शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
4
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
5
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
6
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
7
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
8
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
9
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
10
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
11
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
12
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
13
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
14
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
15
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
16
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
17
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
18
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
19
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
20
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हा परिषद निवडणुकीला बंडखोरीची लागण : उमेदवारही गोंधळात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 23, 2019 20:33 IST

जिल्हा परिषद निवडणूक सुरुवातीपासूनच गोंधळात राहिली आहे. उमेदवारी अर्ज भरण्याचा अखेरचा दिवस असतानाही हा गोंधळ कायमच होता.

ठळक मुद्देआघाडीच्या बाबतीतही राहिला संभ्रम

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : जिल्हा परिषद निवडणूक सुरुवातीपासूनच गोंधळात राहिली आहे. उमेदवारी अर्ज भरण्याचा अखेरचा दिवस असतानाही हा गोंधळ कायमच होता. राजकीय पक्षांनी अखेरपर्यंत अनेकांना एबी फॉर्म दिले नाही. त्यामुळे आपण पक्षाचा उमेदवार आहे की नाही, हा गोंधळ अखेरपर्यंत होता. दरम्यान, सात वर्षानंतर निवडणूक होत असल्याने निवडणुकीसाठी मोठ्या संख्येने कार्यकर्ते इच्छुक होते. पण ऐनवेळेवर भरवशावर ठेवलेल्या उमेदवाराला डावलल्याने बंडखोरीचीही लागण झाली. दुसरीकडे काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेची महाआघाडी अखेरपर्यंत संभ्रमात राहिली.राज्य निवडणूक आयोगाने जिल्हा परिषदेच्या निवडणुकीची घोषणा केल्यानंतरही निवडणूक होते की नाही, हा गोंधळ उमेदवारी अर्ज भरण्याची तारीख येईपर्यंत कायम होता. सर्वोच्च न्यायालयाने अखेर याप्रकरणी निवडणूक आटोपल्यानंतर सुनावणी घेऊ, असा निर्णय दिल्याने इच्छुक उमेदवार तयारीला लागले. त्यातच जिल्ह्यात २१ डिसेंबरपर्यंत हिवाळी अधिवेशनाचा माहोल होता. त्यामुळे उमेदवारी अर्ज भरण्यासाठी सोमवार हा अखेरचा दिवस उमेदवारांजवळ होता. सोमवारी तहसील कार्यालयात पंचायत समिती व जिल्हा परिषदेच्या उमेदवारांना अर्ज भरायचे होते, तेही ३ वाजताच्या आत. परिणामी चांगलाच गोंधळ उडाला होता. राजकीय पक्षांनी इच्छुक उमेदवारांचे अर्ज घेतले, त्यांच्या मुलाखती घेतल्या, उमेदवारांच्या नेत्यांनी त्यांना तिकीट मिळवून देण्याचा भरवसाही दिला, पण ऐनवेळी भलताच उमेदवार निश्चित करण्यात आला. त्यामुळे मोठ्या प्रमाणात बंडखोरीची लागण झाली. भाजपामध्ये ही बंडखोरी मोठ्या प्रमाणात फोफावली.काँग्रेस-राष्ट्रवादीची वेळेपर्यंत युतीबाबत संभ्रम कायम होता. काँग्रेस-राष्ट्रवादीच्या जागेवरून झालेल्या वाटाघाटीत राष्ट्रवादीचे काही भागात अस्तित्व नाकारले. त्यामुळे राष्ट्रवादीच्या जिल्हाध्यक्षांनी आघाडीला समर्थन दिले नाही. त्यामुळे काही सर्कलमध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे दोन्ही उमेदवार रिंंगणात आहेत. पण दोन्ही पक्षाने अजूनही बऱ्याच उमेदवारांना पक्षाचा एबी फॉर्म दिला नाही. त्यामुळे आपण पक्षाचे अधिकृत उमेदवार आहो की नाही, हा गोंधळ उमेदवारांमध्ये दिसून आला. पंचायत समिती निवडणुकीच्या उमेदवारीच्या बाबतीत चांगलाच गोंधळ दिसून आला. एकीकडे इच्छुकांची संख्या मोठी आणि पक्षाकडून काहीच अधिकृत सांगण्यात येत नसल्याने पंचायत समितीच्या उमेदवारांमध्ये चांगलाच संभ्रम झाला होता. ऐन वेळी उमेदवारी अर्ज भरण्यात येत असल्याने कागदपत्रांची जुळवाजुळव करण्यात उमेदवाराला अडचणी येत असल्याचे दिसून आले.नागपूर ग्रामीणमध्ये झाली बंडखोरीनागपूर ग्रामीणमध्ये येणाऱ्या बोरखेडी फाटक जि.प. सर्कलमध्ये बाहेरून उमेदवार दिल्यामुळे नाराज झालेल्या पं.स. सदस्य उर्मिला मिलमिले यांनी अपक्ष अर्ज दाखल केला. बेसा सर्कलमध्ये भाजपाचे पदाधिकाऱ्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश करून काँग्रेसची उमेदवारी मिळविली आणि भाजपाला चांगलाच झटका दिला. खरबीमध्येही भाजपाच्या विद्यमान सदस्यांना डावलल्याने नाराजीचा सूर उमटला. काँग्रेस आणि राष्ट्रवादीत युती न झाल्यामुळे काही सर्कलमध्ये दोन्ही पक्षांनी उमेदवार रिंगणात उतरविले.दोन्ही माजी उपाध्यक्ष अपक्ष म्हणून रिंगणात२०१२ ला झालेल्या निवडणुकीनंतर भाजप, राष्ट्रवादीची सत्ता बसली. यात भाजपाच्या संध्या गोतमारे या अध्यक्ष तर राष्ट्रवादीचे चंद्रशेखर चिखले हे उपाध्यक्ष झाले. पुढे राष्ट्रवादीशी भाजपाची तूतूमैमै झाल्यानंतर भाजपाने अडीच वर्षासाठी भाजपाच्या निशा सावरकर यांना अध्यक्ष तर शिवसेनेचे शरद डोणेकर यांना उपाध्यक्ष बनविले. पण यावेळी या दोन्ही अध्यक्षांनी जिल्हा परिषद निवडणूक लढण्यास नकार दिला. तर चंद्रशेखर चिखले यांच्या मेटपांजरा सर्कलमध्ये राष्ट्रवादीने इतरांना उमेदवारी दिली. त्यामुळे ते अपक्ष म्हणून रिंगणात उतरले. दुसरीकडे शरद डोणेकर यांनी शिवसेनेशी फारकत घेऊन भाजपाकडून तिकीट मिळविण्याचा प्रयत्न केला. परंतु त्यांनाही यश आले नाही. त्यामुळे गोंडेगाव सर्कलमधून त्यांनीही अपक्ष म्हणून रिंगणात उतरण्याचा निर्णय घेतला.

टॅग्स :zpजिल्हा परिषदElectionनिवडणूकcongressकाँग्रेसNCPराष्ट्रवादी काँग्रेसBJPभाजपाShiv Senaशिवसेना