शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
5
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
6
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
7
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
8
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
9
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
10
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
11
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
12
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
13
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
14
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
15
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
16
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
17
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
18
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
19
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
20
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?

उष्माघाताने मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत देण्याची मागणी करणार : नाना पटोले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 20, 2022 12:29 IST

सरकारने ही वास्तविकता स्वीकारून पीडितांच्या कुटुंबीयांना नैसर्गिक आपत्ती निकषानुसार भरपाई देण्यासाठी धोरण तयार करावे, अशी मागणीही पटोले यांनी केली आहे.

ठळक मुद्देनागपुरात उष्माघाताने ३५ मृत्यू

नागपूर : उपराजाधीन सूर्य आग ओकत आहे. वाढत्या तापमानामुळे नागपूरकर त्रस्त आहेत. उष्माघाताने नागरिकांचे जीव जात आहेत. आता काँग्रेसने याला राजकीय मुद्दा करण्याची तयारी चालवली आहे. नागपुरात उष्माघाताने ३५ जणांचा मृत्यू झाला, असा दावा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला आहे. ही एकप्रकारे नैसर्गिक आपत्तीच आहे. सरकारने ही वास्तविकता स्वीकारून पीडितांच्या कुटुंबीयांना नैसर्गिक आपत्ती निकषानुसार भरपाई देण्यासाठी धोरण तयार करावे, अशी मागणीही पटोले यांनी केली आहे.

लोकमतशी चर्चा करताना पटोले म्हणाले, अतिवृष्टीने मृत्यू झाल्यास सरकार भरपाई देते. मात्र, उष्माघाताने मृत्यू झाल्यास भरपाई देण्यासाठी सरकारने कुठलेही नियम तयार केलेले नाहीत. उष्माघात ही सुद्धा नैसर्गिक आपत्तीच आहे. ऊन तापतेय म्हणून कुणी घरात बसू शकत नाही. उपजीविकेसाठी बाहेर पडून काम करावेच लागते. सरकारने या संदर्भात एक धोरण तयार करण्याची गरज आहे. आपण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन उष्माघाताने मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत देण्याची मागणी करू, असेही पटोले यांनी सांगितले.

पटोले म्हणाले, नागपुरात एकाच दिवशी उष्माघाताने १७ जणांचा मृत्यू झाला. चंद्रपुरात शेकडो पक्ष्यां जीव गेला. ही आकडेवारी धक्कादायक आहे. असे असले तरी बाधितांना मदत मिळत नाही. सरकारने यावर गांभीर्याने विचार करायला हवा. काँग्रेसचे पदाधिकारी उष्माघाताने झालेल्या मृत्यूची आकडेवारी गोळा करीत असून, आपण हा मुद्दा लावून धरणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. तर, महापालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लोकमतशी बोलताना सांगितले की, त्यांच्याकडे उष्माघाताने झालेल्या मृत्यूची आकडेवारी नाही.

१७ प्रकरणे आली, ७ रद्द, ६ प्रलंबित

- महापालिकेच्या हीट ॲक्शन प्लॅनचे अध्यक्ष डॉ. विजय जोशी म्हणाले, यावर्षी उष्माघाताने मृत्यू झाल्याची शक्यता असल्याची १३ प्रकरणे समोर आली. जिल्हा शल्य चिकित्सकांच्या अध्यक्षतेखालील समितीसमोर ही प्रकरणे ठेवण्यात आली. समितीने सात प्रकरणे रद्द केली, तर ६ प्रकरणांचा शवविच्छेदन अहवाल प्राप्त न झाल्यामुळे प्रलंबित आहेत. गेल्या दोन वर्षांत कोरोनामुळे महापालिकेला यासंदर्भात पावले उचलण्यास अडचण आली.

टॅग्स :PoliticsराजकारणNana Patoleनाना पटोलेHeat Strokeउष्माघातDeathमृत्यू