शहरं
Join us  
Trending Stories
1
Mantha Cyclone: मोंथा चक्रीवादळ किनारपट्टीवर धडकले! वेग प्रतितास 100 किमी, विदर्भाला ऑरेंज अलर्ट
2
वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटची खरंच चौकशी सुरू केली आहे का? मुख्यमंत्री फडणवीसांनी दिले उत्तर
3
"निवडणुकीत लक्ष्मी दर्शन, कुणाला चपटी, कुणाला कोंबडं बकरू लागतं, तयारी ठेवा"; अजित पवारांच्या आमदाराचे विधान
4
पुण्यात भीषण अपघात! फरश्या घेऊन जाणाऱ्या ट्रकची तीन वाहनांना धडक,ट्रकचालकला पोलिसांच्या ताब्यात
5
१० हजारांचं जेवण करून बिल न भरता पळाले; ट्रॅफिकमध्ये झाला घोळ, रेस्टॉरंट मालकाने रस्त्यात गाठलं अन्...
6
वेळेत ब्लाऊज शिवून न देणे टेलरला पडलं महागात; ग्राहक कोर्टाने सुनावली शिक्षा, काय आहे प्रकार?
7
जळगाव जिल्ह्यात एसटी बसचा भीषण अपघात, चालकासह 8 प्रवाशी जखमी
8
"अतिवृष्टीग्रस्त शेतकर्‍यांना आतापर्यंत ८ हजार कोटी वाटप, पुढील १५ दिवसांत ११ हजार कोटी देणार"
9
Mohammed Shami: "मी काही बोललो तर, वाद होईल!" संघ निवडीबाबत उपस्थित होणाऱ्या प्रश्नांवर शमीचं उत्तर
10
"त्यांना फाशीशिवाय दुसरी शिक्षा असूच शकत नाही"; डॉक्टर तरुणी मृत्यू प्रकरणात उदयनराजेंनी लोकांना काय केले आवाहन?
11
Viral Video: फलंदाजाला 'असं' आउट होताना कधीच पाहिलं नसेल; षटकार मारूनंही पंचांनी वर केलं बोट!
12
अजबच! गावठी कुत्रा बनला ज्वेलरी शॉपचा रखवालदार, गळ्यात घालतो ५० तोळ्यांची सोन्याची चेन
13
Inspiring Story: तरुणीला किडनीची गरज, तरुणाला कर्करोग...; गोष्ट एका अनोख्या प्रेमाची!
14
'५० कोटींच्या धमकीला भीक घालत नाही', सुषमा अंधारेंनी रणजितसिंह नाईक निंबाळकरांविरोधात पुरावे दाखवले
15
4 दुचाकी, 6 सिलिंडर...बसमध्ये ठेवलेले 'हे' सामान; भडका उडाल्याने दोघांचा जागीच मृत्यू, डझनभर जखमी
16
UPSC Student Murder: लिव्ह पार्टनरची थंड डोक्याने हत्या, फॉरेन्सिक सायन्सची विद्यार्थिनी अमृताकडून 'ती' एक चूक झाली अन्...
17
'महायुती सरकारचे ११ हजार कोटींचे पॅकेजही ३२ हजार कोटींच्या पॅकेजसारखे फसवेच', हर्षवर्धन सपकाळ यांची टीका
18
मोठी बातमी! कर्जमाफीसाठी परभणी जिल्हाधिकाऱ्यांच्या गाडीवर शेतकऱ्याची दगडफेक
19
ट्रम्प आणि पुतिन यांच्यातील दरी वाढली, रशियन तेल साम्राज्याला मोठा झटका; परदेशी मालमत्ता विकण्यास सुरुवात
20
8th Pay Commission: १४०००, १५००० की १८०००...एक लाख सॅलरीवर किती होणार दरमहा वाढ?

दीक्षाभूमीच्या विकासकामांना सुरुवात कधी होणार? भदंत आर्य नागार्जुन सुरेई ससाई यांचा सवाल

By आनंद डेकाटे | Updated: July 19, 2025 19:44 IST

Nagpur : धम्मचक्र प्रवर्तनदिनाला केवळ अडीच महिने शिल्लक, मुख्यमंत्री फडणवीस यांना पुन्हा दिले स्मरणपत्र

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : पवित्र दीक्षाभूमीवरील बहुप्रतीक्षित विकासकामे रखडलेली आहेत. राज्य सरकारकडून २०० कोटी रुपये मंजूर करूनही तांत्रिक अडचणीमुळे काम बंद आहे. तीकधी सुरू होणार असा सवाल करीत अवघ्या अडीच महिन्यांवर आलेल्या धम्मचक्र प्रवर्तनदिनाच्या पार्श्वभूमीवर दीक्षाभूमीवरील अर्धवट कामे तातडीने पूर्ण करावीत, अशी मागणी डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीचे अध्यक्ष तथा धम्मसेना नायक भदंत आर्य नागार्जुन सुरेई ससाई यांनी केली आहे.

भदंत ससाई यांनी पत्रकारांशी संवाद साधताना म्हटले की, "मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना या रखडलेल्या कामांविषयी पत्र पाठवले असून त्यांनी नागपूर सुधार प्रन्यासला निर्देश दिले आहेत. मात्र प्रत्यक्षात काहीही हालचाल दिसत नाही." दीक्षाभूमीच्या स्तूपात महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे अस्थिकलश असून देश-विदेशातील अनुयायी येथे नित्यनेमाने दर्शनासाठी येतात. मात्र पावसाळ्यात पाणी स्तूपात शिरते आणि मशिनच्या साहाय्याने ते बाहेर काढावे लागते. सध्या तात्पुरत्या उपाययोजनांतर्गत स्तूपाभोवती ताळपत्री लावण्यात आली असली तरी ही समस्या कायमस्वरूपी मार्गी लागावी, अशी मागणी ससाई यांनी केली.

अर्धवट बांधकाम, अधांतरी आश्वासने२०२४ मध्ये सुरू झालेल्या भव्य सभामंचाचे बांधकाम अद्याप पूर्ण झालेले नाही. धम्मचक्र प्रवर्तनदिनासाठी अवघा अडीच महिन्यांचा कालावधी शिल्लक असताना, कार्यक्रम भव्यदिव्य व्हावा, यासाठी हे बांधकाम तातडीने पूर्ण करणे आवश्यक आहे. त्याचप्रमाणे दीक्षाभूमीच्या चारही बाजूंनी असलेली भिंतही जीर्णावस्थेत असून तिचे काम केवळ १० टक्क्यांपर्यंत पोहोचले आहे.

बुद्धमूर्तीसाठी चबुतरा अजूनही अपूर्ण५६ फूट उंच चलीत मुद्रेतील तथागत गौतम बुद्धांच्या मूर्तीसाठी चबुतऱ्याचे कामदेखील सुरू झालेले नाही. याशिवाय सौरऊर्जेवर आधारित थीमबेस लायटिंगची कल्पना देखील प्रत्यक्षात यायची आहे.

"धम्मचक्र प्रवर्तनदिन हा आमच्यासाठी केवळ सोहळा नसून, तो इतिहास आणि प्रेरणेचा दिवस आहे. दीक्षाभूमीला योग्य रूप देणे ही राज्य शासनाची जबाबदारी आहे." “केवळ घोषणा आणि निधी मंजुरी पुरेसे नाही. आंबेडकरी अनुयायांच्या भावना लक्षात घेता, कामात गती आणणे हे सरकारचे कर्तव्य आहे.”— भदंत आर्य नागार्जुन सुरेई ससाई

टॅग्स :Diksha Bhoomi Nagpurदीक्षाभूमीnagpurनागपूरDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस