शहरं
Join us  
Trending Stories
1
काश्मिरात अतिरेकी हल्ला, २८ ठार; 'टार्गेट किलिंग'मध्ये महाराष्ट्रातील पर्यटकांचाही समावेश
2
रुपचंदानी कुटुंबीय पहलगाममध्ये सुखरूप; काळजीनं नातेवाईकांचा जीव लागला होता टांगणीला
3
'यूपीएससी'त पुण्याचा अर्चित डोंगरे तिसरा; राज्यातील ९५ विद्यार्थ्यांनी घातली यशाला गवसणी
4
पोप फ्रान्सिस यांच्या निधनामुळे कर्मयोगी जवाहरलाल दर्डा यांच्या पुतळ्याचे अनावरण स्थगित
5
KL राहुलचं एकदम कूल सेलिब्रेशन! मग संजीव गोयंका यांच्या हातात हात दिला; पण... (VIDEO)
6
मत्स्य व्यवसायाला कृषी समकक्ष दर्जा, मंत्रिमंडळाचा निर्णय; मच्छीमारांना ६ हजाराचा लाभ मिळणार
7
भिसेंवर उपचार करणाऱ्या डॉक्टरांची होणार चौकशी; महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलचा निर्णय
8
एक मंदिर, एक विहीर, एक स्मशान...डॉ. भागवतांच्या संप्रदायाला ही एकता समजली तरी खूप बरे होईल
9
गुलफिशा फातिमाने तुरुंगात खितपत का पडावे?; २ वर्ष उलटली तरी जामीन नाही  
10
पहलगाम मध्ये तुमच्या ओळखीचे कुणी अडकले असेल तर 'या' तीन क्रमांकावर साधू शकता संपर्क
11
Rishabh Pant : पंतनं हिंमत दाखवली नाही की, तो किंमत शून्य झालाय? एक निर्णय अन् अनेक प्रश्न
12
महाराष्ट्रातल्या दोन पर्यटकांचा पहलगाम हल्ल्यात मृत्यू; पर्यटक जखमी असल्याची CM फडणवीसांची माहिती
13
"तुला मारणार नाही, जा आणि मोदींना सांग"; पतीची डोळ्यांसमोर हत्या केल्यानंतर दहशतवाद्यांनी पत्नीला धमकावलं
14
दररोज फक्त ₹7 ची बचत करा अन् दरमहा ₹5000 मिळवा; जाणून घ्या सरकारी योजनेचे फायदे...
15
जम्मू-काश्मीरमध्ये मोठा दहशतवादी हल्ला; नाव विचारुन झाडल्या गोळ्या, 27 जणांच्या मृत्यूची भीती
16
मराठी मुलीच्या वडिलांना, काकांना दहशतवाद्यांनी नाव विचारून डोळ्यांदेखत गोळ्या घातल्या- एकनाथ शिंदे
17
"सरकारला धन्यवाद, पण पुन्हा एकदा सांगतो..."; हिंदी सक्तीच्या माघारीनंतर राज ठाकरेंचे ट्विट
18
पहलगाममध्ये टीआरएफने घडवला नरसंहार; दहशतवादी संघटनेने पत्र जारी करुन सांगितले कारण
19
'दोषींना सोडणार नाही, कठोर शिक्षा...', पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर PM मोदींची तीव्र प्रतिक्रिया
20
‘यूपीएससी’त प्रज्ञाचक्षू विद्यार्थ्यांमध्ये मनू गर्ग देशात अव्वल

जागतिक बौद्धिक संपदा दिन; स्वत:च्या बौद्धिक संपदेचे करा पेटंट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 26, 2018 11:03 IST

आपल्या बौद्धिक संपदेला सुरक्षित करणे ही काळाची गरज झाली आहे. तसे केले नाही तर भारतीयांचे ज्ञान चोरून जग पुढे जाण्याचा धोका निर्माण झाला आहे.

ठळक मुद्देभारतीय संशोधनात पुढे पण पेटंट करण्यात मागे पेपर प्रसिद्ध करून नुकसान करू नका

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : भारतीय विद्यार्थी, संशोधक हे संशोधनात पुढे आहेत. त्यांचे संशोधन जगाच्या संशोधनापेक्षा वेगळे व बहुउपयोगी आहे. मात्र, इतर देशांच्या तुलनेत ते आपल्या संशोधनाचे पेटेंट मिळवित नाही. गेल्यावेळी चीनसारख्या देशाने त्यांच्या संशोधनांचे पेटेंट घेण्यासाठी तब्बल ११ लाख फाईलिंग केले. तर भारतातून येणाऱ्या अर्जांची संख्या फक्त ४७ हजार होती. विशेष म्हणजे या ४७ हजारांमध्येही विदेशातील अर्ज करणाऱ्यांची संख्या ७० टक्क्यांवर होती.आपल्या बौद्धिक संपदेला सुरक्षित करणे ही काळाची गरज झाली आहे. तसे केले नाही तर भारतीयांचे ज्ञान चोरून जग पुढे जाण्याचा धोका निर्माण झाला आहे.राजीव गांधी इन्टलेक्चुअल प्रॉपर्टी राईट्स (आरजीआयजीआर) ही केंद्र सरकारची संस्था बौद्धिक संपदेचे पेटेंट करण्यासाठी जगजागृतीचे काम करीत आहे. भारतात अनेक लोक संशोधन करतात. संशोधन झाले की एखाद्या राष्ट्रीय परिषदेत त्याचा पेपर प्रसिद्ध करून मोकळे होतात. असे केल्याने त्यांनी केलेल्या संशोधनावर त्यांचा कुठलाही हक्क शिल्लक राहत नाही. ती माहिती जगासाठी मोकळी झालेली असते. एकदा माहिती प्रसिद्ध झाली की नंतर तिचे पेटेंट मिळविता येत नाही. त्यामुळे संशोधकांनी आपल्या संशोधनाचे आधी पेटेंट मिळवून आपली बौद्धिक संपदा कशी सुरक्षित करता येईल, याकडे लक्ष देणे गरजेचे आहे.१९८० मध्ये नागपुरात फक्त पेटेंट इन्फरमेशन सेंटर होते. मात्र, आता या केंद्रातर्फे प्रशिक्षण कार्यक्रमही राबविले जात आहेत. एखाद्या विद्यार्थ्याने, संशोधकाने एखादे संशोधन केले तर त्या संशोधनाचे पेटेंट त्याने कसे मिळवावे, याची माहिती देण्यासाठी संस्थोतर्फे शिबिर आयोजित केले जातात. प्रशिक्षण घेतले जाते.गेल्या वर्षभरात संस्थेने अशा ९४ कार्यशाळा घेतल्या आहेत असून चार हजारावर लोकांना प्रशिक्षणही दिले आहे. यातून जागृती निर्माण होऊन आता पेटेंटसाठी येणाऱ्या अर्जांची संख्या वाढली आहे. देशात आजवर दोन लाखावर लोकांनी पेटेंट घेतले आहे. येत्या काळात या संख्येत झपाट्याने वाढ होण्याची शक्यता आहे.

असे मिळवा पेटंटआपण एखादे संशोधन केले की त्याची नोंदणी ipindia.gov.in या वेबसाईटवर जाऊन करता येते. वेबसाईटवर फॉर्म नंबर १,२ व ३ मध्ये आपल्या संशोधनाची संपूर्ण माहिती भरावी लागते. त्यानंतर तुम्हाला एक रेफरन्स नंबर मिळतो. त्यानंतर तुम्ही सादर केलेल्या माहितीचे परीक्षण करण्याची प्रकिया सुरू होते. संस्थेचे परीक्षक त्याचे आॅनलाईन परीक्षण करतात. त्यात काही त्रुटी असतील, अडचणी असतील तर आपल्याला आॅनलाईन कळविले जाते. त्रुटी पूर्ण करण्याची संधी दिली जाते. ही सर्व प्रक्रिया तीन ते चार वर्षे चालते. यासाठी फक्त ५,६०० रुपये शुल्क आकारले जाते. एखाद्याला ही प्रकिया कमी वेळात करायची असेल तर त्यासाठी मात्र विशेष शुल्क भरावे लागते.

विदर्भाने घ्यावा पुढाकारराजीव गांधी इन्टलेक्चुअल प्रॉपर्टी राईट्स या संस्थेद्वारे इन्टलेक्चुअल प्रॉपर्टी राईट्सबाबत विविध प्रकारचे प्रशिक्षण दिले जाते. देशभरातील अनेक तरुण येथे येऊन प्रशिक्षण घेऊन जातात. परंतु, संस्थेकडे विदर्भ व नागपुरातून येणारा तरुण वर्ग तुलनेने फारच कमी आहे. विदभार्तून दरवर्षी पेटंट नोंदणीसाठी फक्त एक हजार अर्ज प्राप्त होतात. ही संख्या वाढण्याची गरज आहे. 

टॅग्स :cultureसांस्कृतिक