शहरं
Join us  
Trending Stories
1
Sonam Raghuvanshi: सोनम रघुवंशीला तीन दिवसांची पोलीस कोठडी; मेघालय पोलीस विमानाने गुवाहाटी, तिथून शिलाँगला नेणार
2
Apple WWDC 2025: अ‍ॅपल सुस्साट! आयओएस १८ वरून थेट २६ वर उडी; सर्वच आयफोनना लिक्विड ग्लास डिझाईन, लाईव्ह ट्रान्सलेशन अन् बरेच काही...
3
ग्रुप कॅप्टन शुभांशू शुक्लांचे उड्डाण एक दिवस लांबणीवर; खराब हवामानामुळे नासाचा निर्णय
4
कॅप्टन कूल महेंद्रसिंह धोनीचा मोठा सन्मान! ICC हॉल ऑफ फेममध्ये मिळालं स्थान
5
सांगलीत महापालिका उपायुक्त वैभव साबळे अटकेत; उंच इमारतीच्या बांधकाम परवान्यासाठी ७ लाखांची लाच मागितली
6
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
7
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
8
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
9
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
10
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
11
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
12
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
13
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
14
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
15
फ्रेंच ओपन जिंकणाऱ्या अल्काराझने एकट्यानं मिळवलं अख्ख्या RCB पेक्षा जास्त बक्षीस, पाहा किती?
16
पाकिस्तानवर कर्जाचा डोंगर आणखी वाढला! कर्ज आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर; आर्थिक सर्वेक्षणातून माहिती आली समोर
17
ISRO-NASA Gaganyaan Mission: शुभांशू शुक्ला अवकाशात रचणार इतिहास! १० जूनला होणारे उड्डाण कुठे पाहता येणार?
18
झालं... युपीआय 'बॅलन्स चेक'वर फांदी कोसळली; १ ऑगस्टपासून बंधने लादण्याची तयारी
19
पाकिस्तानला मदत करणाऱ्याला जशास तसं उत्तर; तुर्कीच्या कट्टर शत्रूची भारत ताकद वाढवणार, पण कशी?
20
सोनमने ज्याच्यासाठी राजा रघुवंशीला संपवलं, त्या राज कुशवाहाची संपत्ती किती? पगार किती होता?

मतदारांचे मत सुरक्षित नाही; नाना पटोले यांचा आरोप

By कमलेश वानखेडे | Updated: January 25, 2025 18:23 IST

Nagpur : ६० लाख मते कुठून वाढली

कमलेश वानखेडे, नागपूर लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : विधानसभा निवडणुकीत मतदानानंतर जारी झालेली आकडेवारी व मतदानाच्या दुसऱ्या दिवशी निवडणूक आयोगाने दिलेल्या आकडेवारीत तब्बल ६० लाख मतांची तफावत आहे. ही वाढीव मते कुठून आली याचे निवडणूक आयोगाने अद्याप उत्तर दिलेले नाही. मतदारांचे मत सुरक्षित नाही, असे चित्र निर्माण झाले असून निवडणूक आयोग लोकशाहीचा खून करीत आहेत, अशी टीका काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांनी केली.

पटोले शनिवारी नागपुरात पत्रकारांशी बोलताना म्हणाले, काँग्रेसने देशभरात २५ जानेवारी रोजी मतदार दिन साजरा केला. मतदाराला जागृत करण्याचा हा एक प्रयत्न आहे. मतदानाच्या दिवशी सायंकाळी ६ नंतर तब्बल ७६ लाख मतदान झाले. एवढे मतदान कुठल्या बूथवर झाले याची माहिती आयोग द्यायला तयार नाही. निवडणूक आयोग कोणासाठी काम करताे हे स्पष्ट झाले आहे. या विरोधात आता आम्ही सर्वोच्च न्यायालयात जाऊ, असेही त्यांनी सांगितले. सरकार सांगते की बांगलादेशी मतदारांनी फायदा घेतला, तर मग पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारने बांगलादेशी मतदारांना भारतात आणले का, असा सवाल पटोले यांनी केला. नागपूरच्या अधिवेशनात यावर प्रश्न निर्माण झाला तेव्हा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे निवडणूक आयोगाची वकिली करत होते, अशी टीका पटोले यांनी केली.

बावनकुळे यांना अडचण काय?

आम्ही निवडणूक आयोगाला प्रश्न विचारतो तर चंद्रशेखर बावनकुळे यांना का त्रास होतो, असा सवाल करीत वेळ ताकदवर असते, आज त्यांचा दिवस आहे, उद्या आमचा दिवस असेल, असा इशाराही त्यांनी दिला. भाजपची सदस्यत्वासाठी मिस कॉल सिस्टिम आहे. विधानसभेत उमेदवारीसाठी काँग्रेसकडे सर्वांत जास्त अर्ज आले होते. भाजपचे लोकही तिकीट मागायला आमच्याकडे आले होते, असा दावाही पटोले यांनी केला.निवडणुका लागणार का?उद्धव ठाकरे यांनी एकला चलोची भूमिका सांगितली. आम्ही त्यांचे स्वागत केले. यावर शरद पवार यांनीही भूमिका मांडली आहे. मुळात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लागतील का, हा प्रश्न आहे. आधी निवडणूक लागू द्या मग आम्ही कसं लढायचे ते ठरवू, असेही पटोले यांनी सष्ष्ट केले. मी प्रदेश अध्यक्षपद सोडले आहे. मी हायकामांडला सांगितले आहे, असेही पटोले यांनी स्पष्ट केले. 

टॅग्स :Nana Patoleनाना पटोलेnagpurनागपूर