शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती निवडणुकीत कुणाचं पारडं जड? एनडीए की इंडिया, कोण मारणार बाजी, असं आहे संसदेतील मतांचं गणित  
2
"ते मराठीत न बोलल्याने भाषेला भोकं पडणार का?’’, अभिनेत्री केतकी चितळेचं वादग्रस्त विधान
3
"सोनिया गांधी आमच्या देवी आहेत, त्यांनी…”, तेलंगाणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांनी उधळली स्तुतीसुमने   
4
WTC मध्ये भारताचा टॉपर ठरला रिषभ पंत! हिटमॅन रोहित शर्माचा रेकॉर्ड मोडला
5
हे सारं मी त्यांच्या सांगण्यावरून केलं, बनावट दूतावास चालवणाऱ्या हर्षवर्धनचा धक्कादायक दावा   
6
IND vs ENG 4th Test Day 2 Stumps: मॅच आधी गिलनं ज्यांना डिवचलं त्या दोघांनीच दमवलं; शेवटी...
7
Asia Cup 2025 : बीसीसीआय UAE च्या मैदानात स्पर्धा घेणार; भारत-पाक हायहोल्टेज मॅचही पाहायला मिळणार?
8
Anshul Kamboj vs Ben Duckett: अंशुल कंबोजची पहिली टेस्ट विकेट! बेन डकेट 'नर्व्हस नाइंटी'चा शिकार
9
"देशासाठी लढणारा मराठी माणूस कधी..., काहींना शिवरायांच्या नावाची ॲलर्जी"; मुख्यमंत्री फडणवीस यांचं जोरदार भाषण
10
Hulk Hogan Death: 'बालपणीचा सुपरहिरो' प्रसिद्ध WWE स्टार हल्क होगनचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन
11
मग मृतांना निवडणुकीत मतदान करायला द्यायचं का? राहुल-तेजस्वींना निवडणूक आयोगाचा सवाल
12
VIDEO: ती आली अन् थेट त्याला बिलगली... चहल-महावशची एकमेकांना घट्ट मिठी, क्लिप व्हायरल
13
चक्क दारूच्या ट्रकवर राज्यामंत्र्याचे नाव, ४० लाखांची विदेशी दारू, सात आराेपींना घेतले ताब्यात
14
'या लोकांचे प्रफुल्ल लोढासोबत काय संबंध आहेत?', गिरीश महाजनांच्या संयमाचा कडेलोट, 'मविआ'ला थेट फोटोच दाखवले
15
दिल्लीतील JNU मधील देवेंद्र फणडवीसांच्या कार्यक्रमादरम्यान विद्यार्थ्यांचं आंदोलन, महायुती सरकारविरोधात घोषणाबाजी
16
10th Pass Job: दहावी पास उमेदवारांसाठी गुप्तचर संस्थेत नोकरी; मुंबई, नागपूरसाठी 'इतक्या' जागा राखीव!
17
Rishabh Pant Fifty : भारताच्या 'जखमी वाघा'ची डरकाळी! लढवय्या पंतनं ठोकली सॉलिड फिफ्टी
18
₹1600 वर पोहोचू शकतो इलेक्ट्रिक बस बनवणाऱ्या कंपनीचा शेअर, खरेदीसाठी उडालीय लोकांची झुंबड; करतोय मालामाल!
19
स्वातंत्र्यवीर सावरकर बदनामी प्रकरणी राहुल गांधी यांना नाशिकच्या कोर्टात जामीन
20
वाघाच्या काळजाचा! जखमी असूनही इंग्लंडशी भिडला, मँचेस्टरमध्ये पंतची विक्रमी खेळी

वाचाळवीरांवर कारवाईसाठी भाजप प्रदेशाध्यक्षांचे मौन का ?

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 23, 2025 15:49 IST

माजी प्रदेशाध्यक्षांनी केली होती कारवाई : नऊ महिन्यांतच भाजप मवाळ

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तोंडावर असताना भारतीय जनता पक्षातील काही वाचाळवीरांमुळे पक्षासमोर अडचणी उभ्या ठाकल्या आहेत. पक्षातील अशा तत्त्वांविरोधात शिस्त न पाळण्याप्रकरणात कारवाईचा इशारा देत माजी प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी तसे पाऊलदेखील उचलले होते व हेच पक्षाचे धोरण असल्याचे स्पष्ट केले होते. विद्यमान प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी काही नेत्यांचे बैठकांमध्ये कान टोचले असले तरी परंतु सार्वजनिकपणे अद्यापही कुणावरही कारवाईसाठी पुढाकार घेतलेला नाही. विचारणा केल्यावरदेखील ते मौन साधले.

'पार्टी विथ डिफरन्स' असे बिरूद मिरविणाऱ्या भाजपमधील काही वाचाळवीरांमुळे पक्षाच्या प्रतिमेला काहीसा तडा गेला आहे. जुन्या जाणत्या कार्यकर्त्यांमध्ये देखील याबाबत नाराजी असून राष्ट्रीय स्वयंसेवक जनतेच्या मुद्द्यांऐवजी अकारण वाद संघाकडूनदेखील निर्माण करणारे मुद्दे टाळा अशी सूचना करण्यात आली आहे. मुख्यमंत्र्यांनी पावसाळी अधिवेशनाच्या अगोदर यासंदर्भात समज दिली होती. वाचाळवीरांवर नियंत्रण आणणे हे पक्ष व प्रदेशाध्यक्षांसमोरील मोठे आव्हान राहणार आहे. रवींद्र चव्हाण हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या नागपूर दक्षिण-पश्चिम या मतदारसंघात पोहोचले व त्यांनी सामाजिक उपक्रमांचे उद्घाटन केले. यावेळी त्यांना 'लोकमत'ने वाचाळवीरांवरील कारवाईबाबत विचारले असता त्यांनी याबाबत सध्या काहीच बोलणार नाही, वेळ आल्यावर सांगेन अशी प्रतिक्रिया दिली. 

पक्षाने भूमिका ठरविली, मग पालन का नाही ?सार्वजनिक व्यासपीठावर बोलताना संयम राखावा, कोणत्याही समुदायाची भावना दुखावणारी किंवा पक्षाच्या अधिकृत भूमिकेशी विसंगत वक्तव्ये करू नयेत, असे आवाहन काही दिवसांअगोदर रवींद्र चव्हाण यांनी केले होते. मात्र, वचक बसणारी कारवाई न झाल्याने वाचाळवींरावर फारसा वचक बसलेला नाही. विधानसभा निवडणुकीच्या अगोदर वाचाळवीरांमुळे महायुतीत दरी निर्माण होते की काय असे चित्र निर्माण झाले होते. त्यामुळे चंद्रशेखर बावनकुळे यांनी सार्वजनिक मंचावरून अशा नेत्यांना थेट इशारा दिला होता. एका बैठकीत महायुतीविरोधात बोलणारे माजी आमदार मल्लिकार्जुन रेड्डी यांच्यावर तडकाफडकी कारवाई करत निलंबितदेखील करण्यात आले होते. पक्षशिस्तीचे उल्लंघन करणाऱ्या किंवा पातळी सोडून बोलणाऱ्या पदाधिकाऱ्यांवर कठोर कारवाईची भूमिका पक्षाने ठरविल्याचे बावनकुळे यांनी घोषित केले होते. मात्र, प्रदेशाध्यक्ष बदलताच पक्षाने ही भूमिकादेखील बदलली की काय असा सवाल उपस्थित होत आहे. 

टॅग्स :Ravindra Chavanरविंद्र चव्हाणBJPभाजपाnagpurनागपूर