शहरं
Join us  
Trending Stories
1
काहीही होवो, सरकार शेतकरी कर्जमाफी करणारच : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
2
आजचे राशीभविष्य, ०८ डिसेंबर २०२५: आपण केलेल्या कामातून यश अन् कीर्ती लाभ होईल
3
इंडिगोवर मोठा आर्थिक दंड लावा; डीजीसीए आणि कंपनीच्या प्रमुखांना हटवा
4
यंदा अनावश्यक गर्दी टाळणार, आजपासून हिवाळी अधिवेशन, प्रशासन सज्ज : सभापती, उपसभापतींनी घेतला आढावा
5
देशातील सर्वांत मोठी एअरलाइन का डगमगली?; नवीन नियमांमुळे संकट! कमी कर्मचारी मॉडेलचाही फटका
6
विमानसेवाच जमीनदोस्त ! अनेक विमानतळांवर गोंधळ सुरू, प्रवाशांचे हाल
7
विरोधी पक्षनेतेपद मुद्यावरून सत्ताधारी-विरोधक आमनेसामने; ‘मविआ’ला खुर्चीचीच चिंता असल्याची सरकारची टीका
8
महाराष्ट्रात लवकरच येणार ‘मेडिकल व्हॅल्यू टुरिझम’ योजना, सार्वजनिक आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांची माहिती
9
विमानतळावर इंडिगोने स्थापन केला आपत्ती व्यवस्थापन गट; अडथळ्यांबाबत २४ तासांत स्पष्टीकरण देण्याची नोटीस
10
क्रिकेटपटू स्मृती मानधना अन् पलाशचे लग्न अखेर माेडले; कुटुंबांच्या गोपनीयतेचा आदर करा : स्मृती
11
...ये दोस्ती हम नही तोडेंगे ! मोदी आणि पुतीन यांच्या भेटीकडे अमेरिका, युरोप आणि चीनचेही होते लक्ष
12
आजी-आजोबांच्या ‘स्क्रीन’च्या ‘व्यसनां’चं काय करणार?
13
गोव्यात नाइट क्लब ठरला ‘मृत्यू क्लब’; अग्नितांडवात २५ ठार; सुरक्षेवर प्रश्नचिन्ह
14
गोवा नाइट क्लबमध्ये कशामुळे भडकली आग? 25 जणांच्या मृत्यूला कोण जबाबदार? CM सावंत यांचा मोठा खुलासा, 4 जणांना अटक
15
Bigg Boss 19: गौरव खन्नाने करुन दाखवलं! 'बिग बॉस १९'च्या ट्रॉफीवर कोरलं नाव
16
गोवा क्लबला दोन एक्झिट गेट, बाहेर पडण्यासाठी धडपडत होते लोक; यामुळे झपाट्याने पसरली आग
17
नाईट क्लब पाडण्याचे आदेश रद्द करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई; गोव्यातील दुर्घटनेनंतर पंचायत संचालकासह तिघे निलंबित
18
'बिग बॉस १९'मधून तान्या मित्तलचा प्रवास संपला; प्रणित मोरेची टॉप ३ मध्ये एन्ट्री, ट्रॉफी जिंकणार?
19
"उद्धव ठाकरे इंडिगोने फिरत नाहीत"; CM फडणवीसांचा खोचक टोला; म्हणाले,"अडचण असल्यास गाडी पाठवून देतो!"
20
मुंढवा जमीन व्यवहार प्रकरण: शीतल तेजवानीनंतर रवींद्र तारूला अटक, घरातून घेतलं ताब्यात
Daily Top 2Weekly Top 5

विरोधी पक्षनेतेपद मुद्यावरून सत्ताधारी-विरोधक आमनेसामने; ‘मविआ’ला खुर्चीचीच चिंता असल्याची सरकारची टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 8, 2025 05:43 IST

अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला विरोधी पक्षाची बैठक विधिमंडळातील काँग्रेस पक्ष कार्यालयात झाली.

