शहरं
Join us  
Trending Stories
1
...तेव्हा "शिवसेना + राष्ट्रवादी + भाजपा सरकार" बनवण्याची ऑफर उद्धव ठाकरेंनी दिली होती; तटकरेंचा गौप्यस्फोट
2
नितीन पाटलांना जूनमध्ये खासदार केलं नाही तर पवारांची औलाद सांगणार नाही; अजित पवारांची घोषणा
3
Priyanka Gandhi : "माझ्या भावाला राजपुत्र म्हणतात...; नरेंद्र मोदी हे सम्राट, महालात राहतात", प्रियंका गांधी कडाडल्या
4
रोहित शर्माचे काल प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणे ही भारतासाठी डोकेदुखी; MI ने सांगितलं टेंशन वाढवणारं कारण
5
'घेऊद्या तारीख, ईडीच्या प्रकरणात कुठे जामीन मिळतो'; न्यायाधिशांचे कोर्टरुमबाहेर धक्कादायक वक्तव्य
6
लोकसभेचा निकाल लागताच चित्र बदलणार; थरूर यांनी सांगितला 'इंडिया' आघाडीचा प्लॅन
7
"अरविंद केजरीवालांनी वाराणसीतून नरेंद्र मोदींच्या विरोधात निवडणूक लढवावी"; सपा नेत्याची मागणी
8
फोटोतील या अभिनेत्याला ओळखलंत का?, त्याची अवस्था पाहून चाहते झाले हैराण
9
मला धमक्या देऊ नका, मी मनात आणलं तर..., नारायण राणे यांचा उद्धव ठाकरेंना इशारा
10
पाकिस्तानच्या माजी मंत्र्यांकडून दुसऱ्यांदा राहुल गांधींचं कौतुक; भाजपानं घेरलं
11
IPL 2024 मधील दोन भारतीय स्टार गोलंदाज स्पर्धेत आता पुढे कदाचित नाही खेळू शकणार 
12
NSE Share : एकावर ४ बोनस शेअर्स, ९०००% डिविडंड; 'या' एक्सचेंजनं गुंतवणूकदारांना दिलं डबल गिफ्ट
13
"हार्दिक पांड्याबद्दल आदर दिसत नाही", इरफान पठाणकडून MI च्या कॅप्टनची बिनपाण्याने धुलाई
14
T20 World Cup : यजमान विडिंजने उतरवला तगडा संघ; IPL गाजवणाऱ्यांना संधी, नवे चेहरेही मैदानात!
15
रोहित शर्माबद्दल 'ती' अफवा पसरवली; आकाश चोप्रा भडकला, दिली संतप्त प्रतिक्रिया
16
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...
17
Kotak Mahindra Bank Q4: नफा वाढून ४१३३ कोटींवर, व्याजातून होणारी कमाई १३.३% वाढली
18
शुबमनने हरलीनला दिले क्रिकेटचे धडे; महिला क्रिकेटपटूसाठी गिल बनला कोच, Video
19
दुबईहून कपड्यात लपवून आणलं २५ किलो सोनं; अफगाणिस्तानच्या बड्या अधिकाऱ्याला पकडलं
20
Income Tax नियमांमध्ये बदल होणार आहेत का? शेअर बाजारही आपटला; अर्थमंत्र्यांनी दिली प्रतिक्रिया

जागतिक जल दिन! ‘जलयुक्त शिवार’मुळे नागपूर जिल्ह्यात वाढला पाणीसाठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 22, 2018 10:54 AM

राज्य शासनानेही पाणीटंचाईमुक्त महाराष्ट्रसाठी ‘जलयुक्त शिवार’ ही महत्त्वाकांक्षी योजना सुरू केली. जलयुक्त शिवारमुळे पहिल्या दोन वर्षातच नागपूर जिल्ह्यातील भूगर्भातील पाण्याच्या पातळीत एक ते दीड मीटरने वाढ झाली आहे, हे विशेष.

ठळक मुद्देसिंचन क्षेत्र वाढले गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार, मागेल त्याला शेततळे, सिंचन विहिरी योजनांनाही प्रतिसाद

आनंद डेकाटे ।लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : पाणीटंचाई ही तशी जागतिक समस्या. जगभरात त्याबाबत बरीच जनजागृती सुरू आहे. शासनस्तरावरही मोठ्या प्रमाणावर उपाययोजना सुरू आहेत. राज्य शासनानेही पाणीटंचाईमुक्त महाराष्ट्रसाठी ‘जलयुक्त शिवार’ ही महत्त्वाकांक्षी योजना सुरू केली. लोकांचा सहभाग आणि शासनाची भरघोस मदत यातून सुरू असलेले हे अभियान नागपूर जिल्ह्यासाठी वरदान ठरले आहे. जलयुक्त शिवारमुळे पहिल्या दोन वर्षातच नागपूर जिल्ह्यातील भूगर्भातील पाण्याच्या पातळीत एक ते दीड मीटरने वाढ झाली आहे, हे विशेष.नागपूर जिल्ह्यातील काटोल, नरखेड, सावनेर, कळमेश्वर हा परिसर संत्रा बेल्ट म्हणून प्रसिद्ध आहे. या परिसरात मोठ्या प्रमाणावर संत्रा लावला जातो. परंतु या परिसरात मोठ्या प्रमाणावर पाण्याचा उपसा झाला. त्यामुळे भूगर्भातील पाण्याची पातळी प्रचंड खाली आहे. १०० टक्के पाण्याचा उपसा झालेला भाग हा शासकीयदृष्ट्या डार्क झोन म्हणून घोषित केला जातो. या भागातही जवळपास ८० टक्के पाण्याचा उपसा झाला, त्यामुळे हा परिसर सेमी डार्क झोनमध्ये गणल्या जाऊ लागला. या भागात नवीन बोअरवेलवर बंदी घालण्यात आली. साहजिकच या सर्वांचा परिणाम संत्रा उत्पादनावरही झाला. पिण्याच्या पाण्याचीही टंचाई भासू लागली. परंतु जलयुक्त शिवारमुळे सध्या येथील परिस्थितीत कमालीची सुधारणा होत आहे. पाण्याची पातळी वाढली आहे.डिसेंबर २०१४ मध्ये राज्य शासनाने जलयुक्त शिवारची घोषणा केली. २०१५-१६ मध्ये ३१३ गावांची निवड करण्यात आली. पहिल्याच वर्षी या योजनेला चांगला प्रतिसाद मिळाला. बहुतांश गावांतील कामे पूर्ण झाली. २०१६-१७ मध्ये नियोजनपूर्ण १८५ गावांची निवड करण्यात आली. या गावांमध्ये एकूण ३०३६ कामे सुरू झाली. यापैकी २९३६ कामे पूर्ण करण्यात आली. या सर्व कामांवर तब्बल ७४ कोटी ४६ लाख रुपये खर्च करण्यात आले. यामध्ये सर्वाधिक १७३२ कामे ही कृषी विभागाने केली. वन विभागाने ३३० कामे, लघु सिंचन(जि.प.)ने २१७ कामे, ग्रामीण पाणी पुरवठ्याने ३९ कामे, भूजल सर्वेक्षणाने १२५ कामे केली. यात ग्राम पंचायतही मागे राहिली नाही. त्यांनी तब्बल ४२० कामे पूर्ण केली. यावर्षी (२०१७-१८) मध्ये २२० गावांचे नियोजन करण्यात आलेले आहे. जलयुक्त शिवारमध्ये नाला खोलीकरण, सरलीकरण, सिमेंट बंधारा, जुना बंधाऱ्याची दुरुस्ती आदी कामे करण्यात येत आहेत. त्यामुळे शेतांमधून गेलेल्या नाले बंधाऱ्यात पाणी वाढले आहे. परिसरातील जवळपासच्या विहिरींमध्ये पाण्याची पातळी वाढली आहे. यासोबतच शासनाने गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार, मागेल त्याला शेततळे, सिंचन विहिरी या योजनाही जलयुक्त शिवारच्या सोबतीलाच राबविण्यास सुरुवात केली. गाळमुक्त धरणमुळे २०१६-१७ मध्ये ५४ गावांतील ५८ लघु सिंचन तलावातील १ लाख २४ हजार ४१० घनमीटर गाळ काढण्यात आला. तर २०१७-१८ मध्ये १०७ लघु सिंचन तलाव, १५ पाझर तलाव, ३० मामा तलाव अशा एकूण १५२ तलावांमधील तब्बल २८ लाख ६४ हजार ४२० घनमीटर गाळ काढण्यात आला. यासोबतच मागेल त्याला शेततळे योजनेंतर्गत १३३७ आणि सिंचन विहिरी योजनेंतर्गत एकूण ५६७३ मंजूर सिंचन विहिरींपैकी ३५८५ पूर्ण झाल्या आहेत. या सर्वांचा परिणाम म्हणजे नागपूर जिल्ह्यातील नाल्यांमध्ये, तलावांमध्ये, विहिरींमधील पाण्याचा साठा वाढला आहे.

पंतप्रधान व मुख्यमंत्र्यांनीही केले कौतुकजलयुक्त शिवारमध्ये नागपूर जिल्ह्याने उत्कृष्ट कार्य केले आहे. काटोल व नरखेडमध्ये राबविलेल्या कामांचे कौतुक खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही केले आहे. यासाठी जिल्हाधिकारी सचिन कुर्वे यांचा गौरवसुद्धा करण्यात आला आहे.

टॅग्स :Waterपाणी