शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात पाचव्या टप्प्यातील १३ लोकसभा मतदारसंघात अंदाजे ५४.३३ टक्के मतदान  
2
भगवान जगन्नाथ मोदींचे भक्त; संबित पात्रांच्या वक्तव्याने नवा वाद, विरोधकांनी BJP ला घेरले...
3
इराणमधील सत्तासंघर्षामधून इब्राहीम रईसींचा बळी? खोमेनींच्या मुलावर संशय, इराणमध्ये चर्चांना उधाण
4
Narendra Modi : "राजपुत्र उघडपणे सांगत आहेत..."; राहुल गांधींच्या जुन्या Video चा उल्लेख करत मोदींचा घणाघात
5
उत्तर प्रदेशमध्ये बनावट मतदान, अनेक खुलासे; २५ मे रोजी होणार पुन्हा मतदान
6
लोकसभा निवडणुकीदरम्यान बीड आणि बारामतीमध्ये बोगस मतदान, शरद पवारांचा गंभीर आरोप  
7
भोंगळ कारभार! मतदान करता न आल्यानं कलाकार संतापले; सांगितलं नेमकं काय घडलं
8
‘ही लढाई संपलेली नाही, तर आता खरी सुरुवात झालीय’, जयंत पाटील यांचं शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांना भावूक पत्र 
9
सॅमसंगची मोठी घोषणा! तुम्ही तुमचा फुटलेला किंवा खराब झालेला फोन वर्षातून दोनदा दुरुस्त करू शकता
10
"उद्धव ठाकरे यांनी नेहमीप्रमाणे त्यांचे रडगाणे सुरु केले आहे"; देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
11
‘...हा तर अरविंद केजरीवाल यांच्या हत्येचा कट’, ‘आप’चा PMO वर सनसनाटी आरोप
12
... म्हणूनच काँग्रेसवाले आमच्या वाहनांवर हल्ले करतायत; कंगना यांचा गंभीर आरोप
13
प्लेऑफमध्ये KKR विरुद्ध SRHचं पारडं जड, अशी आहे आकडेवारी, थेट फायनल गाठणार की…
14
पंतप्रधान नेतन्याहू आणि हमास प्रमुखांना अटक होणार? ICC अटक वॉरंट जारी करण्याच्या तयारीत
15
मुंबईकर आजोबांना सलाम! नाकात नळी, मतदानाला आले, ओळखपत्र विसरले; पुढे...
16
जिथे शिवसेनेचं मतदान आहे, तिथे...; निवडणूक आयोग भाजपाची चाकरी करत असल्याचा उद्धव ठाकरेंचा आरोप
17
निवडणूक आयोगाच्या नियोजनावर भाजपाही संतापली; "मतदारांचे हाल दुर्दैवी, यातून..."
18
लोकसभेची उमेदवारी घेऊन वायकरांनी आपली अटक टाळली; गजानन कीर्तीकरांचा खळबळजनक दावा
19
"जे लोक मतदान करणार नाहीत त्यांना..."; अभिनेते परेश रावल यांनी मांडली रोखठोक भूमिका
20
अमेरिका, कॅनडा, अरब देशातून AAP ला अवैध फंडिग; ED नं गृह मंत्रालयाला सोपवला रिपोर्ट

कन्हानचे पाणी बोगद्याद्वारे तोतलाडोहला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 28, 2019 12:30 AM

मध्यप्रदेशातील चौराई धरणामुळे महाराष्ट्रातील पेंच प्रकल्पासंबंधात निर्माण झालेल्या गंभीर पाणीटंचाईवर मात करण्यासाठी कन्हान नदीतील १० दलघमी पाणी बोगद्याद्वारे तोतलाडोह जलाशयात वळविण्यात येणार आहे. यासाठी तब्बल २ हजार ८६४ कोटी रुपयांच्या प्रस्तावाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत मंत्रिमंडळाने गुरुवारी मंजुरी दिली. नागपूर व भंडारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी वरदान ठरणारा हा ऐतिहासिक निर्णय असून नागपूर शहराची पिण्याच्या पाण्याची समस्या कायमस्वरूपी निकाली निघणार आहे.

ठळक मुद्दे२८६४ कोटींच्या प्रस्तावाला मुख्यमंत्र्यांची मंजुरीपालकमंत्री बावनकुळे व आमदारांच्या प्रयत्नांना यशनागपूरचा पिण्याच्या पाण्याचा व सिंचनाचा प्रश्न मिटणार