कमलेश वानखेडे/योगेश पांडे

नागपूर : विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात प्रथमच दोन्ही सभागृहात विरोधी पक्षनेतेपद नसताना त्याच मुद्द्यावरून राजकारण तापले आहे. अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला विरोधकांनी सरकारच्या चहापानावर बहिष्कार टाकत, कायद्यात नसतानाही दोन उपमुख्यमंत्री आहेत, मग दोन्ही सभागृहात विरोधी पक्षनेते का नाहीत असा सवाल केला. तर विरोधी पक्षनेते ठरविण्याचा अधिकार विधानपरिषद सभापती व विधानसभा अध्यक्षांचा असून त्यांचा निर्णय आम्हाला मान्य असेल असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. जनतेच्या प्रश्नांपेक्षा विरोधी पक्षनेत्याच्या खुर्चीचीच मविआला चिंता असल्याचा चिमटा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काढला.

अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला विरोधी पक्षाची बैठक विधिमंडळातील काँग्रेस पक्ष कार्यालयात झाली. यानंतर काँग्रेसचे गटनेते विजय वडेट्टीवार, उद्धवसेनेचे नेते भास्कर जाधव यांच्यासह प्रमुख नेत्यांनी पत्रकार परिषद घेत सरकार संवैधानिक मूल्यांचे पालन करण्यास तयार नसल्याचा आरोप केला. घटनेत किंवा विधिमंडळ नियमावलीत उपमुख्यमंत्रिपदाची तरतूद नसतानाही केवळ राजकीय सोयीसाठी राज्यात दोन उपमुख्यमंत्री नेमण्यात आले. मात्र, संवैधानिक पद असतानाही दोन्ही सभागृहातील विरोधी पक्षनेतेपद रिक्त ठेवले जात आहे. त्यांची नियुक्ती का केली जात नाही, असा सवाल काँग्रेसचे गटनेते वडेट्टीवार व जाधव यांनी सरकारला केला. हे सरकार संविधानावर अविश्वास दाखवत असल्यामुळे सरकारच्या चहापानावर बहिष्कार टाकत असल्याचे त्यांनी सांगितले.

यावर मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांनी विरोधकांना प्रत्युत्तर दिले. विरोधी पक्ष दिशाहीन झाला आहे व त्यांच्यात मुद्दे रेटून नेण्याची मानसिकताच नाही. विरोधी पक्षनेतेपदाबाबत विधानपरिषद सभापती व विधानसभा अध्यक्ष जो निर्णय घेतील तो आम्हाला मान्य असेल. कुणाबाबतही आमचा आग्रह किंवा दुराग्रह नाही असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. तर आमचा अजेंडा हा कुठलीही खुर्ची नाही.

विरोधक आता उपमुख्यमंत्रिपदावरून प्रश्न उपस्थित करत आहे. मग त्यांच्या कार्यकाळात हेच पद असंवैधानिक नव्हते का असा सवाल एकनाथ शिंदे यांनी केला.

विरोधकांची टीका

पाशवी बहुमताच्या भरवशावर सरकार मुजोर झाले आहे. सरकारचे मंत्री त्यांच्या खात्याचे कंत्राटदार झाले आहेत.

कर्जमाफीची तारीख पे तारीख सुरू.

विरोधी पक्षातील आमदारांच्या मतदारसंघात सरकारने कुठलाही निधी दिलेला नाही. कंत्राटदारासाठी विदर्भ सिंचनाचा निधी पळविला

सरकारचे प्रत्युत्तर

विरोधकांनी २०१४ च्या अगोदरचा

व नंतरच्या विदर्भाची तुलना करावी.

विरोधकांचा संविधान व संवैधानिक संस्थांवर विश्वास नाही.

विरोधकांना जनतेच्या मुद्द्यांपेक्षा विधिमंडळात पायऱ्यांवर आंदोलन करण्यात स्वारस्य

अगोदर पूर्ण वेळ अधिवेशनात या, मग सरकारविरोधात बोला.

आचारसंहितेमुळे अधिवेशनाचा कालावधी कमी, काम दुप्पट होणार.

योग्य वेळी निर्णय घेऊ

विधानपरिषदेचे सभापती राम शिंदे यांनी या मुद्द्यावर भाष्य केले. विरोधी पक्षनेत्याच्या नियुक्तीबाबत प्रस्ताव सादर करण्यात आला आहे. ताे प्रलंबित असून योग्यवेळी या प्रस्तावावर निर्णय घेण्यात येईल, असे त्यांनी स्पष्ट केले.

टॅग्स :Winter Session Maharashtraविधानसभा हिवाळी अधिवेशनnagpurनागपूर