शहरं
Join us  
Trending Stories
1
समीर वानखेडे यांना झटका! आर्यन खानच्या शोवरील मानहानी खटल्यात सुनावणी, कोर्ट काय म्हणाले..
2
टाटाने Nexon EV विकल्या पण स्पेअर पार्टच मिळत नाहीत...; चार्जिंग गन जोडतात तेच अ‍ॅक्च्युएटर फॉल्टी
3
मारुती सुझुकीने रचला इतिहास; फोर्ड, जीएम, फोक्सवॅगनला पछाडत ठरली जगातील ८वी सर्वात मौल्यवान ऑटो कंपनी
4
गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड! पाहा ११ कोटी रुपयांच्या १० किलो सोन्याच्या 'दुबई ड्रेस'चे खास फोटो
5
लक्ष्मी मित्तल यांनी दिल्लीत केली या वर्षीची सर्वात मोठी प्रॉपर्टी डील, कितीला खरेदी केला बंगला?
6
आंधळं प्रेम! प्रियकरला भेटण्यासाठी ११०० किमीचा प्रवास करून मध्य प्रदेशला पोहोचली १८ वर्षांची मुलगी; पण पुढे काहीतरी भलतंच घडलं
7
जीएसटी २२ सप्टेंबरला घटला, अन् टर्म इन्शुरन्सचे हप्ते कंपन्यांनी चार दिवसांनी कमी केले; कारण काय...
8
पर्सनल लोन हवे आहे? 'ही' सरकारी बँक देत आहे सर्वात स्वस्त कर्ज, पहा टॉप बँकांचे दर आणि EMI
9
पाकिस्तानच्या पंतप्रधानांचा पुन्हा आंतरराष्ट्रीय अपमान! ट्रम्प यांनी व्हाईट हाऊसमध्ये बोलावून ताटकळत ठेवले
10
नवरात्री २०२५: नवरात्रीत 'या' शुभ मुहूर्तावर डोळे मिटून करा घर-गाडीची खरेदी; वस्तू लाभणारच!
11
हाय बीपी, थायरॉईड, फॅटी लिव्हर: एका बँक कर्मचाऱ्याची वेदनादायक कहाणी, सांगितलं का सोडावी लागली नोकरी?
12
ट्रम्प यांचा 'टॅरिफ बॉम्ब'! सन फार्मा-ल्यूपिनसह 'या' कंपन्यांचे शेअर्स आपटले; ३ लाख कोटींचे नुकसान
13
CM आदित्यनाथांचे कौतुक, PM मोदींनी गुंतवणुकदारांना सांगितले उत्तर प्रदेशात गुंतवणुकीचे फायदे; UPITS मध्ये काय बोलले?
14
"शंभर टक्के ओला दुष्काळ जाहीर झालाच पाहिजे", शिंदेंच्या आमदाराचीच सरकारकडे मागणी
15
'शबनम कांड' सारखंच प्रकरण! 'सावधान इंडिया' पाहिलं अन् फिल्मी स्टाईलनं मित्राला संपवलं; त्या तिघांमध्ये नेमकं काय झालं? 
16
"हिंदूंच्या मतांवर आमचं महायुती सरकार; आम्हाला कुणी गोल टोपी, दाढीवाल्याने मतदान केले नाही"
17
"बेबी, I Love You, जवळ ये ना..." विद्यार्थिनींना असे मेसेज पाठवणारा चैतन्यानंद मुंबईत लपलाय?
18
'मिशन शक्ती ५.०'चा धडाका! अवघ्या ३ दिवसांत १२ हरवलेल्या लोकांना शोधून काढले; योगी सरकारची पोलिसांना शाबासकी
19
प्रदूषणाने धोक्याची घंटा वाजवली! कार्बन उत्सर्जनात चीन नंबर १, भारत कितव्या क्रमांकावर? आकडेवारी पाहून बसेल धक्का
20
पीएम किसान योजनेत मोठा बदल! आता 'या' शेतकऱ्यांनाही मिळणार लाभ, २१ वा हप्ता कधी?

