शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारमध्ये राडा! उपमुख्यमंत्र्यांच्या ताफ्यावर हल्ला; दुसरीकडे सीपीएम आमदाराला मारहाण, गाडी फोडली
2
अनिल अंबानींची पुन्हा चौकशी होणार, ED नं १४ नोव्हेंबरला बोलावलं; प्रकरण काय?
3
भाजप कार्यकर्त्याने आधी दिल्लीत नंतर बिहारमध्ये मतदान केले; राहुल गांधींनंतर आप नेत्याने आरोप केला
4
"माझ्या पप्पांना अडकवण्यात आलंय"; वडील जेलमध्ये, लेकीने अभ्यास सोडून केला प्रचार
5
मोठी बातमी! पार्थ पवार जमीन व्यवहार प्रकरणी तहसीलदार सूर्यकांत येवले निलंबित
6
बिहार निवडणूक 2025: व्होटर स्लीपशिवाय मतदान नाही! सकाळी ६.३० वाजल्यापासून रांगेत असलेल्या महिलांना रोखले
7
चारित्र्यावर संशय! रस्त्यात दुसऱ्या तरुणासोबत बोलली म्हणून संतापलेल्या पतीने ब्लेडने कापले पत्नीचे नाक
8
याला म्हणतात ऑफर...! Tata च्या इलेक्ट्रिक कारवर ₹1.30 लाखांपर्यंतची सूट, Curvv EV अन् Punch EV वर मोठा डिस्काउंट
9
तो प्रवास ठरला अखेरचा..; प्रसिद्ध ट्रॅव्हल इन्फ्लुएंसर अनुनय सूदचे 32व्या वर्षी निधन
10
धक्कादायक! अखेर ७ सिंहांना मृत्यूदंडाची शिक्षा; 'जंगलाच्या राजा'ला मारण्याची तयारी कोण करतंय?
11
₹१६०० पर्यंत जाणार Paytm चा शेअर; एक्सपर्ट बुलिश, आजही शेअरमध्ये मोठी तेजी
12
'एकाच ठिकाणी.. कुठे तरी राहा' राज ठाकरेंनी पिट्याभाईला सुनावले
13
...अन् व्हीलचेअरवर बसलेल्या प्रतीकासाठी PM मोदींनी स्वतः आणून दिला तिच्या आवडीचा पदार्थ (VIDEO)
14
राजा भैय्याच्या शस्त्रपूजेचा पोलिस तपास अहवाल आला; दसऱ्याला डझनभर शस्त्रांचे पूजन केले होते
15
Video - बापाची धडपड! ट्रॅफिकमध्ये अडकलेली रुग्णवाहिका, आजारी लेकीला उचलून घेऊन...
16
मुलांसाठी जबरदस्त आहे 'ही' स्कीम, अनेक योजना याच्यासमोर फेल; रोज फक्त ₹८.५ रुपये वाचवून व्हाल लखपती
17
अमित शाहांनी म्हटलं, 'पिंटू बडा आदमी बनेगा'; काही क्षणांनी भाजपा उमेदवाराचा अश्लील व्हिडिओ व्हायरल
18
Rahul Gandhi: 'मतचोरी'च्या आरोपांत नवा ट्विस्ट! 'तो' फोटो ब्राझिलियन मॉडेलचा नाही? तर...
19
Mahabharat: शुक्राचार्यांना एकच डोळा का? ते शिवपुत्र होते? नावामागेही आहे रोचक कथा!
20
डिजिटल अरेस्टच्या नावाखाली तब्बल ३,००० कोटी रुपयांची फसवणूक! 'हे' लोक ठरत आहेत सायबर फ्रॉडचे बळी

जागतिक आत्महत्या प्रतिबंधक दिन; कोरोनामुळे दूरगामी मानसिक परिणाम होण्याची भीती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2021 07:15 IST

Nagpur News कोरोनातून होणारे मानसिक परिणाम दूरगामी ठरण्याची भीती आहे, असे मत सायकॅट्रिक सोसायटीचे अध्यक्ष डॉ. सुशील गावंडे व सचिव डॉ. श्रीकांत निंभोरकर यांनी व्यक्त केले.

ठळक मुद्देनैराश्य असलेल्या रुग्णांचे १५ टक्के प्रमाणयोग्य उपचार घेतल्यास आत्महत्येच्या विचारांना प्रतिबंध करणे शक्य 

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : कोरोना काळात अनेकांमध्ये चिंतेचे प्रमाण वाढले आहे. यातूनच काहींना मानसिक आरोग्याच्या तक्रारी जडल्या आहेत, काहींमध्ये त्यात वाढ झाली आहे. विशेष म्हणजे, कोरोनातून होणारे मानसिक परिणाम दूरगामी ठरण्याची भीती आहे, असे मत सायकॅट्रिक सोसायटीचे अध्यक्ष डॉ. सुशील गावंडे व सचिव डॉ. श्रीकांत निंभोरकर यांनी व्यक्त केले. (World Suicide Prevention Day; Fear of far-reaching psychological consequences due to corona)

जागतिक आत्महत्या प्रतिबंधक दिनाच्या पूर्वसंध्येला ते ‘लोकमत’शी बोलत होते. समाजात मानसिक आरोग्यासंबंधी जागृती नाही. कोरोना पश्चात तर मानवाच्या सामाजिक वृत्तीला तडा जातोय. संवादाचा देखील अभाव जाणवत आहे. लॉकडाऊनसदृश परिस्थितीमुळे आंतर वैयक्तिक संबंधांचा अभाव निर्माण झाला आहे. त्याच प्रकारे व्यसनाधिनता वाढली आहे. नैराश्य असलेल्या रुग्णांचे १५ टक्के प्रमाण आहे. या बाबी आत्महत्यांसाठी कारणीभूत ठरत असल्याचे मतही या तज्ज्ञानी मांडले.

-भारतात रोज सरासरी ४०० आत्महत्या

डॉ. गावंडे म्हणाले, २०१९ च्या ‘नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरो’च्या आकडेवारीनुसार भारतात रोज सरासरी ४०० आत्महत्या होतात. प्रति एक लाख लोकसंख्येमागे १० आत्महत्या ही गंभीर बाब आहे. ग्रामीण भागापेक्षा शहरी भागात आत्महत्या अधिक आहे. वाढत्या स्पर्धेबाबत होणारे शहरीकरण देखील आत्महत्येसाठी जबाबदार ठरत आहे.

-आत्महत्या केलेल्यांपैकी ८० टक्के व्यक्तींचे यापूर्वीही प्रयत्न

डॉ. निंभोरकर म्हणाले, नैराश्याच्या गर्तेत अडकलेले कित्येक जण मानसिक आजाराचे बळी ठरत आहेत. यातून आत्महत्येचे विचार बळावत असल्याचे प्रमाण वाढत आहेत. आत्महत्या केलेल्यांपैकी ६० ते ८० टक्के व्यक्तींनी यापूवीर्ही आत्महत्येचा प्रयत्न केला असतो. जर असा आत्महत्येचा प्रयत्न केल्या गेला असेल तर, योग्य उपचारांती आत्महत्या टाळता येऊ शकते.

-आप्तस्वकीयांशी चर्चा करा!

मनात आत्महत्येचे विचार आले तर आप्तस्वकीयांशी नि:संकोच चर्चा करावी. मानसिकरोग तज्ज्ञांची मदत घ्यावी. औषधांमध्ये नियमितता ठेवावी आणि डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय औषधं बंद करू नयेत.

डॉ. सुशील गावंडे, अध्यक्ष, सायकॅट्रिक सोसायटी

-लक्षणांना वेळेत ओळखा! 

आत्महत्येची पूर्वलक्षणे लक्षणे आढळून आली तर निश्चितच मानसोपचार तज्ज्ञांचा सल्ला घेतला पाहिजे. वेळेत लक्षण ओळखून मदत मिळाली तर आत्महत्या टाळू शकते व निश्चितच जीव वाचू शकतो.

डॉ. श्रीकांत निंभोरकर, सचिव, सायकॅट्रिक सोसायटी

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस