शहरं
Join us  
Trending Stories
1
ते शिट्ट्या वाजवून मजा घेत होते का? उत्तरकाशीच्या धरालीमधील ढगफुटीवेळच्या व्हिडीओवर अनेक प्रश्न...
2
'महादेवी' परतणार! नांदणी मठाजवळच हत्तीणीसाठी पुनर्वसन केंद्र उभारण्यास 'वनतारा' मदत करणार
3
८० वर्षांपूर्वी उत्खननात सापडलेले शिवमंदिर; आता पुन्हा धराली दुर्घटनेत जमिनीखाली गाडले गेले...
4
Video: चीन आता 'लांडग्याला' युद्धावर पाठविणार, मिनिटाला ६० गोळ्या झाडणारा रोबो; सैन्यासोबत सरावाचा व्हिडीओ... 
5
टी-२० अन् वनडेत फर्स्ट क्लास; पण टेस्टमध्ये ATKT; असं आहे हेडमास्टर गंभीरचं 'प्रगती पुस्तक'
6
IPLमधील या क्रिकेटपटूने ॲडल्ट साईटवर केली एंट्री, क्रिकेटप्रेमी अवाक्, आपल्या निर्णयाबाबत म्हणाला...
7
कशी सुरु झाली मृणाल ठाकूर अन् धनुषची लव्हस्टोरी?, 'तो' सेल्फी पुन्हा होतोय व्हायरल
8
एकदा करून बघाच! वजन कमी होईल अन् केस गळणंही थांबेल... इवल्याशा वेलचीचे मोठे फायदे
9
रेल्वे कंत्राटावरून वाद, ३ मराठी भावंडांवर परप्रांतीयांचा प्राणघातक हल्ला; रॉडने डोके फोडले अन् रचला बनाव
10
तुमचा iPhone धोक्यात? ॲपल युजर्ससाठी भारत सरकारचा 'रेड अलर्ट', लगेच 'हे' काम करा!
11
रक्षाबंधन २०२५: गजलक्ष्मी योगात श्रावण पौर्णिमा; लक्ष्मीकृपेने 'या' राशींच्या आनंदाला येणार भरती
12
'या' १६ देशांमध्ये चिकनगुनियाचा कहर, चीनमध्ये ७००० रुग्ण; अमेरिकेतही अलर्ट जारी
13
तेल, टॅरिफ अन् S-400..; डोनाल्ड ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतर अजित डोवाल रशियात दाखल
14
शाळेच्या गेटमधून आत शिरली, अचानक चक्कर येऊन कोसळली; सहावीतील विद्यार्थिनीचा हृदयविकाराने मृत्यू
15
Dadar Kabutarkhana: दादरमध्ये जोरदार राडा! कबुतरखान्यावरील ताडपत्र्या आंदोलकांनी हटविल्या, पोलिसांसोबत झटापट
16
दुसरा श्रावण गुरुवार: १० मिनिटांत होणारे प्रभावी ‘गुरुस्तोत्र’ म्हणा; दत्तगुरूंची कृपा मिळवा
17
डोळ्यांवर काकडी ठेवल्याने खरंच रिलॅक्स वाटतं की फक्त ब्यूटी ट्रेंड? सत्य समजल्यावर वाटेल आश्चर्य
18
शेतकऱ्यांसाठी १ दिवस मुंबई बंदचा आवाज उठवावा; 'शिवतीर्थ'वर बच्चू कडूंनी घेतली राज ठाकरेंची भेट
19
अपेक्षाभंग! RBI च्या निर्णयानंतर बाजार गडगडला; २.१३ लाख कोटींचा फटका! 'या' क्षेत्रात सर्वाधिक घसरण
20
...अन् धूर्त कोल्होबानं क्रिकेटच्या पंढरीतील Live मॅच थांबवली, नेमकं काय घडलं?

