शहरं
Join us  
Trending Stories
1
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
2
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
3
भरधाव बोलेरो कालव्यात कोसळली; ११ जणांचा गाडीतच मृत्यू, बाहेर येण्यासाठी धडपडत राहिले
4
पायी जाणाऱ्या दोघांना भरधाव कारने उडविले, दोघांचा जागीच मृत्यू; छत्रपती संभाजीनगरमधील घटना
5
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
6
खुशखबर! रक्षाबंधनपूर्वी RBI देणार मोठी भेट? कर्ज घेणाऱ्यांना दिलासा, तुमचा EMI होणार स्वस्त?
7
जिभेचे चोचले पडतील महागात! अल्ट्रा-प्रोसेस्ड फूडमुळे फुफ्फुसांच्या कॅन्सरचा धोका, रिसर्चमध्ये खुलासा
8
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
9
केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे नागपुरातील घर उडविण्याची धमकी, निनावी कॉलने सुरक्षायंत्रणांची धावपळ
10
सामाजिक न्याय विभागाचे ४१० कोटी लाडक्या बहिणींसाठी वळते : खोब्रागडे
11
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
12
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
13
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
14
कमाल झाली..! कुणाच्या स्वप्नातही नाही आली; ती गोष्ट टीम इंडियातील या तिघांनी सत्यात उतरवली
15
मालेगाव २००८; बॉम्बस्फोटातील तपासात एटीएस आणि एनआयएचा विरोधाभास 
16
सात महिन्यांत अक्षय कुमारने ११० कोटींची मालमत्ता विकली, कुठे किती रुपयांना केली विक्री? जाणून घ्या
17
महिलांसाठी मोठी संधी! LIC ची नवी योजना, फक्त ‘हे’ काम करा आणि दरमहा ७,००० रुपये कमवा!
18
भारतीय शेतकरी चुकून गेला पाकिस्तानात; न्यायालयाने सुनावली तुरुंगवासाची शिक्षा, वडील म्हणतात....
19
सरकारचा पैसा आहे, आपल्या बापाचं काय जातंय? संजय शिरसाटांचे विधान; सुप्रिया सुळे म्हणाल्या, "इशारा देऊन पण..."
20
कुलगाममध्ये तिसऱ्या दिवशीही चकमक सुरू; आतापर्यंत तीन दहशतवादी ठार, या वर्षातील सर्वात मोठी कारवाई

"पीएचडी करुन काय दिवा लावणार?"; विधिमंडळात अजित पवार रोखठोक, विद्यार्थी संतप्त

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 13, 2023 11:30 IST

सारथी संस्थेच्या माध्यमातून मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक सुविधा दिल्या जातात.

नागपूर/मुंबई - मराठा समाजातील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक सुविधांसाठी सरकारने सारथी ही संस्था सुरू केली. या संस्थेच्या माध्यमातून मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी आर्थिक मदत केली जाते. त्याच अनुषंगाने आमदार सतेज पाटील यांनी हिवाळी अधिवेशनात विधिमंडळात प्रश्न उपस्थित केला होता. मात्र, या प्रश्नावर उत्तर देताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रतिप्रश्न केला आणि, पीएचडी करुन पोरं काय दिवे लावणार आहेत? असा सवाल केला. अजित पवारांचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून पीएचडीधारक विद्यार्थ्यांची नाराजीही दिसून येत आहे. 

सारथी संस्थेच्या माध्यमातून मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक सुविधा दिल्या जातात. यातच पीएचडी करण्यासाठी शिष्यवृत्तीसुद्धा दिली जाते. मात्र, ती केवळ २०० विद्यार्थ्यांना दिली जाते. ही संख्या वाढविण्यात यावी, अशी मागणी आमदार सतेज पाटील यांनी विधान परिषदेत केली. त्यासंदर्भात, अजित पवारांनी उत्तर दिलं होतं. राज्यात होत असलेल्या पीएचडींपैकी खरंच किती पीएचडींची आपल्याला गरज आहे? संख्या वाढवून काय करणार? पीएचडी करून पोरं काय दिवे लावणार? असं अजित पवार म्हणाले. विशेष म्हणजे अजित पवारांच्या विधानावर सभागृहातील काही प्रमाणात हशा पिकल्याचं ऐकायलं मिळालं. 

अजित पवार म्हणाले, ''अनेक ठिकाणी सारथी, महाज्योती आणि बार्टी अशा वेगवेगळ्या प्रकारच्या आपल्या संस्था आहेत. या संस्थांमध्ये आम्हाला फेलोशीप, पीएचडीसाठी शिष्यवृत्ती द्या, प्रवेश द्या, निधी द्या, अशा मागण्या होत आहेत. मात्र, ही संख्या एवढी वाढली की, एवढ्या मुलांची पीएचडी खरंच गरजेची आहे का, अशी चर्चा कॅबिनेटमध्ये झाल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधानसभेत सांगितले. कॅबिनेटमधील चर्चेनंतर आम्ही सगळ्यांनी निर्णय घेतला की मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमायची आणि त्यांनी या समितीन निर्णय घ्यायचा. त्यानुसार, पीएचडीसाठी सारथीला २०० विद्यार्थ्यांची संख्या तर परदेशी शिष्यवृत्तीसाठी ७५ विद्यार्थ्यांची संख्या असेल, असे अजित पवारांनी स्पष्ट केले. 

काय दिवे लावणार?

दरम्यान, यावेळी फेलोशीपसाठी विद्यार्थी संख्या २०० केल्यावर आक्षेप घेत आमदार सतेज पाटील यांनी हा निर्णय पुढच्या वर्षापासून लागू करावा. कारण, या फेलोशीपसाठी १३२९ विद्यार्थ्यांनी अर्ज केला होता, ते सर्वजण फेलोशीपच्या आशेवर आहेत, असे पाटील यांनी निदर्शनास आणून दिले. त्यावर, अजित पवार यांनी, फेलोशील करुन ते काय करणार आहेत? असा सवाल केला. त्यावर, फेलोशीप घेऊन ते विद्यार्थी पीएचडी करतील असेही पाटील यांनी म्हटले. त्यावर, अजित पवार यांनी रोखठोक प्रतिप्रश्न केला आणि पीएचडी करुन काय दिवा लावणार आहेत, असा सवाल केला.

टॅग्स :Ajit Pawarअजित पवारSatej Gyanadeo Patilसतेज ज्ञानदेव पाटीलnagpurनागपूरEducationशिक्षण