शहरं
Join us  
Trending Stories
1
लाजीरवाण्या पराभवानंतर LSG चे मालक संतापले; कॅप्टन KL Rahul ला झापताना दिसले, Video
2
Fact Check: भारतात ३०० दहशतवादी घुसणार असल्याचे भाजपा अध्यक्ष जेपी नड्डा खरंच बोलले? जाणून घ्या सत्य
3
नागपूर मेडिकलच्या अधिष्ठात्यांसह ११ डॉक्टरांविरोधात गुन्हा, निष्काळजीपणाचा ठपका!
4
"मी विरोध केला नाही, 'त्या' पोझिशनमध्ये केवळ छताकडे बघत राहिले अन् डोनाल्ड ट्रम्प..."; पॉर्न स्टारचे खळबळजनक खुलासे
5
ना कोहली... ना रोहित...; ब्रायन लाराला वाटतं, हा युवा फलंदाज मोडू शकतो त्याचा 400 धावांचा रेकॉर्ड
6
Chandrayaan-3 नं इतिहास रचला; आता चंद्रासंदर्भात आली आणखी एक आनंदाची बातमी! जाणून घ्या, काय सापडलं?
7
सनरायझर्स हैदराबादने ९.४ षटकांत कुटल्या विजयी १६७ धावा, Mumbai Indians चे आव्हान संपुष्टात आणले
8
१६७ धावा, ९.४ षटकं, १६ चौकार, १४ षटकार! SRH चा चमत्कार, अभिषेक-ट्रॅव्हिस यांनी मोडला १६ वर्षांपूर्वीचा विक्रम
9
शरद पवारांकडे पक्ष विलिनीकरणाशिवाय पर्याय नाही; चंद्रशेखर बावनकुळे यांची खरमरीत टीका
10
माझे शब्दच हरवले आहेत, ही काल्पनिक फलंदाजी; बेक्कार हरल्यानंतर KL Rahul ला काहीच सूचेना
11
आमदाराच्या स्वीय्य सहाय्यकाच्या अपघाती मृत्यू प्रकरणी ट्रकचालकास अटक व सुटका
12
भारतीय अर्थव्यवस्था 8% दराने वाढणार; देशाच्या मुख्य आर्थिक सल्लागारांनी व्यक्त केला विश्वास
13
'इंडिया' आघाडी भ्रष्टाचारी; भाजपकडे नेता, नीती अन् विकासाचा कार्यक्रम तयार: अमित शाह
14
ट्रॅव्हिड हेडने कुटल्या १२ चेंडूंत ५८ धावा! अभिषेक शर्मासह ३६ चेंडूंत फलकावर चढवल्या १०७ धावा
15
महा-बीसीए, बीबीए, एमसीए, एमबीए CET प्रवेश परीक्षा २९ मे रोजी; सुधारित वेळापत्रक जाहीर
16
भारताच्या लोकसंख्येत हिंदू 6 टक्क्यांनी घटले, मुस्लीम समाजाचा टक्का वाढला; सरकारी पॅनलनं केला 65 वर्षांचा अभ्यास
17
Air India ने 80 उड्डाणे रद्द केल्याबद्दल मागितली प्रवाशांची माफी; तिकीटाचे पैसेही परत करणार...
18
काँग्रेसची धुळधाण हीच खरी देशभक्ती; एकनाथ शिंदेंची संगमनेरात जोरदार टीका
19
मी दक्षिण भारतातील असून भारतीय दिसते; अभिनेत्रीचं सॅम पित्रोदांना चोख प्रत्युत्तर
20
इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेत नोकरीची संधी, 'या' तारखेपूर्वी उमेदवार करू शकतात अर्ज

जागतिक रेबीज दिन :दर २५ मिनिटाला रेबीजमुळे एकाचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 27, 2019 10:02 PM

नुकत्याच झालेल्या एका अभ्यासातून देशात दर २५ मिनिटाला रेबीजमुळे एकाचा मृत्यू होतो. यात १५ वर्षाखालील मुलांची संख्या सर्वात जास्त आहे.

ठळक मुद्देभारतात दरवर्षी ३० हजार लोक मृत्यूच्या दारात : जीवघेण्या आजारावर जनजागृती आवश्यक

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : श्वानदंशामुळे ‘रेबीज’च्या ज्या केसेस भारतात आढळतात, त्यातील ९७ टक्के पिसाळलेल्या कुत्र्यापासून उद्भवलेल्या असतात. जगात दरवर्षी रेबीजमुळे ६० हजार लोकांचा मृत्यू होतो. त्यापैकी जवळपास ३० हजार लोक एकट्या भारतात मृत्यू पावतात. नुकत्याच झालेल्या एका अभ्यासातून देशात दर २५ मिनिटाला रेबीजमुळे एकाचा मृत्यू होतो. यात १५ वर्षाखालील मुलांची संख्या सर्वात जास्त आहे.रेबीज हा प्राण्यांना व मानवाला होणारा जीवघेणा आजार आहे. हा आजार कुत्र्यांपासून, जंगली कोल्ह्यांपासून, वटवाघुळापासून चावा घेतल्याने होतो. ‘रेबीज’चे दुसरे नाव मृत्यू आहे. आजारापूर्वी श्वानदंशानंतर संपूर्ण प्रतिबंधक लसीकरण व जखमेवर उपाययोजना हाच जीवनाचा आधार आहे. कुत्रा चावल्यानंतर शासकीय रु ग्णालयात नि:शुल्क लस उपलब्ध आहे, मात्र कुठल्याही पशु चिकित्सालयात ही सोय उपलब्ध नाही. हा रोग होऊ नये म्हणून श्वानाकरिता नि:शुल्क नियमित लसीकरण अपेक्षित आहे. परंतु ही सोय उपलब्ध नसल्याने मृत्यूचे प्रमाण वाढत आहे. शहरातील, गावातील सर्वच मोकाट कुत्र्यांना लस टोचणे हे प्रशासनाला शक्य होत नाही हे वास्तव असले तरी या दिशेने संशोधन व जनजागृती करून या समस्येवर मात केली जाऊ शकते, असे तज्ज्ञाचे मत आहे.नि:शुल्क लसीकरणासाठी संस्थांचा पुढाकारपशुधन विकास अधिकारी डॉ. अजय पोहरकर यांनी सांगितले, पशु सर्वचिकित्सालय नागपूर व नावार संस्था आणि ‘इंडियन इम्युनोलॉजिकल्स लि.’ या संस्थांच्या सहभागाने पाळीव प्राण्याकरिता ‘अ‍ॅण्टी रेबीज’ लसीकरणाची नि:शुल्क सोय उपलब्ध केली आहे. तसेच सरकारने नागपुरात ‘वन हेल्थ इन्स्टिट्यूट स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे या समस्येच्या निराकरणासाठी मोठा फायदा होण्याची शक्यता आहे.लक्षणे केव्हा दिसतील याचा नेम नाहीश्वानदंश झाल्यानंतर त्याची लक्षणे केव्हा दिसून येतील याचा नेम राहत नाही. पहिल्या काही दिवसात किंवा एक वर्षांनंतरही ही लक्षणे दिसून येऊ शकतात. दंश झालेल्या जागेवर पुरळ येणे, खाज सुटणे, झिणझिण्या येणे, ताप येऊन डोके दुखणे, स्रायू दुखणे, यात रोग्याला प्रकाशाची व पाण्याची भीती वाटणे ही काही प्राथमिक लक्षणे आहेत.दंश होताच डॉक्टरांशी संपर्क साधा 

दंश होताच त्वरित डॉक्टरांशी संपर्क साधावा. यावर विशिष्ट असे उपचार नाहीत, पण वेळीच लस (इन्जेक्शन) घेतल्यास त्यावर पूर्णपणे नियंत्रण मिळविता येते.जागतिक रॅबीज दिनानिमित्त २८सप्टेंबर २०१९ ला पशु सर्वाचिकित्सालय, महाराज बाग रोड, सीताबर्डी नागपूर येथे सकाळी ८ ते १२ या वेळेत पाळीव तसेच मोकाट कुत्रे व मांजरींना नि:शुल्क अँटी रॅबीज लस टोचण्यात येणार आहे. पशुप्रेमी व पशुकल्याणार्थ कार्य करणाऱ्यांनी व नागपूर महानगर पालिकेने सहभाग नोंदवून रॅबीज मुक्त देश ही संकल्पना साध्य करण्याकरिता जास्तीत जास्त कुत्रे व मांजरी यांचे नि:शुल्क लसीकरण करून घ्यावे.डॉ. अजय पोहरकरपशुधन विकास अधिकारीअध्यक्ष म.रा. पशुवैद्यक परिषदएकदा रॅबीज झाल्यास १०० टक्के मृत्यू 
रॅबीज हा ‘रेबडो व्हायरस’ नावाचा विषाणू रोगट प्राण्यांच्या लाळेतून संपर्क स्थापित झाल्यावर होतो. हा रोग कुत्रा चावल्यामुळे जास्त प्रमाणात होतो. दंशमार्गाने रॅबीजचे विषाणू मानवाच्या शरीरात प्रवेश करतात व ते मज्जातंतूपर्यंत पोहचतात. यामुळे मेंदूला सूज येते. मेंदूमधून हे रॅबीजचे विषाणू लाळोत्पादक ग्रंथीत शिरतात व त्यानंतर लाळेत या विषाणूचा प्रादुर्भाव जाणवायला लागतो. एकदा रॅबीज झाल्यास १०० टक्के मृत्यूचा धोका असतो. यामुळे श्वानदंश होताच डॉक्टरांच्या सल्ल्याने लस घेणे आवश्यक असते.डॉ. चंद्रशेखर मेश्राममेंदू रोग तज्ज्ञ

टॅग्स :dogकुत्राDeathमृत्यू