नागपूर जिल्ह्यात वाढलेल्या रुग्णांचे ओझे शहरावर का?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 15, 2020 21:19 IST

मंगळवारी सोशल मीडियावर दुपारी १४८ रुग्ण पॉझिटिव्ह आल्याचा आकडा फिरत होता. त्यामुळे शहरवासीय चिंतेत पडले. अखेर इतके रुग्ण कसे काय वाढले. हे रुग्ण कोणत्या परिसरातील आहे, ही आकडेवारी खरी आहे काय,असे प्रश्न त्यांना पडले.

ठळक मुद्देकोविड-१९ पॉझिटिव्हच्या आकड्यांमध्ये अडकले शहरवासी

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : कोविड-१९ पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या आणि वस्त्यांबाबत शहरवासीयांना विशेष उत्सुकता आहे. त्यांच्या परिसरात तर कुणी पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आलेला नाही ना याची माहिती त्यांना जाणून घ्यायची असते. मंगळवारी सोशल मीडियावर दुपारी १४८ रुग्ण पॉझिटिव्ह आल्याचा आकडा फिरत होता. त्यामुळे शहरवासीय चिंतेत पडले. अखेर इतके रुग्ण कसे काय वाढले. हे रुग्ण कोणत्या परिसरातील आहे, ही आकडेवारी खरी आहे काय,असे प्रश्न त्यांना पडले. जिल्हा प्रशासनाने विविध प्रयोगशाळेत तपासलेल्या नमुन्यांच्या आधारावर ही माहिती जारी केली. परंतु परिसराचा उल्लेख केला नव्हता. केवळ नागपूर जिल्हा असे लिहिले होते. दुसरीकडे मनपातर्फे दररोज फेसबुक,ट्विटर, वेबसाईटच्या माध्यमातून आकडेवारी जारी केली जाते. त्यांनी सायंकाळी ५ वाजता शहरात केवळ ४२ रुग्ण पॉझिटिव्ह आढळल्याचे सांगितले होते. जिल्हा प्रशासन आणि मनपाच्या आकडेवारीत शहरवासीय अडकून पडले.मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी काही दिवसापूर्वी एक वक्तव्य केले होते की, नागरिक सुधारले नाही तर पुन्हा लॉकडाऊन लावण्यात येईल. या वक्तव्यानंतर नागपुरात पुन्हा लॉकडाऊन लागणार असल्याचे मॅसेज सोशल मीडियावर खूप फिरू लागले. या मॅसेजमध्ये कधी १४ जुलैपासून तर कधी १६ जुलैपासून लॉकडाऊन लागणार असल्याचा उल्लेख करण्यात येत होता. परंतु या फेक मॅसेजबाबत ना जिल्हा प्रशासन ना मनपा प्रशासनाने काही वक्तव्य जारी केले. अशा परिस्थितीत लॉकडाऊनमुळे त्रस्त झालेल्या नागरिकांना पुन्हा लॉकडाऊन नको आहे. नागरिकांचे म्हणणे आहे की, जिल्ह्यात जर रुग्णांची संख्या वाढत असेल तर शहरात लॉकडाऊन लावण्याचा इशारा देणे कुठपर्यंत योग्य आहे. जिल्ह्यात लॉकडाऊनबाबत असे कुठल्याही प्रकारचे संकेत जिल्हा प्रशासनाने जारी केलेले नाहीत. शहरवासी चिंतेत आहे. दुविधेत अडकले आहेत. सर्वप्रथम नागपूर शहरातील पॉझिटिव्ह रुग्णांचे खरे आकडे आणि परिसराची माहिती देण्यात यावी,अशी मागणी त्यांनी केली आहे.मंगळवारी जिल्हा प्रशासनाने नागपूर जिल्ह्यात सायंकाळी ५ वाजेपर्यंत १४८ रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आल्याची घोषणा केली. यात एम्सच्या प्रयोगशाळेत ६८, नीरीच्या प्रयोगशाळेत १८, माफसूच्या प्रयोगशाळेत १६, मेयोच्या १३, मेडिकलच्या ७, खासगी प्रयोगशाळेत ९, अ‍ॅण्टीजन टेस्टमध्ये ६ आणि इतर प्रयोगशाळेत ११ नमुने पॉझिटिव्ह आढळल्याची माहिती देण्यात आली. परंतु हे रुग्ण नेमके कोणत्या परिसरातील किंवा तालुक्यातील आहेत, याचा उल्लेख केला नाही.दुसरीकडे मनपाने जारी केलेल्या माहितीमध्ये सायंकाळी ५ वाजेपर्यंत शहरात ४६ रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आल्याचे सांगितले. रात्री ९ वाजेपर्यंत हा आकडा ६० पर्यंत पोहोचला. अशा परिस्थितीत जिल्हा प्रशासन व मनपा प्रशासनाच्या आकडेवारीतील सायंकाळी ५ वाजेपर्यंत अंतर पाहिले तर एकूण १०२ रुग्ण ग्रामीण भागातील होतात. परंतु जिल्ह्यात कामठी (२६ रुग्ण) वगळले तर उर्वरित रुग्णांचे नमुने कोणत्या तालुक्यातील आहेत, हा प्रश्न उपस्थित होतो. मंगळवारी २०११ नमुने तपासण्यात आले. दुसरीकडे मे-जून महिन्यात ३०० ते ४०० रुग्णांची तपासणी केली जात होती.अखेर मनपा आयुक्त मुंढे गप्प का?नागपूर शहरातील कोविड-१९ च्या संसर्गित रुग्णांसोबतच जिल्ह्यातील रुग्णांचे आकडे जोडून दाखविल्यामुळे रुग्णांची संख्या मोठी दिसून येत आहे. जिल्ह्यात मागील काही दिवसांपासून संसर्ग झपाट्याने वाढला आहे. जिल्ह्यात वाढत्या रुग्णांमुळे जर शहरात लॉकडाऊन लावले जात असेल तर शहरवासीयांवर हा अन्याय होईल. संबंधित प्रकरणात मनपा आयुक्त तुकाराम मुंढे हे काही बोलत नसल्याने नागरिक चिंतेत पडले आहे. ज्या पद्धतीने लॉकडाऊनदरम्यान व्हिडिओद्वारे नागरिकांना सतर्क व नियमांचे पालन करण्याचे आवाहन केले होते, त्याच धर्तीवर मुंढे यांनी समोर येऊन नागरिकांना हेही सांगितले पाहिजे की, नागपूर शहराच्या तुलनेत ग्रामीण भागातील कोरोना रुग्णांची संख्या अधिक आहे.शहरावर का लादले जात आहेत रुग्णमागील काही दिवसापासून कोविड-१९ रुग्णांची संख्या वाढताना दिसत आहे. परंतु प्रशासनाकडून कुठल्या भागात रुग्ण वाढताहेत ते सांगितले जात नाही. जिल्ह्यातील विविध भागांमध्ये संसर्ग वाढत आहे. परंतु त्यांनाही आता नागपूर शहरातील रुग्णांसोबत जोडून दाखविले जात आहे. अखेर प्रशासनाला हे दोन्ही आकडे आजच जोडून का दाखवावे लागत आहे, असा प्रश्न आता नागरिक विचारू लागले आहेत. शहरवासीयांनी लॉकडाऊन पाहिले आहे. त्यामुळे पुन्हा लॉकडाऊन लागावे असे कुणालाही वाटत नाही. परंतु जिल्ह्यातील कोरोना रुग्णांना शहरातील रुग्णांशी जोडून दाखविले जात असल्याने शहरात लॉकडाऊन लागणार असल्याची अफवा पसरली आहे. त्यामुळे हे रोखण्यासाठी प्रशासनाला पुढाकार घेण्याची गरज आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याnagpurनागपूर