शहरं
Join us  
Trending Stories
1
राजस्थान रॉयल्सचे QUALIFIER 1चे स्वप्न भंगणार? पंजाब किंग्सकडून हरल्याने समीकरण बदलले
2
दोन पक्ष संपवण्याच्या प्रयत्नात भाजपलाच संपवलं; आदित्य ठाकरेंचा फडणवीसांना टोला 
3
इंडिया आघाडीचे सरकार स्थापन झाल्यावर बाहेरुन पाठिंबा देणार; ममता बॅनर्जींची मोठी घोषणा
4
घाटकोपर होर्डिंग्ज एजन्सीची मान्यता तत्काळ रद्द करून काळ्या यादीत टाका; अंबादास दानवेंचं मुख्यमंत्र्यांना पत्र
5
"दिल टूट गया है..", कॉमेडियन श्याम रंगीलाचा उमेदवारी अर्ज फेटाळला, वाराणसीतून लढवता येणार नाही निवडणूक!
6
'मुस्लिमांशी घट्ट नाते आहे' म्हणणारे पंतप्रधान मोदी मुस्लीम द्वेषावरच भाषण देतात, नाना पटोलेंची टीका
7
पंजाब किंग्सच्या गोलंदाजांसमोर RRच्या फलंदाजांची धडपड; रियान पराग एकटा लढला
8
एकहाती सत्तेपेक्षा 'मिलीजुली' सरकार देशहिताचं, जे सगळ्यांची 'मन की बात' ऐकेल; आदित्य ठाकरेंनी मांडला वेगळाच मुद्दा
9
"अरविंद केजरीवाल यांच्यासाठी माझ्याकडे एक वाईट बातमी आहे..."; काय म्हणाले अमित शाह?
10
Anil Desai, Congress: ठाकरे गटाच्या उमेदवाराशी आधी काँग्रेस कार्यकर्ते भिडले, मग खांद्यावरून घेऊन नाचले; गैरसमजातून वाद, नेमकं काय घडलं?
11
झारखंडचे मंत्री आलमगीर आलम यांना ईडीकडून अटक, सचिवाच्या नोकराच्या घरी सापडली होती कोट्यावधींची रोकड!
12
धक्कादायक! वाहन चालवत असतानाच फार्मासिस्टचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू
13
राहुल गांधींच्या पत्रिकेत पंतप्रधान बनण्याचा योग नाही; भाजप नेत्याचा खोचक टोला...
14
Neeraj Chopra : नीरज चोप्राने आणखी एक सुवर्णपदक जिंकले, महाराष्ट्राच्या पाटीलची 'उत्तम' कामगिरी
15
पती पत्नीचा असाही 'व्यवसाय'! ती ट्रक चालकांना जाळ्यात फसवायची अन् तो उकळायचा पैसे
16
इस्रायलचं टेन्शन वाढणार! दक्षिण आफ्रिकेची आंतरराष्ट्रीय कोर्टात याचिका; उद्या होणार सुनावणी
17
ज्या सत्तेला सोनिया गांधींनी नाकारले, त्या सत्तेवर मोदींचा डोळा; मल्लिकार्जुन खरगेंचा हल्लाबोल...
18
एका लग्नाची दुसरी गोष्ट! 75 वर्षीय वडिलांसाठी लेकीने निवडली 60 वर्षांची नवरी
19
स्टार क्रिकेटपटूची बलात्काराच्या प्रकरणातून निर्दोष मुक्तता; ट्वेंटी-२० वर्ल्ड कप खेळण्यास सज्ज
20
धक्कादायक! तरुणी झोपली होती, प्रियकरानं घरात घुसून केली हत्या, घटनेनं शहर हादरलं

डबडबल्या डोळ्यांनी शहीद गोवारी बांधवांना नमन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 23, 2019 9:07 PM

देशाच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या हजारो गोवारी बांधवांनी त्या अमानवीय घटनेच्या स्मृतींना उजाळा देत न्यायाच्या लढाईत शहीद झालेल्या बांधवांना डबडबल्या डोळ्यांनी श्रद्धांजली अर्पण केली.

ठळक मुद्देहजारो गोवारी बांधव स्मारकावर जमा : सेवाभावी संस्थांनी दिली सेवा

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : सरकारच्या उपेक्षेचे बळी ठरलेल्या ११४ गोवारी बांधवांच्या २५ व्या स्मृतीदिनानिमित्त झिरो माईल चौकातील शहीद स्मारकाचा परिसर शनिवारी गोवारी बांधवांच्या गर्दीने भरला होता. देशाच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या हजारो गोवारी बांधवांनी त्या अमानवीय घटनेच्या स्मृतींना उजाळा देत न्यायाच्या लढाईत शहीद झालेल्या बांधवांना डबडबल्या डोळ्यांनी श्रद्धांजली अर्पण केली. त्या घटनेनंतर न्याय हक्काच्या लढाईला २५ वर्षे लोटल्यानंतरही बांधवांना न्यायाची प्रतीक्षा कायम असल्याची खंत त्या प्रत्येकाच्या चेहऱ्यावर होती. 

१९८५ चा काळा जीआर रद्द करावा आणि गोंडगोवारीच्या मध्ये केवळ ‘कॉमा’ टाकून समाजाला न्याय द्यावा, या मागणीसाठी गोवारी बांधवांनी २३ नोव्हेंबर १९९४ ला हिवाळी अधिवेशनावर लाखोंचा मोर्चा काढला होता. सरकारचा कोणताही प्रतिनिधी भेटायला न आल्याने सायंकाळपर्यंत थांबलेल्या मोर्चात अचानक झालेल्या चेंगराचेंगरीत ११४ गोवारी बांधवांचे बळी गेले आणि असंख्य जखमी झाले. त्या बांधवांच्या लढ्याला अभिवादन करण्यासाठी दरवर्षी हजारो गोवारी बांधव गोवारी शहीद स्मारकाजवळ जमा होतात. तसे ते यावर्षीही आले. सकाळपासून गावोगावच्या लोकांनी येथे भेट देत साश्रू नयनांनी शहीद बांधवांना आदरांजली वाहिली. यावर्षी २५ वा स्मृतीदिन असल्याने लोकांची संख्या वाढल्याचे दिसून आले. 
विविध सामाजिक, राजकीय संघटना, संस्थांचे कार्यकर्ते स्मृतीस्थळावर जमा झाले होते. यात महाविद्यालयीन तरुणांचा समावेश अधिक होता. धामणगाव रेल्वे परिसरातील गावांमधून आदिवासी गोवारी युवा शक्ती संघाच्या माध्यमातून ५०० गोवारी बांधवांनी येथे भेट दिली. याशिवाय आदिवासी गोवारी युनिटी ट्रस्ट संघटनेशी जुळलेल्या गावोगावच्या विद्यार्थ्यांनी दुपारी ४ वाजता स्मारकाभोवती मानवी साखळी करीत मौन श्रद्धांजली अर्पण केली. यावेळी भोजनदानासह पुस्तक व विद्यार्थ्यांच्या मार्गदर्शन केंद्रासह २५ प्रकारचे स्टॉल स्मारक परिसरात लागले होते. सामाजिक संस्थांनीही यावेळी बांधवांना सेवा दिली.२५ वर्षापूर्वी झालेल्या मोर्चातील चेंगराचेंगरीतून सुखरुप बचावलेले, जखमी झालेले तसेच शहीद झालेल्यांचे नातेवाईकही मोठ्या संख्येने शहीद गोवारी स्मारकावर उपस्थित झाले होते. प्रत्यक्ष त्या मोर्चाचे साक्षीदार असलेले, ज्यांनी आपल्या बांधवांच्या शवाचे थर पाहिले, त्या क्षणांची आठवण करीत अनेकांचा हुंदका दाटून येत होता. सायंकाळपर्यंत आदरांजली वाहण्याचा हा सिलसिला स्मारकावर चालला होता. दिवस मावळताच हे गोवारी बांधव आपल्या गावाकडे परतीच्या प्रवासाला निघाले.

न्याय अद्याप बाकी असल्याची खंत २५ वर्षे लोटली तरी ज्या मागणीसाठी हे हत्याकांड झाले ती मागणी अद्याप पूर्ण झाली नसल्याची खंत श्रद्धांजलीसाठी आलेल्या बांधवांनी व्यक्त केली. राज्य सरकारने विशेष मागास प्रवर्गामध्ये ४० उच्च जाती टाकून गोवारी जमातीला मूळ आदिवासींपासून भटकविले. त्यामुळे समाजातील आर्थिक दुर्बलांना, गोरगरिबांना कोणताच शासकीय लाभ होत नाही. घरकुल योजना, बेरोजगारांना बँक कर्ज, नोकरीमध्ये तसेच स्पर्धा परीक्षांकरिता शासकीय सवलत मिळत नाही. त्यामुळे समाजातील विद्यार्थी, युवक बेरोजगारांची थट्टा केली जात असल्याचा समाजाचा आरोप आहे. गोवारी जमातीला एससी किंवा एसटीप्रमाणे कोणत्याही प्रकारची शासकीय योजना नाही. त्यामुळे गोवारी जमात ही सामाजिक, आर्थिक, राजकीय विकासापासून कोसो दूर असल्याची समाजाची भावना आहे. गोंडगोवारी ही बोली भाषा आहे. ‘गोंड’ व ‘गोवारी’ वेगळ्या जमाती आहेत. २००२ पर्यंत गोंड-राजगोंड अशी अनुसूचीमध्ये नोंद होती. राज्य शासनाने शिफारस करून लोकसभेत दुरुस्ती विधेयक आणले. गोंड-राजगोंडमध्ये कॉमा टाकला. त्याप्रमाणे ‘गोंडगोवारी’ मध्येही कॉमा टाकण्याची शिफारस राज्य सरकारने केंद्राकडे करावी, अशी समाजाची मागणी आहे. जोवर ही दुरुस्ती होणार नाही, तोवर समाजाला न्याय मिळणार नाही, अशी भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.

टॅग्स :nagpurनागपूर