शहरं
Join us  
Trending Stories
1
Red Fort Blast Video: अनेकांच्या उडाल्या चिंधड्या! स्फोटानंतरची दृश्ये बघून होईल थरकाप, नेमकी कुठे घडली घटना?
2
Video: मोठी बातमी! दिल्लीत लाल किल्ल्याजवळ भीषण स्फोट, 8 जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
3
कुणाचा हात तुटून पडला, कुणाचा कोथळा बाहेर आला; प्रत्यक्षदर्शीने सांगितली दिल्ली स्फोटाची हादरवून टाकणारी घटना
4
'त्या' जमीन गैरव्यवहार प्रकरणात पार्थ पवार, शीतल तेजवानींना पोलिसांकडून क्लीन चिट
5
भयानक कोसळणार ...! मी १९७१ पासून सोने खरेदी करतोय, पण...; रॉबर्ट कियोसाकी यांच्या दाव्याने खळबळ 
6
दहशतवाद्यांच्या टोळीत महिला डॉक्टरही सामील, थेट पाकिस्तानशी कनेक्शन; कारमध्ये घेऊन फिरत होती एके ४७!
7
जडेजाला संघाबाहेर काढण्यात धोनी सगळ्यात पुढे असेल! माजी क्रिकेटरनं त्यामागचं कारणही सांगून टाकलं
8
भारताच्या शेजारी देशांत भरतो 'नवरीचा बाजार', खरेदी करण्यासाठी चीनमधून येतात लोक! काय आहे प्रकार?
9
राष्ट्रवादीने हटवले तरी रुपाली ठोंबरे पाटील 'प्रवक्त्या'च; पोस्ट करत म्हणाल्या, 'अजित पवारांना भेटून...'
10
ताजमहालसमोर साखरपुडा...! दोनवेळा ऑस्ट्रेलियाला वर्ल्डकप जिंकविणारी भारताची सून होणार; कोण आहे ती...
11
अभिनेते धर्मेंद्र व्हेंटिलेटरवर? आयसीयूत सुरु आहेत उपचार; टीमने दिली हेल्थ अपडेट, म्हणाले...
12
"मी तुझ्या बापाला मारलं, मृतदेह सुटकेसमध्ये..."; बायकोने नवऱ्याला संपवलं, लेकीला केला फोन
13
Honeymoon Destinations : गुलाबी थंडीत रोमँटिक हनिमून प्लॅन करताय? भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट!
14
"पंक्चर बनवणारे येऊन...!", बिहारमध्ये योगी आदित्यनाथांची तुफान बॅटिंग; विरोधकांवर थेट हल्लाबोल
15
"जबरदस्तीनं मिठीत घ्यायचा, शारीरिक जवळीक साधायचा, अन्..."; महिला क्रिकेटरच्या आरोपांनी खळबळ
16
धर्मेंद्र यांच्या तब्येतीबद्दल कळताच हेमा मालिनी रुग्णालयात पोहोचल्या, म्हणाल्या, "आम्ही सगळेच..."
17
मुंबईत काँग्रेस स्वबळावर लढणार तर उद्धव ठाकरेंसोबत युतीआधीच मनसेने 'इतक्या' जागांची केली तयारी
18
'या' मुस्लिम देशाची अमेरिकेशी वाढतेय जवळीक! ब्लॅकलिस्टमधून बाहेर पडताच, ८० वर्षांनी अमेरिकेत एन्ट्री
19
'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण' योजना बंद होणार? एकनाथ शिंदेंकडून मोठी घोषणा, e-KYC देखील...
20
धक्कादायक! बाथरूममध्ये आंघोळीसाठी गेली, पण तासभर बाहेरच नाही आली; दरवाजा तोडला तर...

पाणीपुरवठ्याच्या कामांचे करारनामे कधी पूर्ण होणार?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 4, 2020 19:09 IST

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदा टंचाईची कामे ग्रामपंचायतीच्या माध्यमातून करण्याच्या सूचना केल्या आहेत. मात्र, अद्याप ग्राम पातळीवर कामासंदर्भातील करारनाम्याचे काम पूर्ण झाले नाही, त्यामुळे प्रत्यक्ष कामाला सुरुवात कधी होणार, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

ठळक मुद्देमे महिना सुरू होऊनही टंचाईच्या कामांना सुरुवात नाही : सीमेलगतच्या गावांमध्ये टंचाईला सुरुवात

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : मे महिन्याला सुरुवात झाली आहे. त्याचसोबत ग्रामीण भागामध्ये पाण्याच्या टंचाईलाही सुरुवात झाली आहे. दरवर्षी उन्हाळ्यात निर्माण होणारी टंचाईची परिस्थिती लक्षात घेता, जिल्ह्याच्या टंचाई आराखड्यासाठी ३१ कोटींचा निधी मंजूर झाला आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदा टंचाईची कामे ग्रामपंचायतीच्या माध्यमातून करण्याच्या सूचना केल्या आहेत. मात्र, अद्याप ग्राम पातळीवर कामासंदर्भातील करारनाम्याचे काम पूर्ण झाले नाही, त्यामुळे प्रत्यक्ष कामाला सुरुवात कधी होणार, असा प्रश्न उपस्थित होत आहे.कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सरकारने शासकीय कार्यालयांत कर्मचाऱ्यांची संख्या कमी केली होती. त्यामुळे जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागाकडून टंचाई आराखड्याची निविदा प्रक्रिया पूर्ण झालेली नव्हती. दरम्यान, शासनाने ही कामे ग्रामपंचायतींच्या माध्यमातून करण्यावर भर देण्याच्या सूचना केल्या. त्यासाठी ग्रामपंचायतीना ग्रामीण पाणीपुरवठा विभागाच्या तालुकास्तरीय कार्यालयासोबत कामासंदर्भातील करारनामा करावा लागणार आहे. यानंतरच त्यांना त्यांच्या गावामध्ये पाणीपुरवठा योजनेची कामे करावी लागणार आहेत. यंदा जिल्ह्यात टंचाई आराखड्याच्या तीन टप्प्यांमध्ये ९०९ गावांमध्ये २६३ वर नळयोजना विशेष दुरुस्तीची कामे, ३८१ बोअरवेल, २ गावांमध्ये तात्पुरती पूरक नळयोजना, २१२ विहीर खोलीकरण, ८७ गावांमध्ये टँकरद्वारे पाणीपुरवठा करणे, ५०३ गावांमध्ये खासगी विहीर अधिग्रहण करणे आदी कामे करावयाची आहेत. ही सर्व कामे करण्यासाठी ३० जूनपर्यंतची मुदत देण्यात येत असते. परंतु कोरोनामुळे सर्व कामे थांबली आहेत. त्यातच उन्हाळ्यामुळे शहर सीमेलगतच्या व ग्रामीण भागातील नागरिकांना पाणीटंचाईला तोंड द्यावे लागत आहे.शहर सीमेलगतच्या कामठी तालुक्यातील बिडगाव व तरोडी (खु.) या दोन गावांमध्ये गेल्या ३ एप्रिलपासून तीन टँकरद्वारे तेथील ग्रामस्थांची तहान भागविण्यात येत आहे. तर जिल्ह्यातील कुही, भिवापूर व नरखेड या तालुक्यांतील सुमारे १२ वर गावांमध्ये खासगी विहिरींचे अधिग्रहण करुन तेथील ग्रामस्थांना पाणी उपलब्ध करून दिले जात आहे. विशेष म्हणजे ग्रामीण भागात आजही पाण्याची ओरड आहेच. मात्र, ते शासकीय कागदोपत्री येऊ दिल्या जात नसल्याचा आरोप आता ग्रामीण जनतेकडून होत आहे.

टॅग्स :water scarcityपाणी टंचाईnagpurनागपूर