शहरं
Join us  
Trending Stories
1
उत्तर प्रदेशमध्ये मतदार यादीतून तब्बल २.८९ कोटी लोकांची नावं वगळणार, SIRबाबत धक्कादायक माहिती समोर 
2
‘सर्व भारतीयांना अमेरिकेतून बाहेर काढा, अन्यथा…’, अमेरिकन पत्रकाराचं वादग्रस्त विधान   
3
पळवा पळवी! पंतप्रधान मोदींच्या कार्यक्रमानंतर लोकांनी कुंड्या, होर्डिंग आणि पुतळे पळवले   
4
स्वबळावर लढणाऱ्या काँग्रेसला ठाकरेंकडून मोठा धक्का, माजी नगरसेवक चंगेज मुलतानी उद्धवसेनेत
5
IND W vs SL W T20I : शफालीची वादळी खेळी! विजयी हॅटट्रिकसह टीम इंडियाचा मालिकेवर कब्जा; हरमनप्रीतनंही रचला इतिहास
6
"भाजपचे लोक हुशार, विरोधकांना सतत होमवर्क देतात", 'धुरंधर'चं नाव घेत कुमार विश्वास यांचा टोला
7
सीरियामध्ये मोठा हल्ला! नमाज पठणादरम्यान मशिदीत स्फोट, ८ जणांचा मृत्यू, १८ जण जखमी
8
IND W vs SL W : पहिल्या ओव्हरमध्ये धुलाई; मग रेणुकानं असा काढला राग! शेवटी 'चार चौघीं'वर पडली भारी
9
‘निष्ठावंतांना उमेदवारी न दिल्यास ते ज्या पक्षात जातील त्याचा प्रचार करणार’, भाजपाच्या ज्येष्ठ आमदाराचा इशारा
10
छत्रपती संभाजीनगरात एमआयएममध्ये 'राडा'; अधिकृत उमेदवारावर पक्ष कार्यकर्त्यांचाच हल्ला!
11
"भाजपाच्या पाठिंब्याशिवाय शिंदेसेना जिंकू शकत नाही"; मीरा-भाईंदरमध्ये महायुतीसाठी अटीशर्ती
12
लेडी DSP दीप्ती शर्मानं रचला इतिहास! असा पराक्रम करणारी ठरली पहिली भारतीय गोलंदाज
13
Ishan Kishan ने ठोकली सलग दोन शतकं, तरीही संघातून बाहेर; BCCIच्या आदेशानंतर घरी का परतला?
14
दिल्लीकडून खेळताना किंग कोहलीची ‘विराट’ कामगिरी! नव्या विश्वविक्रमासह ऑस्ट्रेलियन दिग्गजाला धोबीपछाड
15
"धर्म आणि विज्ञान यांच्यात कुठलाही संघर्ष नाही; दोघांचेही ध्येय एकच...!" नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
16
पित्याला मृत्युच्या दाढेतून ओढलं, थेट मगरीशी भिडला, चिमुकल्या अजयराजच्या शौर्याची कहाणी!
17
पुतण्यानेच रचला चुलत्याच्या हत्येचा कट; पराभवाचा बदला घेण्यासाठी मंगेश काळोखेंची हत्या, तटकरेंच्या निकटवर्तीयावरही गुन्हा दाखल
18
"कितीही अडथळे आले तरी परत आणणारच"; मोदी-माल्यांच्या लंडनमधील ‘त्या’ मस्करीला भारताचं चोख प्रत्युत्तर
19
"लोकं अडकून पडलेत, मुलांचं शिक्षण रखडलंय"; H1B व्हिसा मुद्द्यावर भारताची अमेरिकेशी चर्चा
20
जावळ काढण्याच्या प्रथेत आईचेही बळजबरीने मुंडन; दौंडमधील महिलांची राज्य महिला आयोगाकडे तक्रार
Daily Top 2Weekly Top 5

आदिवासींच्या मृत्यूनंतर मिळेल का खावटी ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 17, 2021 04:06 IST

नागपूर : राज्यात कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊनमुळे कामे बंद असल्याने अनुसूचित जमातीच्या कुटुंबीयांसमोर उद्भवलेल्या बेरोजगारीचा प्रश्न विचारात घेऊन आदिवासी ...

नागपूर : राज्यात कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊनमुळे कामे बंद असल्याने अनुसूचित जमातीच्या कुटुंबीयांसमोर उद्भवलेल्या बेरोजगारीचा प्रश्न विचारात घेऊन आदिवासी मंत्र्यांनी १ मे २०२० रोजी खावटी? योजनेची घोषणा केली. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत ऑगस्ट २०२० मध्ये त्याला मान्यता देण्यात आली. पहिली लाट संपून आता दुसरी लाट आली आहे. पुन्हा लॉकडाऊनची वेळ सरकारवर आली आहे. मात्र अजूनही खावटी? आदिवासींच्या पदरात पडली नाही. मृत्यूनंतर मिळेल का खावटी? असा संतप्त सवाल आदिवासी बांधव करीत आहे.

योजनेंतर्गत आदिवासी बांधवांना ४ हजार रुपये रकमेचा लाभ देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यापैकी २००० रुपये रकमेचा लाभ रोख स्वरुपात तर २००० रुपयांचा लाभ खाद्य वस्तू स्वरुपात देण्यात येणार होता. त्यासाठी २३१ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली होती. खावटीच्या अनुषंगाने सर्वेक्षणाची प्रक्रिया आदिवासी विभागाने पार पाडली. लाभार्थ्यांच्या याद्या जाहीर झाल्या. त्यांच्याकडून कागदपत्रांची पूर्तता करवून घेण्यात आली. मात्र खावटी काही पोहचली नाही.

कोरोनाच्या पहिल्या लाटेपेक्षा दुसरी लाट आणखी भीषण आहे. सरकारने पुन्हा लॉकडाऊन लावला आहे. पुन्हा उद्योग, व्यवसाय बंद करण्यात आले आहे. ग्रामीण भागात कोरोनाचे संक्रमण दिवसेंदिवस वाढत आहे. पुन्हा एकदा आदिवासी युवक बेरोजगारीच्या उंबरठ्यावर उभा आहे. अशात या तोकड्या मदतीचीही पूर्तता होत नसेल, तर काय अर्थ.

- कागदी खेळात अडकलेली खावटी

कागदी खेळ आणि टक्केवारीत अडकलेली खावटी योजनेचा लाभ आतापर्यंत आदिवासींना मिळाला नाही. खावटी योजनेची फसवी घोषणा करून आदिवासींच्या तोंडाला पाने पुसली आहे.

- आदिवासी मंत्र्यांनी केलेल्या घोषणेला एक वर्ष पूर्ण होण्यास १५ दिवस शिल्लक असताना व कोरोनाची दुसरी लाट भयानक रूप घेत आहे. अद्याप लाभार्थी यादी पूर्ण झाली नाही, बँक डिटेल प्राप्त नाही, अनेक कुटुंबाकडे जातीचे दाखले, बँक खाते नाही त्यामुळे ३ महिने लाभ देणे शक्य नाही. २००० रुपयांचे धान्य देण्याचे ठरले पण अद्याप निविदा प्रक्रिया पूर्ण नाही, आता २००० रुपयाची घोषणा केली पण जुनीच तरतूद पूर्ण झाली नाही, मग नवीन मदत आदिवासींच्या मृत्यू नंतर मिळेल का? त्यामुळे ही घोषणा म्हणजे निव्वळ फसवणूक आहे.

दिनेश शेराम, अध्यक्ष, अखिल भारतीय आदिवासी विकास परिषद