न्यायासाठी अख्खे गाव उतरले रस्त्यावर, नागपूरच्या कुडकुडत्या थंडीत मांडला ठिय्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2021 13:16 IST

या गावकऱ्यांच्या शेतजमिनी दहा वर्षांपूर्वी वेकोलीने अधिग्रहित केल्या होत्या. जमिनी अधिग्रहित करण्यासंदर्भात सर्व प्रक्रिया पार पाडल्यानंतर डब्ल्यूसीएलने हा प्रकल्प रद्द करण्याचा निर्णय घेतला.

ठळक मुद्देडब्ल्यूसीएलच्या विरोधात संविधान चौकात चिल्ल्यापिल्ल्यांसह गावकऱ्यांचे आंदोलन

नागपूर : शहरात सध्या गारठा चांगलाच वाढला आहे. अशात बल्लारपूर क्षेत्रातील राजुरा तालुक्यातील सुब्बई चिंचोलीतील विस्थापित झालेले ग्रामस्थ नागपुरात आले असून कापडाच्या पालाखाली गावातील तरुण, म्हातारी मंडळी व बायाबापड्या मुलाबाळांसह आपल्या मागण्यांच्या पूर्ततेसाठी संविधान चौकात ठिय्या ठोकून आहेत.

ऐन शेतीच्या हंगामात गाव, घर, शाळा सोडून १६० लोकांचा समूह आंदोलनात सहभागी आहे. न्याय मिळेपर्यंत आंदोलन टिकावे यासाठी पोटापाण्याची रसद गावातून आणली आहे. पाच दिवस आंदोलनाला झालीत, मात्र कुणी फिरकले नाही. १५ डिसेंबर रोजी प्रशासनाने बैठक बोलाविली आहे. बैठकीत तडजोड न झाल्यास आंदोलनाची आक्रमकता वाढून आमरण उपोषण करण्याचा निर्णय गावकऱ्यांनी घेतला आहे.

हे आंदोलनकर्ते चंद्रपूर जिल्ह्यातील राजुरा तालुक्यातील सुब्बई चिंचोली गावचे आहेत. या गावकऱ्यांच्या शेतजमिनी दहा वर्षांपूर्वी वेकोलीने अधिग्रहित केल्या होत्या. जमिनी अधिग्रहित करण्यासंदर्भात सर्व प्रक्रिया पार पाडल्यानंतर डब्ल्यूसीएलने हा प्रकल्प रद्द करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे २०५ प्रकल्पगस्त शेतकरी जमिनीचा मोबदला व करारानुसार १ सातबाऱ्यावर १ नोकरी मिळावी याच्या प्रतीक्षेत आहेत.

विशेष म्हणजे गावातील तरुणांचे डब्ल्यूसीएलमध्ये नोकरी लागेल या प्रतीक्षेत वय निघून गेले आहे. अधिग्रहणाची प्रक्रिया पूर्ण केल्याने शेतजमिनीची खरेदी-विक्री करता येत नाही. जमिनीवर कर्ज काढता येत नाही. जनसुविधेची कामे गावापर्यंत पोहोचत नाहीत. त्यामुळे न्याय मिळावा यासाठी हे गावकरी घरदार सोडून संविधान चौकात बसले आहेत.

हे आंदोलन बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टीचे चंद्रपूर जिल्हा महासचिव सुरेश पाईकवार यांच्या नेतृत्वात सुरू असून, आंदोलनात अरुण सोमलकर, रमेश चाफले, वैभव लारोकर, अनिल लोखंडे, जगदीश मारबते, रोशन गौरकर, अलका चौधरी, सुरेखा सोमलकर, आदींचा समावेश आहे.

- आंदोलकांच्या मागण्या

वेकोली बल्लारपूर क्षेत्रातील सुब्बई येथील चिंचोली रिकास्ट प्रकल्पातील २०५ प्रकल्पग्रस्तांना नोकरी देण्यात यावी.

वेकोलीने अधिग्रहित केलेल्या शेतजमिनीचा आर्थिक मोबदला प्रकल्पग्रस्तांना देण्यात यावा.

लाभार्थ्यांना रोजगाराकरिता वय मर्यादेमध्ये सात वर्षांची सवलत देण्यात यावी.

टॅग्स :agitationआंदोलनjobनोकरीFarmerशेतकरी