शहरं
Join us  
Trending Stories
1
११ वर्षांच्या कार्यकाळात भारत बनला सर्वाधिक वेगाने वाढलेली अर्थव्यवस्था
2
निकोलस पूरनचा अवघ्या २९व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम, तडकाफडकी निवृत्तीची घोषणा
3
राशीभविष्य, १० जून २०२५: शुभ प्रसंगाचा बेत आखाल, चांगली बातमी मिळेल, दिवस आनंदी जाईल!
4
राजा रघुवंशीच्या अंत्यसंस्काराचा धक्कादायक व्हिडीओ; राज कुशवाह सोनमच्या वडिलांना देत होता आधार
5
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
6
विद्यार्थिनीला कॉलेजातून काढण्याचा आदेश रद्द; हायकोर्ट म्हणाले, निर्णय एकतर्फी, ऑपरेशन सिंदूरदरम्यान केली होती पोस्ट
7
'सिंदूर'मध्ये खुलला देशभक्तीचा रंग; औषधी वनस्पती, नर्सरीमध्ये रोपांची मागणी वाढली
8
लॉस एंजेलिसमध्ये परिस्थिती चिघळली; ट्रम्प प्रशासनाने कॅलिफोर्नियाच्या रस्त्यांवर उतरवले ७०० मरीन कमांडो
9
तैवानच्या कंपन्या महाराष्ट्राबाहेर, फॉक्सकॉन इतर राज्यात, सेमिकंडक्टर कंपन्याही इतरत्र
10
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
11
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
12
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
13
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
14
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
15
हा सदोष मनुष्यवधच!
16
विजयाचा बेहोश उन्माद चेंगराचेंगरीत का मृत्यू पावतो?
17
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
18
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
19
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु

विष्णू मनोहरांनी बाप्पासाठी तयार केला ३००० किलोचा महाप्रसाद; उपमुख्यमंत्र्यांनीही लावला हातभार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 8, 2022 15:24 IST

नागपुरात एकाच कढईत बनवला तीन हजार किलोचा महाप्रसाद

नागपूर : सुग्रास व्यंजन बनविण्यासाठी ओळखले जाणारे विश्वविक्रमधारी शेफ विष्णू मनोहर यांनी साऱ्यांचेच आराध्य असलेल्या बाप्पासाठी तब्बल ३ हजार किलोचा प्रसाद तयार केला आणि त्याचे वितरण केले. त्यांच्या या प्रसाद बनविण्याच्या उपक्रमाला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हजेरी लावली आणि कढईमध्ये प्रसादाची सामग्री टाकण्यासोबतच डाव सुद्धा फिरवला.

श्रीगणेशोत्सवाच्या पर्वावर शेफ विष्णू मनोहर यांनी बाप्पासाठी अडीच हजार किलोचा चना डाळीचा प्रसाद तयार करण्याची आणि वितरित करण्याची घोषणा केली होती. त्यानुसार बुधवारी उत्तर अंबाझरी मार्गावरील अमृतभवन येथे सकाळी ९ वाजतापासूनच तयारी सुरू झाली. चुलीवर कढई चढवण्यास सुरुवात झाली आणि दुसरीकडे प्रसिद्ध भजन गायक कमलेश पांडे यांचे सुरेल स्वर बाहेर पडू लागले. प्रसाद आणि गायनाची जणू जुगलबंदीच सुरू झाली. यावेळी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, माजी महापौर दयाशंकर तिवारी, आ. ॲड. अभिजित वंजारी, आ. विकास ठाकरे, जिल्हाधिकारी विपिन इटनकर आदींनी भेट देत प्रसाद बनविण्याच्या उपक्रमात आपला सहभाग दर्शवला.

या प्रसादासाठी सुमारे दीड हजार किलोची विशेष कढई ठेवण्यात आली होती. त्यात ६५० किलो चना डाळ, १०० किलो शेंगदाणे, १५० किलो खाण्याचे तेल, ८० किलो आले, १०० किलो कोथिंबिर व कढीपत्ता, ४० किलो धने पुड, १५ किलो जिरे, १० किलो गरम मसाला, २५ किलो मिठ, ५० किलो चिंच, २५ किलो गूळ, १० किलो हळद, १५ किलो तिखड, २ किलो हिंग व एक हजार लिटर पाणी अशी सामग्री वापरण्यात आली. अशा सगळ्या सामग्रीअंती प्रसादाचे वजन अडीच हजार किलोवरून तीन हजार किलोवर गेले.

प्रसाद तयार होत असताना सभागृहाबाहेर ढोल-ताशा पथकाच्या वादनाने वातावरण निर्मितीही केली होती. प्रसाद तयार होताच गणपती बाप्पाचा जयघोष करण्यात आला. आरतीनंतर प्रसादाचे वितरण करण्यात आले आणि मोठ्या संख्येने नागरिक भक्तांनी प्रसादाचा आस्वाद घेतला.

टॅग्स :Socialसामाजिकfoodअन्नGaneshotsavगणेशोत्सवVishnu Manoharविष्णु मनोहरDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसnagpurनागपूर