शहरं
Join us  
Trending Stories
1
एक दिवस फॅन्स अन् क्रिकेटपटू यांच्यातल्या विश्वासाला तडा जाईल, Rohit Sharma चं विधान
2
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
3
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
4
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
5
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
6
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
7
PM Modi vs Congress: "काँग्रेस म्हणजे भ्रष्टाचाराची जननी, त्यांना विकासाची ABCD माहिती नाही"; पंतप्रधान मोदी विरोधकांवर बरसले!
8
राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांच्या सभेत गोंधळ; बॅरिकेड्स तोडल्यामुळे चेंगराचेंगरी
9
RCB चे अभिनंदन न करता MS Dhoni ड्रेसिंग रुममध्ये का परतला? समोर आलं कारण 
10
पंजाब किंग्सची जोरदार फटकेबाजी, सनरायझर्स हैदराबादसमोर दोनशेपार लक्ष्य
11
Video:'भारतीय लहेजाची लाज वाटते?'; Cannes च्या रेड कार्पेटवर इंग्रजी बोलण्याने कियारा ट्रोल
12
Swati Maliwal Case : दिल्ली पोलिसांनी मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानातून सीसीटीव्ही डीव्हीआर जप्त केला
13
श्रेयस अय्यर, इशान किशन यांना BCCI कडून सेकंड चान्स; घेतला गेला मोठा निर्णय 
14
यावेळीही ट्रॉफी जिंकण्याचे RCB चे स्वप्न भंगणार? एक योगायोग अन् चाहत्यांचे टेन्शन वाढले
15
तुमको मिरची लगी तो मैं क्या करू? ठाण्यासाठी ‘करो या मरो’च्या लढाईला सिद्ध व्हा - देवेंद्र फडणवीस 
16
१% ते १००% पर्यंतचा प्रवास! RCB ची गाडी सुस्साट; ५ खेळाडूंमुळे मिळाले प्ले ऑफचे तिकीट
17
नातू प्रज्वल रेवण्णावरील आरोपांवर माजी पंतप्रधान देवेगौडा यांनी मौन सोडले; म्हणाले, दोषी आढळला तर...
18
नॅचरल आईस्क्रीमचे संस्थापक रघुनंदन श्रीनिवास कामथ यांचे निधन; वयाच्या ७० व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास 
19
ते कुणालाच नको होते; एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदाबाबत संजय राऊत यांचा नवा दावा
20
MS Dhoniचा मैदानाबाहेर मारलेला षटकार ठरला CSKच्या पराभवाचे कारण? RCBला मॅच जिंकण्यासाठी झाली मदत

मेट्रो रेल्वेमधील व्हीसीबी अचानक बंद पडते तेव्हा ...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 26, 2019 8:56 PM

एअरपोर्ट मेट्रो स्टेशनवरून खापरीच्या दिशेने निघालेली मेट्रो रेल्वे काही अंतरावर अचानक थांबविण्यात आली. ट्रेनच्या व्हॅक्युम सर्किट ब्रेकरमध्ये (व्हीसीबी) (विद्युत पुरवठा करणारी यंत्रणा) बिघाड झाल्याने ट्रेन थांबविण्यात आली.

ठळक मुद्देमहामेट्रोची मॉक ड्रील : ४६ प्रवाशांना सुरक्षितपणे आणले स्टेशनवर

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : एअरपोर्ट मेट्रो स्टेशनवरून खापरीच्या दिशेने निघालेली मेट्रो रेल्वे काही अंतरावर अचानक थांबविण्यात आली. ट्रेनच्या व्हॅक्युम सर्किट ब्रेकरमध्ये (व्हीसीबी) (विद्युत पुरवठा करणारी यंत्रणा) बिघाड झाल्याने ट्रेन थांबविण्यात आली. लगेच व्हॅक्युम सर्किट ब्रेकर पूर्ववत सुरू करण्याचा प्रयत्न अधिकाऱ्यांनी केला, मात्र ते सुरू होत नव्हते. याची तात्काळ माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांना देण्यात आली. अशाप्रसंगी ४६ प्रवाशांना स्टेशनवर सुरक्षित आणण्यात आले. मंगळवारी घेतलेली महामेट्रोची मॉक ड्रील यशस्वी ठरली.घटनेचा तपशील जाणून घेताच वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दुसरे पँटोग्राफ उभारण्याचे व व्हॅक्युम सर्किट ब्रेकर बंद करण्याचे आदेश अधिकाऱ्यांना दिले. त्यानंतर लगेच दुसरे पँटोग्राफ उभारण्यात आले, मात्र तरीही व्हॅक्युम सर्किट ब्रेकर बंद होत नव्हते. याची माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांना देण्यात आली व प्रवाशांना रेल्वेतून बाहेर काढण्याची परवानगी घेतली.प्रवाशांना गाडीतून बाहेर काढण्याची घोषणा करण्याचे निर्देश ट्रेन ऑपरेटरला देण्यात आले. प्रवाशांना गाडीतून बाहेर काढण्याच्या आधी व्हायाडक्टवरचे लाईट सुरूकरण्यात आले. तसेच ट्रेन ऑपरेटरला आपातकालीन दार उघडण्याचे आदेश देत प्रवाशांना सुरक्षित बाहेर काढण्यात आले. त्यानंतर साऊथ एअरपोर्ट स्टेशनच्या कंट्रोलरला याची माहिती देण्यात आली. रेल्वेतून सर्व ४६ प्रवाशांना बाहेर काढल्यानंतर सर्वांना साऊथ एअरपोर्ट मेट्रो स्टेशनकडे जाण्याची सूचना दिली. दोन दिव्यांग नागरिकाला स्ट्रेचरवरून नेण्यात आले. शेवटी सर्व प्रवासी एअरपोर्ट मेट्रो स्टेशनवर आल्याची माहिती या स्टेशन कंट्रोलरने सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिली. रिकामी रेल्वे डेपोला पाठविण्यात आली.प्रवासादरम्यान ट्रेन बंद पडल्यास प्रवाशांना पुढच्या स्टेशनवर सुरक्षित आणण्यासाठी कशा प्रकारच्या योजना कराव्यात, यासाठी मॉक ड्रीलचे आयोजन करण्यात आले. संपूर्ण मॉक ड्रील यशस्वीरीत्या केवळ २० मिनिटात पूर्ण झाली. मॉक ड्रील पूर्ण झाल्याची सूचना सर्व संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आली.बुधवारपासून दर १५ मिनिटांनी मेट्रोमहामेट्रोतर्फे बुधवार, २७ नोव्हेंबरपासून वर्धा मार्गावर सीताबर्डी इंटरचेंज ते खापरी दरम्यान (रिच-१) ताशी ८० किमी वेगाने दर १५ मिनिटांनी प्रवासी सेवा नागरिकांना उपलब्ध देण्यात येत आहे. सध्या केवळ २५ मिनिटात नागरिकांना सीताबर्डी इंटरचेंज ते खापरी इंटरचेंजदरम्यान प्रवास करता येत आहे. बुधवारपासून प्रवाशांच्या वेळेत बचत होणार आहे.

टॅग्स :Metroमेट्रोNAGPUR METRO RAIL CORPORATION LIMITEDनागपूर मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशन