शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; २९ देशांतील अमेरिकन राजदुतांना तडकाफडकी परत बोलावले; काय आहे कारण?
2
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटेंच्या शिक्षेला सुप्रीम कोर्टाकडून स्थगिती; आमदारकीही जाणार नाही, आज काय घडलं?
3
ऐन निवडणुकीत महायुती सरकारनं निवडणूक कायद्यात केला महत्त्वाचा बदल; काय परिणाम होणार?
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या दराचा नवा उच्चांक, चांदीच्या दरात ७,२१४ रुपयांची वाढ; सोन्याच्या दरातही जोरदार तेजी
5
"साजिद अकरमशी माझा कोणताही संबंध नाही"; दहशतवाद्याच्या पत्नीचा मृतदेह स्वीकारण्यास नकार
6
'मी हे विकत घेऊ शकत नाही' असे म्हणणे सोडा! रॉबर्ट कियोसाकींनी सांगितला श्रीमंतीचा नवा मंत्र
7
VIDEO : "सर्वस्व दिलं, तरीही मनासारखं नाही घडलं!" रोहित शर्मा 'त्या' गोष्टीबद्दल पहिल्यांदाच बोलला
8
आता मनमानी चालणार नाही! रुग्णालयांना आधीच सांगावा लागणार आयसीयू-व्हेंटिलेटरचा खर्च; 'यांची' मंजुरीही आवश्यक
9
थरारक घटना! टेकऑफनंतर काही मिनिटांतच Air India विमानाचा यू टर्न; हवेत अडकला प्रवाशांचा श्वास
10
सैराटची पुनरावृत्ती! आंतरजातीय विवाहामुळे बदल्याची आग; बापानेच केली गर्भवती लेकीची हत्या
11
रस्त्यांवर झाडू मारतोय भारतीय 'सॉफ्टवेअर डेव्हलपर'! महिना सव्वा लाखाची कमाई; कंपनी का देते इतके पैसे?
12
विधवा वहिनीचं दीरासोबतच सुरू झालं अफेअर अन् अचानक घरातून झाली गायब! एक महिन्यानंतर जे समोर आलं... 
13
तुम्ही वापरत असलेला चार्जर FAKE तर नाहीये ना? कसा ओळखायचा ओरिजनल चार्जर, टाळू शकता मोबाइलचं होणारं नुकसान
14
Mumbai Crime: मुंबईतील धक्कादायक प्रकार! चालत्या लोकलमधून मुलीला खाली फेकलं; Video व्हायरल, आरोपीला पकडलं
15
भीषण अपघात! इंडोनेशियात डिव्हायडरला धडकून बस महामार्गावर उलटली, १६ जणांचा मृत्यू
16
सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही...
17
बॉलिवूडचे चर्चेतले चेहरे अक्षय खन्ना-सनी देओल २९ वर्षांनंतर एकत्र दिसणार? 'या' सिनेमाची चर्चा
18
Budh Gochar 2025: २०२५ ला निरोप देताना 'या' ७ राशींचे नशीब चमकणार, आयुष्यात येणार सुवर्णकाळ
19
लग्नाच्या आदल्या रात्री वडील ओरडले; नवरदेवाच्या लागलं मनाला, वरातीऐवजी घरातून निघाली अंत्ययात्रा!
20
KVP Scheme: पैसा दुप्पट करणारी सरकारी स्कीम; विना जोखीम 'इतक्या' महिन्यांत तुमचे पैसे होतील दुप्पट
Daily Top 2Weekly Top 5

जिच्यामुळे नवजीवन भेटले, तिच्यावरच हातोड्याने वार; नंदनवन झोपडपट्टीत थरार

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 19, 2023 18:09 IST

‘संशयाच्या भूता’ने केला घात, मद्यपी पतीकडून पत्नीचा खून

नागपूर : संशयाच्या भूताने झपाटलेल्या एका मद्यपी पतीने आपल्या पत्नीच्या डोक्यावर हातोड्याने प्रहार करत तिची हत्या केली. नंदनवन झोपडपट्टीत सोमवारी मध्यरात्री ही घटना घडली. या प्रकारामुळे परिसरात खळबळ उडाली होती. पोलिसांनी आरोपी पतीला अटक केली आहे.

