शहरं
Join us  
Trending Stories
1
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
2
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
3
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
4
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
5
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
6
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
7
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
8
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
9
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
10
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
11
आकाशदीपची फिफ्टी पाहून गिल-जड्डूला सेंच्युरीचं फिल! बॅटसह हेल्मेट उंचावण्याची केली डिमांड (VIDEO)
12
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
13
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
14
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
15
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
16
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
17
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
18
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
19
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
20
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?

जागतिक आत्महत्या प्रतिबंधक दिन; कोरोनामुळे दूरगामी मानसिक परिणाम होण्याची भीती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2021 07:15 IST

Nagpur News कोरोनातून होणारे मानसिक परिणाम दूरगामी ठरण्याची भीती आहे, असे मत सायकॅट्रिक सोसायटीचे अध्यक्ष डॉ. सुशील गावंडे व सचिव डॉ. श्रीकांत निंभोरकर यांनी व्यक्त केले.

ठळक मुद्देनैराश्य असलेल्या रुग्णांचे १५ टक्के प्रमाणयोग्य उपचार घेतल्यास आत्महत्येच्या विचारांना प्रतिबंध करणे शक्य 

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : कोरोना काळात अनेकांमध्ये चिंतेचे प्रमाण वाढले आहे. यातूनच काहींना मानसिक आरोग्याच्या तक्रारी जडल्या आहेत, काहींमध्ये त्यात वाढ झाली आहे. विशेष म्हणजे, कोरोनातून होणारे मानसिक परिणाम दूरगामी ठरण्याची भीती आहे, असे मत सायकॅट्रिक सोसायटीचे अध्यक्ष डॉ. सुशील गावंडे व सचिव डॉ. श्रीकांत निंभोरकर यांनी व्यक्त केले. (World Suicide Prevention Day; Fear of far-reaching psychological consequences due to corona)

जागतिक आत्महत्या प्रतिबंधक दिनाच्या पूर्वसंध्येला ते ‘लोकमत’शी बोलत होते. समाजात मानसिक आरोग्यासंबंधी जागृती नाही. कोरोना पश्चात तर मानवाच्या सामाजिक वृत्तीला तडा जातोय. संवादाचा देखील अभाव जाणवत आहे. लॉकडाऊनसदृश परिस्थितीमुळे आंतर वैयक्तिक संबंधांचा अभाव निर्माण झाला आहे. त्याच प्रकारे व्यसनाधिनता वाढली आहे. नैराश्य असलेल्या रुग्णांचे १५ टक्के प्रमाण आहे. या बाबी आत्महत्यांसाठी कारणीभूत ठरत असल्याचे मतही या तज्ज्ञानी मांडले.

-भारतात रोज सरासरी ४०० आत्महत्या

डॉ. गावंडे म्हणाले, २०१९ च्या ‘नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरो’च्या आकडेवारीनुसार भारतात रोज सरासरी ४०० आत्महत्या होतात. प्रति एक लाख लोकसंख्येमागे १० आत्महत्या ही गंभीर बाब आहे. ग्रामीण भागापेक्षा शहरी भागात आत्महत्या अधिक आहे. वाढत्या स्पर्धेबाबत होणारे शहरीकरण देखील आत्महत्येसाठी जबाबदार ठरत आहे.

-आत्महत्या केलेल्यांपैकी ८० टक्के व्यक्तींचे यापूर्वीही प्रयत्न

डॉ. निंभोरकर म्हणाले, नैराश्याच्या गर्तेत अडकलेले कित्येक जण मानसिक आजाराचे बळी ठरत आहेत. यातून आत्महत्येचे विचार बळावत असल्याचे प्रमाण वाढत आहेत. आत्महत्या केलेल्यांपैकी ६० ते ८० टक्के व्यक्तींनी यापूवीर्ही आत्महत्येचा प्रयत्न केला असतो. जर असा आत्महत्येचा प्रयत्न केल्या गेला असेल तर, योग्य उपचारांती आत्महत्या टाळता येऊ शकते.

-आप्तस्वकीयांशी चर्चा करा!

मनात आत्महत्येचे विचार आले तर आप्तस्वकीयांशी नि:संकोच चर्चा करावी. मानसिकरोग तज्ज्ञांची मदत घ्यावी. औषधांमध्ये नियमितता ठेवावी आणि डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय औषधं बंद करू नयेत.

डॉ. सुशील गावंडे, अध्यक्ष, सायकॅट्रिक सोसायटी

-लक्षणांना वेळेत ओळखा! 

आत्महत्येची पूर्वलक्षणे लक्षणे आढळून आली तर निश्चितच मानसोपचार तज्ज्ञांचा सल्ला घेतला पाहिजे. वेळेत लक्षण ओळखून मदत मिळाली तर आत्महत्या टाळू शकते व निश्चितच जीव वाचू शकतो.

डॉ. श्रीकांत निंभोरकर, सचिव, सायकॅट्रिक सोसायटी

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस