शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
4
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
5
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
6
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
7
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
8
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
9
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
10
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
11
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
12
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
13
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
14
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
15
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
16
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
17
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
18
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
19
Daund Local Body Election Result 2025: दौंडला दोन्ही गट सत्तेत; नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुर्गादेवी जगदाळे
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

वाचाळवीरांवर कारवाईसाठी भाजप प्रदेशाध्यक्षांचे मौन का ?

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 23, 2025 15:49 IST

माजी प्रदेशाध्यक्षांनी केली होती कारवाई : नऊ महिन्यांतच भाजप मवाळ

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तोंडावर असताना भारतीय जनता पक्षातील काही वाचाळवीरांमुळे पक्षासमोर अडचणी उभ्या ठाकल्या आहेत. पक्षातील अशा तत्त्वांविरोधात शिस्त न पाळण्याप्रकरणात कारवाईचा इशारा देत माजी प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी तसे पाऊलदेखील उचलले होते व हेच पक्षाचे धोरण असल्याचे स्पष्ट केले होते. विद्यमान प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी काही नेत्यांचे बैठकांमध्ये कान टोचले असले तरी परंतु सार्वजनिकपणे अद्यापही कुणावरही कारवाईसाठी पुढाकार घेतलेला नाही. विचारणा केल्यावरदेखील ते मौन साधले.

'पार्टी विथ डिफरन्स' असे बिरूद मिरविणाऱ्या भाजपमधील काही वाचाळवीरांमुळे पक्षाच्या प्रतिमेला काहीसा तडा गेला आहे. जुन्या जाणत्या कार्यकर्त्यांमध्ये देखील याबाबत नाराजी असून राष्ट्रीय स्वयंसेवक जनतेच्या मुद्द्यांऐवजी अकारण वाद संघाकडूनदेखील निर्माण करणारे मुद्दे टाळा अशी सूचना करण्यात आली आहे. मुख्यमंत्र्यांनी पावसाळी अधिवेशनाच्या अगोदर यासंदर्भात समज दिली होती. वाचाळवीरांवर नियंत्रण आणणे हे पक्ष व प्रदेशाध्यक्षांसमोरील मोठे आव्हान राहणार आहे. रवींद्र चव्हाण हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या नागपूर दक्षिण-पश्चिम या मतदारसंघात पोहोचले व त्यांनी सामाजिक उपक्रमांचे उद्घाटन केले. यावेळी त्यांना 'लोकमत'ने वाचाळवीरांवरील कारवाईबाबत विचारले असता त्यांनी याबाबत सध्या काहीच बोलणार नाही, वेळ आल्यावर सांगेन अशी प्रतिक्रिया दिली. 

पक्षाने भूमिका ठरविली, मग पालन का नाही ?सार्वजनिक व्यासपीठावर बोलताना संयम राखावा, कोणत्याही समुदायाची भावना दुखावणारी किंवा पक्षाच्या अधिकृत भूमिकेशी विसंगत वक्तव्ये करू नयेत, असे आवाहन काही दिवसांअगोदर रवींद्र चव्हाण यांनी केले होते. मात्र, वचक बसणारी कारवाई न झाल्याने वाचाळवींरावर फारसा वचक बसलेला नाही. विधानसभा निवडणुकीच्या अगोदर वाचाळवीरांमुळे महायुतीत दरी निर्माण होते की काय असे चित्र निर्माण झाले होते. त्यामुळे चंद्रशेखर बावनकुळे यांनी सार्वजनिक मंचावरून अशा नेत्यांना थेट इशारा दिला होता. एका बैठकीत महायुतीविरोधात बोलणारे माजी आमदार मल्लिकार्जुन रेड्डी यांच्यावर तडकाफडकी कारवाई करत निलंबितदेखील करण्यात आले होते. पक्षशिस्तीचे उल्लंघन करणाऱ्या किंवा पातळी सोडून बोलणाऱ्या पदाधिकाऱ्यांवर कठोर कारवाईची भूमिका पक्षाने ठरविल्याचे बावनकुळे यांनी घोषित केले होते. मात्र, प्रदेशाध्यक्ष बदलताच पक्षाने ही भूमिकादेखील बदलली की काय असा सवाल उपस्थित होत आहे. 

टॅग्स :Ravindra Chavanरविंद्र चव्हाणBJPभाजपाnagpurनागपूर