शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेच्या ४८ जागा, ५० हजारांपेक्षा कमी फरक; २०१९ च्या सार्वत्रिक निवडणुकीवर काँग्रेसचा मोठा दावा
2
'ओबीसी समाज श्रीमंत मराठ्यांविरोधात जाऊ नये, हाच शरद पवारांच्या मंडळ यात्रेचा हेतू'; प्रकाश आंबेडकरांचा टोला
3
'मतचोरी' विरोधात इंडिया आघाडीचे उद्या शक्तिप्रदर्शन, राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली खासदार संसदेपासून निवडणूक आयोगाच्या कार्यालयापर्यंत मोर्चा काढणार
4
Rahul Gandhi : राहुल गांधींसमोरील अडचणी वाढणार? शकुन राणीला 'डबल व्होटर' म्हणून फसले; आयोगाने बजावली नोटीस
5
'बुडायला लागलो तर अर्धे जग सोबत घेऊन जाणार'; पाकिस्तानची भारताला पुन्हा अणु हल्ल्याची धमकी!
6
रामदास आठवले महाराष्ट्र भाजपवर नाराज; थेट पीएम मोदींकडे केली तक्रार, कारण काय?
7
ब्रिटनच्या F-35B विमानामागचं शुक्लकाष्ठ सुटेना, आता या देशात करावं लागलं आपातकालीन लँडिंग
8
मनी लॉंड्रिंगप्रकरणी रॉबर्ट वाड्रांच्या अडचणीत वाढ; दोन कंपन्यांद्वारे ५८ कोटी रुपये कमावल्याचा आरोप
9
"जेव्हा देशासाठी निवड होते, तेव्हा..."; मराठमोळ्या 'वर्ल्ड चॅम्पियन'ने जसप्रीत बुमराहला सुनावलं
10
मासे खरेदी करण्यावरून दोन गटांमध्ये तुफान राडा, एकमेकांना लाथा-बुक्क्यांनी मारले
11
टस्कर हत्तीने भिंत फाेडून घरात केला प्रवेश; जीवनावश्यक साहित्याची नासधूस, छत्तीसगड सीमेलगतच्या मंजिगड टाेला येथील घटना
12
फक्त १२७९ रुपयांत करा हवाई प्रवास; Air India ने आणली खास ऑफर, जाणून घ्या डिटेल...
13
मत चोरीच्या मुद्यावरुन लक्ष वळवण्याचा प्रयत्न; हवाई दल प्रमुखांच्या वक्तव्यावर काँग्रेस नेत्याची टीका
14
IPS वडिलांनी कॉन्स्टेबलला बडतर्फ केलं, त्यांच्याच मुलीने कोर्टात खटला लढवून पुन्हा सेवेत घेतलं; नेमकं प्रकरण काय?
15
रोहित शर्मा, विराट कोहलीची वनडे क्रिकेटमधूनही लवकरच निवृत्ती? गौतम गंभीरचे विधान व्हायरल
16
धक्कादायक! तीन मुलांसह आईने संपवलं जीवन, लेकरांना पोटाला बांधलं आणि… 
17
विठुमाऊलीच्या मंदिरात मायमराठीची उपेक्षा, गुरुजींनी हिंदीत सांगितली पूजा? पोस्ट व्हायरल
18
इयत्ता तिसरीतील मुलीवर वर्गमित्राकडून अत्याचार; बाभुळगाव तालुक्यातील घटना
19
AAI JE Recruitment 2025 : विमानतळावर नोकरीची संधी! एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियाने जाहीर केली बंपर नोकरभरती
20
'मत चोरी'ची तक्रार करण्यासाठी राहुल गांधींनी जारी केली वेबसाइट; नागरिकांना केले आवाहन...

भारतीयांच्या संशोधनाला अभ्यास पुस्तिकेत स्थान का नाही? पद्मभूषण शशिकुमार चित्रे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 6, 2019 21:54 IST

डॉ. सी.व्ही. रमण, मेघनाद शहा, डॉ. बोस यांच्या संशोधनाला अभ्यासाच्या पुस्तकात स्थान मिळाले, कारण ते जागतिक दर्जाचे होते. त्यानंतर मात्र आपल्या देशातील संशोधक हे स्थान प्राप्त करू शकले नाही. वास्तविक आपल्याकडचे बहुतेक संशोधन पाश्चात्त्यांच्या प्रभावावर आधारीत व पेपर सादरीकरणापुरते मर्यादित असते. त्यामुळे नव्या संशोधकांनी अभ्यास पुस्तिकेत स्थान मिळेल, असे स्वत:चे काहीतरी निर्माण करावे, असे आवाहन ख्यातिप्राप्त गणिततज्ज्ञ व खगोलशास्त्रज्ञ पद्मभूषण डॉ. शशिकुमार चित्रे यांनी केले.

ठळक मुद्देइन्स्टिट्यूट ऑफ सॉयन्समध्ये राष्ट्रीय विद्यार्थी परिषदेला आरंभ

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : डॉ. सी.व्ही. रमण, मेघनाद शहा, डॉ. बोस यांच्या संशोधनाला अभ्यासाच्या पुस्तकात स्थान मिळाले, कारण ते जागतिक दर्जाचे होते. त्यानंतर मात्र आपल्या देशातील संशोधक हे स्थान प्राप्त करू शकले नाही. वास्तविक आपल्याकडचे बहुतेक संशोधन पाश्चात्त्यांच्या प्रभावावर आधारीत व पेपर सादरीकरणापुरते मर्यादित असते. त्यामुळे नव्या संशोधकांनी अभ्यास पुस्तिकेत स्थान मिळेल, असे स्वत:चे काहीतरी निर्माण करावे, असे आवाहन ख्यातिप्राप्त गणिततज्ज्ञ व खगोलशास्त्रज्ञ पद्मभूषण डॉ. शशिकुमार चित्रे यांनी केले.नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स आणि नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ फॉरेन्सिक सायन्स यांच्यावतीने ‘इमर्जिंग ट्रेन्ड्स इन फंडामेंटल सायन्स’ या विषयावर दोन दिवसीय राष्ट्रीय विद्यार्थी परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. बुधवारी या परिषदेच्या उद्घाटनप्रसंगी डॉ. चित्रे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. याप्रसंगी महाराष्ट्र अ‍ॅनिमल अ‍ॅन्ड फिशरी सायन्स विद्यापीठ (माफसू)चे कुलगुरू डॉ. आशिष पातूरकर, विज्ञान संस्थेचे संचालक डॉ. आर.जी. आत्राम, फॉरेन्सिक सायन्सचे संचालक डॉ. जयराम खोब्रागडे, आयोजन समितीचे समन्वयक विद्यार्थी प्रतिनिधी मोहित माहुरकर, प्राची कठाणे व फ्रॅँ क बॉर्टन व्यासपीठावर उपस्थित होते.डॉ. शशिकुमार चित्रे यांनी ‘अ‍ॅस्ट्रोफिजिक्स अ‍ॅन्ड सोसायटी’ या विषयावर आपले विचार मांडले. अंतराळाबद्दल लोकांमध्ये सुरुवातीपासून कुतूहल राहिले आहे. मात्र ते उघड्या डोळ्याने दिसते त्यापुरते मर्यादित होते. गॅलिलिओने दुर्बिणीचा शोध लावल्यानंतर अंतराळ संशोधनामध्ये क्रांतिकारक परिवर्तन निर्माण झाले. पुढे केपलरचे गणित सूत्र, न्यूटनचे गुरुत्वाकर्षण आणि आईनस्टाईन यांच्या सापेक्षतावादावरील सूत्रामुळे या क्षेत्रातील संशोधनाने प्रचंड वेग घेतला. १९५० नंतरचा काळ अंतराळ संशोधनाचा सुवर्णकाळ म्हणून मानला जातो. सॅटेलाईट, टीव्ही, आजचा मोबाईल आणि असंख्य प्रकारचे रासायनिक एलिमेंट हे खगोलशास्त्रातील संशोधनामुळेच शक्य झाल्याचे डॉ. चित्रे यांनी स्पष्ट केले. अंतराळ म्हणजे भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, गणित आणि जीवशास्त्राचा बेसिक अभ्यास करण्याची निसर्गाने निर्माण केलेली प्रयोगशाळाच होय, असे मत त्यांनी मांडले. चंद्र, सूर्याच्या सतत बदलणाऱ्या परिक्रमा, वातावरणातील बदल, आकाशगंगेतील ताऱ्यांचा पुंजका, हे सर्व संशोधनाचे विषय आहेत. या संशोधनातून नव्या ग्रहांची ओळख झाली. पूर्वी संशोधनासाठी हबल टेलिस्कोप ही एकच खिडकी होती. मात्र आज मानवाने चंद्र आणि मंगळावरही डिजिटल टेलिस्कोप लावला आहे.एक्स-रे, गॅमा रेज या नव्या संशोधनाच्या खिडक्या उपलब्ध झाल्या आहेत. या खिडक्यातून आणखी संशोधन होईल तेव्हा आपणही आश्चर्य करू, अशी भावना त्यांनी मांडली. माफसूचे कुलगुरू डॉ. आशिष पातूरकर व डॉ. सुरेंद्र गोळे यांनी ‘अप्लिकेशन ऑफ ऑपरेशन रिसर्च इन रियल लाईफ’ विषयावर संशोधनात्मक विचार मांडले. विज्ञान संस्थेच्या प्राध्यापिका डॉ. सुजाता देव यांच्या संयोजनातून या विद्यार्थी परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे.आपला सूर्य नष्ट होईल काय?खगोलशास्त्रात अनेक महत्त्वपूर्ण संशोधन झाले असले तरी आपण केवळ तळाशीच पोहचलो आहोत. सूर्य हा ४.५ कोटी वर्षापूर्वी निर्माण झाल्याचे मानले जाते व तो त्याचे अर्धे आयुष्य जगल्याचे बोलले जाते. म्हणजे एवढ्याच वर्षांनी तो नष्ट होणार, हा कुतूहलाचा विषय नाही काय, असा सवाल त्यांनी केला. आतापर्यंत जे संशोधन झाले ते केवळ ५ टक्के आहे. मात्र अंतराळात ९५ टक्के डार्क मटेरियल असू त्यापर्यंत अद्याप आपण पोहचलोच नाही. अनेक सूर्य, आकाशगंगा व आपल्यासारखी सजीवसृष्टी असलेली पृथ्वी अंतराळात असेल, ते संशोधन बाकी आहे. सोलर न्यूट्रिनो पझल, पॅराडॉक्स, ऑपरेशन ऑफ सोलर डायनॅमो, एक्स-रे बायनरी, प्रोटो स्टार्स, ब्लॅक होल अशा कितीतरी नव्या शाखा संशोधनासाठी उपलब्ध असून विद्यार्थ्यांनी या क्षेत्राकडे वळावे, असे आवाहन डॉ. चित्रे यांनी केले.परिषदेत ४०० विद्यार्थ्यांचा सहभागडॉ. सुजाता देव यांनी सांगितले की, ही विद्यार्थ्यांनी विद्यार्थ्यांसाठी आयोजित केलेली परिषद आहे. यात देशभरातील नामांकित संस्थांच्या ४०० विद्यार्थी प्रतिनिधींनी सहभाग घेतला आहे. पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांनी स्वत: संशोधित केलेले पेपर सादर केले. यामध्ये भौतिकशास्त्र व गणितासह सांख्यिकी शास्त्र, रसायनशास्त्र, मेडिसिनल केमिस्ट्री, क्वॉन्टम मेकॅनिक्स, इन्स्ट्रुमेंटल टेक्नॉलॉजी, माहिती तंत्रज्ञान, वनस्पती व प्राणी हे सजीवशास्त्र, फॉरेन्सिक सायन्स, सोलर एनर्जी आदी विषयाचे संशोधन असून त्या प्रत्येक विषयाच्या सादरीकरणासाठी संस्थेत स्वतंत्र कक्ष तयार करण्यात आला आहे. याशिवाय प्रत्येक विषयाचे पोस्टर प्रेझेंटेशनही विद्यार्थ्यांनी केले असून परीक्षकांच्या अवलोकनानंतर यातील विजेत्यांना पारितोषिक देण्यात येणार आहेत.सायन्स एक्सप्लोरेटरीचे विज्ञान मॉडेल्सयावेळी राजेंद्रसिंह सायन्स एक्सप्लोरेटरीच्यावतीने विज्ञान मॉडेल्सचे प्रदर्शन मांडण्यात आले आहे. मानवी शरीराची रचना, भौतिकशास्त्र, गणित व रसायनशास्त्राशी संबंधित मॉडेल्सचा समावेश आहे.