साथ; 52 वर्षे तिरंगा फडकवला नाही', मल्लिकार्जुन खरगेंचा भाजपा-RSS वर गंभीर आरोप
2
'तुमच्या मुलाचा दोष नाही', एअर इंडिया विमान अपघातातील पायलटच्या वडिलांची सर्वोच्च न्यायालयात धाव
3
धक्कादायक! "तो जवळ यायचा अन्...." बांगलादेश महिला क्रिकेटरचा निवडकर्त्यावर लैंगिक शोषणाचा गंभीर आरोप
4
Manoj Jarange Patil: हत्येच्या कटावरुन मनोज जरांगेंचा थेट धनंजय मुंडेंवर गंभीर आरोप, '२.५ कोटींची डील आणि...'
5
रिलायन्स पॉवरला मोठा झटका! बनावट बँक गॅरंटी प्रकरणी ED कडून तिसरी अटक; माजी CFO चाही समावेश
6
ट्रम्प यांच्या भाषणादरम्यान व्हाईट हाऊसमध्ये खळबळ! फार्मा कंपनीचा अधिकारी बेशुद्ध पडला
7
ऐतिहासिक! १८० च्या स्पीडने धावली वंदे भारत स्लीपर ट्रेन; नवा रेकॉर्ड, ट्रायलचा Video व्हायरल
8
४०० कोटींची जमीन, लाखोंचे फ्लॅट; १९९३ मुंबई बॉम्बस्फोटांचा 'मास्टर माइंड' टायगर मेमनच्या संपत्तीचा लिलाव होणार!
9
कच्च्या तेलाच्या दरात मोठी वाढ होणार! पेट्रोल-डिझेलच्या किमती स्थिर ठेवण्यासाठी सरकारचा मास्टरप्लॅन
10
Axar Patel: विराट कोहली, ख्रिस गेलनंतर फक्त अक्षर पटेलच करू शकला 'अशी' कामगिरी!
11
Wife सोबत मिळून Post Office च्या या स्कीममध्ये ₹४ लाख जमा करा, पाहा महिन्याला किती मिळेल व्याज?
12
अजित पवारांचे घुमजाव! काल म्हणाले, "गोष्टी कानावर आल्या होत्या"; आता म्हणतात, "अजिबात कल्पना नाही"
13
‘तू बघत राहा, मी खोलीत गुदमरून मरेन’, पत्नीला  मेसेज पाठवून पतीने दरवाजा केला बंद, त्यानंतर...
14
महामार्गांवरून भटक्या कुत्र्यांना हटवा, त्यांचे लसीकरण आणि नसबंदी करून...; सर्वोच्च न्यायालयाचे तीन आदेश
15
Larissa Nery : "मी राहुल गांधींना ओळखत नाही, भारतात..."; ब्राझिलियन महिलेला वाटली भीती, केला मोठा खुलासा
16
दुकानातून हळूहळू कमी होत होता दारूचा स्टॉक; कपल करत होतं भरलेल्या बाटल्यांची चोरी! कसं पकडलं?
17
२५ लाख ते ६० लाख... गृहकर्जावर महिन्याचा खर्च किती? तुमचा EMI कमी करण्यासाठी 'हा' कालावधी निवडा
18
मारुतीने व्हिक्टोरिस लाँच केली अन् या कारवर बंपर सूट दिली; ऑक्टोबरपेक्षा आणखी ५४,००० रुपयांनी स्वस्त केली...
19
पहिल्याच दिवशी जमिनीवर आला 'हा' आयपीओ; गुंतवणूकदारांना मोठं नुकसान, GMP नं केला 'विश्वासघात'
20
Jasprit Bumrah Record : बुमराहचा मोठा पराक्रम! पाकिस्तानी गोलंदाजाला धोबीपछाड देत बनला 'नंबर वन'

किनवट तालुक्यात चार वर्षांत १११ शेतकऱ्यांच्या आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 11, 2018 00:44 IST

सलग चार वर्षांपासून किनवट तालुक्यात दुष्काळी परिस्थिती असून निसर्गाच्या लहरीपणामुळे पिकाचा उतारा घटून शेतकरी कर्जाच्या खाईत ढकलला गेला आहे़ त्यामुळे गत चार वर्षांत १११ शेतकºयांनी कर्जबाजारीपणामुळे आत्महत्या केली आहे़