अर्चना भारस्कर (३८) असे पत्नीचे नाव असून रमेश मतिराम भारस्कर (४८) हा आरोपी पती आहे. रमेश हा आठवडी बाजारात भाजी-मासोळी विकायचा तर अर्चना ही धुण्याभांड्याचे काम करायची. दोघांनाही १२ व ६ वर्षांच्या दोन मुली आहे. रमेश हा व्यसनी होता व दारूच्या नशेत तो पत्नीशी नेहमीच वाद घालायचा. त्याला पत्नीच्या चारित्र्यावर संशय होता व त्यातून त्याने अनेकदा तिला मारहाणदेखील केली होती. यामुळेच तिने रमेशला सोडून माहेर गाठले होते. मात्र सहा महिन्यांपूर्वी ती मोठ्या मुलीसह परत आली.

रमेशचा भाऊ अशोक हा त्याच्या शेजारी राहतो. सोमवारी अशोकच्या कुटुंबात घरगुती कारणावरून वाद झाला. हा वाद मिटवण्यासाठी रमेशची बहीण बेबीबाई नेमाडे या वर्ध्याहून आल्या होत्या. त्यांच्यासोबत अर्चनाही आपल्या मुलीसह अशोकच्या घरी गेली. सकाळी कामावर जायचे असल्याने ती रात्री ११ वाजता घरी परतली तर मुलगी पूजा ही काका अशोकच्या घरी झोपली. दरम्यान बेबीताईदेखील वर्ध्याला परतल्या. अर्चना घरी पोहोचताच रमेशने परत तिच्या चारित्र्यावरून वाद घालण्यास सुरुवात केली. अर्चनाने त्याला प्रत्युत्तर दिले असता रमेश संतापला व त्याने घरातील हातोड्याने तिच्या डोक्यावर प्रहार केले. यात अर्चनाचा जागीच मृत्यू झाला.

रात्रभर तिच्या मृतदेहासोबत तो घरीच होता व पहाटे ५ वाजता दरवाजाला कुलूप लावून कॉलनीतील पानठेल्यावर गेला. तेथून त्याने बहीण बेबीबाईला फोन करून अर्चनाची हत्या केल्याचे सांगितले. बेबीबाईने लगेच अशोकला ही माहिती दिली. अशोक रमेशच्या घरी पोहोचला तेव्हा त्याला कुलूप दिसले. खिडकीतून डोकावले असता अर्चना जमिनीवर पडलेली दिसली. अशोकच्या माहितीवरून नंदनवन पोलिस घटनास्थळी पोहोचले. त्यांनी रमेशला अटक केली. या घटनेमुळे दोन्ही लहान मुलींना मोठा धक्का बसला आहे.

अनेक वर्षांपासून सुरू होता छळ

अर्चना ही रमेशची दुसरी पत्नी होती. रमेशच्या संशयी स्वभावामुळे पहिली पत्नी लग्नानंतर सहा महिन्यातच त्याला सोडून चालली गेली होती. १३ वर्षांपूर्वी रमेशने अर्चनाशी लग्न केले होते. लग्नानंतर चार वर्षांनी अर्चना त्याच्या छळाला कंटाळून मुलींसह मूर्तिजापूर येथे माहेरी गेली. रमेशने दोन ते तीन वेळा तिच्या माहेरी जाऊन माफी मागितली होती व ती परत आली होती. मात्र परत रमेशचा छळ वाढल्याने ती सहा वर्षांपासून मूर्तिजापूर येथे राहत होती. सहा महिन्यांपूर्वी रमेशची प्रकृती खालावली होती. त्यानंतर रमेशच्या नातेवाइकांच्या विनंतीनंतर अर्चना नागपुरात परत आली होती.

अर्चनामुळेच रमेश मृत्यूशय्येतून परतला होता. तीन महिने त्याला स्वतःच्या हाताने खाऊ घातले. जास्त मेहनत करून तिने त्याच्या उपचारासाठी पैसे जमा केले. इतकेच काय तर त्याच्याकडे लक्ष देता यावे यासाठी लहान मुलीला भावाकडे ठेवले होते. मात्र जिच्यामुळे नवीन आयुष्य मिळाले तिच्यावर रमेश संशय घेतच राहिला.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीnagpurनागपूर