शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अयोध्येला जाणार, रामललाचे दर्शन घेणार, रोड शो करणार!
2
सामंतांनी मदत केली तर... रत्नागिरी-सिंधुदूर्गात राणे - ठाकरे संघर्षाचा सामना; बालेकिल्ला कोणाचा याचाही फैसला
3
भाजपा उमेदवाराच्या विरोधात आंदोलनादरम्यान शेतकऱ्याचा मृत्यू, पोलिसांनी धक्का दिल्याचा आरोप
4
मोबाईलवर मुलांशी बोलते म्हणून ओरडला, १४ वर्षांच्या मुलीने कुऱ्हाडीने मोठ्या भावाचा गळा कापला  
5
निवडणूक ‘यांची’, प्रतिष्ठा पणाला ‘त्यांची’; मुलगी, मुलगा, बहीण, सुनेसाठी करावी लागतेय अपार मेहनत
6
राज्यावर पाणीटंचाईचे संकट अधिक चिंताजनक; पाणीसाठा २८ टक्क्यांवर; २,३४४ गावांत २,९५२ टँकर्स सुरू
7
अपोफिस लघुग्रहामुळे ‘दुसरे लोणार’ नाही; दा. कृ. सोमण यांची माहिती
8
राधाकृष्ण विखे आणि मल्लिकार्जुन खर्गेंमध्ये झाली गुप्त बैठक, प्रकाश आंबेडकरांचा सनसनाटी दावा
9
पूंछमध्ये लष्करी वाहनांवर दहशतवाद्यांचा हल्ला; हवाई दलाचा जवान शहीद, ४ जखमी
10
आजचे राशीभविष्य - ५ मे २०२४, कुटुंबात सुखशांतीचे वातावरण असेल, धनप्राप्ती संभवते
11
कांदा निर्यातबंदी अखेर घेतली मागे, ६४ रुपये प्रतिकिलोने निर्यातीस मान्यता; प्रतिक्विंटल ५०० रुपयांनी वाढले दर
12
सेक्स स्कॅण्डल प्रकरणी एच. डी. रेवण्णा अटकेत; एसआयटीने घेतले ताब्यात
13
फाेडाफाेडीच्या राजकारणात काेणाची हाेणार सरशी? चार नावे जाहीर करून काँग्रेसने टाकला डाव, भाजपसह ‘आप’चे वाढले टेन्शन 
14
रायबरेलीत राहुल गांधी मोठ्या फरकाने निवडणूक हरतील : अमित शाह यांचा दावा
15
पंतप्रधान मोदी हे ‘शहेनशहा’... काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांची टीका
16
पाकला ‘शहजादा’ हवा पंतप्रधानपदी; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घणाघाती टीका
17
"आई आणि बायकोच्या राड्यात...", कुशल बद्रिकेची 'ती' पोस्ट चर्चेत
18
इंटरनेटवरून पसरणारा कट्टरतावाद धोकादायक; इंटरपोल परिषदेत भारताची ठाम भूमिका
19
पोलिसांनी मागवले राजभवनचे सीसीटीव्ही फुटेज, चाैकशी सुरू; राज्यपालांवरील लैंगिक शोषणाचे आरोप
20
गैरवापर रोखण्यासाठी ‘४९८ अ’ कायदा बदला; सर्वोच्च न्यायालयाकडून केंद्र सरकारला महत्त्वाची शिफारस 

सामाजिक संघटनेशिवाय राजकारण अशक्य 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 10, 2019 11:47 PM

आम्ही समाजाला नाही बनवत तर समाज आम्हाला बनवितो. कार्यकर्त्यांनी पुढाऱ्यांच्या इशाऱ्यावर चालू नये, असे मत मनोज बंड यांनी व्यक्त केले.

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : महावीरनगरातील सैतवाळ जैन संघटन मंडळ युवा शाखेतर्फे पर्युषण पर्वानिमित्त ‘समाजकारण व राजकारण’ या विषयावरील परिसंवादाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला प्रमुख वक्ते म्हणून अभिनंदन पळसापुरे हे उपस्थित होते. याशिवाय पुलक मंच परिवाराचे राष्ट्रीय सांस्कृतिक मंत्री मनोज बंड, करिअर मोटिव्हेटर डॉ. नरेन्द्र भुसारी, अखिल दिगंबर सैतवाळ संस्थेचे विदर्भ विभागीय सचिव राजेन्द्र नखाते, प्रशांत मानेकर उपस्थित होते.राजकारण व समाजकारण या दोन्ही एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. व्यक्तीची सुरुवात समाजसेवेपासून होते तर शेवट राजकारणाने होतो. समाजसेवेत कार्यकर्ता हा कार्यकर्ताच असतो, तो कधीच माजी कार्यकर्ता होत नाही. समाजसेवेची आवड लहानपणापासून असली पाहिजे. आपण समाजाचे पुढारी, पदाधिकारी बनलो व त्यानंतर पन्नास-शंभर कार्यकर्ते मिळाले तेव्हा त्याच्या मनात येते मी समाजाचा पुढारी झालो, आता कार्यकर्त्यांनी माझे ऐकले पाहिजे. या विचारापासून समाजात राजकारणाची सुरुवात सध्या होते आहे. आता समाजात माझी चलती राहील. आम्ही समाजाला नाही बनवत तर समाज आम्हाला बनवितो. कार्यकर्त्यांनी पुढाऱ्यांच्या इशाऱ्यावर चालू नये, असे मत मनोज बंड यांनी व्यक्त केले. जोपर्यंत सामाजिक संघटन मजबूत नसेल तोपर्यंत राजकारणावर कोणताही फरक पडणार नाही. समाजाने आपला पुढारी निवडल्यावर त्याला संघटित होऊन पूर्ण सहकार्य केले तर तो राजकारणात प्रभावी कार्य करू शकतो. सामाजिक संघटनेशिवाय राजकारण होऊ शकत नाही, असे प्रतिपादन अभिनंदन पळसापुरे यांनी केले. डॉ. नरेन्द्र भुसारी, राजेन्द्र नखाते, प्रशांत मानेकर यांनीही आपले मत मांडले. कार्यक्रमाचे संचालन नीरज पळसापुरे यांनी तर सिद्धांत नखाते यांनी आभार मानले. कार्यक्रमाला सैतवाळ जैन संघटन मंडळाचे अध्यक्ष चंद्रकांत वेखंडे, प्रकाश मारवडकर, सुभाष मचाले, विनय बंड, प्रशांत सवाने, श्रीकांत मानेकर, विशाल चानेकर, रमेश तुपकर, शरद वेखंडे, धीरज बंड, संयम भुसारी, निखील पळसापुरे, अभिषेक बंड, चैतन्य महाजन उपस्थित होते.

टॅग्स :SocialसामाजिकPoliticsराजकारण