शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast : मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
3
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
4
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
5
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
6
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
7
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
8
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
9
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI
10
इराण-इस्त्राईल संघर्षामुळे काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट', भारताच्या चिंतेमागील कारण काय?
11
सोन्या-चांदीवर कर्ज घेताय? 'या' नियमांत झाला आहे बदल, जाणून घ्या
12
गौतम गंभीरच्या आईला हृदयविकाराचा झटका; इंग्लंड सीरीज सोडून भारतात परतला...
13
पतीसमोरच बायकोला प्रियकराकडे पाठवले, अट मात्र धक्कादायक! पंचायतीच्या निर्णयाने सगळेच झाले अवाक्
14
तात्काळ तिकीट बुकिंगचे नियम बदलले! १ जुलैपासून आधारशिवाय तिकीट नाही, असे करा लिंक!
15
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
16
एअर इंडियाच्या क्रॅश झालेल्या विमानाची किंमत किती होती? पहिल्यांदाच बोईंग ड्रिमलायनरचा झाला अपघात
17
अपघातानंतर परिसरातील तापमान 1000 अंशांपर्यंत पोहोचले...कुत्रे-पक्षीही जळून खाक झाले!
18
Israel Strike on Iran: इस्रायलचे इराणवर हल्ले! डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना आधीच सांगितलं होतं की...'
19
Recruitment 2025: भारतीय तटरक्षक दलात दहावी- बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरी!
20
Wedding Insurance Guide : लग्न करताय? 'हा' विमा असेल तर टेन्शन फ्री व्हाल! जाणून घ्या 'वेडिंग इन्शुरन्स'चे फायदे!

आता ऑलिम्पिकमध्ये फडकवणार तिरंगा, विश्व चॅम्पियन ओजस देवतळेचा निर्धार

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 28, 2023 11:47 IST

तुर्की आणि शांघाय येथे झालेल्या विश्व चॅम्पियनशिपमध्येही ओजस देवतळेने ज्योती सुरेखा वेनमच्या साथीने मिश्र दुहेरीत सुवर्णपदक पटकावले

नागपूर : तिरंदाजी विश्वचषकात भारताला पहिले सुवर्ण जिंकून देणाऱ्या नागपूरच्या ओजस देवतळेला आता ऑलिम्पिक पदकाची आस लागली आहे. नुकत्याच जर्मनीच्या बर्लिन शहरात झालेल्या तिरंदाजी विश्वचषकात ओजसने वैयक्तिक गटात सुवर्णपदक पटकावत भारतासाठी इतिहास रचला होता. ९२ वर्षांच्या कालखंडात अशी कामगिरी करणारा तो पहिला भारतीय ठरला. याव्यतिरिक्त ओजसने विविध गटांत सुवर्ण कामगिरी करत तिरंदाजी विश्वचषकात आपले नाणे खणखणीत वाजवले.

तुर्की आणि शांघाय येथे झालेल्या विश्व चॅम्पियनशिपमध्येही ओजस देवतळेने ज्योती सुरेखा वेनमच्या साथीने मिश्र दुहेरीत सुवर्णपदक पटकावले. तसेच, कोलंबिया येथे झालेल्या चॅम्पियनशिपच्या तिसऱ्या टप्प्यात प्रथमेश जावकर, अभिषेक वर्मा आणि ओजस देवतळे या भारतीय संघाने पुरुषांच्या गटात विजेतेपद पटकावले होते. सांघित प्रकारात चमकदार कामगिरी करणाऱ्या ओजसने बर्लिनला वैयक्तिक प्रकारातही सुवर्णपदकाचा सिलसिला कायम ठेवला.

‘लोकमत’सोबत बोलताना ओजसने आपल्या दैदीप्यमान यशाबद्दल आनंद व्यक्त केला. तो म्हणाला, 'अथक परिश्रमाचे खऱ्या अर्थाने चीज झाले. या यशामुळे भविष्यातील खडतर आव्हानांना तोंड देण्याचा आत्मविश्वास मिळाला आहे. तिरंदाजी विश्वचषकातील प्रत्येक खेळाडू मातब्बर होता. त्यामुळे वाट सोपी नसेल याची मला कल्पना आली होती. पण उपांत्यपूर्व फेरीत पोलंडच्या प्रतिस्पर्ध्याविरुद्ध १५० पैकी १४९ गुण घेत विजय मिळाल्याने माझा उत्साह द्विगुणीत झाला. त्यामुळेच उपांत्य फेरीत नेदरलंड्सच्या स्लॉकरविरुद्ध मी याच कामगिरीची पुनरावृत्ती करू शकलो. मात्र, अंतिम सामन्यात पोलंडच्या दुसऱ्या प्रतिस्पर्ध्याविरुद्ध १५० पैकी १५० गुण ही मी केलेली कामगिरी माझ्यासाठी स्वप्नवत होती.'

एशियाड आणि ऑलिम्पिकवर नजर

पुढील महिन्यात सुरू होणाऱ्या आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी ओजसने सरावाला सुरुवात केली आहे. या स्पर्धेतही सुवर्णपदक जिंकण्याच्या तो प्रयत्नात आहे. याव्यतिरिक्त २०२८ ला होणारे लॉस एंजलिस ऑलिम्पिक हे ओजसचे प्रमुख लक्ष्य आहे. तो म्हणतो, 'ऑलिम्पिकच्या तयारीसाठी माझ्याकडे भरपूर अवधी आहे. सरावात सातत्य ठेवून मला २०२८च्या ऑलिम्पिकमध्ये देशासाठी सुवर्ण कामगिरी करायची आहे. ऑलिम्पिकमध्ये भारताचा तिरंगा फडकावणे हे माझे स्वप्न आहे.'

स्केटिंगकडून तिरंदाजीकडे

ओजसचा इथवरचा प्रवास खूप रंजक ठरलेला आहे. लहानपणी स्केटिंगमध्ये नशीब आजमावल्यानंतर ओजस तिरंदाजीकडे वळला. याबाबत त्याने सांगितले की, 'वडील एनसीसीत स्नॅप शूटर असल्याने शूटिंगविषयी घरात सकारात्मक वातावरण होते. मला सुद्धा नेम धरून लक्ष्य भेदण्यात मजा वाटायची. यातूनच पुढे झिशान सरांच्या मार्गदर्शनात मी तिरंदाजीचे धडे गिरवायला सुरुवात केली. परिणाम असा झाला की २०१९ च्या शालेय राष्ट्रीय खेळांमध्ये मी कांस्यपदक पटकावले. त्यानंतर पदकांचा प्रवास कधी थांबला नाही.' आई-वडील, झिशान सर आणि साताऱ्याचे प्रवीण सावंत सर हे आतापर्यंत मिळवलेल्या ऐतिहासिक यशाचे खरे वाटेकरी असल्याचे ओजस प्रकर्षाने नमूद करतो.

टॅग्स :Socialसामाजिक