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : मध्यप्रदेशातील चौराई धरणामुळे महाराष्ट्रातील पेंच प्रकल्पासंबंधात निर्माण झालेल्या गंभीर पाणीटंचाईवर मात करण्यासाठी कन्हान नदीतील १० दलघमी पाणी बोगद्याद्वारे तोतलाडोह जलाशयात वळविण्यात येणार आहे. यासाठी तब्बल २ हजार ८६४ कोटी रुपयांच्या प्रस्तावाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत मंत्रिमंडळाने गुरुवारी मंजुरी दिली. नागपूर व भंडारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी वरदान ठरणारा हा ऐतिहासिक निर्णय असून नागपूर शहराची पिण्याच्या पाण्याची समस्या कायमस्वरूपी निकाली निघणार आहे.जलसंपदा विभागातर्फे मध्यप्रदेशातील लोहघोगरी गावाजवळून कन्हान नदीतून हा बोगदा तयार केला जाणार आहे. पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे व या भागातील आमदारांनी दीर्घ काळापासून ही मागणी केली होती. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी जलसंधारण मंत्री असताना या प्रश्नाची दखल घेत बैठकाही घेतल्या होत्या. सातत्याने पाठपुरावा केला होता. शेवटी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीयावर निर्णय घेत दिलासा दिला आहे.सन २०१६-१७ मध्ये मध्यप्रदेश सरकारने चौराई धरणाचे बांधकाम पूर्ण केले. त्यामुळे पेंच नदीवरील तोतलाडोह धरणात पाणी येणे कमी झाले आहे. तेव्हापासून नागपूर व भंडारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पाणी मिळेनासे झाले व नागपूर शहराला पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण झाली होती. चौराई धरणामुळे महाराष्ट्राच्या वाट्याला येणाऱ्या ६१४ दलघमी पाण्यात घट झाली. १९६४ च्या पाणी वापरासाठी करण्यात आलेल्या आंतरराज्यीय पाणी वापर करारानुसार मागील ४० वर्षात महराष्ट्राला १८४० दलघमी पाणी मिळवयास हवे होते. ते फक्त १२९४ दलघमी मिळाले. चौराई धरण होईपर्यंत गेल्या २५ वषार्पासून नागपूर जिल्ह्यातील तोतलाडोह धरणात येणाऱ्या सर्व पाण्याचा वापर होत होता. त्यातून नागपूर शहरासाठी पाणीपुरवठा योजना व सिंचनासाठी मुबलक पाणी उपलब्ध होते. पण आता त्यात ६१४ दशलक्ष घनमीटरची तूट निर्माण झाली आहे.चौराई धरण मध्य प्रदेशात बांधण्यात आल्यामुळे पूर्वी प्राप्त होणाऱ्या ४२.७ टीएमसीपैकी फक्त २७ टीएमसी पाणी महाराष्ट्राच्या तोतलाडोह येथे उपलब्ध होत होते. ही तफावत भरून काढण्यासाठी २५ ऑक्टोबर २०१६ रोजी गठित समितीच्या शिफारशीनुसार व शेतकऱ्यांच्या मागणीनुसार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गंभीर पाणी टंचाई परिस्थितीवर मात करण्यासाठी कमी कालावधी व दीर्घ कालावधीत पूर्ण होऊ शकणाऱ्या उपाययोजना करण्याचे निर्देश दिले. गेल्या ३० मे २०१९ च्या शासन निर्णयानुसार मंजूर योजनांची कामे पूर्ण झाल्यानंतर ११८ दलघमी पाण्याची तूट भरून निघणे अपेक्षित आहे. पण नागपूर शहराची २०२५ पर्यंत लोकसंख्येतील वाढ लक्षात घेता पिण्याच्या पाण्याची मागणी २५० ते ३०० दलघमी होणे अपेक्षित आहे. त्यामुळे मंजूर उपाययोजना पूर्ण झाल्यानंतरही मनपाच्या पिण्याच्या पाण्याची आवश्यकता व एक लाख चार हजार हेक्टर सिंचन होणे कठीण होते.६२ किमीचा असेल बोगदानागपूरजवळील जामघाट प्रकल्प आर्थिकदृष्ट्या व मोठ्या प्रमाणात लागणाऱ्या वन जमिनीमुळे अव्यवहार्य ठरला आहे. यामुळे लोहघोगरी गावाजवळ वळण बंधारा बांधून बोगद्याद्वारे कन्हान नदीचे पाणी तोतलाडोह धरणात वळवण्यात येणार आहे. या बंधाऱ्याची लांबी १६० मीटर व उंची ५.५ मीटर राहणार आहे. तर बोगद्याची लांबी ६२ किमी राहणार आहे. या बोगद्याचा व्यास ६.९ मीटर असेल. १२.२६ हेक्टर वनजमिनी यासाठी लागणार असून १० दलघमी पाणी वळवण्यात येणार आहे.असा मिळेल निधीबोगद्याद्वारे तोतलाडोहमध्ये पाणी आणण्याच्या प्रकल्पाला सन २०१९-२० मध्ये ५८६ कोटी सन २०२०-२१ मध्ये ५७५ कोटी, २०२१-२२ मध्ये ५७४ कोटी, सन २०२२-२३ मध्ये ५७४ कोटी व सन २०२३-२४ मध्ये ५५४ कोटी रुपये मिळून २८६४ कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहे.असे आहेत फायदे

  •  जलसाठा १० दलघमीने वाढणार
  •  चौराई धरणामुळे निर्माण झालेली पाणीटंचाई दूर होणार
  •  नागपूरचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटणार
  •  पेंच प्रकल्पाच्या लाभ क्षेत्रात झालेली घट भरून निघण्यास या प्रकल्पामुळे मदत होईल.
  •  पाच वर्षात प्रकल्प पूर्ण होणार, एक लाख हेक्टर सिंचन वाढेल
  •  तोतलाडोह येथे कार्यान्वित असलेले जलविद्युत प्रकल्पातून सरासरी ९५ दशलक्ष युनिट वीज अधिक निर्माण होईल.
टॅग्स :Kanhan Riverकन्हान नदीDamधरणWaterपाणीChief Ministerमुख्यमंत्री