शहरं
Join us  
Trending Stories
1
"दहशतवाद्यांनी कल्पनाही केली नसेल त्यापेक्षा कठोर शिक्षा देणार"; बिहारमधून PM मोदींचा इशारा
2
फ्राईड राईसमध्ये जास्त पडलेल्या मीठानं जीव वाचवला; पहलगाम हल्ल्यातील पीडितांनी सांगितली आपबीती
3
कधीपर्यंत धर्म सांगून गोळ्या खात राहायच्या?; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद काय बोलले?
4
पत्नीच्या नावे Post Office मध्ये ₹१,००,००० ची FD केल्यास २ वर्षांनी किती परतावा मिळेल, पाहा कॅलक्युलेशन
5
काश्मीरमध्ये तणाव असतानाच छत्तीसगडमध्ये नक्षलवाद्यांवर मोठी कारवाई, १००० नक्षल्यांना जवानांनी घेरले, ५ ठार  
6
पहलगाम दहशतवादी हल्लाः पाकिस्तानी उच्चायोगात मागवण्यात आला केक; बॉक्स पाहून एकच प्रश्न, हे 'सेलिब्रेशन' कसलं?
7
पाकिस्तान पुरता अडकणार? पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा एक निर्णय अन् शेअर बाजार धडाम
8
Elphinstone Bridge: तारीख निश्चित! एल्फिन्स्टन ब्रिज २५ एप्रिलपासून वाहतुकीसाठी बंद, मुंबईकरांची कोंडी होणार
9
डोळ्यात अश्रू, कपड्यांवर रक्ताचे डाग..! दहशतवादी हल्ल्यात डोळ्यादेखत वडिलांना गमावलेल्या लेकीनेच केले अंत्यसंस्कार
10
IPL 2025: दिल्ली कॅपिटल्सचा युवा स्टार म्हणतो- "मला टीम इंडियाकडून खेळायचंय, पण..."
11
Pahalgam Terror Attack : "माझ्या शुभमला परत आणा, मी माझं दुःख कोणाला सांगू, त्याने कोणाचं काय नुकसान केलं होतं?"
12
या सरकारी बँकेनं सुरू केलं लोन कॅम्पेन; कमी व्याजदर आणि शून्य चार्जेसवर मिळणार कर्ज, अखेरची तारीख कधी?
13
पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर खेळाडूही संतापले! सचिन तेंडुलकर ते नीरज चोप्रा.. कोण काय म्हणाले?
14
मुलगी झाली हो..! ; अभिनेता चिराग पाटील दुसऱ्यांदा झाला बाबा, पोस्ट शेअर करत दिली खुशखबर
15
Indus Waters Treaty: ६५ वर्षे जुना सिंधू पाणी करार काय आहे? पाकिस्तानवर किती परिणाम होईल?; वाचा सविस्तर
16
"मला पहलगाम दहशतवादी हल्ल्याबद्दल आधीच माहित होतं"; 'त्या' व्यक्तीचा पोलिसांना फोन अन्...
17
मोठा खुलासा! लेफ्टनंट विनयने दोन दहशतवाद्यांना पकडलेले; नौदलाचा अधिकारी धारातीर्थी पडला
18
"तुला ठार मारू’’, भारतीय क्रिकेट संघाचा प्रशिक्षक गौतम गंभीरला दहशतवादी संघटनेकडून धमकी
19
‘जीव वाचवण्यासाठी आम्ही…’मृत गनबोटेंच्या पत्नीने शरद पवारांना सांगितला अंगावर काटा आणणारा अनुभव
20
दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबियांना इन्शुरन्स क्लेम मिळतो का? काय आहेत विमा नियम?

उद्योग गेल्याचे वडेट्टीवार यांना कुठल्या सुत्रांनी सांगितले

By कमलेश वानखेडे | Updated: September 19, 2024 16:56 IST

उद्योगमंत्री उदय सामंत यांचा टोला : विभागाकडे अशी कुठलिही नोंद नाही

नागपूर : विदर्भात किती उद्योग आले याकडे कदाचित विरोधी पक्षनेते वडेट्टीवार यांचे लक्ष नसावे. पूर्व आणि पश्चिम विदर्भात अनेक प्रकल्प, उद्योगांना आणण्यात सरकार यशस्वी झालेले आहे. कुठल्या सुत्रांनी त्यांना उद्योग गेल्याची माहिती दिली, असा सवाल करीत उद्योग मंत्री उदय सामंत यांनी वडेट्टीवार यांना टोला लगावला. उद्योग मंत्री म्हणून आपल्याकडे अशी कुठेही नोंद नाही. प्रधान सचिव यांच्याकडून माहिती घेण्यासाठी सूचना दिल्या आहेत, असेही त्यांनी स्पष्ट केले.

गुरुवारी नागपुरात पत्रकारांशी बोलताना उद्योगमंत्री सामंत म्हणाले, देशातील पहिला सेमीकंडक्टर उद्योगाचे उद्घाटन मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्या उपस्थितीत झाले. परकीय गुंतवणुकीमध्ये मागील काळात मागे असलेला महाराष्ट्र सगळ्यांना मागे टाकून आता पुढे चाललेला आहे. महाराष्ट्र विदेशी गुंतवणुकीत एक नंबरवर आहे आणि राहील, असा दावा त्यांनी केला.

बेताल वक्तव्य करणाऱ्यांनी संयम ठेवावा

बेताल वक्तव्य करणाऱ्यांनी संयम ठेवला पाहिजे. महायुती म्हणून निवडणुकीला समोर जाताना आपली मते कमी होणार नाही, प्रत्येक पक्षाच्या घटक पक्षाच्या सगळ्यांनी याची काळजी घेतली पाहिजे, असा सल्ला सामंत यांनी दिला.

तिकीट वाटप सन्मान जनक होईलमहायुतीतील तिकीट वाटप सन्मान जनक होईल. सन्मान जनकचा आकडा किती असेल यावर बोलणे मात्र उदय सामंत यांनी टाळले. तिसऱ्या आघाडीच्या शक्यतेबाबत विचारणा केली असता ते म्हणाले, कुठली आघाडी झाली तरी महाविकास आघाडीचा पराभव अटळ आहे. दोन महिन्यानंतर मी जेव्हा नागपूरला येईल तेव्हा महायुतीचा सरकार सत्तेत आलेले असेल. सगळ्यांना स्वतंत्र निर्णय घेऊन आघाडी करण्याचे अधिकार आहे.

शरद पवारांचे एका दगडात तीन पक्षी...मुख्यमंत्री कोण या विषयावर पंधरा दिवसापूर्वी शरद पवार महत्त्वाचे बोलले. त्यांनी एका दगडात तीन पक्षी मारलेले आहेत. महाविकास आघाडीच्या नेत्यांनी भानावर यावे. संख्याबळ असल्यावरच मुख्यमंत्री कोण होईल हे ठरवता येईल. निवडून आल्यानंतर कोण मुख्यमंत्री हे ठरवू, असे त्यांनी स्पष्ट केले आहे.

टॅग्स :Vijay Vadettiwarविजय वडेट्टीवारUday Samantउदय सामंतnagpurनागपूर