शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs PAK Asia Cup Final : दुबईत विजयाचा जल्लोष झाला; पण टीम इंडियानं बहिष्कारानं केला शेवट; नेमकं काय घडलं?
2
IND vs PAK: आधी 'सिंदूर', आता विजय 'तिलक'! भारताने आशिया कप जिंकला, पाकिस्तान पराभूत
3
IND v PAK: हिंदुस्थान झिंदाबाद! भारत जिंकल्यावर काश्मीरमध्ये लष्करी जवान, नागरिकांचा जल्लोष
4
IND vs PAK: "खेळाच्या मैदानात 'ऑपरेशन सिंदूर' आणि..."; पंतप्रधान मोदींनी पाकिस्तानला डिवचलं
5
IND vs PAK : सिक्सर मारला तिलक वर्मानं अन् चर्चा गौतम गंभीरची; ड्रेसिंग रुममधील व्हिडिओ व्हायरल
6
IND vs PAK Final : अडचणीत आणणाऱ्या पाकला नडला! तिलक वर्माची कडक फिफ्टी!
7
VIDEO: हिशेब चुकता... हॅरिस रौफची दांडी गुल केल्यावर जसप्रीत बुमराहचं 'मिसाईल' सेलिब्रेशन
8
Suryakumar Yadav Out Or Not Out : सूर्याचा कॅच नीट पकडला की, पाक कॅप्टनकडून चिटींग? (VIDEO)
9
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या बाल व शिशू स्वयंसेवकांचा विजयादशमी उत्सव उत्साहात संपन्न
10
सांगलीत चारित्र्याच्या संशयातून पत्नीची गळा चिरून हत्या, मग पती स्वत:हून पोलिस ठाण्यात हजर
11
खेड: भीमा नदीपात्रात कार बुडून एकाचा मृत्यू; पाण्याचा अंदाज न आल्याने घटना घडल्याचा अंदाज
12
IND vs PAK Final : कुलदीपची कमाल! ओव्हर हॅटट्रिकसह मारला 'चौकार'; जोमात सुरुवात करून पाक कोमात
13
कर्तव्यनिष्ठ! वडिलांचे अंत्यसंस्कार झाले, दुसऱ्याच दिवशी धाराशिवचे 'सीईओ' मदतीसाठी बांधावर धावले!
14
तुमच्या कॅप्टनचं तुम्ही बघा, आमच्याच आम्ही बघतो! IND vs PAK Final मध्ये टॉस वेळी काय घडलं? (VIDEO)
15
“नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना महायुती सरकारने तत्काळ भरीव मदत द्यावी, अन्यथा...”: हर्षवर्धन सपकाळ
16
युवराज, उथप्पा, रैनाची मालमत्ता ED जप्त करणार? मनी लॉड्रिंग प्रकरणात आली महत्त्वाची अपडेट
17
“पाक लिंक खोटी, जेलमध्ये भेटायला दिले नाही, ते गांधीवादी...”; सोनम वांगचूकच्या पत्नीचा दावा
18
रेल्वे इंजिनमध्ये आता टँकरने डिझेल भरता येणार; शेडमध्ये जाण्याची गरज भासणार नाही!
19
जळगावमध्ये माजी महापौरांच्या फार्म हाऊसवर सुरू होतं धक्कादायक काम, पोलिसांची धाड, ८ जण अटकेत
20
IND vs PAK Final, Asia Cup 2025 : सूर्यानं टॉस जिंकला; हार्दिक पांड्या 'आउट'! रिंकूला संधी; कारण...

Winter Session Maharashtra : माझ्यावरचे आरोप खोटे, मात्र कोर्ट देईल ती...; जमीन घोटाळ्यावर मंत्री अब्दुल सत्तारांनी दिले स्पष्टीकरण

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 28, 2022 15:13 IST

नागपुरात गेल्या आठ दिवसापासून हिवाळी अधिवेशन सुरू आहे. शिंदे -फडणवीस सरकारमधील कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांच्यावर जमीन घोटाळ्याचा आरोप विरोधी पक्षांनी केला आहे.

नागपुरात गेल्या आठ दिवसापासून हिवाळी अधिवेशन सुरू आहे. शिंदे -फडणवीस सरकारमधील कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांच्यावर जमीन घोटाळ्याचा आरोप विरोधी पक्षांनी केला आहे. यावरुन सत्तार यांच्या मंत्रीपदाच्या राजीनाम्याची मागणी विरोधकांनी केली, या घोटाळ्या प्रकरणी मंत्री अब्दुल सत्तार यांनी आज सभागृहात स्पष्टीकरण दिले. 

'गायरान जमीनीचे नियमानुसारच वाटप केले आहे. माझ्यावरचे आरोप खोटो आहेत. आदिवासी लोकांना मी न्याय दिला आहे. या प्रकरणात मी जर दोषी असेल तर मला कोर्ट जी शिक्षा देईल ती मला मान्य आहे, असं स्पष्टीकरण कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांनी दिले. 

मी या जमीनीचा निर्णय घेतला, आदिवासी, मागासवर्गीय गरीब लोकांना मी न्याय देण्यासाठी प्रयत्न केला आहे. विरोधी बाकावरील लोक ज्या पद्धतीने आरोप करत आहेत, त्यामध्ये कोणतेही तथ्य नाही. यापुढे जाऊन सांगायचे तर विरोधी बाकावर बसलेल्या लोकांनी मोठ्या प्रमाणात जमीनी हडप केल्या आहेत. याचा आपण अंदाज लावू शकत नाही, असंही अब्दुल सत्तार म्हणाले. 

अब्दुल सत्तार अडचणीत, गायरान जमिनीच्या वाटपावरून अजित पवारांचे गंभीर आरोप, राजीनाम्याची केली मागणी 

'ज्या व्यक्तीला जमीन गेली आहे, त्या व्यक्तीने सर्व पुरावे दिले आहेत. त्या व्यक्तीने १९४६, १९४७ चा पेरणी जमीन असल्याचा पुरावा महसूल खात्याचा दाखल केला होता. या पुराव्यावरुन ही जमीन देण्यात आली असल्याचे मंत्री अब्दुल सत्तार म्हणाले. 

मंत्री अब्दुल सत्तार यांच्यावर काय आहेत आरोप? 

शिंदे सरकारमधील कृषिमंत्री आणि आधीच्या सरकारमधील महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांच्यावर विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी गंभीर आरोप केले. अजितदादा म्हणाले की, तत्कालिन महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी गायरान जमिनी वाटप करण्याचा निर्णय घेतला. हा निर्णय सर्व कायदेशीर बाबींचं उल्लंघन करणारा होता. या प्रकरणातील याचिकेच्या सुनावणीदरम्यान उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने गंभीर निरीक्षण नोंदवलं. तसेच तत्कालिन महसूल राज्यमंत्र्यांविरोधात प्रथमदर्शनी सबळ पुरावे उपलब्ध आहेत. जिल्हा कोर्टाचा आदेश माहिती असतानाही महसूल राज्यमंत्र्यांनी हा निर्णय घेतला, असा दावा अजित पवार यांनी केला.

ते पुढे म्हणाले की, महसूलमंत्र्यांच्या अखत्यारित येणाऱ्या जिल्हाधिकाऱ्यांना  महसूल राज्यमंत्र्यांनी घेतलेला निर्णय अवैध वाटल्याने जिल्हाधिकाऱ्यांनी महसूलच्या अतिरिक्त मुख्य सचिवांना पत्र लिहिलं. तोपर्यंत राज्यात सत्तांतर होऊन हे शिंदे सरकार सत्तेवर आलं होतं. या पत्रातून वादग्रस्त आदेशाची अंमलजबाणी केल्यास सुप्रिम कोर्टाचा अनादर होईल, असं जिल्हाधिकाऱ्यांनी कळवलं होत. तसेच योग्य दिशानिर्देश देण्याची मागणी केली होती. मात्र माझ्या माहितीप्रमाणे या पत्रावर अद्यापपर्यंत शासनाने कोणतीही कारवाई केलेली नाही. ही जमीन ३७ एकर असून, त्याची दिडशे कोटी रुपये एवढी किंमत आहे. ही वाशिमला लागून आहे. या प्रकरणात महसूल राज्यमंत्र्यांनी पदाचा दुरुपयोग केला आहे.  

टॅग्स :Winter Session Maharashtraविधानसभा हिवाळी अधिवेशनAbdul Sattarअब्दुल सत्तारAjit Pawarअजित पवारEknath Shindeएकनाथ शिंदे