शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईकरांनो काळजी घ्या! पुढील २४ तासांसाठी पावसाचा रेडअलर्ट, हवामान खात्याचा इशारा
2
आता खामेनेईचा खात्मा करणारच..: हॉस्पिटलवरील हल्ल्यानंतर इस्त्रायलचे खुले चॅलेंज
3
इराणच्या हल्ल्यात इस्त्रायली एअर डिफेन्स फेल; मित्राची झाली आठवण, भारताला आला कॉल, आता...
4
जगाला हादरवणारी बातमी! इराणने इस्रायलचा शेअर बाजार उडवला; तुमच्या गुंतवणुकीवर काय परिणाम होणार?
5
Rain Update: रायगडमधील तीन नद्यांनी ओलांडली धोक्याची पातळी, तीन पर्यटन ठिकाणी जाण्यास बंदी
6
...तर अमेरिका किम जोंग उन यांच्या देशावर अणुबॉम्ब टाकेल; यांनी केला मोठा दावा
7
₹८,००० कोटींची गुंतवणूक... अंबानींनी केली Coca-Cola आणि Pepsi ला टक्कर देण्याची तयारी; काय आहे प्लान?
8
मुंबई, रायगड, रत्नागिरी जिल्ह्यासह पुणे घाट, सातारा घाट परिसरात 24 तासांसाठी ऑरेंज अलर्ट
9
धक्कादायक! "लग्न ठरल्यानंतर सोनम दिवसातून फक्त..."; राजा रघुवंशीच्या मित्राचा मोठा खुलासा
10
बसच्या तिकिटामुळे हत्या उघडकीस आली! पाच वर्षाचे रिलेशन, लग्नाची इच्छा, घडलं वेगळंच
11
६ ग्रहांचे जुलैमध्ये गोचर: १० राशी मालामाल, इच्छापूर्ती काळ; अचानक पैसे मिळतील, चांगले घडेल!
12
Video: इलॉन मस्क यांना मोठा धक्का; प्रक्षेपणादरम्यान SpaceX च्या स्टारशिप रॉकेटमध्ये स्फोट
13
Air India Plane Crash: 'असं वाटलं पाकिस्ताननेच मिसाईल हल्ला केला, चार मित्र गमावले'; अपघातातून वाचलेल्या केशवने सांगितला थरार
14
ठाकरेंसोबत रात्रीतून खेळ झाला! काल मातोश्रीवर आलेले 'ते' दोन नेते आज शिंदेंच्या शिवसेनेत
15
लीड्स टेस्टपूर्वीच टीम इंडियाला मोठा झटका, 259 धावा करणाऱ्या 'या' क्रिकेटरला दुखापत! नेमकं काय घडलं? आता कशी असेल प्लेइंग 11?
16
Ashadhi Ekadashi 2025: संत नामदेवांनी पांडुरंगाच्या आरतीत उल्लेखलेली 'राही' नेमकी कोण?
17
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी राहुल गांधी यांना वाढदिवसानिमित्त दिल्या खास शुभेच्छा, म्हणाले...
18
Shree Swami Samarth: एक पैशाचा खर्च नाही, ‘हा’ उपाय एकदा करून पाहा; स्वामी कायम पाठीशी असतील, अशक्यही शक्य होईल!
19
चालत्या रिक्षात अचानक झाला स्फोट; आगीत महिला प्रवासी जिवंत जळाली, ५ जण जखमी
20
Air India Plane Crash Insurance Claim : अहमदाबाद विमान अपघात: Air India ४,०८० कोटी रुपयांचा 'इन्श्युरन्स क्लेम' करणार, इतिहासातील सर्वाधिक आकडा ठरणार?

‘मुद्रा’ योजनेच्या आकड्यांचा सरकारकडूनच खेळखंडोबा?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 27, 2019 10:19 IST

मुद्रा बँक योजनेंतर्गत वर्षभरात ऋणखात्यांची संख्या व वाटप झालेल्या ऋणासंदर्भात वेगवेगळी माहिती देण्यात आली आहे. त्यामुळे सरकारी पातळीवर आकडेवारीचा खेळ झाला आहे की काय, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

ठळक मुद्देएकाच वर्षाच्या ऋणखात्यांबाबत वेगळी आकडेवारी ऋणखात्यांचा नेमक्या संख्येबाबत प्रश्नचिन्ह

