शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदीचे दोन्ही जीआर रद्द, त्रिभाषा सूत्राचा निर्णय घेण्यासाठी नवी समिती स्थापन
2
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
3
एअर इंडियाच्या विमानात समस्या, टोकियोहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचे कोलकात्यात इमरजन्सी लँडिंग
4
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
5
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
6
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
7
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
8
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले
9
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
10
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
11
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
12
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...
13
"कुठल्या तोंडाने आंदोलन करता हे राज ठाकरेंनी उद्धव यांना विचारलं पाहिजे"; CM फडणवीसांची टीका
14
कर्नाटकात मोठी 'उलथापालथ' होणार, आता 'हा' बडा नेता मुख्यमंत्री बनणार? आमदारानंच बोलता-बोलता 'लिक' केला काँग्रेसचा 'बिग प्लॅन'!
15
आमिर खानने नाकारलं अंडरवर्ल्ड पार्टीचं निमंत्रण, घाबरलं कुटुंब, म्हणाला - "मला जसं जगायचंय तसं... "
16
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
17
Shefali Jariwala Death: अँटी एजिंग औषधं बनलं मृत्यूचं कारण? शेफाली जरीवाला प्रकरणात मोठा खुलासा
18
"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..."
19
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
20
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा

भारतीय सैन्य ताकदवर असताना झुकण्याची काय गरज होती? विजय वडेट्टीवार यांचा सवाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 14, 2025 11:17 IST

Nagpur : पंतप्रधान यांच्या भाषणात निराशा आणि हतबलता दिसली

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : भारत अमेरिकेपुढे का झुकला, हा प्रश्न विचारला जात आहे. निवडणुकापूर्वी सत्तेत येण्यापूर्वी ज्या ताकदीने पंतप्रधान नरेंद्र मोदी बोलले, त्याच पद्धतीने बोलावे, अशी अपेक्षा भारतीयांची होती. जनतेत विश्वासावरून विश्वासघाताची भावना वाढायला लागली आहे. भारतीय सैन्य इतके ताकदवर असताना झुकण्याची काय गरज होती, असा सवाल काँग्रेसचे गटनेते विजय वडेट्टीवार यांनी केला.

मंगळवारी नागपुरात पत्रकारांशी बोलताना वडेट्टीवार म्हणाले, पंतप्रधान वारंवार भाषणात पाकिस्तानचे नाव घेत होते त्या चिल्लर देशाला एवढा भाव देण्याची गरज होती. पंतप्रधानांचे भाषण अमेरिकेला इशारा देणारे असायला हवे होते. पंतप्रधान मोदी यांच्या भाषणात अमेरिकेपुढे आम्ही झुकणार नाही, असे वाक्य आले असते तर बरे वाटले असते. आधी ट्रम्पचे भाषण झाले. त्यानंतर पंतप्रधान मोदी यांचे भाषण झाले. आपण पाकिस्तानात घुसायला पाहिजे. आपले सैन्य ताकदवर आहे. सैन्यांना अधिकार दिले होते त्यावर त्यांनी ठाम राहायला पाहिजे होते. परंतु पंतप्रधान यांच्या भाषणात निराशा आणि हतबलता दिसली, अशी टीका त्यांनी केली. फळबागा भाजीपाला धान नुकसान झाल्यामुळे शेतकऱ्यांचे कंबरडे मोडलेले आहे. तातडीने मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांनी पंचनामे करून नुकसानभरपाई घोषित करावी. नैसर्गिक आपत्तीत एनडीआरएफ आणि एचडीआरएफच्या निकषाप्रमाणे केंद्राकडे मागणी करून मदत मिळवून शेतकऱ्यांना द्यावी, अशी मागणी वडेट्टीवार यांनी केली.

टॅग्स :Vijay Vadettiwarविजय वडेट्टीवारOperation Sindoorऑपरेशन सिंदूरnagpurनागपूर