ठळक मुद्देजळालेल्या डीपी सहा-सहा महिने दुरुस्त होईनात

किनवट : सलग चार वर्षांपासून किनवट तालुक्यात दुष्काळी परिस्थिती असून निसर्गाच्या लहरीपणामुळे पिकाचा उतारा घटून शेतकरी कर्जाच्या खाईत ढकलला गेला आहे़ त्यामुळे गत चार वर्षांत १११ शेतकºयांनी कर्जबाजारीपणामुळे आत्महत्या केली आहे़किनवट तालुक्यात सलग चार वर्षांपासून निसर्गाच्या लहरीपणामुळे महागामोलाचे बियाणे वाया जात आहे़ कर्जमाफीचेही तालुक्यात तीनतेरा वाजले आहेत. पेरणीसाठी मिळणारे पीककर्ज पेरणीनंतर मिळू लागले. खरीप हंगामाचे कसेबसे पीक घरात येत आहे़ मात्र पीककर्जासाठी शेतकरी आजही बँकेच्या रांगेत उभे आहेत़ ऐन पेरणीच्या काळात शेतकºयांना बी बियाणे खरेदीसाठी व्याज दिडीदुपटीने खाजगी कर्ज काढण्यात येत आहे़ दरवर्षी खरीप हंगामात पिकांवर रोगांचा प्रादुर्भाव होतो, त्यातच निसर्गाची अवकृपा ही किनवट तालुक्यातील शेतकºयांच्या पाचवीला पुंजली आहे़ म्हणूनच की काय, गेल्या चार वर्षांत १११ शेतकºयांनी कर्जबाजारीपणामुळे आत्महत्या केली आहे.आघाडी सरकारच्या काळात म्हणजे २००९ ते २०१३ या कालावधीत ६६ शेतकºयांनी आत्महत्या केल्याची नोंद आहे़ तर महायुतीच्या काळात या आकड्याने शंभरी पार केली आहे़

  • किनवटचे आ. प्रदीप नाईक म्हणाले, शासनाचे धोरण हे शेतकरीविरोधी आहे. कर्जमाफीची घोषणा फसवी आहे. या शासनाच्या काळात शेतकºयांच्या उत्पादित मालाला योग्य भाव मिळत नाही. पीकविम्यात दुजाभाव होत असून शेतकºयांचा उत्पादित माल वेळेवर खरेदी होत नाही. उल्लेखनीय म्हणजे, कधी नव्हे ते यावर्षी ऐन दिवाळीत भारनियमन लादल्या गेले हे शासनाचे मोठे अपयश आहे.
  • किनवट तालुक्यात २०१४ मध्ये २६, २०१५-३२, २०१६-२९, २०१७-१२ तर ३ नोव्हेंबर २०१८ पर्यंत एकूण १२ आत्महत्या झाल्या आहेत़ अशाप्रकारे चार वर्षांतच १११ शेतकºयांनी मृत्यूला कवटाळले़

यावर्षी खरीप हंगामात सुरुवातीला समाधानकारक पाऊस झाला. त्यानंतर पावसाचा खंड व नंतर अतिवृष्टी यामुळे उतारा घटून तालुक्यात दुष्काळसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे़ तर त्यात भर म्हणून आता रबी हंगाम घेऊ इच्छिणाºया व पाण्याची सोय उपलब्ध असलेल्या शेतकºयांच्या कृषिपंपाला वेळेवर वीजपुरवठा केला जात नाही़ तर रोहित्र जळाल्यानंतर वेळीच नवीन दिले जात नाही यामुळे पेरणी केलेले बियाणे जमिनीतच राहिले़ आजही विजेची समस्या कायम आहे. ट्रान्सफॉर्मर जळाले तर आॅईल नाही़ ही समस्या महावितरण शेतकºयांना सांगून अडवणूक करते, अशा परिस्थितीत चिंताक्रांत शेतकरी आत्महत्येला कवटाळून जीवन संपवतात. हे चित्र एका वर्षाचे नसून दरवर्षीचे आहे. विदर्भाच्या सीमेवर यवतमाळ जिल्ह्याला लागून असलेल्या किनवट तालुक्याला विदर्भ पॅकेजच्या धर्तीवर शासनाने पॅकेज जाहीर करून शेतकरी आत्महत्या थांबवाव्यात, अशी मागणी आहे. २००६ ते ३ नोव्हेंबर २०१८ या कालावधीत म्हणजे तेरा वर्षांत एकूण २१८ शेतकरी आत्महत्या झाल्या आहेत, असे शेतकरी आत्महत्या प्रकरणाचा गोषवारावरून स्पष्ट होत आहे.

    टॅग्स :NandedनांदेडFarmerशेतकरीfarmer suicideशेतकरी आत्महत्या