शहरं
Join us  
Trending Stories
1
"काँग्रेसनं नसीम खान यांना उमेदवारी दिल्यास पूर्ण ताकदीनं त्यांना निवडून आणू"
2
Digvijaya Singh : "तुम्हाला निराश करणार नाही, ही माझी शेवटची..."; दिग्विजय सिंह निवडणूक लढवणार नाहीत?
3
बापरे! चौथ्या मजल्यावरून खाली पडलं 7 महिन्यांचं बाळ; काळजाचा ठोका चुकवणारा Video
4
'एकट्यात बोलवून साडीची पिन काढायचे अन्...'; प्रज्वल रेवन्नांविरोधात महिलेची पोलिसांत तक्रार
5
प्रियकरासोबत मिळून केली पतीची हत्या, मग पोलिसांत दिली बेपत्ता असल्याची तक्रार, पण असं फुटलं बिंग
6
...तेव्हा राज ठाकरेंवर प्राणघातक हल्ला करण्याचा प्लॅन रचला होता; मनसे नेत्याचा मोठा दावा
7
गुरुचे राशीपरिवर्तन: मेष ते मीन राशींवर कसा असेल प्रभाव? तुमची रास कोणती? लाभ की ताप? पाहा
8
भारत दौरा टाळून एलॉन मस्क पोहोचले थेट चीनमध्ये, चिनी पंतप्रधानांच्या भेटीनंतर दिले सूचक संकेत
9
उद्धवसेना, शिंदेसेना मुंबईत आज आमनेसामने! भव्य रॅलीत CM शिंदे vs आदित्य ठाकरे येणार, मोठा फौजफाटा
10
रत्नागिरीच्या सभेत मनसेची उद्धव ठाकरेंवर खोचक टीका; "ज्यांनी आयुष्यभर दुसऱ्याचं..."
11
...अन् नम्रता संभेरावला पाहून बोमन इराणींनी चक्क त्यांची BMW थांबवली, अभिनेत्रीने सांगितला किस्सा
12
'ये रिश्ता क्या कहलाता है' मधून हिना खानला काढण्यात आलं होतं, शिवांगी जोशी ठरली कारण?
13
कल्याण लोकसभा मतदारसंघात एकनाथ शिंदेंकडून काँग्रेसला धक्का, बड्या नेत्यासह माजी नगसेवक शिंदे गटात 
14
Israel-Hamas War : इस्त्रायलचा रफाह शहरावर हवाई हल्ला; १३ जणांचा मृत्यू, अनेक जखमी
15
भाजपा खासदार व्ही. श्रीनिवास प्रसाद यांचं निधन, चार दिवसांपासून ICUमध्ये घेत होते उपचार  
16
Blog : ऋतुराज गायकवाड T20 WC मध्ये का नको? डावा-उजवा असा खेळ बस्स करा...
17
"काय गं तुला खूप माज आलाय का?", जुई गडकरीला तरुणीकडून धमकी; अभिनेत्री म्हणाली, आता थेट पोलीस…
18
"अजून मी प्रचारालाही सुरुवात केली नाही, तोवर...; उज्ज्वल निकमांचा विरोधकांना टोला
19
पिकअप व्हॅन आणि कारचा भीषण अपघात, १० जणांचा मृत्यू, २३ जण जखमी   
20
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी

वकिलांविरुद्ध चुकीची कारवाई, हायकोर्टाने व्यक्त केली दिलगिरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 20, 2018 11:15 PM

मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठातील न्यायमूर्तीद्वय भूषण गवई व मुरलीधर गिरटकर यांच्या न्यायपीठाने वकिलांचा समावेश असलेली अवमानना कारवाई रद्द करून वकिलांना या कारवाईचा विनाकारण त्रास सहन करावा लागल्यामुळे दिलगिरी व्यक्त केली. तसेच, हा निर्णय देताना काही महत्त्वपूर्ण निरीक्षणेही नोंदवली.

ठळक मुद्देअवमानना कारवाई रद्द : सत्य माहिती लपविल्याचा होता ठपका

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठातील न्यायमूर्तीद्वय भूषण गवई व मुरलीधर गिरटकर यांच्या न्यायपीठाने वकिलांचा समावेश असलेली अवमानना कारवाई रद्द करून वकिलांना या कारवाईचा विनाकारण त्रास सहन करावा लागल्यामुळे दिलगिरी व्यक्त केली. तसेच, हा निर्णय देताना काही महत्त्वपूर्ण निरीक्षणेही नोंदवली.नागपूर खंडपीठातील एक सदस्यीय न्यायपीठाने गडचिरोली जिल्हा परिषदेचे अधिकारी, आरोग्य सेवक व वकील यांनी संगनमताने सत्य माहिती लपवून हवा तो दिलासा मिळवून घेतला, असा ठपका ठेवला होता व या प्रकरणात स्वत:हून अवमानना याचिका दाखल करून घेतली होती. नियमानुसार, ती याचिका न्यायमूर्तीद्वय भूषण गवई व मुरलीधर गिरटकर यांच्यासमक्ष सुनावणीसाठी आली होती. या द्विसदस्यीय न्यायपीठाने प्रकरणातील संपूर्ण रेकॉर्ड तपासल्यानंतर कुणीही चुकीचे वागले नसल्याचा निर्णय दिला व अवमानना कारवाई रद्द केली. या कारवाईमुळे विकलांचे झालेले नुकसान भरून काढता येणार नाही. तसेच, त्यांच्या त्रासाचीही भरपाई करता येणार नाही. त्यामुळे आम्ही केवळ दिलगिरी व्यक्त करतो असे न्यायालयाने निर्णयात म्हटले.या प्रकरणात सर्वजण आपापल्या ठिकाणी बरोबर होते. न्यायाधीश व वकील माणसेच असून प्रत्येक सुनावणीच्या वेळी काय झाले हे आठवेल एवढी प्रभावी स्मरणशक्ती त्यांना मिळालेली नाही. वकिलांनी न्यायालयासोबत बनवाबनवी केली हे रेकॉर्डवरून दिसून येत नाही. तसे असते तर, संबंधित सर्व याचिका एकाच वकिलामार्फत दाखल करण्यात आल्या असत्या. मुख्य कार्यकारी अधिकारी बदलल्यानंतर जिल्हा परिषदेची भूमिकाही बदलत असते. प्रकरणातील सर्व घोळ त्यामुळेच निर्माण झाला. त्यासाठी वकिलांना दोषी ठरवता येणार नाही. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीच्या आधारावर ते न्यायालयात वक्तव्ये करीत असतात असे मतही न्यायालयाने निर्णयात नोंदवले.करिअरचा विचार करणे आवश्यकवकिलांच्या करिअरवर विपरीत परिणाम होईल अशी गंभीर निरीक्षणे नोंदविण्यापूर्वी न्यायालयाने विशेष काळजी घेणे व सावधानी बाळगणे आवश्यक आहे. धोकादायक निरीक्षणे नोंदविण्यापूर्वी संबंधित वकिलांना नोटीस द्यायला हवी होती. त्यानंतर, वकिलांनी संपूर्ण रेकॉर्ड न्यायालयापुढे आणला असता. तो रेकॉर्ड तपासल्यानंतर ही कारवाई करण्याची गरज भासली नसती, असे न्यायालयाने सांगितले. तसेच, संबंधित न्यायपीठाने वकिलांचे नुकसान व्हावे या उद्देशातून अवमानना कारवाई सुरू केली नाही याचा विश्वास असल्याचेही निर्णयात स्पष्टपणे नमूद केले.

टॅग्स :advocateवकिलHigh Courtउच्च न्यायालय