योगेश पांडे ।लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : देशातील असंघटित लघु उद्योगांच्या विकासाकरिता वित्तीय गरजा पूर्ण करण्यासाठी भारत सरकारने मुद्रा बँक योजनेची सुरुवात केली. परंतु बराच गाजावाजा करून सुरू झालेल्या या योजनेबाबत आता सरकारकडूनच विसंगत माहिती देण्यात आली आहे. या योजनेंतर्गत वर्षभरात ऋणखात्यांची संख्या व वाटप झालेल्या ऋणासंदर्भात वेगवेगळी माहिती देण्यात आली आहे. त्यामुळे सरकारी पातळीवर आकडेवारीचा खेळ झाला आहे की काय, असा प्रश्न उपस्थित होत आहे. ‘मायक्रो युनिट्स डेव्हलमेंट अ‍ॅन्ड रिफायनान्स एजंसी लिमिटेड’कडून एकाच विषयाशी संबंधित दोन माहिती अधिकारांमध्ये वेगवेगळी माहिती देण्यात आल्याने, ही बाब समोर आली आहे.उपराजधानीतील माहिती अधिकार कार्यकर्ते अभय कोलारकर यांनी माहितीच्या अधिकारांतर्गत रिझर्व्ह बँक आॅफ इंडियाकडे विचारणा केली होती. २०१८-१९ या कालावधीत किती लाभार्थ्यांना मुद्रा योजनेंतर्गत किती कर्ज खाती उघडण्यात आली, वितरित कर्जाचा आकडा किती होता तसेच किती रक्कम ‘एनपीए’मध्ये आली आहे, इत्यादी प्रश्न त्यांनी विचारले होते.‘मुद्रा’तर्फे १९ आॅगस्ट २०१९ रोजी प्राप्त झालेल्या अधिकृत माहितीनुसार, एप्रिल २०१८ ते मार्च २०१९ मध्ये १ कोटी ४४ लाख ५५ हजार ७१२ ‘मुद्रा’ ऋण खाती उघडण्यात आली व ६९,८९४.०८ कोटींचे ऋण वितरित करण्यात आले.परंतु ‘मुद्रा’तर्फे ११ मार्च २०१९ रोजीदेखील एका माहितीच्या अधिकारांतर्गत एप्रिल २०१८ ते डिसेंबर २०१८ या आठ महिन्यांच्या कालावधीतील आकडेवारी देण्यात आली होती. यानुसार त्या आठ महिन्यांत ऋणांची संख्या ३ कोटी ६ लाख १४ हजार १२८ इतकी होती व ऋणखातेधारकांना १,५४,९१८.५९ कोटींचे कर्ज वितरित करण्यात आले.वरील आकडेवारीनुसार एकूण ऋणखाती तसेच वाटप करण्यात आलेल्या ऋणनिधीची वर्षभराची आकडेवारी ही आठ महिन्यांच्या आकड्यांपेक्षा कमी दिसून येत आहे. वाटप केलेल्या कर्जाचा आकडादेखील कसा काय घटला, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

‘एनपीए’चा आकडा १७ हजार कोटींहून अधिकदरम्यान, २०१५ पासून अनेक कर्जदारांनी मिळालेल्या कर्जाची परतफेड करण्यास टाळाटाळ केली आहे. बँकांकडून वारंवार पाठपुरावा करूनही त्यास दाद न दिल्याने ही कर्जखाती 'एनपीए' करण्यात आली आहे. ३१ मार्च २०१९ अखेर या योजनेअंतर्गत ‘एनपीए’ खात्यांची संख्या ही ३६ लाख ९६ हजार १९ इतकी होती व ‘एनपीए’ची रक्कम ही १७ हजार ७१२ कोटी ६३ लाख इतकी होती.

काय आहे ‘मुद्रा’ योजना ?भारतीय रोजगार क्षेत्रात मोठ्या संख्येने सामावून घेतलेल्या लघुउद्योगांना आर्थिक साहाय्य पुरविणे हा मुद्रा कर्ज योजनेचा उद्देश आहे. या योजनेअंतर्गत शिशू, किशोर आणि तरुण अशा तीन टप्प्यांत कर्ज दिले जाते. शिशू योजनेंतर्गत ५० हजार, किशोर योजनेंतर्गत पाच लाख तर तरुण योजनेंतर्गत उद्योजकांना १० लाखांपर्यंतचे कर्ज मिळते.

टॅग्स :Governmentसरकार