शहरं
Join us  
Trending Stories
1
“राष्ट्रभक्तीचा नवा अध्याय, सत्तेसाठी भाजप+एमआयएम अकोट पॅटर्न”; ठाकरे गटाच्या नेत्यांची टीका
2
अमेरिकेचा इराणसोबत व्यापार करणाऱ्या देशांना इशारा, २५ टक्के अतिरिक्त टॅरिफची घोषणा; भारतावर होणार 'हा' परिणाम
3
कल्याणमध्ये २१ वर्षीय एअर होस्टेसचा प्रियकराकडून छळ; ६ वर्षांच्या प्रेमाचा असा झाला भीषण शेवट, आरोपी अजूनही मोकाट?
4
कोट्यवधींच्या रॉल्स रॉयसच्या दरात मोठी सवलत? किमतीत ४० टक्क्यांपर्यंत घटीची शक्यता
5
आईच्या पिंडदानाची तयारी सुरू होती, तेवढ्यात फोन खणखणला अन्...; असं काही घडलं की सगळेच झाले हैराण!
6
Wife सोबत मिळून पोस्टाच्या ‘या’ स्कीममध्ये करा गुंतवणूक; महिन्याला मिळेल ₹९२५० चं फिक्स व्याज
7
तुमच्यावर कोणी करणी केलीय का? घरावर बाहेरची शक्ती कार्य करतेय का? कसे ओळखाल? ४ संकेत मिळतात
8
११ वर्षांनी अद्भूत योगात मकरसंक्रांती २०२६: संक्रमण पुण्य काल कधी? पाहा, महत्त्व-मान्यता
9
इराणच्या खामेनी विरोधात बंड पुकारणं पडणार महागात! 'या' २६ वर्षीय तरुणाला दिली जाणार फाशी?
10
Makar Sankranti 2026: संक्रांतीला विशेषतः स्त्रियांनी 'या' गोष्टींचे करावे दान; होतो दुप्पट लाभ आणि कुटुंबाची प्रगती 
11
टॅरिफविरोधात सर्वोच्च न्यायालयाचा निकाल आला तर अमेरिका संपली...; डोनाल्ड ट्रम्प यांची मोठी भीती
12
चांदीची ऐतिहासिक भरारी! २.६८ लाखांचा टप्पा पार; आता ३ लाखांचे लक्ष्य? खरेदीची संधी की नफावसुलीची वेळ?
13
२०२६ची पहिली षट्तिला एकादशी: अनंत कृपा लाभेल, काही कमी पडणार नाही; ‘असे’ करा व्रत पूजन!
14
अमेरिकेने व्हेनेझुएलावर अज्ञात शस्त्र वापरले, मादुरोंचा गार्ड म्हणाला, "नाक-तोंडातून रक्त येत होतं आणि..."
15
IMPS द्वारे पैसे पाठवणं महागणार; 'या' दिग्गज सरकारी बँकेनं कोट्यवधी ग्राहकांना दिला मोठा झटका
16
PNB मध्ये जमा करा ₹२,००,०००, मिळेल ₹८१,५६८ चं फिक्स व्याज; जाणून घ्या संपूर्ण स्कीम
17
इथे कंपन्यांना सर्व्हिस सेंटर उघडता येईनात...! मारुती पेट्रोल पंपावरच कार सर्व्हिस करून देणार...
18
इराणसोबत व्यापार कराल तर २५% टॅरिफ द्यावा लागेल...! ट्रम्प यांची पुन्हा धमकी; या देशांवर होणार थेट परिणाम
19
मराठी मुलांना नोकरी देण्यास उद्योगपतीचे स्वागत केले; गैर काय? फडणवीस यांचा ठाकरेंवर हल्लाबोल
20
तातडीने इराण सोडा, आर्मेनिया किंवा तुर्कीमार्गे बाहेर पडा! अमेरिकेचे आपल्या नागरिकांना आदेश
Daily Top 2Weekly Top 5

नागपूर जिल्ह्यात वाढलेल्या रुग्णांचे ओझे शहरावर का?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 15, 2020 21:19 IST

मंगळवारी सोशल मीडियावर दुपारी १४८ रुग्ण पॉझिटिव्ह आल्याचा आकडा फिरत होता. त्यामुळे शहरवासीय चिंतेत पडले. अखेर इतके रुग्ण कसे काय वाढले. हे रुग्ण कोणत्या परिसरातील आहे, ही आकडेवारी खरी आहे काय,असे प्रश्न त्यांना पडले.

ठळक मुद्देकोविड-१९ पॉझिटिव्हच्या आकड्यांमध्ये अडकले शहरवासी

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : कोविड-१९ पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या आणि वस्त्यांबाबत शहरवासीयांना विशेष उत्सुकता आहे. त्यांच्या परिसरात तर कुणी पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आलेला नाही ना याची माहिती त्यांना जाणून घ्यायची असते. मंगळवारी सोशल मीडियावर दुपारी १४८ रुग्ण पॉझिटिव्ह आल्याचा आकडा फिरत होता. त्यामुळे शहरवासीय चिंतेत पडले. अखेर इतके रुग्ण कसे काय वाढले. हे रुग्ण कोणत्या परिसरातील आहे, ही आकडेवारी खरी आहे काय,असे प्रश्न त्यांना पडले. जिल्हा प्रशासनाने विविध प्रयोगशाळेत तपासलेल्या नमुन्यांच्या आधारावर ही माहिती जारी केली. परंतु परिसराचा उल्लेख केला नव्हता. केवळ नागपूर जिल्हा असे लिहिले होते. दुसरीकडे मनपातर्फे दररोज फेसबुक,ट्विटर, वेबसाईटच्या माध्यमातून आकडेवारी जारी केली जाते. त्यांनी सायंकाळी ५ वाजता शहरात केवळ ४२ रुग्ण पॉझिटिव्ह आढळल्याचे सांगितले होते. जिल्हा प्रशासन आणि मनपाच्या आकडेवारीत शहरवासीय अडकून पडले.मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी काही दिवसापूर्वी एक वक्तव्य केले होते की, नागरिक सुधारले नाही तर पुन्हा लॉकडाऊन लावण्यात येईल. या वक्तव्यानंतर नागपुरात पुन्हा लॉकडाऊन लागणार असल्याचे मॅसेज सोशल मीडियावर खूप फिरू लागले. या मॅसेजमध्ये कधी १४ जुलैपासून तर कधी १६ जुलैपासून लॉकडाऊन लागणार असल्याचा उल्लेख करण्यात येत होता. परंतु या फेक मॅसेजबाबत ना जिल्हा प्रशासन ना मनपा प्रशासनाने काही वक्तव्य जारी केले. अशा परिस्थितीत लॉकडाऊनमुळे त्रस्त झालेल्या नागरिकांना पुन्हा लॉकडाऊन नको आहे. नागरिकांचे म्हणणे आहे की, जिल्ह्यात जर रुग्णांची संख्या वाढत असेल तर शहरात लॉकडाऊन लावण्याचा इशारा देणे कुठपर्यंत योग्य आहे. जिल्ह्यात लॉकडाऊनबाबत असे कुठल्याही प्रकारचे संकेत जिल्हा प्रशासनाने जारी केलेले नाहीत. शहरवासी चिंतेत आहे. दुविधेत अडकले आहेत. सर्वप्रथम नागपूर शहरातील पॉझिटिव्ह रुग्णांचे खरे आकडे आणि परिसराची माहिती देण्यात यावी,अशी मागणी त्यांनी केली आहे.मंगळवारी जिल्हा प्रशासनाने नागपूर जिल्ह्यात सायंकाळी ५ वाजेपर्यंत १४८ रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आल्याची घोषणा केली. यात एम्सच्या प्रयोगशाळेत ६८, नीरीच्या प्रयोगशाळेत १८, माफसूच्या प्रयोगशाळेत १६, मेयोच्या १३, मेडिकलच्या ७, खासगी प्रयोगशाळेत ९, अ‍ॅण्टीजन टेस्टमध्ये ६ आणि इतर प्रयोगशाळेत ११ नमुने पॉझिटिव्ह आढळल्याची माहिती देण्यात आली. परंतु हे रुग्ण नेमके कोणत्या परिसरातील किंवा तालुक्यातील आहेत, याचा उल्लेख केला नाही.दुसरीकडे मनपाने जारी केलेल्या माहितीमध्ये सायंकाळी ५ वाजेपर्यंत शहरात ४६ रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आल्याचे सांगितले. रात्री ९ वाजेपर्यंत हा आकडा ६० पर्यंत पोहोचला. अशा परिस्थितीत जिल्हा प्रशासन व मनपा प्रशासनाच्या आकडेवारीतील सायंकाळी ५ वाजेपर्यंत अंतर पाहिले तर एकूण १०२ रुग्ण ग्रामीण भागातील होतात. परंतु जिल्ह्यात कामठी (२६ रुग्ण) वगळले तर उर्वरित रुग्णांचे नमुने कोणत्या तालुक्यातील आहेत, हा प्रश्न उपस्थित होतो. मंगळवारी २०११ नमुने तपासण्यात आले. दुसरीकडे मे-जून महिन्यात ३०० ते ४०० रुग्णांची तपासणी केली जात होती.अखेर मनपा आयुक्त मुंढे गप्प का?नागपूर शहरातील कोविड-१९ च्या संसर्गित रुग्णांसोबतच जिल्ह्यातील रुग्णांचे आकडे जोडून दाखविल्यामुळे रुग्णांची संख्या मोठी दिसून येत आहे. जिल्ह्यात मागील काही दिवसांपासून संसर्ग झपाट्याने वाढला आहे. जिल्ह्यात वाढत्या रुग्णांमुळे जर शहरात लॉकडाऊन लावले जात असेल तर शहरवासीयांवर हा अन्याय होईल. संबंधित प्रकरणात मनपा आयुक्त तुकाराम मुंढे हे काही बोलत नसल्याने नागरिक चिंतेत पडले आहे. ज्या पद्धतीने लॉकडाऊनदरम्यान व्हिडिओद्वारे नागरिकांना सतर्क व नियमांचे पालन करण्याचे आवाहन केले होते, त्याच धर्तीवर मुंढे यांनी समोर येऊन नागरिकांना हेही सांगितले पाहिजे की, नागपूर शहराच्या तुलनेत ग्रामीण भागातील कोरोना रुग्णांची संख्या अधिक आहे.शहरावर का लादले जात आहेत रुग्णमागील काही दिवसापासून कोविड-१९ रुग्णांची संख्या वाढताना दिसत आहे. परंतु प्रशासनाकडून कुठल्या भागात रुग्ण वाढताहेत ते सांगितले जात नाही. जिल्ह्यातील विविध भागांमध्ये संसर्ग वाढत आहे. परंतु त्यांनाही आता नागपूर शहरातील रुग्णांसोबत जोडून दाखविले जात आहे. अखेर प्रशासनाला हे दोन्ही आकडे आजच जोडून का दाखवावे लागत आहे, असा प्रश्न आता नागरिक विचारू लागले आहेत. शहरवासीयांनी लॉकडाऊन पाहिले आहे. त्यामुळे पुन्हा लॉकडाऊन लागावे असे कुणालाही वाटत नाही. परंतु जिल्ह्यातील कोरोना रुग्णांना शहरातील रुग्णांशी जोडून दाखविले जात असल्याने शहरात लॉकडाऊन लागणार असल्याची अफवा पसरली आहे. त्यामुळे हे रोखण्यासाठी प्रशासनाला पुढाकार घेण्याची गरज आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याnagpurनागपूर