शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

दीक्षाभूमीच्या विकासकामांना सुरुवात कधी होणार? भदंत आर्य नागार्जुन सुरेई ससाई यांचा सवाल

By आनंद डेकाटे | Updated: July 19, 2025 19:44 IST

Nagpur : धम्मचक्र प्रवर्तनदिनाला केवळ अडीच महिने शिल्लक, मुख्यमंत्री फडणवीस यांना पुन्हा दिले स्मरणपत्र

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : पवित्र दीक्षाभूमीवरील बहुप्रतीक्षित विकासकामे रखडलेली आहेत. राज्य सरकारकडून २०० कोटी रुपये मंजूर करूनही तांत्रिक अडचणीमुळे काम बंद आहे. तीकधी सुरू होणार असा सवाल करीत अवघ्या अडीच महिन्यांवर आलेल्या धम्मचक्र प्रवर्तनदिनाच्या पार्श्वभूमीवर दीक्षाभूमीवरील अर्धवट कामे तातडीने पूर्ण करावीत, अशी मागणी डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीचे अध्यक्ष तथा धम्मसेना नायक भदंत आर्य नागार्जुन सुरेई ससाई यांनी केली आहे.

भदंत ससाई यांनी पत्रकारांशी संवाद साधताना म्हटले की, "मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना या रखडलेल्या कामांविषयी पत्र पाठवले असून त्यांनी नागपूर सुधार प्रन्यासला निर्देश दिले आहेत. मात्र प्रत्यक्षात काहीही हालचाल दिसत नाही." दीक्षाभूमीच्या स्तूपात महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे अस्थिकलश असून देश-विदेशातील अनुयायी येथे नित्यनेमाने दर्शनासाठी येतात. मात्र पावसाळ्यात पाणी स्तूपात शिरते आणि मशिनच्या साहाय्याने ते बाहेर काढावे लागते. सध्या तात्पुरत्या उपाययोजनांतर्गत स्तूपाभोवती ताळपत्री लावण्यात आली असली तरी ही समस्या कायमस्वरूपी मार्गी लागावी, अशी मागणी ससाई यांनी केली.

अर्धवट बांधकाम, अधांतरी आश्वासने२०२४ मध्ये सुरू झालेल्या भव्य सभामंचाचे बांधकाम अद्याप पूर्ण झालेले नाही. धम्मचक्र प्रवर्तनदिनासाठी अवघा अडीच महिन्यांचा कालावधी शिल्लक असताना, कार्यक्रम भव्यदिव्य व्हावा, यासाठी हे बांधकाम तातडीने पूर्ण करणे आवश्यक आहे. त्याचप्रमाणे दीक्षाभूमीच्या चारही बाजूंनी असलेली भिंतही जीर्णावस्थेत असून तिचे काम केवळ १० टक्क्यांपर्यंत पोहोचले आहे.

बुद्धमूर्तीसाठी चबुतरा अजूनही अपूर्ण५६ फूट उंच चलीत मुद्रेतील तथागत गौतम बुद्धांच्या मूर्तीसाठी चबुतऱ्याचे कामदेखील सुरू झालेले नाही. याशिवाय सौरऊर्जेवर आधारित थीमबेस लायटिंगची कल्पना देखील प्रत्यक्षात यायची आहे.

"धम्मचक्र प्रवर्तनदिन हा आमच्यासाठी केवळ सोहळा नसून, तो इतिहास आणि प्रेरणेचा दिवस आहे. दीक्षाभूमीला योग्य रूप देणे ही राज्य शासनाची जबाबदारी आहे." “केवळ घोषणा आणि निधी मंजुरी पुरेसे नाही. आंबेडकरी अनुयायांच्या भावना लक्षात घेता, कामात गती आणणे हे सरकारचे कर्तव्य आहे.”— भदंत आर्य नागार्जुन सुरेई ससाई

टॅग्स :Diksha Bhoomi Nagpurदीक्षाभूमीnagpurनागपूरDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस