शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local: तांत्रिक बिघाडामुळे हार्बर लाईन ठप्प; केवळ सीएसएमटी ते वाशीपर्यंतच लोकल सुरु, ट्रान्स हार्बरवही परिणाम
2
११ वर्षांच्या कार्यकाळात भारत बनला सर्वाधिक वेगाने वाढलेली अर्थव्यवस्था
3
गाडी वापरणं आता महागणार! थर्ड पार्टी इन्शुरन्समध्ये मोठी वाढ करण्याची तयारी, किती वाढेल खर्च?
4
निकोलस पूरनचा अवघ्या २९व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम, तडकाफडकी निवृत्तीची घोषणा
5
"माझ्या मृत्यूच्या गोष्टी करणाऱ्यांनो.."; अमिताभ बच्चन यांनी नेटकऱ्याला सुनावलं, नंतर ट्वीट केलं डिलीट
6
Navi Mumbai Crime: नवी मुंबईतील भयंकर घटना! पत्नीवर चाकूनं सपासप वार करून पतीची आत्महत्या
7
पाव्हणं जेवला काय...! गौतमी पाटीलसोबत सरु आजींनीही धरला ठेका, पाहा भन्नाट डान्स स्टेप्स
8
लिव्हर कॅन्सरवरील सर्जरीनंतर दीपिका पहिल्यांदाच आली समोर, सांगितला वेदनादायी अनुभव
9
बहुतांश लोकांना माहीत नाही की या लोनमध्ये संपूर्ण रकमेवर नाही; खर्च केलेल्या रकमेवरच लागतं व्याज, प्रीपेमेंटवर पेनल्टीही नाही
10
राशीभविष्य, १० जून २०२५: शुभ प्रसंगाचा बेत आखाल, चांगली बातमी मिळेल, दिवस आनंदी जाईल!
11
राजा रघुवंशीच्या अंत्यसंस्काराचा धक्कादायक व्हिडीओ; राज कुशवाह सोनमच्या वडिलांना देत होता आधार
12
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
13
विद्यार्थिनीला कॉलेजातून काढण्याचा आदेश रद्द; हायकोर्ट म्हणाले, निर्णय एकतर्फी, ऑपरेशन सिंदूरदरम्यान केली होती पोस्ट
14
'सिंदूर'मध्ये खुलला देशभक्तीचा रंग; औषधी वनस्पती, नर्सरीमध्ये रोपांची मागणी वाढली
15
लॉस एंजेलिसमध्ये परिस्थिती चिघळली; ट्रम्प प्रशासनाने कॅलिफोर्नियाच्या रस्त्यांवर उतरवले ७०० मरीन कमांडो
16
तैवानच्या कंपन्या महाराष्ट्राबाहेर, फॉक्सकॉन इतर राज्यात, सेमिकंडक्टर कंपन्याही इतरत्र
17
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
18
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
19
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
20
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया

जिच्यामुळे नवजीवन भेटले, तिच्यावरच हातोड्याने वार; नंदनवन झोपडपट्टीत थरार

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 19, 2023 18:09 IST

‘संशयाच्या भूता’ने केला घात, मद्यपी पतीकडून पत्नीचा खून

नागपूर : संशयाच्या भूताने झपाटलेल्या एका मद्यपी पतीने आपल्या पत्नीच्या डोक्यावर हातोड्याने प्रहार करत तिची हत्या केली. नंदनवन झोपडपट्टीत सोमवारी मध्यरात्री ही घटना घडली. या प्रकारामुळे परिसरात खळबळ उडाली होती. पोलिसांनी आरोपी पतीला अटक केली आहे.

अर्चना भारस्कर (३८) असे पत्नीचे नाव असून रमेश मतिराम भारस्कर (४८) हा आरोपी पती आहे. रमेश हा आठवडी बाजारात भाजी-मासोळी विकायचा तर अर्चना ही धुण्याभांड्याचे काम करायची. दोघांनाही १२ व ६ वर्षांच्या दोन मुली आहे. रमेश हा व्यसनी होता व दारूच्या नशेत तो पत्नीशी नेहमीच वाद घालायचा. त्याला पत्नीच्या चारित्र्यावर संशय होता व त्यातून त्याने अनेकदा तिला मारहाणदेखील केली होती. यामुळेच तिने रमेशला सोडून माहेर गाठले होते. मात्र सहा महिन्यांपूर्वी ती मोठ्या मुलीसह परत आली.

रमेशचा भाऊ अशोक हा त्याच्या शेजारी राहतो. सोमवारी अशोकच्या कुटुंबात घरगुती कारणावरून वाद झाला. हा वाद मिटवण्यासाठी रमेशची बहीण बेबीबाई नेमाडे या वर्ध्याहून आल्या होत्या. त्यांच्यासोबत अर्चनाही आपल्या मुलीसह अशोकच्या घरी गेली. सकाळी कामावर जायचे असल्याने ती रात्री ११ वाजता घरी परतली तर मुलगी पूजा ही काका अशोकच्या घरी झोपली. दरम्यान बेबीताईदेखील वर्ध्याला परतल्या. अर्चना घरी पोहोचताच रमेशने परत तिच्या चारित्र्यावरून वाद घालण्यास सुरुवात केली. अर्चनाने त्याला प्रत्युत्तर दिले असता रमेश संतापला व त्याने घरातील हातोड्याने तिच्या डोक्यावर प्रहार केले. यात अर्चनाचा जागीच मृत्यू झाला.

रात्रभर तिच्या मृतदेहासोबत तो घरीच होता व पहाटे ५ वाजता दरवाजाला कुलूप लावून कॉलनीतील पानठेल्यावर गेला. तेथून त्याने बहीण बेबीबाईला फोन करून अर्चनाची हत्या केल्याचे सांगितले. बेबीबाईने लगेच अशोकला ही माहिती दिली. अशोक रमेशच्या घरी पोहोचला तेव्हा त्याला कुलूप दिसले. खिडकीतून डोकावले असता अर्चना जमिनीवर पडलेली दिसली. अशोकच्या माहितीवरून नंदनवन पोलिस घटनास्थळी पोहोचले. त्यांनी रमेशला अटक केली. या घटनेमुळे दोन्ही लहान मुलींना मोठा धक्का बसला आहे.

अनेक वर्षांपासून सुरू होता छळ

अर्चना ही रमेशची दुसरी पत्नी होती. रमेशच्या संशयी स्वभावामुळे पहिली पत्नी लग्नानंतर सहा महिन्यातच त्याला सोडून चालली गेली होती. १३ वर्षांपूर्वी रमेशने अर्चनाशी लग्न केले होते. लग्नानंतर चार वर्षांनी अर्चना त्याच्या छळाला कंटाळून मुलींसह मूर्तिजापूर येथे माहेरी गेली. रमेशने दोन ते तीन वेळा तिच्या माहेरी जाऊन माफी मागितली होती व ती परत आली होती. मात्र परत रमेशचा छळ वाढल्याने ती सहा वर्षांपासून मूर्तिजापूर येथे राहत होती. सहा महिन्यांपूर्वी रमेशची प्रकृती खालावली होती. त्यानंतर रमेशच्या नातेवाइकांच्या विनंतीनंतर अर्चना नागपुरात परत आली होती.

अर्चनामुळेच रमेश मृत्यूशय्येतून परतला होता. तीन महिने त्याला स्वतःच्या हाताने खाऊ घातले. जास्त मेहनत करून तिने त्याच्या उपचारासाठी पैसे जमा केले. इतकेच काय तर त्याच्याकडे लक्ष देता यावे यासाठी लहान मुलीला भावाकडे ठेवले होते. मात्र जिच्यामुळे नवीन आयुष्य मिळाले तिच्यावर रमेश संशय घेतच राहिला.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीnagpurनागपूर