शहरं
Join us  
Trending Stories
1
सुधीर मुनगंटीवारांनी 'राज्यभर दौरा गुंडाळला', भाजप नेत्यांसोबत आज चर्चा; ठाकरे बंधुबद्दलही बरंच बोलले
2
“१०० टक्के ठाकरे बंधूंना १०० जागा मिळतील, युतीची केवळ घोषणा बाकी, जागावाटप पूर्ण”: संजय राऊत
3
ठाकरे बंधुंमधील दादर, शिवडीचा तिढा अखेर सुटला, मोठ्या भावासाठी धाकट्याने घेतले झुकते माप
4
महापालिका निवडणूक २०२६ : प्रस्तावच नाही; काँग्रेस-'वंचित'ची युती होणार की नाही? गोंधळ कायम 
5
दीपूचंद्र दासच्या मित्रांनीच केली 'गद्दारी', मारणाऱ्या धर्मांध जमावातच झाले सामील अन्...! सामोर आलं धक्कादायक सत्य
6
खळबळजनक! सकाळी एन्काऊंटर, संध्याकाळी फरार; पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पळाला आरोपी
7
महाविकास आघाडी फुटणार? सुप्रिया सुळे म्हणाल्या, "...तर आम्ही इतर पर्यायांचा विचार करू"
8
पहाटे ५ ची वेळ, उर्फी जावेद घाबरलेल्या अवस्थेत पोलिस स्टेशनमध्ये पोहोचली; नक्की काय घडलं?
9
इंडिगो एअरलाइन्स मार्चनंतर तुर्कीकडून घेतलेली विमानांचे उड्डाण करणार नाही; DGCA ने दिला स्पष्ट नकार
10
सोलापुरात अजित पवारांचा भाजपाला धक्का! अतुल पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश
11
आठ कोटी, बारा पानांची चिठ्ठी आणि स्वतःवरच झाडली गोळी; Ex IPS अमर सिंग चहल यांची प्रकृती गंभीर, असा निर्णय का घेतला?
12
८ लाखांच्या गुंतवणुकीवर मिळवा ३,२८,००० रुपये फिक्स व्याज! ज्येष्ठ नागरिकांसाठी पोस्टाची 'खास' भेट
13
"मनसेचे जे काही नगरसेवक निवडून येतील, तेदेखील पळवतील", भाजपचा राज ठाकरेंना सावधगिरीचा सल्ला
14
गॅल्व्हेस्टनजवळ मेक्सिकन नौदलाच्या विमानाचा भीषण अपघात, पाच जणांचा मृत्यू
15
विदर्भात भाजपची हुरडा पार्टी; मुनगंटीवार यांनी शाब्दिक हल्ला चढवल्याने सुरू झाला नवा वाद
16
२०२५चे शेवटचे पंचक: ५ दिवस अशुभ, पण ‘ही’ कामे करणे शुभ; दोष लागणार नाही, नेमके काय टाळावे?
17
Bigg Boss Marathi: लावणी डान्सरला 'बिग बॉस मराठी'ची ऑफर? म्हणाली- "मला त्यांच्याकडून मेल आलाय..."
18
बांगलादेशात युनूस सरकार उलथवून टाकण्याची तयारी सुरू! उस्मान हादीच्या संघटनेने दिला मोठा इशारा
19
एपस्टीन फाइल्सवरून जनतेचा रोष वाढला, न्याय विभागाने कोणते फोटो प्रसिद्ध केले आणि कोणते लपवून ठेवले?
20
मुंबईचा ‘ब्रेन’, पुण्याचे ‘मार्केट’ अन् सातारा-सांगलीतले ‘अड्डे’
Daily Top 2Weekly Top 5

जागतिक आत्महत्या प्रतिबंधक दिन; कोरोनामुळे दूरगामी मानसिक परिणाम होण्याची भीती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2021 07:15 IST

Nagpur News कोरोनातून होणारे मानसिक परिणाम दूरगामी ठरण्याची भीती आहे, असे मत सायकॅट्रिक सोसायटीचे अध्यक्ष डॉ. सुशील गावंडे व सचिव डॉ. श्रीकांत निंभोरकर यांनी व्यक्त केले.

