शहरं
Join us  
Trending Stories
1
वीज कमी वापरणाऱ्यांना स्वस्त दर; जास्त वापरल्यास बिलात ‘झटका’, किती युनिटपर्यंत दिलासा?
2
चांदीच्या ताटात न दिलेल्या जेवणाची चर्चा जोरदार; आरोप-प्रत्यारोपांचा धुरळा
3
अहिल्यानगर हादरले! आठवीच्या विद्यार्थ्याने केला दहावीच्या विद्यार्थ्याचा खून; क्रिकेटचा वादातून शाळेतच संपवले
4
पंचगंगा, चंद्रभागेला पूर, भीमा नदीत ६३ हजार क्युसेकचा विसर्ग सुरू; विदर्भाला पावसाचा दिलासा 
5
अग्रलेख: इराण विरुद्ध इस्रायल; युद्ध संपले, की तात्पुरते थांबले?
6
समृद्धी महामार्गावर आता २४ तास खड्डे दुरुस्तीपथक; देखभाल-दुरुस्तीचे काम कंत्राटदारामार्फत नियमित
7
जमीन सरकारी, वापरण्याचा हक्क सरकारलाच; मोघरपाड्यात मेट्रो कार शेड उभारण्याचा मार्ग मोकळा
8
‘गडकरी’ सुरू झाल्याखेरीज ‘घाणेकर’ बंद होणार नाही! ठाणे महापालिकेने मांडली स्पष्ट भूमिका
9
विशेष लेख: माझ्या मनात पाल का चुकचुकते आहे?
10
विधानसभा निकाल रद्द करण्याची मागणी फेटाळली; याचिका करून कोर्टाचा वेळ वाया घालवला : हायकोर्ट
11
एसटी महामंडळाच्या २ हजार बसेस भंगारात; ‘एमएसटीसी’च्या माध्यमातून करण्यात येणार लिलाव
12
भरती-ओहोटीचे सर्वेक्षण वाढवणवासियांनी उधळले; आयटीडीसी पथकाला पिटाळले
13
उद्योगस्नेही वातावरणामुळे महाराष्ट्रात देशातील सर्वाधिक गुंतवणूक -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
14
तरुणांनी प्रामाणिकपणा, नवकल्पनांसह परंपरा पुढे न्यावी : मंत्री आदिती तटकरे
15
“मोदी माझे चांगले मित्र, व्यापार निवडला अन्...”; भारत-पाक युद्धविरामावर पुन्हा ट्रम्प बोलले
16
“घोषित-अघोषित आणीबाणीत फरक करण्याची वेळ आली आहे, पुन्हा सावध राहण्याचा काळ”: शरद पवार
17
Malegaon Factory Election Result: माळेगाव सहकारी साखर कारखाना निवडणूक अजित पवारांच्या लाटेत
18
Swargate Case :स्वारगेट बलात्कार प्रकरणी पोलिसांकडून पीडितेला मानसिक त्रास; वकिलांचा आरोप
19
वीजग्राहकांसाठी आनंदाची बातमी! २६ टक्के वीजदर कमी होणार; CM फडणवीस म्हणाले, “इतिहासात प्रथमच…”
20
लग्नाआधी सरकारी नोकरी! नववी नापास रिंकू सिंह होणार थेट 'शिक्षण अधिकारी'

आणीबाणीच्या काळात साहित्यिक, इतिहासकार मौन का होते ?

By योगेश पांडे | Updated: June 25, 2025 19:30 IST

विनय सहस्त्रबुद्धे : कॉंग्रेसने संविधानाची हत्या करत लोकशाहीला शोभेची वस्तू बनविले

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : मागील काही काळापासून राईचा पर्वत करत काही साहित्यिकांकडून सरकार व प्रशासनाविरोधात भूमिका घेण्यात येत असल्याचे दिसून येते. मात्र आणीबाणीच्या कालावधीत कॉंग्रेसने संविधानाची हत्या करत लोकशाहीला शोभेची वस्तू बनविले होते. स्वातंत्र्यानंतर देशासमोरील त्या सर्वात कठीण काळात संबंधित साहित्यिक व इतिहासकारांनी मौन का साधले होते असा सवाल उपस्थित करत त्यांना नक्कीच इतिहास प्रश्न विचारणार असे प्रतिपादन भाजपचे राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य व माजी राज्यसभा खासदार विनय सहस्त्रबुद्धे यांनी केले. नागपुरात बुधवारी ते पत्रपरिषदेदरम्यान बोलत होते.

आणीबाणीनिमित्त नागपुरात विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. त्यानिमित्त ते नागपुरात आले होते. पत्रपरिषदेदरम्यान त्यांनी कॉंग्रेसवर जोरदार हल्लाबोल केला. तत्कालिन पंतप्रधान इंदिरा गांधी त्या काळात घाबरलेल्या होत्या, त्यामुळे आपल्या अवतीभवती विश्वासपात्र लोकांना नेमण्याचा त्यांचा प्रयत्न होता. अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर इंदिरा गांधी यांनी देशात आपल्या कुटुंबातील सत्ता कायम ठेवण्यासाठी देशावर आणीबाणी लादली. आणीबाणीमुळे भारताच्या लोकशाही वर कलंक लागले. कॉंग्रेसने संविधानाची हत्या करत लोकशाहीला शोभेची वस्तू बनविले होते. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ व इतर संघटनांनी आणीबाणीचा विरोध केला असता लाखो लोकांना तुरुंगात डांबण्यात आले होते. त्याबाबत कॉंग्रेसने उत्तर दिले पाहिजे, असे सहस्त्रबुद्धे म्हणाले.

खरगे निराधार बोलतातमल्लिकार्जुन खरगे टीका करताना बहुतांश वेळा निराधार बोलतात. आणीबाणीच्या काळात आम्ही अशी टीका केली असती, तर ती छापलीदेखील गेली नसती. त्यामुळे खरगे यांच्या टीकेला जास्त उत्तर देण्याची गरज नाही. घराणेशाहीचे राजकारण करणाऱ्यांनी आम्हाला शिकवू नये, असे सहस्त्रबुद्धे म्हणाले. संविधानाच्या मुद्द्यांवर आमच्यावर विरोधकांकडून तथ्यहीन टीका करण्यात येते. मात्र याचा अर्थ आम्ही बचावात्मक पवित्रा घेतला आहे असा होत नाही असे त्यांनी स्पष्ट केले.

बाळासाहेब ठाकरेंनी केले होते देवरसांचे स्वागतयावेळी सहस्त्रबुद्धे यांनी आणीबाणीला पाठिंबा देणाऱ्या शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यासंदर्भातील एक किस्सा सांगितला. राष्ट्रीय स्वयंसेवक संघावरची बंदी उचलली गेल्यानंतर मार्च १९७७ मध्ये तत्कालीन सरसंघचालक बाळासाहेब देवरस यांची येरवडा कारागृहातून सुटका झाली. दादर रेल्वे स्टेशनवर त्यांचा स्वागत खुद्द बाळासाहेब ठाकरे यांनी केले होते. एका बाळासाहेबांचा स्वागत दुसऱ्या बाळासाहेबांनी करू नये असं बंधन नाही असे त्यावेळेस बाळासाहेब ठाकरे म्हणाले होते.

टॅग्स :nagpurनागपूर