शहरं
Join us  
Trending Stories
1
'दक्षिणेतील लोक आफ्रिकन दिसतात'; सॅम पित्रोदांच्या विधानावर काँग्रेस म्हणतं, 'त्यांनी दिलेली उपमा...'
2
४ जूनच्या निकालानंतर सगळं स्पष्ट होईल; शरद पवारांच्या विधानावर पृथ्वीराज चव्हाणांचा दावा
3
सॅम पित्रोदांनी ईशान्य आणि दक्षिण भारतातील लोकांच्या रंगावरून केलेल्या टिप्पणीला मोदींचं प्रत्युत्तर, म्हणाले...   
4
Sachin Pilot : "काँग्रेसला भाजपापेक्षा जास्त जागा मिळतील; जे खूप वर जातात ते एक ना एक दिवस खाली येतात"
5
उत्तर मुंबईतील सर्वसमावेशक विकासावर लक्ष केंद्रीत करणार; पीयूष गोयल यांनी दिली ग्वाही
6
पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुका जाहीर; ४ जागांसाठी 'या' तारखेला मतदान
7
Ajit Pawar : श्रीनिवास पवारांनी मला साथ देणार असल्याचं सांगितलं होतं, पण....' अजित पवारांचा मोठा गौप्यस्फोट
8
परशुराम जन्मोत्सव: विष्णूंचा सहावा अवतार, शस्त्र-शास्त्रात पारंगत चिरंजीव; वाचा, महात्म्य
9
अरे देवा! ब्युटी पार्लरमध्ये भेटल्या, एकमेकींच्या प्रेमात पडल्या अन् घरातून पळाल्या; कोर्ट म्हणतं...
10
...अन् सुरेश रैनाने सिद्धार्थ जाधवला मारली मिठी, अभिनेता म्हणाला- "तुम्ही माझं कौतुक केलं..."
11
टोल नाकेवाल्यांनी पैसे घेतले, NHAI ला महागात पडले; परदेशी वाहनमालक नडला, 25000 चा दंड
12
30 वर्ष सहन केला नवऱ्याचा अत्याचार; बॉलिवूड गाजवणाऱ्या अभिनेत्रीचे लग्नानंतर झाले अतोनात हाल
13
Babar Azam म्हणजे बिन कामाचा भाऊ; पाकिस्तानातील अभिनेत्रींनी कर्णधाराची उडवली खिल्ली
14
केरळमध्ये वेस्ट नाईल तापाचा प्रादुर्भाव; 'या' धोकादायक आजाराची लक्षणे काय आहेत? जाणून घ्या...
15
Smriti Irani Tax Saving Funds : स्मृती इराणींनी ज्या टॅक्स सेव्हिंग फंडात गुंतवणूक केली, माहितीये त्यांची कामगिरी कशीये?
16
रश्मिका मंदानाला विसरा, आता ही साऊथ अभिनेत्री बनली 'नॅशनल क्रश'; दुप्पट केलं मानधन
17
मनीष सिसोदियांना दिलासा नाहीच! जामीन याचिकेवरील सुनावणी पुढे ढकलली
18
उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला दिलासा! औरंगाबाद आणि उस्मानाबाद जिल्ह्याचं नाव छत्रपती संभाजीनगर आणि धाराशिवच
19
अक्षय्य तृतीयेला पंचमहायोग: लक्ष्मीकृपा मिळण्यासाठी ‘हे’ उपाय करा, लाभ मिळवा; शुभच होईल!
20
‘अदानी, अंबानींकडून किती माल उचलला, त्यांना शिव्या देणं अचानक कसं काय बंद केलं?’, मोदींचा काँग्रेसला सवाल  

आमच्या भविष्यासोबतच खेळ का?विद्यार्थ्यांचा संतप्त सवाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 30, 2020 9:48 PM

कर्मचारी संघटनांच्या आंदोलनामुळे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठातील अंतिम सत्राच्या परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. अगोदरच कोरोनामुळे परीक्षांना बराच उशीर झाला आहे. अशा स्थितीत आता आंदोलनामुळे परीक्षांवर परत संकट आल्यामुळे विद्यार्थ्यांकडून प्रचंड संताप व्यक्त करण्यात येत आहे.

ठळक मुद्देराज्य शासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : कर्मचारी संघटनांच्या आंदोलनामुळे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठातील अंतिम सत्राच्या परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. अगोदरच कोरोनामुळे परीक्षांना बराच उशीर झाला आहे. अशा स्थितीत आता आंदोलनामुळे परीक्षांवर परत संकट आल्यामुळे विद्यार्थ्यांकडून प्रचंड संताप व्यक्त करण्यात येत आहे. राजकारणातून तर हा प्रकार होत नाही ना, असा सवालदेखील व्यक्त करण्यात येत असून काही प्राधिकरण सदस्यांनी राज्य शासनाच्या भूमिकेवरदेखील प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.नागपूर विद्यापीठातील अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षांना १ ऑक्टोबरपासून सुरुवात होणार होती. विद्यार्थ्यांचे हित लक्षात घेता विद्यापीठाने मोबाईलवरून परीक्षा देण्यासाठी विशेष अ‍ॅपदेखील विकसित केले होते. या अ‍ॅपमुळेदेखील विद्यार्थ्यांमध्ये काही प्रमाणात संभ्रम जाणवत होता. मात्र तो दूर होत असतानाच विद्यार्थ्यांना मंगळवारी मोठा धक्का बसला. यासंदर्भात अनेकांना बुधवारी माहिती कळाली व बहुतांश जणांनी संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. सोशल मीडियावरदेखील विविध प्रश्न उपस्थित करण्यात येत आहेत.सरकार विद्यार्थी हिताचा विचार कधी करणार?विद्यापीठातील काही प्राधिकरण सदस्यांनीदेखील या प्रकारावर नाराजी व्यक्त केली आहे. सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे कर्मचाऱ्यांना आंदोलनाचा पवित्रा घ्यावा लागला. राज्य शासनाच्या अपरिपक्व धोरणाचा परत एकदा विद्यार्थ्यांना फटका बसला आहे. सरकार विद्यार्थी हिताचा विचार कधी करणार, असा प्रश्न व्यवस्थापन परिषद सदस्य विष्णू चांगदे यांनी उपस्थित केला आहे.अधिकाऱ्यांच्या नजरा मुंबईकडेकाही आजी-माजी प्राधिकरण सदस्यांनी विद्यापीठाची परीक्षेची तयारी पूर्ण नव्हती व म्हणून परीक्षा पोस्टपोन करण्यात आल्याचा आरोप केला आहे. आमची परीक्षा घेण्याची पूर्ण तयारी असून प्रश्नसंचदेखील तयार आहेत. मोबाईल अ‍ॅपवरदेखील काहीच समस्या येणार नाहीत. आमच्या नजरा मुंबईकडेच लागल्या असून आंदोलन मिटल्यावर नवीन वेळापत्रक जारी करू, असे परीक्षा व मूल्यमापन संचालक डॉ. प्रफुल्ल साबळे यांनी स्पष्ट केले.

टॅग्स :Rashtrasant Tukdoji Maharaj Nagpur Universityराष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठStudentविद्यार्थीexamपरीक्षा