ठळक मुद्देनैराश्य असलेल्या रुग्णांचे १५ टक्के प्रमाणयोग्य उपचार घेतल्यास आत्महत्येच्या विचारांना प्रतिबंध करणे शक्य 

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : कोरोना काळात अनेकांमध्ये चिंतेचे प्रमाण वाढले आहे. यातूनच काहींना मानसिक आरोग्याच्या तक्रारी जडल्या आहेत, काहींमध्ये त्यात वाढ झाली आहे. विशेष म्हणजे, कोरोनातून होणारे मानसिक परिणाम दूरगामी ठरण्याची भीती आहे, असे मत सायकॅट्रिक सोसायटीचे अध्यक्ष डॉ. सुशील गावंडे व सचिव डॉ. श्रीकांत निंभोरकर यांनी व्यक्त केले. (World Suicide Prevention Day; Fear of far-reaching psychological consequences due to corona)

जागतिक आत्महत्या प्रतिबंधक दिनाच्या पूर्वसंध्येला ते ‘लोकमत’शी बोलत होते. समाजात मानसिक आरोग्यासंबंधी जागृती नाही. कोरोना पश्चात तर मानवाच्या सामाजिक वृत्तीला तडा जातोय. संवादाचा देखील अभाव जाणवत आहे. लॉकडाऊनसदृश परिस्थितीमुळे आंतर वैयक्तिक संबंधांचा अभाव निर्माण झाला आहे. त्याच प्रकारे व्यसनाधिनता वाढली आहे. नैराश्य असलेल्या रुग्णांचे १५ टक्के प्रमाण आहे. या बाबी आत्महत्यांसाठी कारणीभूत ठरत असल्याचे मतही या तज्ज्ञानी मांडले.

-भारतात रोज सरासरी ४०० आत्महत्या

डॉ. गावंडे म्हणाले, २०१९ च्या ‘नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरो’च्या आकडेवारीनुसार भारतात रोज सरासरी ४०० आत्महत्या होतात. प्रति एक लाख लोकसंख्येमागे १० आत्महत्या ही गंभीर बाब आहे. ग्रामीण भागापेक्षा शहरी भागात आत्महत्या अधिक आहे. वाढत्या स्पर्धेबाबत होणारे शहरीकरण देखील आत्महत्येसाठी जबाबदार ठरत आहे.

-आत्महत्या केलेल्यांपैकी ८० टक्के व्यक्तींचे यापूर्वीही प्रयत्न

डॉ. निंभोरकर म्हणाले, नैराश्याच्या गर्तेत अडकलेले कित्येक जण मानसिक आजाराचे बळी ठरत आहेत. यातून आत्महत्येचे विचार बळावत असल्याचे प्रमाण वाढत आहेत. आत्महत्या केलेल्यांपैकी ६० ते ८० टक्के व्यक्तींनी यापूवीर्ही आत्महत्येचा प्रयत्न केला असतो. जर असा आत्महत्येचा प्रयत्न केल्या गेला असेल तर, योग्य उपचारांती आत्महत्या टाळता येऊ शकते.

-आप्तस्वकीयांशी चर्चा करा!

मनात आत्महत्येचे विचार आले तर आप्तस्वकीयांशी नि:संकोच चर्चा करावी. मानसिकरोग तज्ज्ञांची मदत घ्यावी. औषधांमध्ये नियमितता ठेवावी आणि डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय औषधं बंद करू नयेत.

डॉ. सुशील गावंडे, अध्यक्ष, सायकॅट्रिक सोसायटी

-लक्षणांना वेळेत ओळखा! 

आत्महत्येची पूर्वलक्षणे लक्षणे आढळून आली तर निश्चितच मानसोपचार तज्ज्ञांचा सल्ला घेतला पाहिजे. वेळेत लक्षण ओळखून मदत मिळाली तर आत्महत्या टाळू शकते व निश्चितच जीव वाचू शकतो.

डॉ. श्रीकांत निंभोरकर, सचिव, सायकॅट्रिक सोसायटी

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस