शहरं
Join us  
Trending Stories
1
२० वर्षांचा ईएमआय १५ वर्षांत संपणार, घर-वाहन कर्ज झाले आणखी स्वस्त, ‘आरबीआय’कडून रेपो दरात कपात
2
इंडिगो नव्हे, इंडि-नो-गो! दिवसभरात १ हजार उड्डाणे, ३ दिवसांत २ हजारांपेक्षा जास्त विमानसेवा रद्द
3
RBI नं रेपो दरात कपात करताच 'या' दोन सरकारी बँकांनी कर्ज केली स्वस्त; पाहा काय आहेत नवे दर?
4
आजचे राशीभविष्य, ०६ डिसेंबर २०२५: कुटुंबात मतभेदाचे प्रसंग उद्भवतील, नवीन कामात अपयशी होण्याची शक्यता
5
रशिया भारताला अखंड तेलपुरवठा करत राहणार; आर्थिक सहकार्याचा ५ वर्षांचा आराखडा निश्चित
6
अजबच! अचानक खेळपट्टीने गिळला चेंडू आणि सामनाच करावा लागला रद्द, WBBL मध्ये नेमकं काय घडलं?   
7
आरक्षण देणाऱ्या मुख्यमंत्र्यांप्रति अनाथ कृतज्ञ होतात तेव्हा...; वर्षा निवासस्थानी पार पडला भावुक सोहळा
8
विशेष लेख: ‘आधी, नंतर आणि शेवटीही फक्त भारतीयच!’  
9
वर्षात चार वेळा ईएमआय झाला कमी!घर, कार घेणे स्वस्त; आरबीआयचा सर्वसामान्यांना दिलासा
10
‘नगरां’च्या निवडणुकीची २१ डिसेंबरलाच मतमोजणी; खंडपीठाचा निर्णय सुप्रीम कोर्टाकडून कायम
11
पुतीन परतले, पुढे...?
12
शाकाहारी असाल तरच तुम्हाला फ्लॅट देणार! मराठी माणसाला नाकारले घर?
13
“४० वर्षीय तरुणाला लाजवणारी कार्यक्षमता, २०२९ ला मोदीच PM असतील”; CM फडणवीसांनी केले स्पष्ट
14
शिक्षकांचे संच मान्यता निकष, टीईटी सक्तीविरोधात आंदोलन; मुंबईमध्ये शाळा बंदला संमिश्र प्रतिसाद
15
कामगार युनियनवरून ठाकरेंची शिवसेना-भाजपमध्ये राडा, वरळीत तणाव; पोलिसांचा कार्यकर्त्यांवर लाठीचार्ज
16
दोन दिवसीय भारत दौऱ्याची सांगता, पुतिन रशियाला जाण्यासाठी रवाना; PM मोदींचे मानले विशेष आभार
17
‘मतचोरी’विरोधात काँग्रेसची रॅली; मातोश्रीवर येऊन दिले निमंत्रण, उद्धव ठाकरे दिल्लीला जाणार?
18
सेवा-समर्पणाच्या वाटेवरच्या ध्येयनिष्ठ प्रवाशाची कहाणी
19
“इतर पक्ष कसे चालावे हेही देवाभाऊ ठरवतात, सर्वांचे राजकीय गुरू”; भाजपा नेत्यांनी केले कौतुक
20
बाबासाहेबांचा मूलमंत्र आजही मार्गदर्शक; ‘भीम ज्योत’चे एकनाथ शिंदे यांच्या हस्ते लोकार्पण
Daily Top 2Weekly Top 5

'सावरकर कुठं अन् हे आमदार कुठं? राजकारण करु नये, शेतकऱ्यांचे प्रश्न महत्वाचे'

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 16, 2019 16:05 IST

सावरकरांच्या मुद्द्यावरील चर्चेदरम्यान सभागृहात शिवसेना आमदार शांत बसले होते.

मुंबई - हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी सभागृहात स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या मुद्द्यावरुन गोंधळ निर्माण झाला. भाजपाआमदारांनी मी सावरकर असं लिहिलेल्या भगव्या टोप्या परिधान करुन सरकारचा निषेध नोंदवला.  स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या संदर्भात आम्ही सभागृहात काढलेले गौरवोद्गार आज विधिमंडळ कामकाजातून काढून टाकले. त्यामुळे हे सभागृह भारताचे की ब्रिटिशांच्या विधानसभेचे, असा प्रश्न माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थित केला. मात्र, राहुल गांधींच्या सावरकरांवरील विधानावरुन झालेल्या राजकारणावर आमदारबच्चू कडू यांनी टोकाची प्रतिक्रिया दिली आहे. 

सावरकरांच्या मुद्द्यावरील चर्चेदरम्यान सभागृहात शिवसेना आमदार शांत बसले होते. शिवसेना सत्तेसाठी लाचार झाली असून आम्ही सावरकरांचा अवमान खपवून घेणार नाही, असे फडणवीस यांनी म्हटले होते. भाजपा आमदारांनी सभागृहात आणि सभागृहाबाहेर सत्ताधारी पक्षाविरुद्ध आवाज उठवला. याबाबत बोलताना, बच्चू कडूंनी शेतकऱ्यांचे प्रश्न महत्त्वाचे असल्याचे म्हटले. सध्या, शेतकऱ्यांचा मुद्दा महत्त्वाचा आहे, पक्ष कुठलाही असू द्यात. भावनेचं धर्माचं राजकारण करुन मतं अधिक पेटीत कसे पक्के होतील, हा खेळ सर्वच पक्षांकडून सुरू आहे. हा खेळ थांबला पाहिजे. मुळात जिथं मरण अटळ आहे, ते मुद्दे समोर घेऊन काम करणे गरजेचं आहे, असे आमदार बच्चू कडूंनी म्हटलंय. 

सावरकर कुठं आणि हे भाजपाचे आमदार कुठं, मी सावरकर लिहिताना थोडी लाज-लज्जा ठेवायला नको का? असा प्रश्नही बच्चू कडूंनी उपस्थित केला आहे. दरम्यान, बच्चू कडू हे अपक्ष आमदार आहेत, त्यामुळे ते वाट्टेल ते बोलतात. बच्चू कडू हे रंग बदलणाऱ्या सरड्यासारखे व्यक्ती आहेत, असा टोलाही भाजपा आमदार संजय कुटे यांनी कडूंना लगावला आहे. 

दरम्यान, सावरकर यांच्याबद्दल बोलण्यापासून आम्हाला कोणीही थांबवू शकत नाही. हिंदुह्रदयसम्राट स्वातंत्र्यवीर सावरकर हे महाराष्ट्राचे दैवत आहे. आमच्यावर हक्कभंग आला तरी चालेल. पण, आमच्याकडून त्यांचा अपमान कदापि सहन केला जाणार नाही. आमचा संघर्ष आम्ही सभागृहातही चालू ठेवू, प्रसंगी सभागृहाबाहेरही करू. जोपर्यंत राहुल गांधी या देशाची माफी मागत नाही, तोपर्यंत हा संघर्ष अविरत राहील, असेही फडणवीस म्हणाले.

टॅग्स :Bachhu Kaduबच्चू कडूBJPभाजपाMLAआमदारWinter Session Maharashtraविधानसभा हिवाळी अधिवेशन