शहरं
Join us  
Trending Stories
1
तुमच्या कॅप्टनचं तुम्ही बघा, आमच्याच आम्ही बघतो! IND vs PAK Final मध्ये टॉस वेळी काय घडलं? (VIDEO)
2
“पाक लिंक खोटी, जेलमध्ये भेटायला दिले नाही, ते गांधीवादी...”; सोनम वांगचूकच्या पत्नीचा दावा
3
IND vs PAK Final, Asia Cup 2025 : सूर्यानं टॉस जिंकला; हार्दिक पांड्या 'आउट'! रिंकूला संधी; कारण...
4
युवराज, उथप्पा, रैनाची मालमत्ता ED जप्त करणार? मनी लॉड्रिंग प्रकरणात आली महत्त्वाची अपडेट
5
जळगावमध्ये माजी महापौरांच्या फार्म हाऊसवर सुरू होतं धक्कादायक काम, पोलिसांची धाड, ८ जण अटकेत
6
राज्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे अपरिमित नुकसान, शरद पवार यांनी सरकारकडे केल्या पाच मागण्या
7
OBC आंदोलने, पण कुठेत नाना पटोले; पदावरून दूर केल्याचा मूक निषेध की नव्या योजनेची तयारी? 
8
BCCIचे अध्यक्ष बदलताच आगरकरच्या निवड समितीत मोठा बदल, दोन स्टार क्रिकेटर बनले 'सिलेक्टर्स'
9
"संघाने आता नथुराम आणि मनुस्मृतीला तिलांजली देऊन गांधी विचार आणि संविधान स्वीकारावे’’, काँग्रेसने दिला सल्ला  
10
भारतावर राज्य करण्याचं स्वप्न, ५० लाख हल्लेखोरांची फौज, शेजारील देशात आखला जातोय भयानक कट 
11
“मातोश्रीवर हल्ल्याचा आणि राज ठाकरेंना मारायचा कट होता”; प्रदीप शर्मांनी सांगितला 'एन्काउंटर'चा थरार
12
IND vs PAK: पाकिस्तानची रडारड सुरूच! FINALआधी PCBची अर्शदीप सिंगबाबत ICCकडे तक्रार, कारण...
13
भीषण! रशियाचा युक्रेनवर मोठा हवाई हल्ला; ५९५ ड्रोन, ४८ क्षेपणास्त्रे डागली, इमारती उद्ध्वस्त
14
अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर ठोस निर्णय घ्या, विशेष अधिवेशन बोलवा; जयंत पाटलांची सरकारकडे मागणी
15
तुमचा गॅस एजन्सीवाला चांगली सेवा देत नाही? मोबाईल सिमप्रमाणे आता LPG गॅस कंपनी बदला
16
“नवी मुंबईत सत्ता हे आनंद दिघेंचे स्वप्न, महायुतीचे आम्ही पाहू, तुम्ही फक्त...”: एकनाथ शिंदे
17
गर्दीवर दगडफेक, पोलिसांकडून लाठीमार, करूरमधील चेंगराचेंगरीबाबत विजयच्या पक्षाला वेगळाच संशय, केली अशी मागणी 
18
“आज-उद्याचा दिवस चिंताजनक, सरकार-प्रशासन अलर्ट”; CM फडणवीसांचे आढावा घेत महत्त्वाचे निर्देश
19
Triptii Dimri : "आयुष्यात रोमान्स करण्यासाठी..."; करोडपती बिझनेसमनच्या प्रेमात आहे अभिनेत्री, गुपचूप करतेय डेट?
20
आशिया कप २०२५ फायनल: क्रिकेटचा थरार, प्राईज मनी ५० टक्क्यांनी वाढविला, भारताला मिळणार एवढे कोटी...

आणीबाणीच्या काळात साहित्यिक, इतिहासकार मौन का होते ?

By योगेश पांडे | Updated: June 25, 2025 19:30 IST

विनय सहस्त्रबुद्धे : कॉंग्रेसने संविधानाची हत्या करत लोकशाहीला शोभेची वस्तू बनविले

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : मागील काही काळापासून राईचा पर्वत करत काही साहित्यिकांकडून सरकार व प्रशासनाविरोधात भूमिका घेण्यात येत असल्याचे दिसून येते. मात्र आणीबाणीच्या कालावधीत कॉंग्रेसने संविधानाची हत्या करत लोकशाहीला शोभेची वस्तू बनविले होते. स्वातंत्र्यानंतर देशासमोरील त्या सर्वात कठीण काळात संबंधित साहित्यिक व इतिहासकारांनी मौन का साधले होते असा सवाल उपस्थित करत त्यांना नक्कीच इतिहास प्रश्न विचारणार असे प्रतिपादन भाजपचे राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य व माजी राज्यसभा खासदार विनय सहस्त्रबुद्धे यांनी केले. नागपुरात बुधवारी ते पत्रपरिषदेदरम्यान बोलत होते.

आणीबाणीनिमित्त नागपुरात विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. त्यानिमित्त ते नागपुरात आले होते. पत्रपरिषदेदरम्यान त्यांनी कॉंग्रेसवर जोरदार हल्लाबोल केला. तत्कालिन पंतप्रधान इंदिरा गांधी त्या काळात घाबरलेल्या होत्या, त्यामुळे आपल्या अवतीभवती विश्वासपात्र लोकांना नेमण्याचा त्यांचा प्रयत्न होता. अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर इंदिरा गांधी यांनी देशात आपल्या कुटुंबातील सत्ता कायम ठेवण्यासाठी देशावर आणीबाणी लादली. आणीबाणीमुळे भारताच्या लोकशाही वर कलंक लागले. कॉंग्रेसने संविधानाची हत्या करत लोकशाहीला शोभेची वस्तू बनविले होते. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ व इतर संघटनांनी आणीबाणीचा विरोध केला असता लाखो लोकांना तुरुंगात डांबण्यात आले होते. त्याबाबत कॉंग्रेसने उत्तर दिले पाहिजे, असे सहस्त्रबुद्धे म्हणाले.

खरगे निराधार बोलतातमल्लिकार्जुन खरगे टीका करताना बहुतांश वेळा निराधार बोलतात. आणीबाणीच्या काळात आम्ही अशी टीका केली असती, तर ती छापलीदेखील गेली नसती. त्यामुळे खरगे यांच्या टीकेला जास्त उत्तर देण्याची गरज नाही. घराणेशाहीचे राजकारण करणाऱ्यांनी आम्हाला शिकवू नये, असे सहस्त्रबुद्धे म्हणाले. संविधानाच्या मुद्द्यांवर आमच्यावर विरोधकांकडून तथ्यहीन टीका करण्यात येते. मात्र याचा अर्थ आम्ही बचावात्मक पवित्रा घेतला आहे असा होत नाही असे त्यांनी स्पष्ट केले.

बाळासाहेब ठाकरेंनी केले होते देवरसांचे स्वागतयावेळी सहस्त्रबुद्धे यांनी आणीबाणीला पाठिंबा देणाऱ्या शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यासंदर्भातील एक किस्सा सांगितला. राष्ट्रीय स्वयंसेवक संघावरची बंदी उचलली गेल्यानंतर मार्च १९७७ मध्ये तत्कालीन सरसंघचालक बाळासाहेब देवरस यांची येरवडा कारागृहातून सुटका झाली. दादर रेल्वे स्टेशनवर त्यांचा स्वागत खुद्द बाळासाहेब ठाकरे यांनी केले होते. एका बाळासाहेबांचा स्वागत दुसऱ्या बाळासाहेबांनी करू नये असं बंधन नाही असे त्यावेळेस बाळासाहेब ठाकरे म्हणाले होते.

टॅग्स :nagpurनागपूर